* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981599
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IF THE PARENTS ARE RUNNING BEHIND MONEY, FORGETTING EVERYTHING? WHAT IDEAL WILL THIS ATTITUDE SET BEFORE THE CHILDREN? THE FEMALES WHO CONSIDER THEIR BODY AS A SHOWPIECE DO NOT HESITATE TO USE IT FOR MONETARY GAINS THUS CAUSING EMOTIONAL POLLUTION. ALL THE EROTIC SCENES UNNECESSARILY PROVOKE YOUNG MINDS. WHEN WE LOOK AROUND AND WITNESS THE HIDEOUS WAYS TRIED OUT BY THE LEADERS IN THE LUST OF AUTHORITY THEN ONCE AGAIN WE ARE COMPELLED TO ASK OURSELVES, WHO WILL BE THE IDEAL FOR THE COMING UP GENERATIONS? MANY HAVE SET IN THE SEARCH OF LIGHT TODAY; THE SUN HAS SET AGES BACK FOR THEM. THEY ARE TRYING THEIR BEST TO FIND THE WAY OUT WITH JUST A TWINKLING LIGHT FROM THE ‘DIYA’. WE EXPECT A LOT FROM THE WRONG-DOERS, FROM THOSE WHO HAVE BEEN PUNISHED BY THE LAW AND JUDICIARY. BUT WHEN THEY TRY TO JOIN THE MAIN STREAM AFTER COMPLETING THEIR PUNISHMENTS, DO WE OFFER OUR HANDS WITHOUT VACILLATING EVEN FOR A MOMENT? ON THE CONTRARY, IT IS THIS SAME YOUTH THAT SUCCESSFULLY PRESERVES THE TENDERNESS AND THE FAITHS IN THEIR MINDS. THEY SET UP THEIR MINDS TO BE THE BEST AND AWAIT OUR COOPERATION.
पैशामागे लागलेले आई-वडील मुलांपुढचे आदर्श नष्ट करतात. शरीर ही प्रदर्शनाची वस्तू समजून तिची किंमत वसूल करणा-या मुली मानसिक प्रदूषणाला कारणीभूत आहेत. उत्तान दृश्यं तरुण मनाला चाळवतात. आज सत्तेसाठी चालणारी साठमारी पाहिली की प्रश्न पडतो, नव्या पिढीपुढे आपण कोणती श्रद्धास्थानं ठेवणार आहोत? ज्यांचा सूर्य मावळला आहे तीच आज प्रकाशाचा शोध घेताहेत; स्वतःची दिवली घेऊन मार्ग काढताहेत. शिक्षा भोगत असणा-या कैद्यांकडून समाजाने अपेक्षा ठेवताना, शिक्षा भोगून तावूनसुलाखून निघालेले हे तरुणच मनातल्या श्रद्धांना झळ पोचू देत नाहीत. त्यांना चांगलं व्हायचंय. आपण आपला आश्वासक हात पुढे केला पाहिजे.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JANMATHEP #JANMATHEP #जन्मठेप #ESSAYS #MARATHI #GIRIJAKEER #गिरिजाकीर "
Customer Reviews
  • Rating Starसुहास जोशी

    लेखिका गिरिजाताई कीर यांनी सामाजिक जाणीवेतून, महत्प्रयासाने साकारलेला `जन्मठेप` प्रकल्प वाचकांकरिता खुला झाला याचं अप्रूप वाटतं. मुळात हा विषय आजवर दुर्लक्षित राहिला, तो प्रत्यक्षात अवतरला तो आपल्या उदार सहकार्यामुळेच! आम्हा जन्मठेपींचं अरण्यरुदन आपलया प्रकाशनसंस्थेच्या विशेष कृपेमुळे मुद्रित झाले ही जाणीव ठेवून कृतज्ञता प्रकट करतो. ...Read more

  • Rating Star SAHITYA SUCHI Jan-2011

