* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666182
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 18 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OUR SURROUNDINGS AND THE HAPPENINGS IN THEM ARE PICTURED THROUGH THE STORIES IN THIS BOOK. MALVIKA, WHOSE LIFE IS SHATTERED BECAUSE OF THE BLANK CALLS, ROHAN WHO IS STUCK IN THE WEB OF PYRAMID MARKETING, MOM WHO IS SACRIFICING EVERYTHING JUST FOR PAPA`S FREEDOM…. WE ALWAYS HEAR OR READ ABOUT ALL THESE THINGS. WHEN SOME YESHWANT IS TRUDGING ALONG THE WAY WITH IMMENSE PERSEVERANCE, WE ALSO TRY TO HELP HIM AS MUCH AS POSSIBLE. WE ALSO WITNESS THE FALL OF SOME VERY SUCCESSFUL VIJA UNCLE. EVERY TOWN AND VILLAGE HOUSES PEOPLE LIKE WHIMSICAL APPA, HIS ADJUSTING DAUGHTER-IN-LAW WHO SUPPORTS HER HUSBAND AND HAS A NATURE TO ADJUST ANY WHERE HIS DAUGHTER NILU WHO IS DISTURBED BECAUSE OF HER FAMILY PROBLEMS. THESE STORIES HAVE THEM AS THE CASTS AND THAT IS WHY WE FIND THEM SO FAMILIAR AND DEAR TO US.
आजकाल आपल्या सभोवती घडणा-या घटनांचे प्रतिबिंब ‘गोल गोल राणी’यातील कथांमध्ये दिसते. ब्लँक कॉल्समुळे उद्ध्वस्त झालेली मालविका, पिरॅमिड मार्केटिंगच्या मोहजालात रोहन, पपा सुटावेत यासाठी विलक्षण तडजोडी करणारी ममी... आपण सर्वांनीच पाहिलेले किंवा ऐकलेले असतात. जिद्दीने परिस्थितीशी दोन हात करून पुढे जाणा-या यशवंतला मदत करणा-यांत आपलाही खारीचा वाटा असतो आणि यशस्वी विजाकाकाचा अस्तही आपण पाहिलेला असतो. विक्षिप्त आप्पा, आपल्या नव-याला सांभाळून घेणारी त्यांची समजूतदार सून निमा, कौटुंबिक अडचणींमुळे त-हेवाईक झालेली आप्पांची मुलगी नीलू अशा लोकांनी भरलेली कुटुंबे थोड्या-फार फरकाने शहरात आणि गावात आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामुळेच या कथा मनाला भावणा-या ठरतात.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 08-01-2006

    हृदयस्पर्शी कथा... आपल्या भोवताली घडणाऱ्या घटना अतिशय तरलपणे लेखिका स्वाती चांदोरकर यांनी ‘गोल गोल राणी’ या कथासंग्रहात चितारल्या आहेत. पहिल्या शीर्षक कथेतील नायिका जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अडचणीत सापडलेली. बॉसच्या थोबाडीत मारते. नोकरी सोडते. नवा आकाशला हे पटत नाही. त्यांच्यात दरी निर्माण होते. तिला चिटिंग करता येत नाही. गोल गोल राणी, इथे इथे पाणी या चक्रात अडकलेली भावनावश नायिका लेखिकेने रंगवलीय. ‘शुभमंगल’ कथेत लग्नाचं भावविश्व बघणारी नीमा दिसते. सासरची लहान जागा, माणसं जास्त, चित्रकार नवऱ्याच्या कलेवर नीमा भुरळलेली. पती नंदनला यश प्राप्त होण्यासाठी खूप प्रयत्न करते. प्रत्यक्षात एका वेगळ्या वास्तावाला तिला सामोरं जावं लागतं. मूल नाही म्हणून अपमान होतात. तिचे उदात्त विचार, प्रगती, मन हे गुण उंबरठ्याबाहेरच. सर्वांसाठी कष्ट घेते, पण याची जाणीव त्यांना नाही. तिची मातृत्वाची घुसमट, हतबलता ‘शुभमंगल’मधून जाणवते. टुरिस्टसाठी गाड्या भाड्याने देणाऱ्या विजाकाकाची व्यथा ‘ऋणानुबंध’ कथेतून उत्कट मांडलेली. कष्टाने श्रीमंत झालेला नंतर अपघाताने विजाकाकाच्या वैभवाची राखरांगोळी होते. सिग्नलवर दुसऱ्यांच्या गाडीच्या काचा साफ करणारा विजाकाका मन विषण्ण करून जातो. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शनासाठी आहे. त्यावर सर्वस्वी अवलंबून राहू नये हे ‘दिशा’ कथेतून लेखिकेने मांडलंय. सांगितलेलं भविष्य खोटं ठरतं. त्याचे विपरित परिणाम नानांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरतात. पण नानी त्यांना सावरतात. तर ‘दिशाहीन’ ही सुद्धा ज्योतिषशास्त्रावर आधारलेली कथा आहे. या कथेत अखेरी ज्योतिष सांगणारे, लोकांना मार्गदर्शन करणारे भाऊसाहेब दिशाहीन ठरलेत, असं चित्रण आहे. ‘कुणी मला सांगाल?’ या कथेत महेश आणि मालकिवाचं भावविश्व सुरेख गुंफलय. मालविका महेशची पत्नी. खेड्यातून शहरात आलेली. लग्नानंतर तिचं जग बदलतं. हे नवीन जग तिला कसं वाटतं? निनावी फोनमुळे तिचं भावविश्व कसं बदलतं? याचं चित्रण सुरेख रेखाटलंय. ‘मृगजळ’ ही सुद्धा व्यथित करणारी कथा. एका डॉक्टरीण बाईचा एकुलता एक मुलगा रोहन कसा बिघडतो व तिचं जीवन कसं उदध्वस्त होतं? याचं चित्र लेखिकेने मन हेलावणारं उभं केलेलं. ‘फूट आणि फूटवेअर’ कथेत जिद्दीने कष्ट करून श्रीमंत बनलेल्या एका मुलाची कथा आहे. जोरात चाललेल्या व्यवसायात वडिलांचा मोह नडला त्यामुळे लहान सीमाच्या जीवनात निर्माण झालेलं वादळ अतिशय भावुकपणे लेखिकेने मांडलेलं आहे. तरुण झाल्यावर तिच्यावर कोणते प्रसंग ओढवतात? आईवडिलांचं न मिळालेलं प्रेम, सहवास. आई रात्र रात्र बाहेर, तर वडील दारूच्या नशेत. वडिलांवर आलेलं संकट आई स्वीकारते पण आईचं संकट सीमा स्वीकारते का? ही कथा सुद्धा उत्कृष्ट मांडलेली. लेखिकेने निवडलेले विषय अन् मांडणी सरस. भाषाशैली उत्तम. उदाहरण द्यायचं तर ‘मानापानावरून रूसलेल्या सासरच्या सावल्या सोबतीला होत्या.’ ‘आनंदाचा बहर किंवा वेदनेचा सूर प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून मांडत असतो.’ ‘माझ्या हातातल्या ब्रशमध्ये नीमाचा स्पर्श, कॅनव्हासला तिचा सुगंध, तर रंगांना तिचा स्वर आहे. चित्र पूर्ण होते ते तिच्या वात्सल्याने!’ अशी वाक्य सहज भावस्पर्शी मनाला सुखावतात. -रमेश उदारे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 12-02-2006

