* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618682
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 1999
  • Weight : 50.00 gms
  • Pages : 108
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :DAYA PAWAR COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THERE IS NO SIMILARITY IN THE URBAN AND RURAL LIFE. THIS MAKES LIFE MORE MISERABLE. THE STORY OF HARI AND SHANKAR TOOK PLACE IN A CITY. A NEW CITY LIKE THE MIDC IS PLANNED. TALL BUILDINGS ARE BEING BUILT. NEW RESIDENTS ARE COMING TO RESIDE IN EVERY.
खेड्यात हे आसं आन शहरात दुसरंच. ताळमेळ कायी बसत नव्हता. डोसक्याचा गोयंदा झालेला. हरि शंकर परसाइची गोष्ट आठवली. ती घडते शहरात. नव्यानंच जसं एमआयडीसी सारखं नवं शहर वसत हाये. उंच उंच इमारती उभ्या रहातात. येगयेगळया इमारतीत नवीन आलेली खटली. सारी शिकली सवरलेली. कुनी इंजिनियर तर कुनी डाक्तर. आता परेम हा तसा साथीच्या रोगासारख पसवरत जातो. तिथं जातीपातीची, धरमाची, परांताची बंधनं आड येत न्हायीत. अशाच नाजूक येळी एका मराठ्याच्या पोराचं आन बामनाच्या पोरीचं लफडं सुरू झालं. आई-बापांना पत्ता न्हायी. शेवटी पोरानं आपल्या बापाला सांगितलं- ‘बस,काही पन करा; कुलकरनीच्या बाला भेटा. तिच्यावर माझं मन जडलंय. तिच्यावाचून जगू शकत न्हायी.’ लेकाचा जीव तीळतीळ तुटतांना पाहून मुलाचा बाप कुलकरनीच्या घरी गेला. बापाला आधी वाटलं, हे सारं ऐकून हुसकूनच देतील आपल्याला कुलकरनी; पन झालं भलतंच! लयी आगतस्वागत झालं. सारं ऐकल्यावर कुलकरनी म्हंगाला,‘फार बरं झालं तुमी आलात. न्हायी तर आमच्या जातीत लयी हुंडा. तुमाला मुलगी दिली तर हुंड्यातून सुटका व्हयील. पन एक मातूर खरं, की लगीन लावता येनार न्हायी. ते धर्मशास्त्रात बसत न्हायी. तुमी तुमच्या लेकाला सांगा, माझ्या मुलीला पळवून न्यायला. पळवून नेणं धरमात
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JAGLYA #JAGLYA #जागल्या #ESSAYSMARATHI #DAYAPAWAR #दयापवार "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 04-07-1999

    विविधांगी अनुभवांचा ‘जागल्या’… दया पवार यांचा ‘जागल्या’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात एकूण एकतीस कथा आहेत. भारतीय समाजरचनेत विशिष्ट जातीत जन्माला आल्यामुळे येणाऱ्या विविध प्रकारच्या अनुभवांचा साठा या कथासंग्रहात वाचावयास मिळो. एकेक अनुभवातून एकेक कथा साकार झाली आहे. या अनुभवांतील दु:खाची झळ वाचकांपर्यंत पोहोचते. अनुभवाच्या मांडणीत कुठेही ऊरबडवा आक्रोश केलेला दिसत नाही. -- ओघात समाजातील वृत्ती-प्रवृत्तीवर भाष्य केले आहे. ‘परेम हा तसा साथीच्या रोगासारखा पसरत जातो. तिथं जातीपातीची, धरमाची, परांताची बंधनं आड येत न्हायीत. अशाच नाजूक येळी एका मराठ्याच्या पोराचं आन बामनाच्या पोरीचं लफडं सुरु झालं. आईबापांना पत्ता न्हायी. शेवटी पोरानं आपल्या बापाला सांगितलं ‘बस-काही पन करा कुलकरनीच्या बाला भेटा. लेकाचा जीव तीळ-तीळ तुटताना पाहून मुलाचा बाप कुलकरनीच्या घरी गेला. बापाला आधी वाटलं, हे सारं ऐकून हुसकूनच देतील आपल्याला कुलकरनी. पन झालं भलतंच. लयी आगत-स्वागत झालं. सारं ऐकल्यावर कुलकरनी म्हणाला, ‘फार बरं झालं तुमी आलात. न्हायी तर आमच्या जातीत लयी हुंडा. तुमाला मुलगी देली तर हुंड्यातून सुटका व्हयील. पण एक मातुर खरं की लगीन लावता येणार न्हायी. ते धरमशास्त्रात बसत न्हायी. तुमी तुमच्या लेकाला सांगा, ‘माझ्या मुलीला पळवून न्यायला.