* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PUDHAKAR GHYA : PRABHAVI VYAKTIMATVACHE SUTRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667004
  • Edition : 11
  • Publishing Year : JUNE 2006
  • Weight : 270.00 gms
  • Pages : 280
  • Language : MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE TITLE OF THE BOOK IS `PUDHAKAR GHYA` WHICH MEANS `TAKE INITATIVE`. THERE IS NO SUBSTITUTE FOR TAKING INITIATIVE. THERE MAY BE SUBSTITUTE FOR HARD WORK BUT THERE IS REALLY NO SUBSTITUTE FOR INTIATIVE. ONLY HARD WORK DOES NOT GUARANTEE SUCCESS AND THEREFORE HARD WORK IS REPLACED BY SMART WORK. HOWEVER, HARD OR SMART, WITHOUT INITIATIVE WORK IS NOT POSSIBLE. ENTIRE BOOK TALKS ABOUT TAKING INITIATIVE IN TRANSFORMING ONESELF INTO BETTER HUMAN BEING. IT CAN BE APPLIED TO ANY AGE GROUP, RELIGION PROFESSION AND QUALIFICATION. APPLICATIONS OF THIS BOOK ARE SO WIDE THAT IT MAKES NO DIFFERENCES WHETHER READER IS RURAL OR URBAN, PLUMBER OR MANAGING DIRECTOR EMPLOYED OR UNEMPLOYED/ RETIRED, WORKING WOMEN OR HOUSE WIFE, MALE OR FEMALE, MARRIED OR UNMARRIED. TEN STEPS ARE SUGGESTED FOR TAKING INTIATIVE. FIRST CHAPTER TALKS ABOUT CLEANSING OF ONE’S OWN THOUGHTS (VICHAR SHUDDHI). SECOND CHAPTER TAKES A STEP TOWARDS DISCOVERING THE PURPOSE OF ONE`S LIFE. ONLY CLEAR THOUGHTS CAN FIND OUT THE PURPOSE OF LIFE. THEREFORE, FIRST STEP IS ESSENTIAL TO UNDERSTAND THE MEANING OF THIS CHAPTER WHICH TELLS HOW TO MANAGE AND ORGANIZE THE LIFE AROUND THE PURPOSE. FOURTH CHAPTER DEALS WITH THE INTERPERSONAL RELATIONSHIPS. IT BRINGS WINING APPROACH IN INTERPERSONAL RELATIONSHIPS, CHAPTER FOUR DEALS WITH LISTENING. IT SUGGESTS THAT MOST OF US DON`T LISTEN, WE ONLY HEAR, LISTENING IS INTENT. CHAPTER SIX TELLS US ABOUT THE TEAM BUILDING AND TEAM APPROACH IN DAY-TO-DAY LIFE. CHAPTER SEVEN DEALS WITH THE HEALTH. IT SUGGESTS THAT REAL WEALTH IS HEALTH. CHAPTER EIGHT TALKS ABOUT RELAXATION AND MEDITATION FOR THE MIND. CHAPTER NINE TEACHES US SOCIAL RESPONSIBILITY AND LAST BUT NOT THE LEAST CHAPTER TEN SUGGESTS US TO BE HAPPY. IT SUGGESTS NOT TO POSTPONE HAPPINESS. ONE CAN EXPERIENCE IN PRESENT TENSE. INSTEAD OF WORKING FOR HAPPINESS, LET`S WORK OUT OF HAPPINESS.
