* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353174613
  • Edition : 3
  • Publishing Year : DECEMBER 2008
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THRILLING CHASE TO ACQUIRE THE MYSTERIOUS OBJECT ENDS AT BINDU LAKE. TILL REACHING THERE PILGRIMS GET MANY MYSTERIOUS ENIGMATIC EXPERIENCES. THEY HAVE TO CROSS THREE GATES ON THREE DIFFERENT PLANES CROSSING EACH GATE LEADS THEM INTO A DIFFERENT KIND OF LAND SPECTACULAR IN THEIR IMAGERY
‘बिंदूसरोवर’ ही राजेन्द्र खेर यांची अद्भुतरम्य उत्वंठावर्धक कादंबरी. बिंदूसरोवर हे काल्पनिक ठिकाण असलं, तरी त्याची लेखकाने वर्णिलेली रमणीयता आपल्याला वास्तवसदृश अनोख्या विश्वात घेऊन जाते. हिमालय हे योगी-तपस्वी यांचं तपसाधना करण्याचं ठिकाण. स्वामी शिवानंद आपल्या दोन शिष्यांसह एका गुहेत साधना करीत असतात. त्यांच्याकडे परग्रहावरील अतिमानवाने दडवलेली पंचधातूची पेटी असते; ज्यात एक वैश्विक रहस्य जपलेलं असतं. चिनी सैनिक तिबेटमधल्या पुरातन मंदिरातून त्या पेटीची माहिती मिळवून शोध घेत शिवानंदांच्या गुहेपर्यंत पोहोचतात. योगी आपल्या विश्वनाथन् नामक शिष्याकडे पेटी सुपूर्द करून त्याला दूर रवाना करतात. प्रा. विश्वनाथन यांच्याकडून व्याख्यानात अनवधानाने या रहस्याचा उल्लेख होतो... आणि पेटी हस्तगत करण्यासाठी अज्ञात व्यक्ती प्राध्यापकांच्या घरी पोहोचतात. तत्पूर्वी ते आपला सुहृद विक्रमकडे पेटी सोपवून त्याला दक्षिणेकडे पाठवतात. रेल्वेत विक्रमला कोण कोण भेटतात... संकटं झेलत ते स्वप्नमयी रमणीय बिंदूसागरापर्यंत कसे पोहोचतात... तेथे त्यांना कोणत्या वैश्विक रहस्याचा बोध होतो, हे जाणून घेण्यासाठी ही अत्यंत उत्कंठावर्धक कादंबरी अवश्य वाचायला हवी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#बिंदूसरोवर #राजेन्द्रखेर #हिमालय #परग्रहावरीलअतिमानव #तिबेटमधीलपुरातनमंदिर #चिनीसैनिक #स्वामीयोगानंद #पंचधातूचीगूढपेटी #विश्वनाथनजगमोहन #विक्रम #महानंद #अपूर्वा #त्रिदंडीमहाराज #कीथ #शंकर #ऑस्कर #पिंड #इंद्रधनुष्य #देव #गंधर्व #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #BINDUROVAR #RAJENDRAKHER #HIMALAYAS #TIBELATED ANCIENT TEMPLES #CHINESEMILITARY #VISHWANATHANJAGMOHAN #VIKRAM #MAHANANDA #APURVA #TRIDANDIMAHARAJ #KEITH #SHANKAR #OSCAR #PIND#INDRADHU#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating Starसुप्रिया हळबे - ठाणे वार्ता

    एक अप्रतिम कादंबरी. विविध विषयांनी नटलेली. मनाला आनंद देणारी पण नकळत चिंतन, आत्मशोध घ्यायला लावणारी अनोखी अशी ही कादंबरी... "बिंदुसरोवर." राजेन्द्र खेर लिखित बिंदुसरोवर ही कादंबरी म्हणजे एक उत्तम रहस्यमय प्रवास. लेखकाबरोबर वाचक नकळत कल्पने्या प्रवासाला सुरूवात करतो आणि कादंबरीतील साऱ्या घटनांमधील एक विशेष पात्र होऊन त्या रहस्यमय, अद्भुत, अध्यात्मिक प्रवासाची अनुभूती घेत जातो.. तिबेटमध्ये घुसखोरी करून चीनचे सैनिक अनेक मंदिरांचा विध्वंस करतात. त्याचवेळी त्यांना माहिती मिळते की, भारतात एका गूढ ठिकाणी अशी एक वस्तू आहे की तिच्या साहाय्याने संपूर्ण विश्वाची रहस्ये उलगडत जातील आणि माणूस संपूर्ण विश्वावर ताबा मिळवू शकेल.. योगी शिवानंद यांचे दोन शिष्य..विश्वनाथ आणि मोहनीश. जे हिमालयात आपल्या गुरुसमवेत योगाभ्यासाची ज्ञानोपासना करीत असतात. नेमके त्याचवेळी चिनी आक्रमक तो संपूर्ण परिसर व्यापून टाकतात. पन्नास वर्षे एका विलक्षण धातूच्या पेटीचा सांभाळ केल्यानंतर ती पेटी आणि एक भूर्जपत्र योगी शिवानंद, विश्वनाथ यांच्याकडे सुपूर्त करतात. त्या पेटीत नेमकं काय असतं...? प्रा.विश्वनाथ यांच्यावर विश्वास ठेवून सुपूर्त केलेल्या धातूच्या पेटीचं पुढे काय होतं...? याचा संपूर्ण अध्यात्मिक, रोमांचक प्रवास म्हणजे बिंदुसरोवर ही कादंबरी.. विज्ञानाच्या अभ्यासाबरोबरच अध्यात्माची, योगिक क्षेत्राची आवड असलेले, अनुभूती घेतलेले प्रा.विश्वनाथ त्यांच्यावर विश्वास ठेवून किंवा त्यांच्याबद्दल खात्री बाळगून त्यांचे गुरु त्यांच्यावर ती पेटी जीवापाड जपण्याची जबाबदारी देतात. पण त्यानंतर जेव्हा त्यांच्यावर संकट येते तेव्हा प्रा.विश्वनाथ काय करतात...ती धातूची पेटी पुढे कुणाकडे सुपूर्त करतात...प्रत्येक टप्प्यावर पेटीचा सांभाळ करायला मदत करणारे महानंद नेमके असतात तरी कोण...? ह्या सर्व गोष्टींची उत्कंठा प्रत्येक पानासरशी वाढत जाते. शेवटच्या टप्प्यात तर उत्कंठा शिगेला पोहोचते, विचारांचे वादळ मनात घोंगावू लागते आणि त्याचमुळे वेळेचे भान न राहता वाचक हातात घेतलेली कादंबरी संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवत नाही.. कादंबरी वाचून झाल्यानंतर देखील त्यातील अध्यात्मिक विचारांनी घेतलेली मनाची पकड चटकन सैल होत नाही. बराच काळ वाचकाच्या मनावर त्याचे गारूड तसेच राहते. ही कादंबरी निव्वळ कल्पनेत रमवणारी नसून, वाचकाला विचार करायला प्रवृत्त करणारी आहे. सध्याच्या काळात प्रत्येकजण भौतिक सुखाच्या मागे धावत असतो. अनेक उत्तम, मनाला पटणाऱ्या गोष्टी मागे सारत निव्वळ ध्येयपूर्तीसाठी योग्य अयोग्यतेच्या पलीकडे जाऊन काम करत असतो. पण बिंदुसरोवर ही कादंबरी वाचल्यानंतर वाचक नक्कीच चिंतनशील अवस्थेत जाण्यासाठी प्रवृत्त होतो.. बिंदुसरोवर वाचताना, कुठेही ते रटाळ, कंटाळवाणे होत नाही. लेखक राजेन्द्र खेर यांच्या ओघवत्या लेखनशैलीचा प्रभाव नक्कीच वाचकाच्या मनाचा वेध घेते. प्रत्येक घटनेत आपण प्रत्यक्ष तिथे आहोत याची अनुभूती घेत एक अद्भुत, अविस्मरणीय आनंददायी प्रवास करत वाचक " बिंदुसरोवरात" नाहून जातो.. ह्या रहस्यमय, अद्भुत, अविस्मरणीय आणि अध्यात्मिक प्रवासाचा आनंद घेण्यासाठी राजेन्द्र खेर लिखित बिंदुसरोवर ही कादंबरी जरूर वाचावी. ...Read more

  • Rating StarVaishali Joshi Nagarkar

    नुकतेच बिंदू सरोवर हे पुस्तक वाचले, रम्य, रहस्यमय कथानक. एक वेगळे पुस्तक म्हणून नक्कीच वाचनीय.

