* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PUDHAKAR GHYA : PRABHAVI VYAKTIMATVACHE SUTRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667004
  • Edition : 11
  • Publishing Year : JUNE 2006
  • Weight : 270.00 gms
  • Pages : 280
  • Language : MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE TITLE OF THE BOOK IS `PUDHAKAR GHYA` WHICH MEANS `TAKE INITATIVE`. THERE IS NO SUBSTITUTE FOR TAKING INITIATIVE. THERE MAY BE SUBSTITUTE FOR HARD WORK BUT THERE IS REALLY NO SUBSTITUTE FOR INTIATIVE. ONLY HARD WORK DOES NOT GUARANTEE SUCCESS AND THEREFORE HARD WORK IS REPLACED BY SMART WORK. HOWEVER, HARD OR SMART, WITHOUT INITIATIVE WORK IS NOT POSSIBLE. ENTIRE BOOK TALKS ABOUT TAKING INITIATIVE IN TRANSFORMING ONESELF INTO BETTER HUMAN BEING. IT CAN BE APPLIED TO ANY AGE GROUP, RELIGION PROFESSION AND QUALIFICATION. APPLICATIONS OF THIS BOOK ARE SO WIDE THAT IT MAKES NO DIFFERENCES WHETHER READER IS RURAL OR URBAN, PLUMBER OR MANAGING DIRECTOR EMPLOYED OR UNEMPLOYED/ RETIRED, WORKING WOMEN OR HOUSE WIFE, MALE OR FEMALE, MARRIED OR UNMARRIED. TEN STEPS ARE SUGGESTED FOR TAKING INTIATIVE. FIRST CHAPTER TALKS ABOUT CLEANSING OF ONE’S OWN THOUGHTS (VICHAR SHUDDHI). SECOND CHAPTER TAKES A STEP TOWARDS DISCOVERING THE PURPOSE OF ONE`S LIFE. ONLY CLEAR THOUGHTS CAN FIND OUT THE PURPOSE OF LIFE. THEREFORE, FIRST STEP IS ESSENTIAL TO UNDERSTAND THE MEANING OF THIS CHAPTER WHICH TELLS HOW TO MANAGE AND ORGANIZE THE LIFE AROUND THE PURPOSE. FOURTH CHAPTER DEALS WITH THE INTERPERSONAL RELATIONSHIPS. IT BRINGS WINING APPROACH IN INTERPERSONAL RELATIONSHIPS, CHAPTER FOUR DEALS WITH LISTENING. IT SUGGESTS THAT MOST OF US DON`T LISTEN, WE ONLY HEAR, LISTENING IS INTENT. CHAPTER SIX TELLS US ABOUT THE TEAM BUILDING AND TEAM APPROACH IN DAY-TO-DAY LIFE. CHAPTER SEVEN DEALS WITH THE HEALTH. IT SUGGESTS THAT REAL WEALTH IS HEALTH. CHAPTER EIGHT TALKS ABOUT RELAXATION AND MEDITATION FOR THE MIND. CHAPTER NINE TEACHES US SOCIAL RESPONSIBILITY AND LAST BUT NOT THE LEAST CHAPTER TEN SUGGESTS US TO BE HAPPY. IT SUGGESTS NOT TO POSTPONE HAPPINESS. ONE CAN EXPERIENCE IN PRESENT TENSE. INSTEAD OF WORKING FOR HAPPINESS, LET`S WORK OUT OF HAPPINESS.