पुढाकार घेतल्याशिवाय कोणालाही काहीही मिळत नाही. आयुष्यात काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर पुढाकार घ्यावाच लागतो. परंतु पुढाकार घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं हेच कित्येकांना माहीत नसतं. काही मंडळींना वाटतं की, पुढाकार म्हणजे दुसऱ्यांना रेटून पुढे जाणे. परंतु आपण जर दुसऱ्यांना रेटून पुढे गेलो तर आपल्यालाही रेटणारा कोणीतरी, कुठेतरी, कधीतरी जन्माला येतोच; त्यामुळे असला पुढाकार यश देत नाही आणि समजा दिलंच तर ते जास्त दिवस टिकत नाही आणि समजा टिकलंच तर असल्या पुढाकारानं आयुष्य तणावग्रस्त होतं. कायमस्वरूपी यश मिळवायचं असेल, मन:शांती टिकवायची असेल, तणाव कमी करायचे असतील, कंटाळवाणं आयुष्य झटकून मजेत जगायचं असेल तर ‘पुढाकार घ्या’ हे पुस्तक वाचा. त्यासाठीही पुढाकार घ्यावा लागेल. हे पुस्तक तुम्हाला मित्रासारखं मार्गदर्शन करील. माझी खात्री आहे की, तुम्ही हे पुस्तक एखाद्या गोष्टीच्या पुस्तकासारखं वाचून मित्राला देऊन टाकणार नाही; तर स्वत:ची प्रत जपून संग्रही ठेवाल व दुसरी प्रत कुणा गरजूला भेट द्याल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पाल्यव्यक्तिमत्त्वाचाकानमंत्र #संजीवपरळीकर #व्यक्तिमत्त्वविकसन #PALYAVYAKTIMATVACHAKANMANTRA #SANJEEVPARLIKAR #PUDHAKARGHYA #ZATPATVYAKTIMTVAVIKASAN #CHARSHABDADYAVEGHYAVE #CHARJABARDASTFANDE #YALAJIVAN AISENAAV #KELYANEHOTAHERE! #VIKRIKAUSHALYASHIKA
Customer Reviews
  • Rating Starप्रा. आर. जी. लहाने

    जीवनातील सर्व आयामांला स्पर्श करणारे हे नितांत सुंदर पुस्तक आहे. आपली मांडणी सुरेख, सुबोध अशी आहे. व्यक्तिमत्त्व विकासाच्या संदर्भात आपले पुस्तक एक संदर्भ ग्रंथच आहे. याच मातीतील उदाहरणांचा चपखल उपयोग केला आहे.

  • Rating StarDAINIK SAKAL 06-05-2007

    जीवन व्यवस्थापन... सध्याच्या स्पर्धेच्या काळात स्वत:चे शरीर, मन व मेंदू कायम सज्ज ठेवावे लागतात. अफाट धावाधाव करताना स्वभावत: काही बरे-वाईट बदल घडत जातात. याबाबत सतर्क करणारे व उपयुक्त मंत्र सांगणारे पुस्तक संजीव परळीकरांनी लिहिले आहे. ‘पुढाकार घ्य : प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र’ या पुस्तकातून त्यांनी जीवनाचे व्यवस्थापन करण्यासाठी काही कृतिकार्यक्रम दिले आहेत. तेही सुलभ असल्याने वाचकांना अजमावून पाहावेसे वाटतील. सवयी, लकबी, वृत्ती, प्रवृत्ती वगैरेबाबत माणसे बरीच संवेदनशील असतात. याबाबत चांगले बदल तर करावेसे वाटतात, पण नेमके ते कसे करावेत, ते समजत नाही. अशांसाठी हे पुस्तक मित्रत्वाचा सल्ला देणारे ठरू शकते. यशस्वी होण्यासाठी मानसिकतेत बदल सुचविणारी पुस्तके गेल्या दोन दशकांमध्ये बऱ्याच प्रमाणात निघाली. त्यात निरनिराळे विचारप्रवाह दिसतात. हे पुस्तक स्वत: पुढाकार घेण्याचा विचार मांडते. त्यामागे वस्तुनिष्ठपणा अधिक आहे. कल्पनेतील भराऱ्या नाहीत. त्यामुळेही हे पुस्तक वाचकांना जवळचे वाटू शकेल. व्यक्तिमत्त्वातील बदलांसाठी आवश्यक असलेली विचारशुद्धी, जगण्याच्या उद्देशाची निश्चिती, दैनंदिन जीवनक्रमाचे नियोजन, भावनांना वळण लावणे, नात्यांमधली स्वत:ची जबाबदारी लक्षात आणून देणे, शांत व स्थिर