* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BINDUSAROVAR
  • Availability : Available
  • ISBN : 9789353174613
  • Edition : 3
  • Publishing Year : DECEMBER 2008
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THRILLING CHASE TO ACQUIRE THE MYSTERIOUS OBJECT ENDS AT BINDU LAKE TILL REACHING THERE PILGRIMS GET MANY MYSTERIOUS ENIGMATIC EXPERIENCES THEY HAVE TO CROSS THREE GATES ON THREE DIFFERENT PLANES CROSSING EACH GATE LEADS THEM INTO A DIFFERENT KIND OF LAND SPECTACULAR IN THEIR IMAGERY
‘बिंदूसरोवर’ ही राजेन्द्र खेर यांची अद्भुतरम्य उत्वंÂठावर्धक कादंबरी. बिंदूसरोवर हे काल्पनिक ठिकाण असलं, तरी त्याची लेखकाने वर्णिलेली रमणीयता आपल्याला वास्तवसदृश अनोख्या विश्वात घेऊन जाते. हिमालय हे योगी-तपस्वी यांचं तपसाधना करण्याचं ठिकाण. स्वामी शिवानंद आपल्या दोन शिष्यांसह एका गुहेत साधना करीत असतात. त्यांच्याकडे परग्रहावरील अतिमानवाने दडवलेली पंचधातूची पेटी असते; ज्यात एक वौQश्वक रहस्य जपलेलं असतं. चिनी सैनिक तिबेटमधल्या पुरातन मंदिरातून त्या पेटीची माहिती मिळवून शोध घेत शिवानंदांच्या गुहेपर्यंत पोहोचतात. योगी आपल्या विश्वनाथन् नामक शिष्याकडे पेटी सुपूर्द करून त्याला दूर रवाना करतात. प्रा. विश्वनाथन यांच्याकडून व्याख्यानात अनवधानाने या रहस्याचा उल्लेख होतो... आणि पेटी हस्तगत करण्यासाठी अज्ञात व्यक्ती प्राध्यापकांच्या घरी पोहोचतात. तत्पूर्वी ते आपला सुहृद विक्रमकडे पेटी सोपवून त्याला दक्षिणेकडे पाठवतात. रेल्वेत विक्रमला कोण कोण भेटतात... संकटं झेलत ते स्वप्नमयी रमणीय बिंदूसागरापर्यंत कसे पोहोचतात... तेथे त्यांना कोणत्या वौQश्वक रहस्याचा बोध होतो, हे जाणून घेण्यासाठी ही अत्यंत उत्वंÂठावर्धक कादंबरी अवश्य वाचायला हवी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#बिंदूसरोवर #राजेन्द्रखेर #हिमालय #परग्रहावरीलअतिमानव #तिबेटमधीलपुरातनमंदिर #चिनीसैनिक #स्वामीयोगानंद #पंचधातूचीगूढपेटी #विश्वनाथनजगमोहन #विक्रम #महानंद #अपूर्वा #त्रिदंडीमहाराज #कीथ #शंकर #ऑस्कर #पिंड #इंद्रधनुष्य #देव #गंधर्व #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #BINDUROVAR #RAJENDRAKHER #HIMALAYAS #TIBELATED ANCIENT TEMPLES #CHINESEMILITARY #VISHWANATHANJAGMOHAN #VIKRAM #MAHANANDA #APURVA #TRIDANDIMAHARAJ #KEITH #SHANKAR #OSCAR #PIND#INDRADHU#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating Starसुप्रिया हळबे - ठाणे वार्ता

