‘DUSKAL..!’ IS A HEARTBREAKING STORY ABOUT TWO SPECIES OF ANIMALS – HUMANS AND ANIMALS – WHO ARE STARVING DUE TO WATER SCARCITY, BARREN FORESTS, AND WHETHER THE DRY SEASON, WHICH HAS COME AS A GUEST OF THE SUN GOD’S GRACE, CAN SAVE OR KILL A PERSON. ARE WE ALL FORGETTING THAT RURAL SETTLEMENTS AND THEIR PEOPLE ARE A PART OF OUR OWN WORLD, IMMERSED IN URBAN LIFE? BECAUSE, A VILLAGE – WHICH HAS SEEN BOTH PROSPERITY AND DROUGHT – HAS EXPERIENCED PROSPERITY ACCORDING TO ITS ABILITY; BUT SUDDENLY, WHAT WAS THERE WAS GONE AND A DRY SEASON HAS COME UPON THE VILLAGE. THIS SEASON EMBRACES EVERYONE, FROM THE ELDERS OF THE VILLAGE – FROM THE FAT ANIMALS – TO THE PEOPLE WITH THEIR STOMACHS ON THEIR HANDS, AND IT CAUSES SUCH A STIR THAT DUE TO ITS IMPACT, A HAPPY FAMILY OF FOUR LEAVES THE FIRST CHILD OF THE FAMILY ORPHANED AND LEAVES FOREVER. A HEART-WRENCHING NOVEL ABOUT WHAT DUSKAL, WHO HAS BECOME AN ANGRY GOD AND A DISASTER, SHOWS A FAMILY AND THE VILLAGERS...
पाणी टंचाई, उजाड रान यामुळं भुकेनं आसुसलेल्या प्राण्याच्या दोन जाती – माणूस व जनावर अन् सूर्यदेवाची कृपा म्हणून पाहुणा बनून आलेला रखरखता काळ माणसाला जगवतो का मारतो याची विदिर्ण कहाणी ‘दुस्काळ..!’ शहरी जीवनात रममाण झालेले आपण सर्वच ग्रामीण वस्ती व तिथली जनता आपल्याच जगाचा एक भाग आहेत हे विसरून जात आहोत का? कारण, एक गाव – बहर व दुष्काळ दोन्ही बघितलेलं – सुबत्ता प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकाने अनुभवलेली; पण अचानक होत्याचं नव्हतं होतं आणि कोरडा दुष्काळ गावावर काळ बनून येतो. हा काळ गावच्या मोठ्या लोकांपासून – धष्टपुष्ट जनावरांपासून – हातावर पोट असणार्या माणसांपर्यंत सर्वांना कवेत घेतो अन् असा काही घाला घालतो की, त्याच्या तडाख्यामुळे चार जणांचं हसरं कुटुंबं घरच्या पहिल्या लेकराला अनाथ करून कायमचं निघून जातं. कोपलेला देव अन् संकट बनून आलेला दुस्काळ एका कुटुंबाला अन् गावकर्यांनाही काय काय दिस दाखवतो त्याची मन हेलावून टाकणारी कादंबरी...