मनाचे महत्त्व वगैरे अनेक महत्त्वाच्या पैलूंवर यात सोदाहरण विवेचन आहे. कॉर्पोरेट विश्वातली माणसे किंवा गृहिणी अथवा विद्यार्थी, अशा सर्वांनाच कार्यकुशलता व प्रभावीपणा यातला फरक उलगडून सांगायचा यात प्रयत्न आहे. पुढाकार का घ्यावा, ते सोपे की कठीण, त्यातले फायदे-तोटे कोणते, वगैरे तपशिलात समजावून सांगत लेखक नकळतपणे या संदर्भातल्या स्वाध्यायासाठी वाचकाला प्रवृत्त करतो. नोकरी मिळणे, मनासारख्या गोष्टी घडणे, कौटुंबिक कलह मिटणे व एकूणच आनंदी राहता येण्यासाठी पुढाकाराची गरज आपल्याला आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टींना केव्हा, किती व कसे महत्त्व द्यायचे, याबाबत कानमंत्र या पुस्तकातून मिळतात. -निला शर्मा ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 07-05-2007

    माणूस माणसाला भेटल्यावर प्रथमदर्शनी मनावर ठसतं ते त्याचं व्यक्तिमत्व. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ही त्याच्या विचारातून परस्परांना होते व या विचारांची तार जुळली की नाती, मैत्री असे संबंध प्रस्थापित होतात. केवळ नात्यासाठी व्यक्तिमत्वाचा प्रभाव उपयोी पडतो असे नाही तर समाजात वावरत असताना नोकरी पेशाच्या ठिकाणी, सार्वजनिक स्थळी, गर्दीत व गर्दीबाहेरही आपले साथीदार असते. तेव्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास हा आपला केवळ स्वत:चाच नाही तर समाजात उमटणाऱ्या प्रतिक्रियाचा पडसाद असतो. हे जाणून इनोव्हसोर्स सोल्यूशन प्रा. लिमिटेडचे कार्यकारी संचालक संजीव परळीकर यांनी प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र सांगणारे पुढकार घ्या हे पुस्तक लिहिले व मेहता पब्लिशिंग हाऊसने ते नुकतेच प्रकाशित केले. या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक संजीव परळीकर यांच्याशी चर्चा करताना असे जाणवले की, त्यांना मराठी तरुणाविषयी अतिशय कळकळ आहे. ते म्हणाले की कॉर्पोरेट जगात मराठी तरुण हुशार असूनही बराच मागे दिसतो. त्यांना जर काहीतरी घवघवीत मिळवायचं असेल तर त्यांना या पुस्तकातील विचार उपयोगात आणता येतील. नुसतेच तरुण नव्हे तर स्त्री, पुरुष, युवक, विद्यार्थी की ज्यांना इंग्रजीवर प्रभुत्व नसल्यामुळे अनेक संधीपासून वंचित राहावे लागते. अशा सर्व मंडळीसाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. जी मंडळी अपयशामुळे खचून गेली आहेत अशा मंडळीसाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. ज्यांच्या नशिबाचे फासे कायम उलटेच पडत आले आहेत. अशांना या पुस्तकामुळे एक नवीन डाव मांडता येण्याची संधी मिळावी, म्हणून मी हे पुस्तक लिहिलेले आहे. अनेक छोटे उद्योजक ज्यांना चांगले व्यवस्थापन शिकायचे आहे. त्यांच्यासाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. समस्त होतकरू मराठी तरुणांना ताठ मानेने समाजत वावरण्याकरता हे पुस्तक लिहिलेले आहे. आपण सर्वचजण अनेक छोट्या प्रसंगात गोंधळून जाऊन चुकीचा निर्णय घेतो व त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावरही या नकारात्मक विचारसणीचा प्रभाव पडतो व व्यक्तिमत्त्वाचा विकास थांबतो. या समस्येला ओळखून पुढाकार घ्या, या पुस्तकात पुढाकाराची दहा सूत्रे मांडली आहेत. त्यात