    एक अप्रतिम कादंबरी. विविध विषयांनी नटलेली. मनाला आनंद देणारी पण नकळत चिंतन, आत्मशोध घ्यायला लावणारी अनोखी अशी ही कादंबरी... "बिंदुसरोवर." राजेन्द्र खेर लिखित बिंदुसरोवर ही कादंबरी म्हणजे एक उत्तम रहस्यमय प्रवास. लेखकाबरोबर वाचक नकळत कल्पने्या प्रवासाला सुरूवात करतो आणि कादंबरीतील साऱ्या घटनांमधील एक विशेष पात्र होऊन त्या रहस्यमय, अद्भुत, अध्यात्मिक प्रवासाची अनुभूती घेत जातो.. तिबेटमध्ये घुसखोरी करून चीनचे सैनिक अनेक मंदिरांचा विध्वंस करतात. त्याचवेळी त्यांना माहिती मिळते की, भारतात एका गूढ ठिकाणी अशी एक वस्तू आहे की तिच्या साहाय्याने संपूर्ण विश्वाची रहस्ये उलगडत जातील आणि माणूस संपूर्ण विश्वावर ताबा मिळवू शकेल.. योगी शिवानंद यांचे दोन शिष्य..विश्वनाथ आणि मोहनीश. जे हिमालयात आपल्या गुरुसमवेत योगाभ्यासाची ज्ञानोपासना करीत असतात. नेमके त्याचवेळी चिनी आक्रमक तो संपूर्ण परिसर व्यापून टाकतात. पन्नास वर्षे एका विलक्षण धातूच्या पेटीचा सांभाळ केल्यानंतर ती पेटी आणि एक भूर्जपत्र योगी शिवानंद, विश्वनाथ यांच्याकडे सुपूर्त करतात. त्या पेटीत नेमकं काय असतं...? प्रा.विश्वनाथ यांच्यावर विश्वास ठेवून सुपूर्त केलेल्या धातूच्या पेटीचं पुढे काय होतं...? याचा संपूर्ण अध्यात्मिक, रोमांचक प्रवास म्हणजे बिंदुसरोवर ही कादंबरी.. विज्ञानाच्या अभ्यासाबरोबरच अध्यात्माची, योगिक क्षेत्राची आवड असलेले, अनुभूती घेतलेले प्रा.विश्वनाथ त्यांच्यावर विश्वास ठेवून किंवा त्यांच्याबद्दल खात्री बाळगून त्यांचे गुरु त्यांच्यावर ती पेटी जीवापाड जपण्याची जबाबदारी देतात. पण त्यानंतर जेव्हा त्यांच्यावर संकट येते तेव्हा प्रा.विश्वनाथ काय करतात...ती धातूची पेटी पुढे कुणाकडे सुपूर्त करतात...प्रत्येक टप्प्यावर पेटीचा सांभाळ करायला मदत करणारे महानंद नेमके असतात तरी कोण...? ह्या सर्व गोष्टींची उत्कंठा प्रत्येक पानासरशी वाढत जाते. शेवटच्या टप्प्यात तर उत्कंठा शिगेला पोहोचते, विचारांचे वादळ मनात घोंगावू लागते आणि त्याचमुळे वेळेचे भान न राहता वाचक हातात घेतलेली कादंबरी संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवत नाही.. कादंबरी वाचून झाल्यानंतर देखील त्यातील अध्यात्मिक विचारांनी घेतलेली मनाची पकड चटकन सैल होत नाही. बराच काळ वाचकाच्या मनावर त्याचे गारूड तसेच राहते. ही कादंबरी निव्वळ कल्पनेत रमवणारी नसून, वाचकाला विचार करायला प्रवृत्त करणारी आहे. सध्याच्या काळात प्रत्येकजण भौतिक सुखाच्या मागे धावत असतो. अनेक उत्तम, मनाला पटणाऱ्या गोष्टी मागे सारत निव्वळ ध्येयपूर्तीसाठी योग्य अयोग्यतेच्या पलीकडे जाऊन काम करत असतो. पण बिंदुसरोवर ही कादंबरी वाचल्यानंतर वाचक नक्कीच चिंतनशील अवस्थेत जाण्यासाठी प्रवृत्त होतो.. बिंदुसरोवर वाचताना, कुठेही ते रटाळ, कंटाळवाणे होत नाही. लेखक राजेन्द्र खेर यांच्या ओघवत्या लेखनशैलीचा प्रभाव नक्कीच वाचकाच्या मनाचा वेध घेते. प्रत्येक घटनेत आपण प्रत्यक्ष तिथे आहोत याची अनुभूती घेत एक अद्भुत, अविस्मरणीय आनंददायी प्रवास करत वाचक " बिंदुसरोवरात" नाहून जातो.. ह्या रहस्यमय, अद्भुत, अविस्मरणीय आणि अध्यात्मिक प्रवासाचा आनंद घेण्यासाठी राजेन्द्र खेर लिखित बिंदुसरोवर ही कादंबरी जरूर वाचावी. ...Read more

  • Rating StarVaishali Joshi Nagarkar

    नुकतेच बिंदू सरोवर हे पुस्तक वाचले, रम्य, रहस्यमय कथानक. एक वेगळे पुस्तक म्हणून नक्कीच वाचनीय.

