* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CREATING LEADERSHIP
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9789394258037
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2022
  • Weight : 225.00 gms
  • Pages : 56
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : YOUNG ADULT LITERATURE
  • Available in Combos :KIRAN BEDI COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN THIS BOOK WE GET A PICTORIAL VIEW OF THE VARIOUS ACTIVITIES AND PROJECTS IMPLEMENTED BY KIRAN BEDI DURING HIS `TOP COP` TENURE. THE AIM OF THIS INITIATIVE WAS TO HELP THE COMMON PEOPLE BY THE POLICE BUT ALSO TO REDUCE THE FEAR OF THE POLICE IN THE MINDS OF THE PEOPLE. KIRAN BEDI CALLS IT `INNOVATION`. THROUGH THIS, WE GET TO SEE A VISUAL REVIEW OF VARIOUS ACTIVITIES IN THE FORM OF COOPERATION WITH THE POLICE THROUGH THE DIRECT PARTICIPATION OF THE PEOPLE AND SOLVING THE PROBLEMS OF THE PEOPLE. EVERY PROBLEM HAS A SOLUTION AND THAT SOLUTION WAS EXTRACTED FROM PUBLIC PARTICIPATION AND USED TO SOLVE COMMON PEOPLE`S PROBLEMS. THESE ACTIVITIES WERE INITIALLY OPPOSED INITIALLY, THESE ACTIVITIES WERE MET WITH OPPOSITION, BUT LATER, AFTER REALIZING ITS BENEFITS AND USEFULNESS, PEOPLE RESPONDED ENTHUSIASTICALLY. MANY OF THESE INNOVATIONS WERE HONORED WITH AWARDS AT THE NATIONAL AND INTERNATIONAL LEVELS IF SOME NECESSARY ITEMS AND TOOLS ARE NOT AVAILABLE IN THE POLICE SYSTEM, WE CAN SEE THAT THEY ARE USED PROPERLY FOR THE BENEFIT OF THE PEOPLE BY GETTING THEM THROUGH PUBLIC PARTICIPATION. THROUGH THIS BOOK, READERS GET A GOOD PICTURE OF THE `CREATIVE` PERIOD OF KIRAN BEDI`S CAREER IN POLICE SERVICE.
किरण बेदी यांच्या `टॉप कॉप` कार्यकाळात राबवल्या गेलेल्या विविध उपक्रम आणि प्रकल्प यांचे चित्ररूपी दर्शन आपल्याला या पुस्तकात घडते. सामान्यातील सामान्य लोकांना पोलिसांची मदत व्हावी पण लोकांच्या मनात पोलीसांबद्दल असलेली भीती कमी व्हावी हा हेतूसुद्धा या उपक्रमामध्ये होता. किरण बेदी याला `नवोपक्रम` असे नाव देतात. या माध्यमातून लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून पोलिसाना सहकार्य व त्यातूनच लोकांच्या समस्यांचे निराकरण असे स्वरूप असलेले विविध उपक्रम याचा आपल्याला सचित्ररूपात आढावा घेतलेला पाहायला मिळतो. प्रत्येक समस्येला तोडगा असतो आणि तो तोडगा लोकसहभागातून काढून त्याचा वापर करून सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यात करण्यात आला. या उपक्रमांना सुरुवातीला विरोधही झालेला पाहायला मिळाला मात्र नंतर याचे फायदे आणि उपयुक्तता लक्षात आल्यानंतर लोकांचा उस्फुर्त प्रतिसाददेखील मिळाला. यातील बऱ्याच नवोपक्रमांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पोलीसयंत्रणेत काम करत असताना काही आवश्यक बाबी व साधने उपलब्ध नसतील तर ती लोकसहभागाच्या माध्यमातून मिळवून त्याचा योग्य असा वापर लोकांच्या हितासाठीच केलेला आपल्याला पाहायला मिळतो. किरण बेदी यांच्या पोलिससेवेच्या कारकिर्दीतील `सर्जक` कालखंडाचे उत्तम असे चित्ररूप दर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना घडते.

No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस#नेतृत्वनिर्मिती #सुप्रियावकील#किरणबेदी #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #NETRUTVANIRMITEE#TRANSLATEDBOOKS#MEHTAPUBLISHINGHOUSE#CREATING LEADERSHIP#KIRAN BEDI#SUPRIYA VAKIL
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more