* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981599
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IF THE PARENTS ARE RUNNING BEHIND MONEY, FORGETTING EVERYTHING? WHAT IDEAL WILL THIS ATTITUDE SET BEFORE THE CHILDREN? THE FEMALES WHO CONSIDER THEIR BODY AS A SHOWPIECE DO NOT HESITATE TO USE IT FOR MONETARY GAINS THUS CAUSING EMOTIONAL POLLUTION. ALL THE EROTIC SCENES UNNECESSARILY PROVOKE YOUNG MINDS. WHEN WE LOOK AROUND AND WITNESS THE HIDEOUS WAYS TRIED OUT BY THE LEADERS IN THE LUST OF AUTHORITY THEN ONCE AGAIN WE ARE COMPELLED TO ASK OURSELVES, WHO WILL BE THE IDEAL FOR THE COMING UP GENERATIONS? MANY HAVE SET IN THE SEARCH OF LIGHT TODAY; THE SUN HAS SET AGES BACK FOR THEM. THEY ARE TRYING THEIR BEST TO FIND THE WAY OUT WITH JUST A TWINKLING LIGHT FROM THE ‘DIYA’. WE EXPECT A LOT FROM THE WRONG-DOERS, FROM THOSE WHO HAVE BEEN PUNISHED BY THE LAW AND JUDICIARY. BUT WHEN THEY TRY TO JOIN THE MAIN STREAM AFTER COMPLETING THEIR PUNISHMENTS, DO WE OFFER OUR HANDS WITHOUT VACILLATING EVEN FOR A MOMENT? ON THE CONTRARY, IT IS THIS SAME YOUTH THAT SUCCESSFULLY PRESERVES THE TENDERNESS AND THE FAITHS IN THEIR MINDS. THEY SET UP THEIR MINDS TO BE THE BEST AND AWAIT OUR COOPERATION.
पैशामागे लागलेले आई-वडील मुलांपुढचे आदर्श नष्ट करतात. शरीर ही प्रदर्शनाची वस्तू समजून तिची किंमत वसूल करणा-या मुली मानसिक प्रदूषणाला कारणीभूत आहेत. उत्तान दृश्यं तरुण मनाला चाळवतात. आज सत्तेसाठी चालणारी साठमारी पाहिली की प्रश्न पडतो, नव्या पिढीपुढे आपण कोणती श्रद्धास्थानं ठेवणार आहोत? ज्यांचा सूर्य मावळला आहे तीच आज प्रकाशाचा शोध घेताहेत; स्वतःची दिवली घेऊन मार्ग काढताहेत. शिक्षा भोगत असणा-या कैद्यांकडून समाजाने अपेक्षा ठेवताना, शिक्षा भोगून तावूनसुलाखून निघालेले हे तरुणच मनातल्या श्रद्धांना झळ पोचू देत नाहीत. त्यांना चांगलं व्हायचंय. आपण आपला आश्वासक हात पुढे केला पाहिजे.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JANMATHEP #JANMATHEP #जन्मठेप #ESSAYS #MARATHI #GIRIJAKEER #गिरिजाकीर "
Customer Reviews
  • Rating Starसुहास जोशी

    लेखिका गिरिजाताई कीर यांनी सामाजिक जाणीवेतून, महत्प्रयासाने साकारलेला `जन्मठेप` प्रकल्प वाचकांकरिता खुला झाला याचं अप्रूप वाटतं. मुळात हा विषय आजवर दुर्लक्षित राहिला, तो प्रत्यक्षात अवतरला तो आपल्या उदार सहकार्यामुळेच! आम्हा जन्मठेपींचं अरण्यरुदन आपलया प्रकाशनसंस्थेच्या विशेष कृपेमुळे मुद्रित झाले ही जाणीव ठेवून कृतज्ञता प्रकट करतो. ...Read more

  • Rating Star SAHITYA SUCHI Jan-2011