  • Rating StarYogesh Ugale

    बिंदुसरोवर. केवळ अद्भुत कादंबरी. या कादंबरीत केवळ कल्पनाविलास नाही तर कल्पनांना वैचारिक अधिष्ठान आहे. यातील लेखन केवळ मनोरंजन करणारे नसून मनात विचारांचे अंजन घालणारे असे आहे. अतिशय प्रवाही लेखनशैली, खिळवून ठेवणारी प्रसंगमांडणी आणि वारंवार अचंबित करणरे धक्के देऊन उत्कंठा वाढवणारी ही कादंबरी वेळोवेळी अंतर्मुख व्हायला भागही पाडते. प्रचलित fiction या प्रकारातील कादंबऱ्यांपेक्षा या कादंबरीचा गाभा वेगळा आहे. अनेक प्रसंगांमधून सामाजिक उन्नती - अवनतीचे चिंतन समोर येते. अद्भुतरम्य कल्पनाविश्वात विहरणाऱ्या वाचकाला हे लेखन अगदी अलगदपणे विचारांच्या लाटेवर बसवून आत्मजाणीवेपर्यंत घेऊन जाते. हा प्रवास अतिशय आनंददायी आहे. नववीत असताना मी ही कादंबरी पहिल्यांदा वाचल्याचे आठवते. या कादंबरीकडे मी आकर्षित झालो ते तिच्या मनोवेधक मुखपृष्ठामुळे. आजही ते आकर्षण कायम आहे. आज तिसऱ्यांदा ही कादंबरी वाचताना कोणताही प्रसंग कंटाळवाणा वाटत नसून पहिल्याइतक्याच आतुरतेने वाचला जातो, यात कोणतेही नवल वाटण्याचे कारण नाही. कारण यातील लेखनात नित्य नाविन्यता जाणवते. त्याच त्या प्रसंगांतून चिंतन आणि अध्ययनाचे नवनवीन बिंदू दरवेळी गवसत जातात. जाणिवसमृध्द आत्मिक बिंदुसरोवराकडे चिंतनशील मनाची यात्रा सुरु राहते.. २०२५ सालची परिस्थिती कल्पनेतून साकार करुन कादंबरीची सुरुवात होते. विज्ञानाच्या सहाय्याने केलेली प्रचंड प्रगती, केवळ भौतिक उपभोगांत रममाण झालेली भारतासहित सगळ्या जगातील मानवजात, अशा पार्श्वभूमीवर एकेक प्रसंग पुढे सरकू लागतो. विज्ञानाच्या अध्ययनाबरोबरच आध्यात्मिक सत्याची अनुभूती घेतलेले प्रा. विश्वनाथन सर. आपल्या साधनाकाळात त्यांच्या गुरुजींनी त्यांच्याकडे एक पेटी रक्षणासाठी सोपविली, जिच्यात असे रहस्य दडले आहे की ज्यायोगे संपूर्ण विश्वावर नियंत्रण मिळवता येईल. जगातील अनेक शक्ती ती पेटी प्राप्त करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावतात. विक्रम भार्गव नावाच्या आपल्या एका विद्यार्थ्याला प्रा. विश्वनाथन ती पेटी बिंदुसरोवरात न्यायला सांगतात. येथून सुरु होतो बिंदुसरोवराचा रोमांचक प्रवास.. प्रत्येक पान उलटताना उत्कंठा वाढतच जाते. मनोमन त्या चित्तथरारक प्रवासाचा आनंद घेताना मनाच्या एका कोपर्‍यात त्या पेटीत