पुढाकार घेतल्याशिवाय कोणालाही काहीही मिळत नाही. आयुष्यात काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर पुढाकार घ्यावाच लागतो. परंतु पुढाकार घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं हेच कित्येकांना माहीत नसतं. काही मंडळींना वाटतं की, पुढाकार म्हणजे दुसयांना रेटून पुढे जाणे. परंतु आपण जर दुसऱ्यांना रेटून पुढे गेलो तर आपल्यालाही रेटणारा कोणीतरी, कुठेतरी, कधीतरी जन्माला येतोच; त्यामुळे असला पुढाकार यश देत नाही आणि समजा दिलंच तर ते जास्त दिवस टिकत नाही आणि समजा टिकलंच तर असल्या पुढाकारानं आयुष्य तणावग्रस्त होतं. कायमस्वरूपी यश मिळवायचं असेल, मन:शांती टिकवायची असेल, तणाव कमी करायचे असतील, कंटाळवाणं आयुष्य झटकून मजेत जगायचं असेल तर ‘पुढाकार घ्या’ हे पुस्तक वाचा. त्यासाठीही पुढाकार घ्यावा लागेल. हे पुस्तक तुम्हाला मित्रासारखं मार्गदर्शन करील. माझी खात्री आहे की, तुम्ही हे पुस्तक एखाद्या गोष्टीच्या पुस्तकासारखं वाचून मित्राला देऊन टाकणार नाही; तर स्वत:ची प्रत जपून संग्रही ठेवाल व दुसरी प्रत कुणा गरजूला भेट द्याल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पाल्यव्यक्तिमत्त्वाचाकानमंत्र #संजीवपरळीकर #व्यक्तिमत्त्वविकसन #PALYAVYAKTIMATVACHAKANMANTRA #SANJEEVPARLIKAR #PUDHAKARGHYA #ZATPATVYAKTIMTVAVIKASAN #CHARSHABDADYAVEGHYAVE #CHARJABARDASTFANDE #YALAJIVAN AISENAAV #KELYANEHOTAHERE! #VIKRIKAUSHALYASHIKA
Customer Reviews
  • Rating Starप्रा. आर. जी. लहाने

    जीवनातील सर्व आयामांला स्पर्श करणारे हे नितांत सुंदर पुस्तक आहे. आपली मांडणी सुरेख, सुबोध अशी आहे. व्यक्तिमत्त्व विकासाच्या संदर्भात आपले पुस्तक एक संदर्भ ग्रंथच आहे. याच मातीतील उदाहरणांचा चपखल उपयोग केला आहे.

  • Rating StarDAINIK SAKAL 06-05-2007

    जीवन व्यवस्थापन... सध्याच्या स्पर्धेच्या काळात स्वत:चे शरीर, मन व मेंदू कायम सज्ज ठेवावे लागतात. अफाट धावाधाव करताना स्वभावत: काही बरे-वाईट बदल घडत जातात. याबाबत सतर्क करणारे व उपयुक्त मंत्र सांगणारे पुस्तक संजीव परळीकरांनी लिहिले आहे. ‘पुढाकार घ्य : प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र’ या पुस्तकातून त्यांनी जीवनाचे व्यवस्थापन करण्यासाठी काही कृतिकार्यक्रम दिले आहेत. तेही सुलभ असल्याने वाचकांना अजमावून पाहावेसे वाटतील. सवयी, लकबी, वृत्ती, प्रवृत्ती वगैरेबाबत माणसे बरीच संवेदनशील असतात. याबाबत चांगले बदल तर करावेसे वाटतात, पण नेमके ते कसे करावेत, ते समजत नाही. अशांसाठी हे पुस्तक मित्रत्वाचा सल्ला देणारे ठरू शकते. यशस्वी होण्यासाठी मानसिकतेत बदल सुचविणारी पुस्तके गेल्या दोन दशकांमध्ये बऱ्याच प्रमाणात निघाली. त्यात निरनिराळे विचारप्रवाह दिसतात. हे पुस्तक स्वत: पुढाकार घेण्याचा विचार मांडते. त्यामागे वस्तुनिष्ठपणा अधिक आहे. कल्पनेतील भराऱ्या नाहीत. त्यामुळेही हे पुस्तक वाचकांना जवळचे वाटू शकेल. व्यक्तिमत्त्वातील बदलांसाठी आवश्यक असलेली विचारशुद्धी, जगण्याच्या उद्देशाची निश्चिती, दैनंदिन जीवनक्रमाचे नियोजन, भावनांना वळण लावणे, नात्यांमधली स्वत:ची जबाबदारी लक्षात आणून देणे, शांत व स्थिर मनाचे महत्त्व वगैरे अनेक महत्त्वाच्या पैलूंवर यात सोदाहरण विवेचन आहे. कॉर्पोरेट विश्वातली माणसे किंवा गृहिणी अथवा विद्यार्थी, अशा सर्वांनाच कार्यकुशलता व प्रभावीपणा यातला फरक उलगडून सांगायचा यात प्रयत्न आहे. पुढाकार का घ्यावा, ते सोपे की कठीण, त्यातले फायदे-तोटे कोणते, वगैरे तपशिलात समजावून सांगत लेखक नकळतपणे या संदर्भातल्या स्वाध्यायासाठी वाचकाला प्रवृत्त करतो. नोकरी मिळणे, मनासारख्या गोष्टी घडणे, कौटुंबिक कलह मिटणे व एकूणच आनंदी राहता येण्यासाठी पुढाकाराची गरज आपल्याला आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टींना केव्हा, किती व कसे महत्त्व द्यायचे, याबाबत कानमंत्र या पुस्तकातून मिळतात. -निला शर्मा ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 07-05-2007