    कथा, कादंबरी, ललित लेखन, बालसाहित्य अशा वाङ्मयाच्या विविध लेखन दालनात विपुल लेखन करण्याऱ्या लेखिका गिरिजा कीर. त्या केवळ लेखिका नाहीत तर सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. बालगुन्हेगार, आदिवासी, कामगार स्त्रिया–मुले यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासाठी काम रून, त्यांच्या प्रश्नांवर त्यांनी लेख, मुलाखती, कथा असे लेखन केले आहे. त्यांच्या साहित्याचे वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादही झाले आहेत. लेखन आणि समाजसेवा याबद्दल अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘कथाकथन’ हे त्यांचे खास क्षेत्र मानले जाते. ‘जन्मठेपेची शिक्षा झालेले मध्यमवर्गीय सुशिक्षित गुन्हेगार’ हा या पुस्तकाचा विषय. ते गुन्हेगारीकडे का वळले? त्यांना आपल्या कृत्यांबद्दल पश्चाताप होतो आहे का? चांगल्या संस्कारातील ही मुले वाममार्गाकडे का वळली? त्यांचे भवितव्य काय? अशा अनेक अंगांनी त्यांनी संशोधन केले आहे. येरवडा जेल-पुणे, आग्वाद जेल-गोवा, आधारवाडी जेल-कल्याण येथे जाऊन त्यांनी कैद्यांच्या भेटगाठी घेतल्या आहेत. काही तुरुंगाधिकाऱयांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यातून त्यांचा कैद्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन लक्षात येतो. या अधिकाऱयांनी लेखिकेला दिलेल्या सौजन्यपूर्ण वागणुकीबद्दल त्यांनी ऋणनिर्देश केला आहे. पुस्तकांच्या परिशिष्टांमध्ये कैदी सुहास जोशी यांचा देहदानाचा अर्ज, येरवडा कारागृहाने गिरिजातार्इंना बंद्यांना भेटण्यासाठी दिलेले परवानगीपत्र, बंद्यांना मुलाखतींच्या आधारे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी दिलेले परवानगीपत्र, इंडियन एक्सप्रेसमधील निशा नमिआर यांच्या पुस्तकाचा परिचय करून देणारा इंग्रजी लेख, गौरी कुलकर्णी यांचा ‘बंदिजनांची आई’ हा गिरिजातार्इंच्या या कार्याविषयीचा ‘सकाळ’मधील लेख आणि ८ मार्च २००६ रोजी कल्याण कारागृहातील अधिकाऱयांच्या सहीने सर्व बंदिजनांच्या वतीने त्यांना देण्यात आलेला ‘माई’ सन्मान (मानपत्र) अशा सहा गोष्टींचा समावेश आहे. जन्मठेपेच्या बंदिजनांच्या हृदयपरिवर्तनाचे काम केल्याबद्दल या बंदिजनांच्या इच्छेनुसारच त्यांना हे मानपत्र दिले आहे. या कागदपत्रांमुळे गिरिजा कीर यांचे मानपत्र दिले आहे. या कागदपत्रांमुळे गिरीजा कीर यांचे सामाजिक भान लक्षात येते. तुरुंगातील कैद्यांसाठी त्या करत असलेले हे काम त्यांच्या घरच्या लोकांना पसंत नाही. पण तरीही सामाजिक जाणीवेने त्या ते करत राहिल्या आहेत. आपली हे काम करण्यामागची भूमिका, त्यांनी पुस्तकाच्या प्रारंभीच स्पष्ट केली आहे. येरवडा जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सुहास जोशीने त्यांचे ‘इथे दिवा लावायला हवा’ हे स्लम dwellers वरील पुरस्कार विजेते पुस्तक तसेच ‘लावण्याखुणा’ हे पुस्तक वाचले. त्या पुस्तकांसंबंधी विचार व्यक्त करणारे पत्र त्याने लेखिकेला पाठवले. लेखिकेने त्याला उत्तर पाठवले. तीन वर्षे दोघांचा पत्रव्यवहार चालू होता. मग कीर यांनी त्याला भेटायचा निर्णय घेतला. तुरुंगाधिकाऱयांची परवानगी घेऊन मुंबईहून पुण्याला येऊन त्या येरवडा जेलमध्ये त्याला भेटल्या. सुहासमुळे त्यांचा आणखी काही बंदिजनांशी संपर्क आला. त्यांना जाणवले की ही चांगल्या घरातील मुले भावनेच्या भरात काहीतरी करून बसतात आणि जन्माची गुन्हेगार ठरतात. मग उपेक्षित जीवन वाट्याला येते. मायेची माणसेही दुरावतात. त्यातले बरेचजण सुशिक्षित आहेत. त्यांना साहित्य, नाट्य, कला ह्यात रस आहे. ती गुन्हेगारीकडे का वळत असावीत? त्यांची मने दुबळी आहेत की कुटुंबसंस्थेत उणीवा आहेत? त्यांच्यावर वडिधाऱयांचे दडपण आहे का? पैसा हेच जीवनाचे ध्येय मानल्यामुळे नैराश्य वाट्याला येते का? हा कुसंगतीचा परिणाम आहे की कोणाची दहशत आहे? भ्रष्टाचार, शोषण, गुंडगिरी या गोष्टी कितपत जबाबदार आहेत? असे अनेक प्रश्न त्यांच्याभोवती फेर धरून नाचू लागले. गजाआडचे जग त्यांना खुणावू लागले. त्यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्या तरुण मुलांना भेटत राहिल्या. पुस्तके, राख्या, भेटकार्डे पाठवीत राहिल्या. पत्र लिहिणारा सुहास जोशी आणि त्याचे आणखी सहा मित्र यांच्या गुन्हेगारीच्या कहाण्यांवर हे पुस्तक आधारित आहे. राजकुमार गुप्ता आणि नीलिमा पंडित या अन्य कैद्यांनीही त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मुलांची मानसिकता जाणून घेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्या ह्य निष्कर्षांपर्यंत आल्या आहेत की अविवेकाने घडलेल्या चुकांबद्दल या मुलांना पश्चाताप होतो आहे. त्यांना चांगले नागरिक म्हणून जगायचे आहे. त्यांचे पुनर्वसन करायला हवे. गिरिजा कीर म्हणतात – ‘ज्यांचा सूर्य मावळला आहे तेच प्रकाशाचा शोध घेताहेत. स्वत:ची दिवली घेऊन मार्ग काढताहेत. शिक्षा भोगत असणाऱ्या कैद्यांकडून समाजाने अपेक्षा ठेवताना, शिक्षा भोगून तावूनसुलाखून निघालेले हे तरूणच मनातल्या श्रद्धांना झळ पोहोचू देत नाही. त्यांना चांगलं व्हायचंय. आपण आपला आश्वासक हात पुढे केला पाहिजे.’ अशा बंदिवानांबद्दल समाजाने क्षमाशील दृष्टी ठेवावी आणि कैद्यांनीही समाजाबद्दल कृतज्ञता बाळगावी असे त्यांना वाटते. तुरुंगातल्या सात मुलांची त्या ‘आई’ झाल्या आहेत. त्यापैकी संजय कांबळेला फाशीची शिक्षा जाहीर झालेली असते. परंतु राष्ट्रपतींनी दया केल्यामुळे त्याची फाशी रद्द होऊन जन्मठेप होते. जन्मठेपेच्या बंदिवानांची शिक्षा कमी व्हावी म्हणून तो प्रयत्नशील आहे. वसंत बंदावणे हा संगमनेरचा शिक्षक. एक मुलगी त्याच्यावर प्रेम करत होती. हा प्रतिसाद देईना तेव्हा त्याला बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकवले. निलेश जोशी एम. बी. झालेला, एका श्रीमंत तरूणीवर प्रेम करणारा, मुलीच्या बापाला त्यांचे प्रेम पसंत नव्हते. त्यांनी आणि निलेशच्या भावाने कारस्थान केले. न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली त्याला जन्मपेठ झाली. तुरूंगात तो झोपडपट्टीतल्या मुलांसाठी संस्कारवर्ग चालवतो. सुहास जोशी, संतोष भिंताडे, शिवाजी सांळुके आणि संतोष शिंदे यांच्याबद्दल थोड्या अधिक विस्ताराने लिहिले आहे. संतोष जोशी मूळचा सावंतवाडीजवळील ‘अरोंदा’ गावाचा राहणारा. त्याने आपल्या पत्रात कोकणचे निसर्गसौंदर्य वर्णन केले आहे. वडील गावचे पौरोहित्य करणारे - ‘किरवंत’ म्हणजे मरणोत्तर क्रियाकर्म करणारे. त्यामुळे इतर ब्राह्मण त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत. त्याची आई गोव्याची. ती त्याच्याकडून स्तोत्रे, श्लोक वगैरे पाठ करून घेते. दोन प्रीप्लॅन्ड मर्डर केल्याबद्दल त्याला जन्मठेप झाली आहे. शिक्षण पूर्ण झाल्याबद्दल नोकरीच्या शोधात मुंबईला आलेला संतोष, बेकारांच्या तांड्यात सामील झाला. १९९१ साली त्याला ‘बँक ऑफ कॉलिफोर्निया’मध्ये कम्युनिकेशन रूममध्ये ऑपरेटर म्हणून नोकरी लागली. ‘कल्याण’ नावाचा व्हाईस प्रेसिडेंट आणि ‘मीना’ नावाच्या लेडी ऑफिसरने त्याची निवड केली. लेखी ऑर्डर दिलीच नाही. १५०० रूपये