* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618682
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 1999
  • Weight : 50.00 gms
  • Pages : 108
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :DAYA PAWAR COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THERE IS NO SIMILARITY IN THE URBAN AND RURAL LIFE. THIS MAKES LIFE MORE MISERABLE. THE STORY OF HARI AND SHANKAR TOOK PLACE IN A CITY. A NEW CITY LIKE THE MIDC IS PLANNED. TALL BUILDINGS ARE BEING BUILT. NEW RESIDENTS ARE COMING TO RESIDE IN EVERY.
खेड्यात हे आसं आन शहरात दुसरंच. ताळमेळ कायी बसत नव्हता. डोसक्याचा गोयंदा झालेला. हरि शंकर परसाइची गोष्ट आठवली. ती घडते शहरात. नव्यानंच जसं एमआयडीसी सारखं नवं शहर वसत हाये. उंच उंच इमारती उभ्या रहातात. येगयेगळया इमारतीत नवीन आलेली खटली. सारी शिकली सवरलेली. कुनी इंजिनियर तर कुनी डाक्तर. आता परेम हा तसा साथीच्या रोगासारख पसवरत जातो. तिथं जातीपातीची, धरमाची, परांताची बंधनं आड येत न्हायीत. अशाच नाजूक येळी एका मराठ्याच्या पोराचं आन बामनाच्या पोरीचं लफडं सुरू झालं. आई-बापांना पत्ता न्हायी. शेवटी पोरानं आपल्या बापाला सांगितलं- ‘बस,काही पन करा; कुलकरनीच्या बाला भेटा. तिच्यावर माझं मन जडलंय. तिच्यावाचून जगू शकत न्हायी.’ लेकाचा जीव तीळतीळ तुटतांना पाहून मुलाचा बाप कुलकरनीच्या घरी गेला. बापाला आधी वाटलं, हे सारं ऐकून हुसकूनच देतील आपल्याला कुलकरनी; पन झालं भलतंच! लयी आगतस्वागत झालं. सारं ऐकल्यावर कुलकरनी म्हंगाला,‘फार बरं झालं तुमी आलात. न्हायी तर आमच्या जातीत लयी हुंडा. तुमाला मुलगी दिली तर हुंड्यातून सुटका व्हयील. पन एक मातूर खरं, की लगीन लावता येनार न्हायी. ते धर्मशास्त्रात बसत न्हायी. तुमी तुमच्या लेकाला सांगा, माझ्या मुलीला पळवून न्यायला. पळवून नेणं धरमात
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JAGLYA #JAGLYA #जागल्या #ESSAYSMARATHI #DAYAPAWAR #दयापवार "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 04-07-1999

    विविधांगी अनुभवांचा ‘जागल्या’… दया पवार यांचा ‘जागल्या’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात एकूण एकतीस कथा आहेत. भारतीय समाजरचनेत विशिष्ट जातीत जन्माला आल्यामुळे येणाऱ्या विविध प्रकारच्या अनुभवांचा साठा या कथासंग्रहात वाचावयास मिळो. एकेक अनुभवातून एकेक कथा साकार झाली आहे. या अनुभवांतील दु:खाची झळ वाचकांपर्यंत पोहोचते. अनुभवाच्या मांडणीत कुठेही ऊरबडवा आक्रोश केलेला दिसत नाही. -- ओघात समाजातील वृत्ती-प्रवृत्तीवर भाष्य केले आहे. ‘परेम हा तसा साथीच्या रोगासारखा पसरत जातो. तिथं जातीपातीची, धरमाची, परांताची बंधनं आड येत न्हायीत. अशाच नाजूक येळी एका मराठ्याच्या पोराचं आन बामनाच्या पोरीचं लफडं सुरु झालं. आईबापांना पत्ता न्हायी. शेवटी पोरानं आपल्या बापाला सांगितलं ‘बस-काही पन करा कुलकरनीच्या बाला भेटा. लेकाचा जीव तीळ-तीळ तुटताना पाहून मुलाचा बाप कुलकरनीच्या घरी गेला. बापाला आधी वाटलं, हे सारं ऐकून हुसकूनच देतील आपल्याला कुलकरनी. पन झालं भलतंच. लयी आगत-स्वागत झालं. सारं ऐकल्यावर कुलकरनी म्हणाला, ‘फार बरं झालं तुमी आलात. न्हायी तर आमच्या जातीत लयी हुंडा. तुमाला मुलगी देली तर हुंड्यातून सुटका व्हयील. पण एक मातुर खरं की लगीन लावता येणार न्हायी. ते धरमशास्त्रात बसत न्हायी. तुमी तुमच्या लेकाला सांगा, ‘माझ्या मुलीला पळवून न्यायला.