* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"THIS IS A COMPILATION OF MANY OF DR. JAISINGRAO PAWAR’S SPEECHES WHILE CHAIRING VARIOUS HISTORY CONFERENCES. THROUGH THESE SPEECHES HE HAS TAKEN AN OVERALL REVIEW OF RESEARCH RELATED TO HISTORY OVER THE LAST CENTURY. HE HAS ALSO DIRECTED MANY VIEWS SO AS TO SPEED UP THE PROCESS OF RESEARCH. THIS WILL SURELY ENABLE MANY SCHOLARS AND RESEARCH PERSONNEL. WHAT IS THE NATURE AND SCOPE OF HISTORY…? WHAT IS THE IMPORTANCE OF SOCIAL HISTORY…? WHAT IS THE IMPORTANCE OF REGIONAL HISTORY IN NATIONAL HISTORY…? WHAT IS THE CAUSE BEHIND COMPLETE IGNORANCE TOWARDS THINGS AND ARCHITECT WHICH IS ACTUALLY VERY IMPORTANT FROM THE HISTORICAL POINT OF VIEW…? WHAT SHOULD WE DO TO PRESERVE OUR HISTORICAL HERITAGE…? WHAT IS THE EXACT RESPONSIBILITY OF RESEARCHERS, PROFESSORS AND TEACHERS OF HISTORY…? DR. PAWAR DISCUSSES MANY SUCH ASPECTS THROUGH THIS COMPILATION. MANY OF THE MAHARASHTRIAN HISTORIANS WILL GET MOTIVATED FOR FURTHER RESEARCH. "
"डॉ. जयसिंगराव पवार यांनी अनेक इतिहास परिषदांच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणांचा हा लेखसंग्रह.... यामध्ये........ महाराष्ट्रातील गेल्या शेसव्वाशे वर्षांतील इतिहास- संशोधन परंपरेचा शोध तर घेतला गेला आहेच, शिवाय ही परंपरा अधिक गतिमान कशी होईल, त्यासाठी इतिहासप्रेमींनी व अभ्यासकांनी काय करायला हवे, याचे दिग्दर्शन केले आहे.... इतिहासाचे स्वरूप व व्याप्ती कशी असते?.... सामाजिक इतिहासाचे महत्त्व काय?.... स्थानीय इतिहासाचे राष्ट्रीय इतिहासात स्थान काय?... ऐतिहासिक वस्तू व वास्तू यांच्या अक्षम्य उपेक्षेची कारणमीमांसा काय?.... आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आपण काय करावयास हवे?.... इतिहासाचे शिक्षक इतिहासप्रेमी यांची यां संदर्भातील नेमकी कोणती जबाबदारी आहे?.... अशा अनेक प्रश्नांची चर्चा डॉ. पवार या लेखांतून करतात.... त्यातून महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी इतिहास संशोधनाकडे आकृष्ट होतील अशी आशा आहे. ... "

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#AMACHYA ITIHASACHA SHODH ANI BODH#DR. JAYSINGRAO PAWAR - #आमच्या इतिहासाचा शोध आणि बोध#डॉ. जयसिंगराव पवार# महाराष्ट्रातील प्रबोधनाची वाटचाल# इतिहासाभ्यासाची आमची अनास्था# इतिहाससंशोधनामागील भूमिका # आमच्या ऐतिहासिक वारशाचे जतन# महाराष्ट्रातील इतिहाससंशोधनाची दुरवस्था : एक मीमांसा सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासाची पुनर्रचना# स्थानीय (LOCAL) इतिहासाचे महत्त्व# इतिहासाच्या साधनांचा अभ्यास# आधुनिक युगाची बीजे आमच्याकडे होती काय? # "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more