    कथा, कादंबरी, ललित लेखन, बालसाहित्य अशा वाङ्मयाच्या विविध लेखन दालनात विपुल लेखन करण्याऱ्या लेखिका गिरिजा कीर. त्या केवळ लेखिका नाहीत तर सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. बालगुन्हेगार, आदिवासी, कामगार स्त्रिया–मुले यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासाठी काम रून, त्यांच्या प्रश्नांवर त्यांनी लेख, मुलाखती, कथा असे लेखन केले आहे. त्यांच्या साहित्याचे वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादही झाले आहेत. लेखन आणि समाजसेवा याबद्दल अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘कथाकथन’ हे त्यांचे खास क्षेत्र मानले जाते. ‘जन्मठेपेची शिक्षा झालेले मध्यमवर्गीय सुशिक्षित गुन्हेगार’ हा या पुस्तकाचा विषय. ते गुन्हेगारीकडे का वळले? त्यांना आपल्या कृत्यांबद्दल पश्चाताप होतो आहे का? चांगल्या संस्कारातील ही मुले वाममार्गाकडे का वळली? त्यांचे भवितव्य काय? अशा अनेक अंगांनी त्यांनी संशोधन केले आहे. येरवडा जेल-पुणे, आग्वाद जेल-गोवा, आधारवाडी जेल-कल्याण येथे जाऊन त्यांनी कैद्यांच्या भेटगाठी घेतल्या आहेत. काही तुरुंगाधिकाऱयांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यातून त्यांचा कैद्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन लक्षात येतो. या अधिकाऱयांनी लेखिकेला दिलेल्या सौजन्यपूर्ण वागणुकीबद्दल त्यांनी ऋणनिर्देश केला आहे. पुस्तकांच्या परिशिष्टांमध्ये कैदी सुहास जोशी यांचा देहदानाचा अर्ज, येरवडा कारागृहाने गिरिजातार्इंना बंद्यांना भेटण्यासाठी दिलेले परवानगीपत्र, बंद्यांना मुलाखतींच्या आधारे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी दिलेले परवानगीपत्र, इंडियन एक्सप्रेसमधील निशा नमिआर यांच्या पुस्तकाचा परिचय करून देणारा इंग्रजी लेख, गौरी कुलकर्णी यांचा ‘बंदिजनांची आई’ हा गिरिजातार्इंच्या या कार्याविषयीचा ‘सकाळ’मधील लेख आणि ८ मार्च २००६ रोजी कल्याण कारागृहातील अधिकाऱयांच्या सहीने सर्व बंदिजनांच्या वतीने त्यांना देण्यात आलेला ‘माई’ सन्मान (मानपत्र) अशा सहा गोष्टींचा समावेश आहे. जन्मठेपेच्या बंदिजनांच्या हृदयपरिवर्तनाचे काम केल्याबद्दल या बंदिजनांच्या इच्छेनुसारच त्यांना हे मानपत्र दिले आहे. या कागदपत्रांमुळे गिरिजा कीर यांचे मानपत्र दिले आहे. या कागदपत्रांमुळे गिरीजा कीर यांचे सामाजिक भान लक्षात येते. तुरुंगातील कैद्यांसाठी त्या करत असलेले हे काम त्यांच्या घरच्या लोकांना पसंत नाही. पण तरीही सामाजिक जाणीवेने त्या ते करत राहिल्या आहेत. आपली हे काम करण्यामागची भूमिका, त्यांनी पुस्तकाच्या प्रारंभीच स्पष्ट केली आहे. येरवडा जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सुहास जोशीने त्यांचे ‘इथे दिवा लावायला हवा’ हे स्लम dwellers वरील पुरस्कार विजेते पुस्तक तसेच ‘लावण्याखुणा’ हे पुस्तक वाचले. त्या पुस्तकांसंबंधी विचार व्यक्त करणारे पत्र त्याने लेखिकेला पाठवले. लेखिकेने त्याला उत्तर पाठवले. तीन वर्षे दोघांचा पत्रव्यवहार चालू होता. मग कीर यांनी त्याला भेटायचा निर्णय घेतला. तुरुंगाधिकाऱयांची परवानगी घेऊन मुंबईहून पुण्याला येऊन त्या येरवडा जेलमध्ये त्याला भेटल्या. सुहासमुळे त्यांचा आणखी काही बंदिजनांशी संपर्क आला. त्यांना जाणवले की ही चांगल्या घरातील मुले भावनेच्या भरात काहीतरी करून बसतात आणि जन्माची गुन्हेगार ठरतात. मग उपेक्षित जीवन वाट्याला येते. मायेची माणसेही दुरावतात. त्यातले बरेचजण सुशिक्षित आहेत. त्यांना साहित्य, नाट्य, कला ह्यात रस आहे. ती गुन्हेगारीकडे का वळत असावीत? त्यांची मने दुबळी आहेत की कुटुंबसंस्थेत उणीवा आहेत? त्यांच्यावर वडिधाऱयांचे दडपण आहे का? पैसा हेच जीवनाचे ध्येय