* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AS THE CO-EDITOR OF VAINATEY, V.S. PENNED DOWN HIS THOUGHTS THROUGH VARIOUS COLUMNS. SOME OF THOSE WRITINGS ARE CLUBBED UNDER THE HEADING ‘SAMUDRAMANTHAN’. TO CAST AWAY THE SHACKLES OF FOREIGN RULE, SYNERGIZED EFFORTS WERE NEEDED. THIS NEEDED AWAKENING AMONG ONE AND ALL. THE FIRST NEWSPAPER TO DO SO WAS ‘DARPAN’. IT WAS FOLLOWED BY MANY IN THE COMING DAYS. THE READERS NOW HAD AN OPPORTUNITY TO READ MORE ABOUT FREEDOM STRUGGLE. THEY ALSO GAINED INSIGHT FROM THIS READING. MOST OF THE NEWSPAPER WRITING WAS AIMED TO DO SO. KHANDEKAR WAS A REGULAR COLUMN-WRITER FOR VAINATEY. A FEW OF HIS COLUMNS LIKE ‘AGRALEKH’, ‘SAMUDRAMANTHAN’, ‘RAANFULE’, ‘PARICHAYACHI PARADI’, ‘TIPANE’ CONTAINED ALL-INCLUSIVE ARTICLES. MANY OF THESE ARE COMPILED UNDER THE TITLE ‘SAMUDRAMANTHAN’ NOW. HIS WRITING ALWAYS EXPRESSED TRUE AND HONEST CONCERN FOR THE COMMON PEOPLE. A TRUE VISIONARY, KHANDEKAR’S WRITING WAS A THOUGHTFUL RESULT OF HIS HIGH INTELLECT. READERS ALWAYS ACCEPTED IT WHOLE-HEARTEDLY.
वि. स. खांडेकर यांनी ते ‘वैनतेय’ साप्ताहिकाचे सहसंपादक असताना विविध सदरांच्या माध्यमातून जे विपुल लेखन केलं, त्यातील अग्रलेखांचा आणि ‘परिचयाची परडी’ या सदरातील लेखनाचा प्रस्तुत ‘वैनतेय’ या ग्रंथात अंतर्भाव केला आहे. अग्रलेखांमधून खांडेकरांनी शिक्षण, राष्ट्रीयता, अस्पृश्यता, न्याय, धर्म, संस्कृती, इतिहास, राजकारण, सहकार, अर्थशास्त्र, संप, संघटन, व्यक्तिगौरव, साहित्य, भाषा असा गोफ विणत `संपादक` म्हणून आपला व्यासंग सिद्ध केला आहे. खांडेकर अग्रलेखांत आपलं नुसतं मत नोंदवून थांबत नाहीत, तर समस्या-विमोचनाचे उपाय सुचवत, ते आपलं वृत्तपत्रीय उत्तरदायित्वही निभावतात. ज्याला पुस्तकपरिचय, परीक्षण, टीका, समीक्षा म्हणता येईल, अशी दोन सदरं वि. स. खांडेकरांनी `वैनतेय` साप्ताहिकात लिहिल्याचं दिसून येतं. पैंकी एक होतं `परिचयाची परडी.` या सदरात खांडेकरांनी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांबद्दल विस्ताराने व मनस्वीपणे लिहिलं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#वैनतेय #वि.स.खांडेकर(लेखक) #डॉ.सुनीलकुमारलवटे(संपादक) #साप्ताहिकवैनतेय #अग्रलेख #परिचयाचीपरडी #परिशिष्ट:प्रकाशनसूची #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #VAINTEY #V.S.KHANDEKAR(AUTHOR) #DR.SUNILKUMARLAVATE(EDITOR) #SAPTAHIKVAINTEY #AGRALEKH #PARICHYACHIPARDI #PARISHISHTA:PRAKASHNSHUCHI #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 10-11-2019

    खांडेकरांचा बहुआयामी लेखनपट... मराठी साहित्यक्षेत्रात आदराने उच्चारले जाणारे नाव म्हणजे ज्ञानपीठविजेते साहित्यिक वि. स. खांडेकर. `मेहता पब्लिशिंग हाऊस`ने पकाशित केलेले वि. स. खांडेकरांचे ‘वैनतेय’ हे पुस्तक म्हणजे खांडेकरांनी वैनतेय या साप्ताहिकात ‘अ्रलेख’ आणि ‘परिचयाची परडी’ या सदरांतून एक तपभर लिहिलेल्या बहुविध विषयांवरील लेखांचा संग्रह आहे. हे साप्ताहिक कोकणासारख्या दुर्गम भागात सन १९२४ पासून चालवलं जातं. खांडेकर या साप्ताहिकाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. खांडेकरांचे हे लेखन १९२४ ते १९३७ या काळातील आहे. हे लेख शिक्षण, राष्ट्रीयता, राजकारण, अस्पृश्यता निवारण, न्याय, धर्म, संस्कृती, संप, संघटना, साहित्य, भाषा, व्यक्ती अशा बहुपदरी गोफातून विणलेले आहेत. ‘परिचयाची परडी’ या सदरातून त्यांनी आपल्याला आवडलेल्या अठ्ठावीस गंथांबद्दल विस्ताराने व मनस्वीपणे लिहिले आहे. ते आदर्श या टोपणनावाने ते लिहीत. या लेखांमधून खांडेकरांच्या चतुरस्त्र प्रतिभेचे दर्शन होते. यातून खांडेकरांच्या लेखक-वाचनाचा पट किती बहुआयामी होता, हे वाचकाच्या लक्षात येतं. -राजेश हेन्द्रे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.