पळवून नेणं धरमात बसतं.’’ परदेसातील ‘मिसीसिपी मसाला’ हा चित्रपट दया पवार यांच्या एका कथेचा विषय झालेला दिसतो. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवर जाता जाता भाष्य केलेले आहे. ‘जगात कुठेही गेलं तरी माणूस हा एकच. एका मासाचा हाये. त्यात दुजाभाव न्हायी.’ हा संदेश देणारा ‘मिसीसिपी मसाला’ आपल्याही देशात घराघरात जायला हवा अशी सदिच्छाही ते व्यक्त करतात. व्यक्तिचित्रणावर कथेत ‘तुकाराम’ या कथेचा विचार करता येतो. महार जातीतील या तुकारामाला आपल्याला दिली जाणारी वेगळी वागणूक सहन होत नाही. तो या गोष्टीचा प्रतिकार करतो, त्याला जे योग्य वाटेल तेच तो करतो. पुढे काही काळानंतर स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याला काम करण्याची काहीच आवश्यकता नसतानाही फुटपाथवर जुन्या पुस्तकांची तो विक्री करतो. गोकुळासारखे नांदते घर सोडून जुन्या पुस्तकांच्या जगात फुटपाथवर राहतो. पाऊस आला तर पुस्तके भिजू नयेत म्हणून जपतो. अशा या तुकारामाकडे पाहताना लेखकाला ‘संत तुकारामां’ची आठवण होते. संत तुकारामाला विठोबाचा ध्यास तर या आधुनिक तुकारामाला जुन्या पुस्तकांचा ध्यास. संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेला असं म्हणतात, पण पुस्तकांसाठी रानोमाळ भटकणारा हा आधुनिक तुकाराम. उद्या फुटपाथवर मरुन पडला तर देवाच्या सोडाच, पण येणाऱ्या जाणाऱ्याला तरी ध्यानात येईल काय? असा हृदयाला भिडणारा प्रश्न विचारुन ‘अशा मान्सापुढं नाही चिरा-नाही पनती. हेच मान्य केले आहे.’ मराठी सारस्वतांनी बेदखल केलेले अण्णाभाऊ साठे यांच्या विषयीचं प्रेम, आदर, सहानुभाव व त्यांना समाजाने दिलेलं दु:खं ‘जग बदल घालून घाव’ या कथेत व्यक्त झालेले आहे. ‘जुनून’ सारख्या कथेत सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलेले आहे. या कथेचे स्वरुप नाट्यात्मक संवादांसारखे आहे. समाजातील निरनिराळ्या थरातील माणसे ‘जात’ या संस्थेला खतपाणी घालताना दिसतात. याचा अनुभव ‘फराळ’सारख्या कथेत येतो. ‘जात’ ‘धर्म’ या संकल्पनांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न या कथेतून दिसतो. भ्रष्टाचार, राजकारण, कटकारस्थान या संदर्भातील काव्य ‘बोफर्स’ या कथेत वाचावयास मिळते. आपल्या देशात जशी ही जातीपातीची उतरंड दिसते तोच अनुभव परदेशातही आलेला आहे. या अनुभवांचा उच्चार ‘इटा’, ‘गरिबी हटाव’ या कथांतून केलेला आहे. ‘जागल्या’ हा कथासंग्रह आजच्या जीवन-जाणिवांकडे पुन्हा एकदा नव्याने विचार करण्यास प्रवृत्त करतो. आजच्या जीवनाशी या कथासंग्रहाचे असलेले हे साम्य लक्षात घेता वाचकांनी या कथासंग्रहाची जरूर दखल घ्यावी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो