* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666182
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 18 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OUR SURROUNDINGS AND THE HAPPENINGS IN THEM ARE PICTURED THROUGH THE STORIES IN THIS BOOK. MALVIKA, WHOSE LIFE IS SHATTERED BECAUSE OF THE BLANK CALLS, ROHAN WHO IS STUCK IN THE WEB OF PYRAMID MARKETING, MOM WHO IS SACRIFICING EVERYTHING JUST FOR PAPA`S FREEDOM…. WE ALWAYS HEAR OR READ ABOUT ALL THESE THINGS. WHEN SOME YESHWANT IS TRUDGING ALONG THE WAY WITH IMMENSE PERSEVERANCE, WE ALSO TRY TO HELP HIM AS MUCH AS POSSIBLE. WE ALSO WITNESS THE FALL OF SOME VERY SUCCESSFUL VIJA UNCLE. EVERY TOWN AND VILLAGE HOUSES PEOPLE LIKE WHIMSICAL APPA, HIS ADJUSTING DAUGHTER-IN-LAW WHO SUPPORTS HER HUSBAND AND HAS A NATURE TO ADJUST ANY WHERE HIS DAUGHTER NILU WHO IS DISTURBED BECAUSE OF HER FAMILY PROBLEMS. THESE STORIES HAVE THEM AS THE CASTS AND THAT IS WHY WE FIND THEM SO FAMILIAR AND DEAR TO US.
आजकाल आपल्या सभोवती घडणा-या घटनांचे प्रतिबिंब ‘गोल गोल राणी’यातील कथांमध्ये दिसते. ब्लँक कॉल्समुळे उद्ध्वस्त झालेली मालविका, पिरॅमिड मार्केटिंगच्या मोहजालात रोहन, पपा सुटावेत यासाठी विलक्षण तडजोडी करणारी ममी... आपण सर्वांनीच पाहिलेले किंवा ऐकलेले असतात. जिद्दीने परिस्थितीशी दोन हात करून पुढे जाणा-या यशवंतला मदत करणा-यांत आपलाही खारीचा वाटा असतो आणि यशस्वी विजाकाकाचा अस्तही आपण पाहिलेला असतो. विक्षिप्त आप्पा, आपल्या नव-याला सांभाळून घेणारी त्यांची समजूतदार सून निमा, कौटुंबिक अडचणींमुळे त-हेवाईक झालेली आप्पांची मुलगी नीलू अशा लोकांनी भरलेली कुटुंबे थोड्या-फार फरकाने शहरात आणि गावात आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामुळेच या कथा मनाला भावणा-या ठरतात.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 08-01-2006

    हृदयस्पर्शी कथा... आपल्या भोवताली घडणाऱ्या घटना अतिशय तरलपणे लेखिका स्वाती चांदोरकर यांनी ‘गोल गोल राणी’ या कथासंग्रहात चितारल्या आहेत. पहिल्या शीर्षक कथेतील नायिका जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अडचणीत सापडलेली. बॉसच्या थोबाडीत मारते. नोकरी सोडते. नवा आकाशला हे पटत नाही. त्यांच्यात दरी निर्माण होते. तिला चिटिंग करता येत नाही. गोल गोल राणी, इथे इथे पाणी या चक्रात अडकलेली भावनावश नायिका लेखिकेने रंगवलीय. ‘शुभमंगल’ कथेत लग्नाचं भावविश्व बघणारी नीमा दिसते. सासरची लहान जागा, माणसं जास्त, चित्रकार नवऱ्याच्या कलेवर नीमा भुरळलेली. पती नंदनला यश प्राप्त होण्यासाठी खूप प्रयत्न करते. प्रत्यक्षात एका वेगळ्या वास्तावाला तिला सामोरं जावं लागतं. मूल नाही म्हणून अपमान होतात. तिचे उदात्त विचार, प्रगती, मन हे गुण उंबरठ्याबाहेरच. सर्वांसाठी कष्ट घेते, पण याची जाणीव त्यांना नाही. तिची मातृत्वाची घुसमट, हतबलता ‘शुभमंगल’मधून जाणवते. टुरिस्टसाठी गाड्या भाड्याने देणाऱ्या विजाकाकाची व्यथा ‘ऋणानुबंध’ कथेतून उत्कट मांडलेली. कष्टाने श्रीमंत झालेला नंतर अपघाताने विजाकाकाच्या वैभवाची राखरांगोळी होते. सिग्नलवर दुसऱ्यांच्या गाडीच्या काचा साफ करणारा विजाकाका मन विषण्ण करून जातो. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शनासाठी आहे. त्यावर सर्वस्वी अवलंबून राहू नये हे ‘दिशा’ कथेतून लेखिकेने मांडलंय. सांगितलेलं भविष्य खोटं ठरतं. त्याचे विपरित परिणाम नानांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरतात. पण नानी त्यांना सावरतात. तर ‘दिशाहीन’ ही सुद्धा ज्योतिषशास्त्रावर आधारलेली कथा आहे. या कथेत अखेरी ज्योतिष सांगणारे, लोकांना मार्गदर्शन करणारे भाऊसाहेब दिशाहीन ठरलेत, असं चित्रण आहे. ‘कुणी मला सांगाल?’ या कथेत महेश आणि मालकिवाचं भावविश्व सुरेख गुंफलय. मालविका महेशची पत्नी. खेड्यातून शहरात आलेली. लग्नानंतर तिचं जग बदलतं. हे नवीन जग तिला कसं वाटतं? निनावी फोनमुळे तिचं भावविश्व कसं बदलतं? याचं चित्रण सुरेख रेखाटलंय. ‘मृगजळ’ ही सुद्धा व्यथित करणारी कथा. एका डॉक्टरीण बाईचा एकुलता एक मुलगा रोहन कसा बिघडतो व तिचं जीवन कसं उदध्वस्त होतं? याचं चित्र लेखिकेने मन हेलावणारं उभं केलेलं. ‘फूट आणि फूटवेअर’ कथेत जिद्दीने कष्ट करून श्रीमंत बनलेल्या एका मुलाची कथा आहे. जोरात चाललेल्या व्यवसायात वडिलांचा मोह नडला त्यामुळे लहान सीमाच्या जीवनात निर्माण झालेलं वादळ अतिशय भावुकपणे लेखिकेने मांडलेलं आहे. तरुण झाल्यावर तिच्यावर कोणते प्रसंग ओढवतात? आईवडिलांचं न मिळालेलं प्रेम, सहवास. आई रात्र रात्र बाहेर, तर वडील दारूच्या नशेत. वडिलांवर आलेलं संकट आई स्वीकारते पण आईचं संकट सीमा स्वीकारते का? ही कथा सुद्धा उत्कृष्ट मांडलेली. लेखिकेने निवडलेले विषय अन् मांडणी सरस. भाषाशैली उत्तम. उदाहरण द्यायचं तर ‘मानापानावरून रूसलेल्या सासरच्या सावल्या सोबतीला होत्या.’ ‘आनंदाचा बहर किंवा वेदनेचा सूर प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून मांडत असतो.’ ‘माझ्या हातातल्या ब्रशमध्ये नीमाचा स्पर्श, कॅनव्हासला तिचा सुगंध, तर रंगांना तिचा स्वर आहे. चित्र पूर्ण होते ते तिच्या वात्सल्याने!’ अशी वाक्य सहज भावस्पर्शी मनाला सुखावतात. -रमेश उदारे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 12-02-2006

    समाजात आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब या स्वाती चांदोरकर यांच्या संग्रहातील दह कथांमधून दिसते. ब्लॅक कॉल्समुळे उद्ध्वस्त झालेली मालविका, पिरॅमिड मार्केटिंगच्या मोहजानात अडकलेला रोहन, पपा सुटावेत यासाठी विलक्षण तडजोड करणारी ममी, परिस्थितीशी गडणारा जिद्दी यशवंत, विक्षिप्त अप्पा अशी किती तरी पात्रे थोड्याफार फरकाने आपल्याला समाजात पाहायला मिळतात. त्यामुळेच या कथा मनाला भावणाऱ्या ठरतात. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 8-1-2006

    कधी काय घडणार, हे आधीच ठरलेलं असते, असे सर्वसाधारण सर्वचजण म्हणतात... जी ती गोष्ट त्या त्या वेळीच घडते. पण माणसाला प्रत्येक गोष्टींची घाई असते. त्या अदृश्य शक्तीचं नियोजन माणूस स्वीकारू शकत नाही ते ह्याच कारणाने. मग चुटपुट लागून राहते. अगदी सहजतेने वधान केले जातं, ‘‘अरेरे, हे आधी घडलं असतं तर...?’’ घडून गेलेल्या गोष्टींवर पश्चाताप करण्याची वेळ माणूस स्वत:च्या आयुष्यात वारंवार आणतो. आजकाल आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब ‘गोल गोल राणी’ मधील कथांमध्ये दिसते. भावनांचा होणारा कोंडमारा आणि त्याचे दारूण परिणाम येणाऱ्या बाळांवर किती भयानकपणे होतात आणि एकाबरोबरच कुटुंबातील सगळ्यांनाच त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागतात, याचे विदारक चित्र उलगडणारी ‘गोल गोल राणी’ ही कथा चुटपुट लावून जाते. ब्लँक कॉल्समुळे उद्ध्वस्त झालेली मालविका, पिरॅमिड मार्केटिंगच्या मोहजाळात अडकून संपलेला रोहन, श्रीमंतीच्या हव्यासापायी भरकटलेला पती, पप्पाला वाचविण्यासाठी विलक्षण तडजोड करणारी मम्मी आणि तिची मुलगी... आपण सर्वांनीच पाहिलेले किंवा ऐकलेले असतात. जिद्दीने परिस्थितीशी दोन हात करून पुढे जाणाऱ्या यशवंतला मदत करणाऱयांत आपलाही खारीचा वाटा असतो आणि यशस्वी विजाकाकाचा अस्तही आपण पाहिलेला असतो. विक्षिप्त आप्पा, आपल्या नवऱ्याला सांभाळून घेणारी त्यांची समजूतदार सून निमा, कौटुंबिक अडचणींमुळे तऱ्हेवाईक झालेली आप्पांची मुलगी निलू अशा लोकांनी भरलेली कुटुंबे थोड्याफार फरकाने शहरात आणि गावात आपल्याला पहायला मिळतात आणि यामुळेच या कथा मनाला भावणाऱ्या ठरतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो