* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BHAVKALLOL
  • Availability : Notify Me
     
  • Translators : PROF. N.I. KADLASKAR
  • ISBN : 9788184981858
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 135
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THESE 15 KANNADA STORIES OF K. SATYANARAYANA, AN IMPORTANT WRITER OF NEW GENERATION, COVERS A WIDE SPECTRUM OF CONTEMPORARY EXPERIENCE RANGING FROM INTENSELY PERSONAL TOPICS LIKE DEATH & LOVE TO POLEMICS ON SIGNIFICANT POLITICAL AND SOCIAL QUESTIONS OF OUR TIMES. IN DOING THIS, THE STORIES OVERCOME URBAN- RURAL, MODERN TRADITIONAL DIVIDE BY ADOPTING AN OPENMINDED APPROACH TO ISSUES AND PEOPLE. IN HIS NARRATION, SATYANARAYANA COMBINES AND DEFTLY USES DIFFERENT MODES OF NARRATION BY USING ELEMENTS OF ORAL TRADITION, MODERNIST NARRATION AND SURREALIST REPRESENTATION. THESE STORIES WRITTEN IN LAST TWO DECADES – A DISTURBING PHASE IN OUR NATIONAL LIFE – HAVE BEEN SENSITIVELY TRANSLATED BY PROFESSOR N.I. KADLASKAR.
के. सत्यनारायण यांच्या कथांतील पात्रे, प्रसंग, घटना, निसर्ग, ग्रामीण व निमनागरी जीवनसरणी ही मंड्या, बंगळुरू व आसपासची गावे यामध्ये बंदिस्त झालेली आहे. त्यात चित्रित झालेली कुटुंबव्यवस्था आणि त्यात मुरलेले र्धािमक व पारंपरिक संस्कार हे अस्सल कर्नाटकी आहेत. त्यामुळे या कथांचे स्वरूप कौटुंबिक कथा असेच आहे. काही कथांतून आधुनिक जीवनाचे कवडसे उमटलेले दिसतात. काही परदेशी पाहुणे अचानक उतरून वावरताना दिसतात; पण हे अपवादात्मक आणि कथासंग्रहाच्या मूळ वस्तूला ढळ न पोहचेल या रीतीने! त्यांच्या कथांची निवेदनशैली प्रवाही आहे, ती भरगच्च तपशिलाने सजलेली आहे. काही कथांतील पात्रांचे वागणे आणि त्यांची अभिव्यक्ती अतिशयोक्त वाटण्याची शक्यता आहे. त्यांच्या कथांतून प्रादेशिकतेचे वातावरण सतत जाणवत राहते आणि ते साहजिकही आहे. त्याच्या कथांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात वर्णन केलेले कौटुंबिक वातावरण. कुटुंबात एकत्र राहणारी मुलेबाळे, कुटुंबात झडणारे समारंभ, रीतिरिवाजांचे पालन, संसारात रमलेली मुलेबाळे, त्यांच्या येणाऱ्या वार्ता, त्यामुळे आठवणारे पुराणातले समांतर प्रसंग आणि घटना यांचा संभार या कथांतून दिसून येतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #BHAVKALLOL #BHAVKALLOL #SHORTSTORIES #MARATHI #PROF.N.I.KADLASKAR #K.SATYANARAYANA "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more