दडलेल्या रहस्याविषयी गूढ तसेच राहते. शेवटी शेवटी ही उत्कंठा परमोच्च अवस्थेला पोहचते. या कादंबरीत विविध प्रसंगांद्वारे आणि पात्रांच्या आपापसांतील संवादाद्वारे जीवन, विज्ञान आणि धर्मविषयक जे चिंतन मांडले आहे, त्याचा प्रभाव अंतरंगी दरवळत राहतो. विकासाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणारा भारत बघता बघता आपण खेड्यांतील, गिरीकंदरातील दारिद्र्यात जीवन कंठणाऱ्या भारतापर्यंत येऊन पोहचतो. परंतु याच अविकसित लोकांनी जपलेल्या संस्कृतीचे दर्शनही घडते. स्वतःला नास्तिक म्हणवणाऱ्यांची कट्टरता आणि भौतिक उत्थानात गुरफटलेल्या बुवा - महाराजांची भोंदुगिरीही डोकावते. कादंबरी शेवटाकडे धावत राहते. पण मनात चिंतनाची बीजपेरणी करुन.. महानंद नावाचा कादंबरीतील व्यक्तिरेखांचा वाटाड्या नकळतपणे आत्मजाणीवेच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाचकाचाही वाटाड्या होऊन जातो. संवादातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. काही उत्तरे नवीन प्रश्नांना जन्म देतात. असे प्रश्न चिंतनाची पायवाट उजळवून जातात. बिंदुसरोवरापर्यंतचा प्रवास अतिशय आकर्षक आहे. या लेखनातून होणारे बिंदुसरोवराचे दर्शन तर केवळ विलक्षण आहे. तेथील वेगवेगळ्या विश्वांचे वर्णन, त्या प्रत्येकातील अंतर्बाह्य वेगळेपण, वेगवेगळ्या मितींचे जीवन सारंकाही अचंबित करणारं आहे. हे वर्णन वाचताना माझ्या डॉ. कार्ल सगन यांच्यासारख्या थोर शास्त्रज्ञाने लिहिलेल्या `कॉसमॉस` या विज्ञानग्रंथाची आठवण डोकावत राहिली.. त्या पेटीत दडलेल्या रहस्याविषयीचे कुतूहल शेवटपर्यंत टिकून राहते. काय आहे त्यातील गुपित ज्याद्वारे माणूस संपूर्ण विश्वावर ताबा मिळवू शकतो..? या रहस्याला जाणून घेण्यासाठी, बिंदुसरोवराचे अद्भुत दर्शन घडण्यासाठी आणि तो रोमहर्षक प्रवास अनुभवण्यासाठी प्रत्येकाने ही कादंबरी वाचायला हवी. चिंतनशील मनाला सत्प्रवृत्त करणारी, सत्प्रवृत्तांना आत्मभान देणारी अशी ही अभिनव कादंबरी. यातील सहजसुंदर आणि तरीही आपल्या वेगळेपणाची जाणीव करुन देणारी लेखनशैली राजेन्द्र खेरांच्या लेखनप्रेमात पडायला पुरेशी होती. काही पुस्तकं जीवनाला विचारसमृध्द करतात, कारण त्यांतील लेखनामागे व्रतस्थ लेखकाची तपश्चर्या असते, एवढे मात्र निश्चित.. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more