पगारात तो १२/१४ तरास राबत होता. ऑफिसमध्ये काम करणारे सगळे तिशीच्या आतले कामसू पण अबोल. कोणालाच अपॉर्इंटमेंट लेटर नाही. मस्टर नाही, पे स्लिप नाही, भत्ते नाहीत. कोणाचीच बोलायची हिंमत नव्हती. ‘मीना, कल्याण’ यांची कंपनी आहे. ‘परवडत नसेल तर सोडून जा’ असा खाक्या होता. सर्वांना अपमानास्पद वागणूक दिली जात असे. लग्न असो वा मर्तिक एक दिवसही रजा मिळत नसे. थोडासा विरोध करणारा असला तर त्याची हकालपट्टी ठरलेली. एकीकडे कामाचा ताण तर दुसरीकडे नोकरी जाईल ही भीती. नशीबावर भरवसा ठेवून कष्ट करायचे. नको असलेली माणसे खोटा आळ ठेवून काढून टाकत. मीनाने मुद्दाम सुहासला लाथ मारली. आधी लेखी मेमो दिले. मग टर्मिनेशन ऑर्डर दिली. संतापाच्या भरात त्याने कोयत्याने वार करून मीना व कल्याण दोघांनाही ठार केले. स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला आणि जन्मठेप झाली. त्याच्या पत्रातील हकीगत वाचून लेखिकेप्रमाणे आपणही हादरून जातो. सुहासने आपल्या भागात जायचे म्हणून गोव्यातील तुरूंगात बदली मागून घेतली. कारावासातून सुटल्यावर गावी जाऊन वृद्धाश्रम काढायचे त्याचे स्वप्न आहे. मूळचा जळगावचा संतोष भिंताडे, लॉ करण्यासाठी पुण्यात बहिणीकडे आला.विद्यार्थी संघटनेचे काम करून लागला. बाजूच्या कॉलनीतील गुंड पोरांनी त्याच्या कॉलनीतील एका पोरीची छेड काढली. म्हणून त्यांना जाब विचारायला गेला. त्यातून एका पोराशी भांडण झाले. शिवीगाळ, मारामारी झाली. संतापाच्या भरात याने केलेल्या वाराने तो मरण पावला. हा स्वत:हून पोलिसस्टेशन मध्ये हजर झाला. जन्मठेप झाली. घरची माणसेही दुरावली. आता तो पैठणच्या खुल्या बंदिगृहात आहे. त्याच कारागृहातील शिवाजी साळुंके आपल्या कवितेतून कठोर वास्तव मांडतो आणि भविष्याचे आशादायी चित्र काढताना म्हणतो – आता तरी हे आपण बदलायला हवे घेऊनी हाती परत कुंचला चित्र नवे काढायला हवे। त्याचा ‘आत्मझड’ काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. वडारवाडीतील वयाने मोठ्या सुनीतावर प्रेम करणाऱ्या संतोष शिंदेचे कशावरून तरी तिच्याशी बिनसले. तिने पोलिसात तक्रार केली. संतोषच्या वडिलांनाही पोलिसांनी त्रास दिला तेव्हा संतापून संतोषने सुनीतावर चाकूने वार केले. त्यात तिचे निधन झाले. ह्याला अटक होऊन जन्मठेप झाली. तो कलाकार आहे. नाटिका बसवतो. अभिनय करतो. तुरुंगातल्या या तरूणांना गिरिजा कीर यांनी संजीवनी दिली आहे. त्यांची मानसिक ताकद वाढवली आहे. त्यामुळे त्या सर्वांची ‘माई’ झाल्या आहेत. पुस्तकातील येरवडा जेलचे वर्णन, तेथील गांधींचा पुतळा, पुणे करार झाला तो आम्रवृक्ष, ३०/३२ श्वेतशाम फोटो आणि चंद्रमोहन कुलकर्णीचे मुखपृष्ठ यामुळे पुस्तक आकर्षक झाले आहे. अवश्य वाचावे असे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 21-11-2010

    गुन्हेगारी हा जसा चिंतेचा विषय आहे, तसा संशोधनाचाही विषय आहे. पण इथे फक्त संशोधन करूनही भागत नाही, तर त्यावर कामही करावे लागते. चांगल्या घरातील लोक गुन्हेगार का होतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे. जन्मठेपेची शिक्षा उपभोगत असलेल्यांना ता काय वाटते ? आणि काय करायची इच्छा आहे हे या पुस्तकात लेखिका गिरिजा कीर यांनी सांगितले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.