* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980486
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHUBHADA GOGATE COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALL AROUND US WE CAN SEE THE SPACE WITH WHICH SCIENCE IS MAKING PROGRESS IN ALL AREAS OF LIFE TODAY. THIS HAS FURTHER ENABLED TO MAKE OUR LIFE BETTER IN MANY WAYS. WE ARE ENDURING LESS PAIN OWING TO THE INVENTIONS. YET, THERE ARE A HUGE NUMBER OF THINGS AND ELEMENTS OF WHICH SCIENCE SEEMS TO FIND NO EXPLANATION. THERE MIGHT BE AN ANSWER SOMEWHERE BUT RIGHT NOW ALL WE ARE CLUELESS ABOUT THEM. THIS HAS FURTHER GIVEN RISE TO MANY WRONG ASSUMPTIONS AND MISCONCEPTIONS. WE AS HUMAN BEINGS ALWAYS GET CARRIED AWAY WITH MYSTERIES AND INDULGE US INTO THOUGHTS RELATED TO THIS VAGUENESS. MRS. GOGATE IS A WELL-KNOWN SCI-FI WRITER. HER MYSTERIES ALSO HAVE THE SAME CAPACITY OF CAPTIVATING THE MINDS OF HER READERS.
आजचं युग हे विज्ञानयुग आहे. विज्ञानाची घोडदौड सर्व क्षेत्रांमध्ये चालू आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपलं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक सुखकर, आरामदायी, वेदनारहित होत आहे. असं असलं तरी अजूनही कित्येक गोष्टी अशा आहेत, की ज्यांचं स्पष्टीकरण आजच्या विज्ञानाला देता येत नाही. असं स्पष्टीकरण कदाचित उद्या मिळेल. पण आज तरी त्यांच्याभोवती गूढतेचं धुक आहे. या धुक्यात दडलेल्या सत्याचं स्पष्ट आणि वास्तव दर्शन होत नाही आणि त्यामुळे त्याविषयी अनेक प्रकारचे समज आणि गैरसमज निर्माण होतात. गूढ आणि विलक्षण गोष्टींचं माणसाला नेहमीच आकर्षण असतं. असं असेल का, असं खरंच घडेल का अशा विचारांनी तो भारला जातो. अशा काही भारणाऱ्या कथांचा हा संग्रह. शुभदा गोगटे या विज्ञानकथा लेखिका म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या विज्ञानकथांप्रमाणेच या गूढकथा वाचकाला खिळवून ठेवतात.
पुणे मराठी ग्रंथालय राजेंद्र बनहट्टी पुरस्कार २००९
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
GHAR #SHUBHADA GOGATE #LANDGA #CHITR #VAT #VAHI #NANDITA DIVAKAR AMIT #ARCHANA #SAMITA #DIDIRAJE #GOVINDA #ROHIT #RAVI
Customer Reviews
  • Rating StarLOUKIK LOKASHA 20-9-2009

    कधी काळी मराठी साहित्यात गूढ कथांना खूपच मागणी होती. कोणत्याही दिवाळी अंकात एखादी गूढकथा असल्याशिवाय अंकाला परिपूर्णता येत नाही असे समजले जाई. विशेषत: रत्नाकर मतकरी यांची गूढकथा असलेल्या दिवाळी अंकाला प्रचंड मागणी असे. अलीकडच्या काळात गूढकथेविषयी औत्ुक्य काही प्रमाणात कमी झाली आहे हे खरे असले तरी याच काळात शुभदा गोगटे यांचे घर हे पुस्तक याच गूढकथा घेऊन आलेले आहे. मागच्या पन्नास वर्षात विज्ञानाने प्रचंड प्रगती केली. माणसाची पावले चंद्रावर पडली. आरोग्य तंत्रज्ञान या क्षेत्रातली प्रगती विचार करण्याच्या पलीकडची आहे. मानवी स्वभाव, मानवी विचार याबद्दलही संशोधन झाले. डॉ. सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्राचा पाया घातला. आज मानसशास्त्रातही प्रचंड प्रगती झाली आहे. माणसाचे जगणे, जगण्याचा उद्देश याबद्दल असंख्य ग्रंथ बाजारात दिसतात. तरीही अजूनपर्यंत कोणत्याही माणसाला माणसाच्या मनाचा अचूक वेध घेता आलेला नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण सर्वश्रुत आहे. जगातल्या एका माणसाचा चेहरा दुसऱ्या माणसाच्या चेहऱ्याशी मिळत नाही. मानवी स्वभावाचेही तसेच असते. एका माणसाचा स्वभाव दुसऱ्या माणसाच्या स्वभावाशी जुळत नाही. माणसाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. आजच्या या प्रगतकाळातही काही माणसांना विज्ञानाच्या पलीकडे खूप काही असते असे वाटत असते. माणसाचा जन्म, त्याची वाढ आणि मृत्यू याचे चक्र अटळ असले तरी मृत्यूनंतरही एक वेगळे जग असते असा समज असलेली किंवा त्या दृष्टीने विचार करणारा एक मोठा वर्ग समाजात असतो. भारतीय माणसालाच गूढतेचे आकर्षण आहे असे नाही. जगभरातील माणसे रंगरुपाने वेगळे असू शकतात परंतु त्यांची विचार करण्याची पद्धत सारखीच असते. अत्यंत प्रगत समजल्या जाणाऱ्या राष्ट्रातूनही गूढकथा साहित्यांना चांगली मागणी असते. माणसाला जन्मापासून मृत्यूची भीती असते. कोणताही सजीव आयुष्यातला बहुतांशी वेळ मृत्यू कशाला म्हणता येईल त्याच विचारात घालवतो. बऱ्याच लोकांना मृत्यूनंतरचे जग कसे असेल, भारतीय परंपरेत तर पुनर्जन्माला खूपच महत्त्व दिले जाते. भारतीय तत्वज्ञान किंवा वैज्ञानिक परंपरा कोणताही सजीव ८४ लाख योनीचक्रातून फिरतो असे सांगत असते. माणसाला पुनर्जन्म मिळाला तर तो कशाचा असेल याबाबतही चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर शुभदा गोगटेंच्या या पुस्तकाकडे बघता येईल. या पुस्तकात असलेल्या पाचही कथातून माणसाला अमूर्त असे काही तरी दिसत असते. कथातील पात्रे आहेत त्यांच्यासोबत गूढतेची सावली आहे. शुभदा गोगटे या विज्ञानकथा लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कधीकधी कथानकातील काही घटनांना विज्ञानाचा पाया असल्याचे जाणवते. गूढकथेसाठी काही शब्द ठरलेले आहेत. भाषा विशिष्ट पद्धतीची पाहिजे. पात्रनिर्मिती करताना प्रचंड कल्पकता दाखवावी लागते. एक भासमान जग प्रत्यक्षपणे उभे करणे सोपे नसते. या कामात शुभदा गोगटे या यशस्वी झाल्या आहेत असे म्हणावे लागेल. गूढकथांना साहित्यिक मूल्य असते का या प्रश्नाबद्दल चर्चा करण्याचे कारण नाही. अशा कथा वाचणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांची तशी गरज आहे. हे लोक गूढकथा फक्त एकाचवेळी वाचतात असे नाही तर एकच पुस्तक अनेक वेळाही वाचतात आणि त्यातून त्याना मानसिक स्तरावर त्यांना पाहिजे असते तसे समाधान मिळते. या बाबींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. वास्तववादी साहित्य लिहिणे काहीसे सोपे असते. दैनंदिन आयुष्यात दिसणारी माणसे, घडणाऱ्या घटना यांच्याविषयी कथेची फ्रेम तयार झाली की आतील त्रुटीच्या जागा कल्पनेने भरून काढायच्या असतात. गूढकथेबद्दल मात्र तसे म्हणता येणार नाही. अशा कथातील जवळपास सर्व पात्रे काल्पनिक असतात. गूढकथा लिहिताना प्रचंड अशा कल्पनाशक्तीच्या वापर करावा लागतो. हे सर्व जमले तरच कथा जमते अन्यथा वाचक दहा-वीस ओळी वाचल्यानंतर पुस्तक बाजूला ठेवून मोकळा होतो. ‘घर’मधील कथा खूपच चांगल्या आहेत. वाचक एकदा पुस्तक हातात घेतले की ते पूर्ण करूनच बाजूला ठेवतो ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more