  • Rating StarYogesh Ugale

    बिंदुसरोवर. केवळ अद्भुत कादंबरी. या कादंबरीत केवळ कल्पनाविलास नाही तर कल्पनांना वैचारिक अधिष्ठान आहे. यातील लेखन केवळ मनोरंजन करणारे नसून मनात विचारांचे अंजन घालणारे असे आहे. अतिशय प्रवाही लेखनशैली, खिळवून ठेवणारी प्रसंगमांडणी आणि वारंवार अचंबित करणरे धक्के देऊन उत्कंठा वाढवणारी ही कादंबरी वेळोवेळी अंतर्मुख व्हायला भागही पाडते. प्रचलित fiction या प्रकारातील कादंबऱ्यांपेक्षा या कादंबरीचा गाभा वेगळा आहे. अनेक प्रसंगांमधून सामाजिक उन्नती - अवनतीचे चिंतन समोर येते. अद्भुतरम्य कल्पनाविश्वात विहरणाऱ्या वाचकाला हे लेखन अगदी अलगदपणे विचारांच्या लाटेवर बसवून आत्मजाणीवेपर्यंत घेऊन जाते. हा प्रवास अतिशय आनंददायी आहे. नववीत असताना मी ही कादंबरी पहिल्यांदा वाचल्याचे आठवते. या कादंबरीकडे मी आकर्षित झालो ते तिच्या मनोवेधक मुखपृष्ठामुळे. आजही ते आकर्षण कायम आहे. आज तिसऱ्यांदा ही कादंबरी वाचताना कोणताही प्रसंग कंटाळवाणा वाटत नसून पहिल्याइतक्याच आतुरतेने वाचला जातो, यात कोणतेही नवल वाटण्याचे कारण नाही. कारण यातील लेखनात नित्य नाविन्यता जाणवते. त्याच त्या प्रसंगांतून चिंतन आणि अध्ययनाचे नवनवीन बिंदू दरवेळी गवसत जातात. जाणिवसमृध्द आत्मिक बिंदुसरोवराकडे चिंतनशील मनाची यात्रा सुरु राहते.. २०२५ सालची परिस्थिती कल्पनेतून साकार करुन कादंबरीची सुरुवात होते. विज्ञानाच्या सहाय्याने केलेली प्रचंड प्रगती, केवळ भौतिक उपभोगांत रममाण झालेली भारतासहित सगळ्या जगातील मानवजात, अशा पार्श्वभूमीवर एकेक प्रसंग पुढे सरकू लागतो. विज्ञानाच्या अध्ययनाबरोबरच आध्यात्मिक सत्याची अनुभूती घेतलेले प्रा. विश्वनाथन सर. आपल्या साधनाकाळात त्यांच्या गुरुजींनी त्यांच्याकडे एक पेटी रक्षणासाठी सोपविली, जिच्यात असे रहस्य दडले आहे की ज्यायोगे संपूर्ण विश्वावर नियंत्रण मिळवता येईल. जगातील अनेक शक्ती ती पेटी प्राप्त करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावतात. विक्रम भार्गव नावाच्या आपल्या एका विद्यार्थ्याला प्रा. विश्वनाथन ती पेटी बिंदुसरोवरात न्यायला सांगतात. येथून सुरु होतो बिंदुसरोवराचा रोमांचक प्रवास.. प्रत्येक पान उलटताना उत्कंठा वाढतच जाते. मनोमन त्या चित्तथरारक प्रवासाचा आनंद घेताना मनाच्या एका कोपर्‍यात त्या पेटीत