विचारशुद्धी, जगण्याचा उद्देश, नियोजनाची गरज, नातीगोती कशी सांभाळावी त्याचप्रमाणे दुसऱ्याचे मत, सांघिक बळ, आरोग्य, मनाची स्थिरता व शांतता, समाजाचे ऋण जाणणे व आनंदी जगणे या गोष्टीवर भर दिला आहे. व्यक्तिमत्त्वाचे दोन प्रकार सांगताना पहिल्या सूत्रात बाह्य व्यक्तिमत्त्वापेक्षा आंतरिक व्यक्तिमत्व अधिक मोलाचे आहे. हे अतिशय सोप्या भाषेत विशद केलेले आहे. या सूत्राला लेखकाने विचारशुद्धी करा असे शीर्षक दिले आहे. या विचारशुद्धीसाठी अतिशय उच्च जीवनमूल्य सुचविलेली आहेत व त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यात कसा उपयोग करता येईल. हेसुद्धा सांगितलेले आहे. या विचारांचा एकत्रित समुदाय म्हणजेच दृष्टिकोन व आपले दृष्टिकोन सकारात्मक का ठेवायचे व कसे ठेवायचे, यावर या पुस्तकात प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. हे दृष्टिकोन सकारात्मक ठेवण्यासाठी निसर्गाने मनुष्यप्राण्याला सजगता, कल्पनाशक्ती, सद्सद्विवेकबुद्धी, इच्छाशक्ती ह्या चार देणग्या दिलेल्या आहेत. व त्याचा वापर जागृतपणे करायचा, हेही उल्लेखलेले आहे. त्याचबरोबर आपल्या जगण्याचा उद्देश आपण प्रत्येकाने शोधून काढला पाहिजे, असे दुसऱ्या सूत्रात लेखक म्हणतात. तसे केल्याने आपलेच जीवन अर्थपूर्ण होईल. परंतु त्यासाठी पुढाकार हा प्रत्येकाला घ्यावा लागेल असे लेखक म्हणतात. सजगता वापरून व कल्पकता वापरून जगण्याचा उद्देश शोधायचे तंत्र यात सांगितलेले आहे. चौफेर व्यक्तिमत्व साकार करण्यासाठी आपली कौटुंबिक भूमिका, व्यक्तिगत भूमिका व सामाजिक भूमिका यात परिस्थितीजन्य झालेल्या बदलासह स्वत:ला तपासायला सांगितले आहे तर पुस्तकाच्या तिसऱ्या सूत्रात नियोजन कसे करावे, या विषयी अत्यंत मौल्यवान सूचना केलेल्या आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 31-12-2006

    प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र... वर्तनशैली, नेतृत्वविकास, व्यक्तिमत्व विकास या विषयांवर अनेक कार्यशाळा घेऊन हजारो तरुणांना प्रशिक्षित करणारे संजीव परळीकर हे इनोव्ह सोर्स सोल्यूशन या कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत. त्यापूर्वी जीटीएल, युनाटेड कार्बन, िकोलस पिरामल वगैरे कंपन्यात त्यांनी विविध पदावर काम केलेले आहे. कामगार म्हणून सुरुवात करून पुढे महाविद्यालयीन पदवी घेऊन सतरा वर्षात औषध उत्पादक कंपनीत असिस्टंट मॅनेजरपर्यंत त्यांनी मजल मारली. तेथे पुढे बढतीची शक्यता न दिसल्यावर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कामे केली. ‘सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ आणि ‘हाऊ टू स्टे वुईथ अँड विदाऊट अँगर’ या दोन पुस्तकांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव आहे. त्यावर आधारित कार्यशाळा घेतल्यावर त्यांनी स्वत:चीच एक व्यवस्थापनविषयक विचारधारा विकसित केली. सुखी होण्यासाठी घ्यावयाच्या पुढाकाराची दहा सूत्रे परळीकरांनी मनाशी निश्चित करून त्यांचे सविस्तर वर्णन करण्यासाठी हे पुस्तक तयार केले आहे. ‘पुढाकार घ्या’ ‘प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र’ असे नाव त्यांनी त्या पुस्तकाला दिले आहे. याशिवाय ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र’, ‘झटपट व्यक्तिमत्त्व विकास’, ‘चार शब्द द्यावे-घ्यावे’ ही पुस्तकेही परळीकरांच्या नावावर जमा आहेत. शेकडो प्रशिक्षण वर्ग घेतल्याने हसत खेळत, विनोद आणि दृष्टांत देत आपले मुद्दे स्पष्ट करण्याचे कौशल्य परळीकरांनी आत्मसात केले आहे. या पुस्तकातही त्याचा प्रत्यय येतो. समर्पक उदाहरणाद्वारे ते आपले विचार आणि मुद्दे वाचकांना, श्रोत्यांना पटवून देण्यात कसूर करीत नाहीत. हे पुस्तक म्हणजे एक जादूचा आरसा आहे असे परळीकर म्हणतात. आपल्या मूळ व्यक्तिमत्त्वाला पूर्ण बदलून टाकण्याची जादू या पुस्तकात आहे असा त्यांचा विश्वास आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी पुढारीपण, पुढाकार, नेतृत्व जोपसाण्यासाठी या पुस्तकात देण्यात आलेली दहा सूत्रे अशा १) विचारशुद्धी करा. २) जगण्याचा उद्देश शोधा. ३) नियोजन करा. ४) नातीगोती सांभाळा. ५) दुसऱ्यांचे ऐकून घ्या. ६) सांघिक बळ निर्माण करा. ७) आरोग्याची काळजी घ्या. ८) मन स्थिर आणि शांत ठेवा. ९) समाजाचे ऋण फेडा. १०) आनंदी जगा. प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी आपल्याला आपल्या अंत:करणापासून, आंतरिक व्यक्तिमत्त्वापासून आरंभ करायला हवा. चांगली फळे हवी असतील तर बी चांगले हवे. जमिनीत रूजलेल्या मुळांची देखभाल हवी. मुळाशी साठवलेले तण दूर करून योग्य प्रकारे खतपाणी हवे. आपल्या मनात, विचारात, व्यक्तिमत्त्वात अनेक पूर्वग्रह, अनेक विकृती ठाण मांडून बसलेल्या असतात. त्यापासून मुक्त होऊन सम्यक् विचारांची जोपासना करायला हवी. तरच सम्यक आचरण शक्य आहे. आपल्या मनाचे कंडिशनिंग झालेले असते. आनुवंशिकता, कौटुंबिक स्थिती, सामाजिक, राजकीय वातावरण इ. कारण त्यासाठी देता येतात. त्यामुळे आपण अपयशाचे खापर त्यावर फोडत राहतो. परंतु असे कोणाला तरी पुढे करून आपल्या अपयशाचे वा त्रुटीचे समर्थन करणे इष्ट नाही. हे कंडिशनिंग तोडायला हवे. त्यासाठी सजगता, कल्पनाशक्ती, सद्सद्विवेकबुद्धी, इच्छाशक्ती यांचा उपयोग होऊ शकतो. दुसऱ्यावर आरोप करायचा नाही, स्वत:च्या चुकांचं समर्थन करायचं नाही. संपूर्ण जबाबदारी घ्यायची, पुढाकार फक्त सकारात्मक असायला हवा, ही पथ्ये पाळली तर आपल्या विचारांमधील एकांगीपणा कमी होऊ शकेल. आपली प्रवृत्ती असेल तर आपण कणखर राहू शकता. वास्तव स्वीकारू शकता. • परिस्थिती वैतागवाणी असली तरी मी खंबीर राहीन. • मी प्रॉब्लेम सोडवण्यात हुशार आहे म्हणून मला प्रॉब्लेम सोडवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. • मी यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीन. • माझ्या आयुष्यात आलेले हे कसोटीत कठीण प्रसंग इतरांच्याही आयुष्यात येऊ शकतात, आलेले असतील. • आज मला कमीपणा घ्यावा लागतो आहे, पण असा कमीपणा घ्यायलाही मनाचा मोठेपणा लागतो. • माझं मन मोठं आहे. मी आनंदाने सगळ्यांना सामावून घेत असतो. आपली भाषा ही देखील आपल्या नेतृत्वाची निदर्शक असते. सतत मन मारून जगणं हे नेतृत्वाचं लक्षण नाही. सतत पडते घेतल्याने न्यूनगंड निर्माण होतो. आपण जी भाषा वापरतो ती मन मारणारी भाषा नसावी, नेतृत्वाची असावी. जबाबदारी घेणारी असावी. आपल्याला इष्ट वाटणाऱ्या गोष्टींसाठी पुढाकार घ्यायला हवा तसाच टाकाऊ गोष्टी झुगारून देण्यासाठी पुढाकारी घ्यायला हवा. मात्र स्वत:च्या फायद्यासाठी पुढाकार घेताना इतरांना ओरबाडून टाकणे म्हणजे नेतत्व नाही. इतरांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना बरोबर घेऊन उन्नती करणे त्यासाठी सजगता, विवेकबुद्धी, इच्छाशक्ती या निसर्गदत्त देणग्यांचा पुरेपूर वापर पुढाकार घेताना करावा लागतो. नोकरी नाही, मनासारख्या गोष्टी होत नाहीत, कुटुंबात कलह आहे, आपल्या मार्गात अडचणी येताहेत त्याबद्दल इतरांना दोष देत बसू नका. त्याबद्दल संपूर्ण जबाबदारी घ्या आणि त्यामधून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्या. प्रश्न सोडवण्यासाठी पुढे पाऊल टाका. एका क्षणात प्रश्न सुटणार नाहीत. पण... प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पहिले पाऊल तर पडेल. करिअर डेव्हलपमेंट, मुलांचे संगोपन, आई-वडिलांबाबतीची कर्तव्ये, पती-पत्नी म्हणून जबाबदारी, आरोग्य संवर्धन अशा नानाविध क्षेत्रासंबंधी आपल्याला नियोजन करण्याची गरज असते. आपल्याला मिळणारा वेळ त्यात ही सर्व कामे करण्यासाठी कसरत करावी लागते, दररोज करायची कामे, आठवड्याला करायची कामे, महिन्याला करायची कामे, त्रैमासिक कामे, षण्मासिक कामे, वार्षिक कामे अशी त्यासाठी नोंद करता येईल. तातडीची कामे, गौण कामे, महत्त्वाची कामे सवडीने करायची कामे अशीही विभागणी करता येईल. घराची साफसफाई नातलगांच्या भेटीगाठी, पत्नीबरोबर शॉपिंग वा फिरणे, डायरी, पत्रलेखन, मुलांचा अभ्यास, घरात मदत, व्यायाम, स्कुटरची वा वाहनाची देखभाल, घरातील नळाची गळती थांबवणे, गॅसनोंदणी, किराणा माल खरेदी, वैद्यकिय तपासणी, डिव्हिडंड भरणे, बँकेची कामे करणे, अशी कितीतरी कामे करण्याची निकड असते. त्यासाठी वेळ काढायला लागतो. त्याचबरोबर काही दीर्घ पल्ल्याची कामे व त्यांचे नियोजनही महत्त्वाचे असते. आर्थिक गुंतवणूक, इन्कम टॅक्सने रिटर्न भरणे, वैद्यकीय तपासणी, वैयक्तिक विकास (व्यायाम, कौशल्य संपादन, प्रशिक्षण) नातेसंबंधांची जपणूक यांनाही टाईम मॅनेजमेंटमध्ये स्थान द्यायला हवे. आपले आरोग्य उत्तम असेल तरच जगातील सुखांचा, सोयींचा उत्तम प्रकारे आपण उपयोग घेऊ शकतो. शरीराची सहनशक्ती वाढवणे, लवचिकता वाढवणे आणि स्नायूंची शक्ती वाढवणे यासाठी व्यायामाची गरज असते. शारीरिक लवचिकता असेल तर स्वभावात लवचिकता आढळते. आडमुठेपणामुळे दीर्घकालीन यश लाभत नाही. मन शांत आणि स्थिर ठेवणे हे यशाचे, पुढाकाराचे नेतृत्वाचे आठवे सूत्र आहे. मन स्थिर ठेवण्यासाठी ध्यानधारणा, शवासन, विपश्यना, एकांतामध्ये मौन, पूजाप्रार्थना, लेखन यांचा उपयोग होऊ शकतो. ‘पुढाकार घ्या’ या पुस्तकातील एकूणच सर्व विवेचन या दृष्टीने तुम्हाला बळ देणारे ठरेल. जीवनाकडे सकारात्मक, जबाबदारीच्या दृष्टीने बघण्यास त्यामुळे प्रेरणा मिळेल. आपल्या यशस्वी जीवनाचा भक्कम पाया घालण्याच्या दृष्टीने योग्य ती उद्दिष्ट्ये समोर ठेवून, विवेकाने वेळेचे व नात्यांचे, कामाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे नियोजन करून आपल्या क्षेत्रात आपणास निकोप मनाने आणि सुदृढ शरीराने प्रगतीचा वेग टिकवता येईल अशी ग्वाही देणारे हे पुस्तक आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more