पळवून नेणं धरमात बसतं.’’ परदेसातील ‘मिसीसिपी मसाला’ हा चित्रपट दया पवार यांच्या एका कथेचा विषय झालेला दिसतो. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवर जाता जाता भाष्य केलेले आहे. ‘जगात कुठेही गेलं तरी माणूस हा एकच. एका मासाचा हाये. त्यात दुजाभाव न्हायी.’ हा संदेश देणारा ‘मिसीसिपी मसाला’ आपल्याही देशात घराघरात जायला हवा अशी सदिच्छाही ते व्यक्त करतात. व्यक्तिचित्रणावर कथेत ‘तुकाराम’ या कथेचा विचार करता येतो. महार जातीतील या तुकारामाला आपल्याला दिली जाणारी वेगळी वागणूक सहन होत नाही. तो या गोष्टीचा प्रतिकार करतो, त्याला जे योग्य वाटेल तेच तो करतो. पुढे काही काळानंतर स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याला काम करण्याची काहीच आवश्यकता नसतानाही फुटपाथवर जुन्या पुस्तकांची तो विक्री करतो. गोकुळासारखे नांदते घर सोडून जुन्या पुस्तकांच्या जगात फुटपाथवर राहतो. पाऊस आला तर पुस्तके भिजू नयेत म्हणून जपतो. अशा या तुकारामाकडे पाहताना लेखकाला ‘संत तुकारामां’ची आठवण होते. संत तुकारामाला विठोबाचा ध्यास तर या आधुनिक तुकारामाला जुन्या पुस्तकांचा ध्यास. संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेला असं म्हणतात, पण पुस्तकांसाठी रानोमाळ भटकणारा हा आधुनिक तुकाराम. उद्या फुटपाथवर मरुन पडला तर देवाच्या सोडाच, पण येणाऱ्या जाणाऱ्याला तरी ध्यानात येईल काय? असा हृदयाला भिडणारा प्रश्न विचारुन ‘अशा मान्सापुढं नाही चिरा-नाही पनती. हेच मान्य केले आहे.’ मराठी सारस्वतांनी बेदखल केलेले अण्णाभाऊ साठे यांच्या विषयीचं प्रेम, आदर, सहानुभाव व त्यांना समाजाने दिलेलं दु:खं ‘जग बदल घालून घाव’ या कथेत व्यक्त झालेले आहे. ‘जुनून’ सारख्या कथेत सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलेले आहे. या कथेचे स्वरुप नाट्यात्मक संवादांसारखे आहे. समाजातील निरनिराळ्या थरातील माणसे ‘जात’ या संस्थेला खतपाणी घालताना दिसतात. याचा अनुभव ‘फराळ’सारख्या कथेत येतो. ‘जात’ ‘धर्म’ या संकल्पनांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न या कथेतून दिसतो. भ्रष्टाचार, राजकारण, कटकारस्थान या संदर्भातील काव्य ‘बोफर्स’ या कथेत वाचावयास मिळते. आपल्या देशात जशी ही जातीपातीची उतरंड दिसते तोच अनुभव परदेशातही आलेला आहे. या अनुभवांचा उच्चार ‘इटा’, ‘गरिबी हटाव’ या कथांतून केलेला आहे. ‘जागल्या’ हा कथासंग्रह आजच्या जीवन-जाणिवांकडे पुन्हा एकदा नव्याने विचार करण्यास प्रवृत्त करतो. आजच्या जीवनाशी या कथासंग्रहाचे असलेले हे साम्य लक्षात घेता वाचकांनी या कथासंग्रहाची जरूर दखल घ्यावी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more