मानल्यामुळे नैराश्य वाट्याला येते का? हा कुसंगतीचा परिणाम आहे की कोणाची दहशत आहे? भ्रष्टाचार, शोषण, गुंडगिरी या गोष्टी कितपत जबाबदार आहेत? असे अनेक प्रश्न त्यांच्याभोवती फेर धरून नाचू लागले. गजाआडचे जग त्यांना खुणावू लागले. त्यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्या तरुण मुलांना भेटत राहिल्या. पुस्तके, राख्या, भेटकार्डे पाठवीत राहिल्या. पत्र लिहिणारा सुहास जोशी आणि त्याचे आणखी सहा मित्र यांच्या गुन्हेगारीच्या कहाण्यांवर हे पुस्तक आधारित आहे. राजकुमार गुप्ता आणि नीलिमा पंडित या अन्य कैद्यांनीही त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मुलांची मानसिकता जाणून घेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्या ह्य निष्कर्षांपर्यंत आल्या आहेत की अविवेकाने घडलेल्या चुकांबद्दल या मुलांना पश्चाताप होतो आहे. त्यांना चांगले नागरिक म्हणून जगायचे आहे. त्यांचे पुनर्वसन करायला हवे. गिरिजा कीर म्हणतात – ‘ज्यांचा सूर्य मावळला आहे तेच प्रकाशाचा शोध घेताहेत. स्वत:ची दिवली घेऊन मार्ग काढताहेत. शिक्षा भोगत असणाऱ्या कैद्यांकडून समाजाने अपेक्षा ठेवताना, शिक्षा भोगून तावूनसुलाखून निघालेले हे तरूणच मनातल्या श्रद्धांना झळ पोहोचू देत नाही. त्यांना चांगलं व्हायचंय. आपण आपला आश्वासक हात पुढे केला पाहिजे.’ अशा बंदिवानांबद्दल समाजाने क्षमाशील दृष्टी ठेवावी आणि कैद्यांनीही समाजाबद्दल कृतज्ञता बाळगावी असे त्यांना वाटते. तुरुंगातल्या सात मुलांची त्या ‘आई’ झाल्या आहेत. त्यापैकी संजय कांबळेला फाशीची शिक्षा जाहीर झालेली असते. परंतु राष्ट्रपतींनी दया केल्यामुळे त्याची फाशी रद्द होऊन जन्मठेप होते. जन्मठेपेच्या बंदिवानांची शिक्षा कमी व्हावी म्हणून तो प्रयत्नशील आहे. वसंत बंदावणे हा संगमनेरचा शिक्षक. एक मुलगी त्याच्यावर प्रेम करत होती. हा प्रतिसाद देईना तेव्हा त्याला बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकवले. निलेश जोशी एम. बी. झालेला, एका श्रीमंत तरूणीवर प्रेम करणारा, मुलीच्या बापाला त्यांचे प्रेम पसंत नव्हते. त्यांनी आणि निलेशच्या भावाने कारस्थान केले. न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली त्याला जन्मपेठ झाली. तुरूंगात तो झोपडपट्टीतल्या मुलांसाठी संस्कारवर्ग चालवतो. सुहास जोशी, संतोष भिंताडे, शिवाजी सांळुके आणि संतोष शिंदे यांच्याबद्दल थोड्या अधिक विस्ताराने लिहिले आहे. संतोष जोशी मूळचा सावंतवाडीजवळील ‘अरोंदा’ गावाचा राहणारा. त्याने आपल्या पत्रात कोकणचे निसर्गसौंदर्य वर्णन केले आहे. वडील गावचे पौरोहित्य करणारे - ‘किरवंत’ म्हणजे मरणोत्तर क्रियाकर्म करणारे. त्यामुळे इतर ब्राह्मण त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत. त्याची आई गोव्याची. ती त्याच्याकडून स्तोत्रे, श्लोक वगैरे पाठ करून घेते. दोन प्रीप्लॅन्ड मर्डर केल्याबद्दल त्याला जन्मठेप झाली आहे. शिक्षण पूर्ण झाल्याबद्दल नोकरीच्या शोधात मुंबईला आलेला संतोष, बेकारांच्या तांड्यात सामील झाला. १९९१ साली त्याला ‘बँक ऑफ कॉलिफोर्निया’मध्ये कम्युनिकेशन रूममध्ये ऑपरेटर म्हणून नोकरी लागली. ‘कल्याण’ नावाचा व्हाईस प्रेसिडेंट आणि ‘मीना’ नावाच्या लेडी ऑफिसरने त्याची निवड केली. लेखी ऑर्डर दिलीच नाही. १५०० रूपये