दडलेल्या रहस्याविषयी गूढ तसेच राहते. शेवटी शेवटी ही उत्कंठा परमोच्च अवस्थेला पोहचते. या कादंबरीत विविध प्रसंगांद्वारे आणि पात्रांच्या आपापसांतील संवादाद्वारे जीवन, विज्ञान आणि धर्मविषयक जे चिंतन मांडले आहे, त्याचा प्रभाव अंतरंगी दरवळत राहतो. विकासाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणारा भारत बघता बघता आपण खेड्यांतील, गिरीकंदरातील दारिद्र्यात जीवन कंठणाऱ्या भारतापर्यंत येऊन पोहचतो. परंतु याच अविकसित लोकांनी जपलेल्या संस्कृतीचे दर्शनही घडते. स्वतःला नास्तिक म्हणवणाऱ्यांची कट्टरता आणि भौतिक उत्थानात गुरफटलेल्या बुवा - महाराजांची भोंदुगिरीही डोकावते. कादंबरी शेवटाकडे धावत राहते. पण मनात चिंतनाची बीजपेरणी करुन.. महानंद नावाचा कादंबरीतील व्यक्तिरेखांचा वाटाड्या नकळतपणे आत्मजाणीवेच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाचकाचाही वाटाड्या होऊन जातो. संवादातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. काही उत्तरे नवीन प्रश्नांना जन्म देतात. असे प्रश्न चिंतनाची पायवाट उजळवून जातात. बिंदुसरोवरापर्यंतचा प्रवास अतिशय आकर्षक आहे. या लेखनातून होणारे बिंदुसरोवराचे दर्शन तर केवळ विलक्षण आहे. तेथील वेगवेगळ्या विश्वांचे वर्णन, त्या प्रत्येकातील अंतर्बाह्य वेगळेपण, वेगवेगळ्या मितींचे जीवन सारंकाही अचंबित करणारं आहे. हे वर्णन वाचताना माझ्या डॉ. कार्ल सगन यांच्यासारख्या थोर शास्त्रज्ञाने लिहिलेल्या `कॉसमॉस` या विज्ञानग्रंथाची आठवण डोकावत राहिली.. त्या पेटीत दडलेल्या रहस्याविषयीचे कुतूहल शेवटपर्यंत टिकून राहते. काय आहे त्यातील गुपित ज्याद्वारे माणूस संपूर्ण विश्वावर ताबा मिळवू शकतो..? या रहस्याला जाणून घेण्यासाठी, बिंदुसरोवराचे अद्भुत दर्शन घडण्यासाठी आणि तो रोमहर्षक प्रवास अनुभवण्यासाठी प्रत्येकाने ही कादंबरी वाचायला हवी. चिंतनशील मनाला सत्प्रवृत्त करणारी, सत्प्रवृत्तांना आत्मभान देणारी अशी ही अभिनव कादंबरी. यातील सहजसुंदर आणि तरीही आपल्या वेगळेपणाची जाणीव करुन देणारी लेखनशैली राजेन्द्र खेरांच्या लेखनप्रेमात पडायला पुरेशी होती. काही पुस्तकं जीवनाला विचारसमृध्द करतात, कारण त्यांतील लेखनामागे व्रतस्थ लेखकाची तपश्चर्या असते, एवढे मात्र निश्चित.. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more