BORN IN A SETTLEMENT OUTSIDE THE VILLAGE, THE INTELLIGENT BASAVANNA DREAMS OF BECOMING A TEACHER AND LEARNING A LOT; BUT HIS FUTURE WIFE, CHINNI, IS MADE A DEVADASI BY HER JOGATINI AUNT. BASAVANNA ALSO JOINS HIS WORK BY COMING IN CONTACT WITH DR. DIXIT, WHO WORKS AGAINST THE DEVADASI PRACTICE; BUT THE PEOPLE OF JOGATINI RISE UP AGAINST HIM. TO SAVE HIS LIFE, HE HAS TO HIDE IN A CEMETERY, THEN HE HAS TO GO TO MUMBAI TO LIVE IN DHARAVI, WITH A GOON NAMED KIRAPPA MOILY. KIRAPPA ARRANGES FOR BASAVANNA TO MARRY HIS MAID`S DAUGHTER AND BASAVANNA DISAPPEARS FROM THERE AND TAKES SHELTER IN A GRAVEYARD, FOR ALMOST TEN YEARS. LATER, WITH THE HELP OF HIS CHILDHOOD FRIEND, HE GETS A GOVERNMENT JOB, HAS A SYMBOLIC MARRIAGE WITH CHINNI, LATER MARRIES SUBHADRA, HAS CHILDREN, AND LIVES A NORMAL LIFE; BUT BASAVANNA, WHO HAS LEARNED SOME AGHORI KNOWLEDGE WHILE LIVING IN THE GRAVEYARD, DIES IN A VERY STRANGE WAY. A HEART-WRENCHING TRUE STORY
गावकुसाबाहेरच्या वस्तीत जन्मलेल्या हुशार बसवण्णाचं स्वप्न असतं शिक्षक होऊन खूप शिकण्याचं; पण त्याच्या होणार्या पत्नीला, चिन्नीला तिची जोगतीण आत्या देवदासी बनवते. देवदासी प्रथेच्या विरोधात काम करणार्या डॉ. दीक्षितांच्या संपर्कात येऊन बसवण्णाही त्यांच्या कार्यात सामील होतो; पण जोगतिणीचे लोक त्याच्या जिवावर उठतात. जीव वाचवण्यासाठी त्याला कबरीत लपावं लागतं, नंतर मुंबईला धारावीत जाऊन राहावं लागतं, किराप्पा मोईली या गुंडाकडे. किराप्पा त्याच्या रखेलीच्या मुलीशी बसवण्णाचं लग्न ठरवतो आणि बसवण्णा तिथून गायब होऊन एका स्मशानात आश्रय घेतो, जवळजवळ दहा वर्षं. नंतर त्याच्या बालमित्राच्या मदतीने त्याला सरकारी नोकरी लागते, चिन्नीशी प्रतीकात्मक विवाह होतो, नंतर सुभद्राशी लग्न होऊन, मुलं होऊन, तो सर्वसामान्य आयुष्य जगतो; पण स्मशानात राहत असताना थोडीफार अघोरी विद्या शिकलेल्या बसवण्णाचा मृत्यू फार विचित्र पद्धतीने होतो. अंगावर शहारे आणणारी सत्यकथा