पगारात तो १२/१४ तरास राबत होता. ऑफिसमध्ये काम करणारे सगळे तिशीच्या आतले कामसू पण अबोल. कोणालाच अपॉर्इंटमेंट लेटर नाही. मस्टर नाही, पे स्लिप नाही, भत्ते नाहीत. कोणाचीच बोलायची हिंमत नव्हती. ‘मीना, कल्याण’ यांची कंपनी आहे. ‘परवडत नसेल तर सोडून जा’ असा खाक्या होता. सर्वांना अपमानास्पद वागणूक दिली जात असे. लग्न असो वा मर्तिक एक दिवसही रजा मिळत नसे. थोडासा विरोध करणारा असला तर त्याची हकालपट्टी ठरलेली. एकीकडे कामाचा ताण तर दुसरीकडे नोकरी जाईल ही भीती. नशीबावर भरवसा ठेवून कष्ट करायचे. नको असलेली माणसे खोटा आळ ठेवून काढून टाकत. मीनाने मुद्दाम सुहासला लाथ मारली. आधी लेखी मेमो दिले. मग टर्मिनेशन ऑर्डर दिली. संतापाच्या भरात त्याने कोयत्याने वार करून मीना व कल्याण दोघांनाही ठार केले. स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला आणि जन्मठेप झाली. त्याच्या पत्रातील हकीगत वाचून लेखिकेप्रमाणे आपणही हादरून जातो. सुहासने आपल्या भागात जायचे म्हणून गोव्यातील तुरूंगात बदली मागून घेतली. कारावासातून सुटल्यावर गावी जाऊन वृद्धाश्रम काढायचे त्याचे स्वप्न आहे. मूळचा जळगावचा संतोष भिंताडे, लॉ करण्यासाठी पुण्यात बहिणीकडे आला.विद्यार्थी संघटनेचे काम करून लागला. बाजूच्या कॉलनीतील गुंड पोरांनी त्याच्या कॉलनीतील एका पोरीची छेड काढली. म्हणून त्यांना जाब विचारायला गेला. त्यातून एका पोराशी भांडण झाले. शिवीगाळ, मारामारी झाली. संतापाच्या भरात याने केलेल्या वाराने तो मरण पावला. हा स्वत:हून पोलिसस्टेशन मध्ये हजर झाला. जन्मठेप झाली. घरची माणसेही दुरावली. आता तो पैठणच्या खुल्या बंदिगृहात आहे. त्याच कारागृहातील शिवाजी साळुंके आपल्या कवितेतून कठोर वास्तव मांडतो आणि भविष्याचे आशादायी चित्र काढताना म्हणतो – आता तरी हे आपण बदलायला हवे घेऊनी हाती परत कुंचला चित्र नवे काढायला हवे। त्याचा ‘आत्मझड’ काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. वडारवाडीतील वयाने मोठ्या सुनीतावर प्रेम करणाऱ्या संतोष शिंदेचे कशावरून तरी तिच्याशी बिनसले. तिने पोलिसात तक्रार केली. संतोषच्या वडिलांनाही पोलिसांनी त्रास दिला तेव्हा संतापून संतोषने सुनीतावर चाकूने वार केले. त्यात तिचे निधन झाले. ह्याला अटक होऊन जन्मठेप झाली. तो कलाकार आहे. नाटिका बसवतो. अभिनय करतो. तुरुंगातल्या या तरूणांना गिरिजा कीर यांनी संजीवनी दिली आहे. त्यांची मानसिक ताकद वाढवली आहे. त्यामुळे त्या सर्वांची ‘माई’ झाल्या आहेत. पुस्तकातील येरवडा जेलचे वर्णन, तेथील गांधींचा पुतळा, पुणे करार झाला तो आम्रवृक्ष, ३०/३२ श्वेतशाम फोटो आणि चंद्रमोहन कुलकर्णीचे मुखपृष्ठ यामुळे पुस्तक आकर्षक झाले आहे. अवश्य वाचावे असे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 21-11-2010

    गुन्हेगारी हा जसा चिंतेचा विषय आहे, तसा संशोधनाचाही विषय आहे. पण इथे फक्त संशोधन करूनही भागत नाही, तर त्यावर कामही करावे लागते. चांगल्या घरातील लोक गुन्हेगार का होतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे. जन्मठेपेची शिक्षा उपभोगत असलेल्यांना ता काय वाटते ? आणि काय करायची इच्छा आहे हे या पुस्तकात लेखिका गिरिजा कीर यांनी सांगितले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more