    समाजात आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब या स्वाती चांदोरकर यांच्या संग्रहातील दह कथांमधून दिसते. ब्लॅक कॉल्समुळे उद्ध्वस्त झालेली मालविका, पिरॅमिड मार्केटिंगच्या मोहजानात अडकलेला रोहन, पपा सुटावेत यासाठी विलक्षण तडजोड करणारी ममी, परिस्थितीशी गडणारा जिद्दी यशवंत, विक्षिप्त अप्पा अशी किती तरी पात्रे थोड्याफार फरकाने आपल्याला समाजात पाहायला मिळतात. त्यामुळेच या कथा मनाला भावणाऱ्या ठरतात. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 8-1-2006

    कधी काय घडणार, हे आधीच ठरलेलं असते, असे सर्वसाधारण सर्वचजण म्हणतात... जी ती गोष्ट त्या त्या वेळीच घडते. पण माणसाला प्रत्येक गोष्टींची घाई असते. त्या अदृश्य शक्तीचं नियोजन माणूस स्वीकारू शकत नाही ते ह्याच कारणाने. मग चुटपुट लागून राहते. अगदी सहजतेने वधान केले जातं, ‘‘अरेरे, हे आधी घडलं असतं तर...?’’ घडून गेलेल्या गोष्टींवर पश्चाताप करण्याची वेळ माणूस स्वत:च्या आयुष्यात वारंवार आणतो. आजकाल आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब ‘गोल गोल राणी’ मधील कथांमध्ये दिसते. भावनांचा होणारा कोंडमारा आणि त्याचे दारूण परिणाम येणाऱ्या बाळांवर किती भयानकपणे होतात आणि एकाबरोबरच कुटुंबातील सगळ्यांनाच त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागतात, याचे विदारक चित्र उलगडणारी ‘गोल गोल राणी’ ही कथा चुटपुट लावून जाते. ब्लँक कॉल्समुळे उद्ध्वस्त झालेली मालविका, पिरॅमिड मार्केटिंगच्या मोहजाळात अडकून संपलेला रोहन, श्रीमंतीच्या हव्यासापायी भरकटलेला पती, पप्पाला वाचविण्यासाठी विलक्षण तडजोड करणारी मम्मी आणि तिची मुलगी... आपण सर्वांनीच पाहिलेले किंवा ऐकलेले असतात. जिद्दीने परिस्थितीशी दोन हात करून पुढे जाणाऱ्या यशवंतला मदत करणाऱयांत आपलाही खारीचा वाटा असतो आणि यशस्वी विजाकाकाचा अस्तही आपण पाहिलेला असतो. विक्षिप्त आप्पा, आपल्या नवऱ्याला सांभाळून घेणारी त्यांची समजूतदार सून निमा, कौटुंबिक अडचणींमुळे तऱ्हेवाईक झालेली आप्पांची मुलगी निलू अशा लोकांनी भरलेली कुटुंबे थोड्याफार फरकाने शहरात आणि गावात आपल्याला पहायला मिळतात आणि यामुळेच या कथा मनाला भावणाऱ्या ठरतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more