    माणूस माणसाला भेटल्यावर प्रथमदर्शनी मनावर ठसतं ते त्याचं व्यक्तिमत्व. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ही त्याच्या विचारातून परस्परांना होते व या विचारांची तार जुळली की नाती, मैत्री असे संबंध प्रस्थापित होतात. केवळ नात्यासाठी व्यक्तिमत्वाचा प्रभाव उपयोी पडतो असे नाही तर समाजात वावरत असताना नोकरी पेशाच्या ठिकाणी, सार्वजनिक स्थळी, गर्दीत व गर्दीबाहेरही आपले साथीदार असते. तेव्हा व्यक्तिमत्त्वाचा विकास हा आपला केवळ स्वत:चाच नाही तर समाजात उमटणाऱ्या प्रतिक्रियाचा पडसाद असतो. हे जाणून इनोव्हसोर्स सोल्यूशन प्रा. लिमिटेडचे कार्यकारी संचालक संजीव परळीकर यांनी प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र सांगणारे पुढकार घ्या हे पुस्तक लिहिले व मेहता पब्लिशिंग हाऊसने ते नुकतेच प्रकाशित केले. या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक संजीव परळीकर यांच्याशी चर्चा करताना असे जाणवले की, त्यांना मराठी तरुणाविषयी अतिशय कळकळ आहे. ते म्हणाले की कॉर्पोरेट जगात मराठी तरुण हुशार असूनही बराच मागे दिसतो. त्यांना जर काहीतरी घवघवीत मिळवायचं असेल तर त्यांना या पुस्तकातील विचार उपयोगात आणता येतील. नुसतेच तरुण नव्हे तर स्त्री, पुरुष, युवक, विद्यार्थी की ज्यांना इंग्रजीवर प्रभुत्व नसल्यामुळे अनेक संधीपासून वंचित राहावे लागते. अशा सर्व मंडळीसाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. जी मंडळी अपयशामुळे खचून गेली आहेत अशा मंडळीसाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. ज्यांच्या नशिबाचे फासे कायम उलटेच पडत आले आहेत. अशांना या पुस्तकामुळे एक नवीन डाव मांडता येण्याची संधी मिळावी, म्हणून मी हे पुस्तक लिहिलेले आहे. अनेक छोटे उद्योजक ज्यांना चांगले व्यवस्थापन शिकायचे आहे. त्यांच्यासाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. समस्त होतकरू मराठी तरुणांना ताठ मानेने समाजत वावरण्याकरता हे पुस्तक लिहिलेले आहे. आपण सर्वचजण अनेक छोट्या प्रसंगात गोंधळून जाऊन चुकीचा निर्णय घेतो व त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावरही या नकारात्मक विचारसणीचा प्रभाव पडतो व व्यक्तिमत्त्वाचा विकास थांबतो. या समस्येला ओळखून पुढाकार घ्या, या पुस्तकात पुढाकाराची दहा सूत्रे मांडली आहेत. त्यात विचारशुद्धी, जगण्याचा उद्देश, नियोजनाची गरज, नातीगोती कशी सांभाळावी त्याचप्रमाणे दुसऱ्याचे मत, सांघिक बळ, आरोग्य, मनाची स्थिरता व शांतता, समाजाचे ऋण जाणणे व आनंदी जगणे या गोष्टीवर भर दिला आहे. व्यक्तिमत्त्वाचे दोन प्रकार सांगताना पहिल्या सूत्रात बाह्य व्यक्तिमत्त्वापेक्षा आंतरिक व्यक्तिमत्व अधिक मोलाचे आहे. हे अतिशय सोप्या भाषेत विशद केलेले आहे. या सूत्राला लेखकाने विचारशुद्धी करा असे शीर्षक दिले आहे. या विचारशुद्धीसाठी अतिशय उच्च जीवनमूल्य सुचविलेली आहेत व त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यात कसा उपयोग करता येईल. हेसुद्धा सांगितलेले आहे. या विचारांचा एकत्रित समुदाय म्हणजेच दृष्टिकोन व आपले दृष्टिकोन सकारात्मक का ठेवायचे व कसे ठेवायचे, यावर या पुस्तकात प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. हे दृष्टिकोन सकारात्मक ठेवण्यासाठी निसर्गाने मनुष्यप्राण्याला सजगता, कल्पनाशक्ती, सद्सद्विवेकबुद्धी, इच्छाशक्ती ह्या चार देणग्या दिलेल्या आहेत. व त्याचा वापर जागृतपणे करायचा, हेही उल्लेखलेले आहे. त्याचबरोबर आपल्या जगण्याचा उद्देश आपण प्रत्येकाने शोधून काढला पाहिजे, असे दुसऱ्या सूत्रात लेखक म्हणतात. तसे केल्याने आपलेच जीवन अर्थपूर्ण होईल. परंतु त्यासाठी पुढाकार हा प्रत्येकाला घ्यावा लागेल असे लेखक म्हणतात. सजगता वापरून व कल्पकता वापरून जगण्याचा उद्देश शोधायचे तंत्र यात सांगितलेले आहे. चौफेर व्यक्तिमत्व साकार करण्यासाठी आपली कौटुंबिक भूमिका, व्यक्तिगत भूमिका व सामाजिक भूमिका यात परिस्थितीजन्य झालेल्या बदलासह स्वत:ला तपासायला सांगितले आहे तर पुस्तकाच्या तिसऱ्या सूत्रात नियोजन कसे करावे, या विषयी अत्यंत मौल्यवान सूचना केलेल्या आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 31-12-2006

    प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र... वर्तनशैली, नेतृत्वविकास, व्यक्तिमत्व विकास या विषयांवर अनेक कार्यशाळा घेऊन हजारो तरुणांना प्रशिक्षित करणारे संजीव परळीकर हे इनोव्ह सोर्स सोल्यूशन या कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत. त्यापूर्वी जीटीएल, युनाटेड कार्बन, िकोलस पिरामल वगैरे कंपन्यात त्यांनी विविध पदावर काम केलेले आहे. कामगार म्हणून सुरुवात करून पुढे महाविद्यालयीन पदवी घेऊन सतरा वर्षात औषध उत्पादक कंपनीत असिस्टंट मॅनेजरपर्यंत त्यांनी मजल मारली. तेथे पुढे बढतीची शक्यता न दिसल्यावर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कामे केली. ‘सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ आणि ‘हाऊ टू स्टे वुईथ अँड विदाऊट अँगर’ या दोन पुस्तकांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव आहे. त्यावर आधारित कार्यशाळा घेतल्यावर त्यांनी स्वत:चीच एक व्यवस्थापनविषयक विचारधारा विकसित केली. सुखी होण्यासाठी घ्यावयाच्या पुढाकाराची दहा सूत्रे परळीकरांनी मनाशी निश्चित करून त्यांचे सविस्तर वर्णन करण्यासाठी हे पुस्तक तयार केले आहे. ‘पुढाकार घ्या’ ‘प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र’ असे नाव त्यांनी त्या पुस्तकाला दिले आहे. याशिवाय ‘पाल्य व्यक्तिमत्त्वाचा कानमंत्र’, ‘झटपट व्यक्तिमत्त्व विकास’, ‘चार शब्द द्यावे-घ्यावे’ ही पुस्तकेही परळीकरांच्या नावावर जमा आहेत. शेकडो प्रशिक्षण वर्ग घेतल्याने हसत खेळत, विनोद आणि दृष्टांत देत आपले मुद्दे स्पष्ट करण्याचे कौशल्य परळीकरांनी आत्मसात केले आहे. या पुस्तकातही त्याचा प्रत्यय येतो. समर्पक उदाहरणाद्वारे ते आपले विचार आणि मुद्दे वाचकांना, श्रोत्यांना पटवून देण्यात कसूर करीत नाहीत. हे पुस्तक म्हणजे एक जादूचा आरसा आहे असे परळीकर म्हणतात. आपल्या मूळ व्यक्तिमत्त्वाला पूर्ण बदलून टाकण्याची जादू या पुस्तकात आहे असा त्यांचा विश्वास आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी पुढारीपण, पुढाकार, नेतृत्व जोपसाण्यासाठी या पुस्तकात देण्यात आलेली दहा सूत्रे अशा १) विचारशुद्धी करा. २) जगण्याचा उद्देश शोधा. ३) नियोजन करा. ४) नातीगोती सांभाळा. ५) दुसऱ्यांचे ऐकून घ्या. ६) सांघिक बळ निर्माण करा. ७) आरोग्याची काळजी घ्या. ८) मन स्थिर आणि शांत ठेवा. ९) समाजाचे ऋण फेडा. १०) आनंदी जगा. प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी आपल्याला आपल्या अंत:करणापासून, आंतरिक व्यक्तिमत्त्वापासून आरंभ करायला हवा. चांगली फळे हवी असतील तर बी चांगले हवे. जमिनीत रूजलेल्या मुळांची देखभाल हवी. मुळाशी साठवलेले तण दूर करून योग्य प्रकारे खतपाणी हवे. आपल्या मनात, विचारात, व्यक्तिमत्त्वात अनेक पूर्वग्रह, अनेक विकृती ठाण मांडून बसलेल्या असतात. त्यापासून मुक्त होऊन सम्यक् विचारांची जोपासना करायला हवी. तरच सम्यक आचरण शक्य आहे. आपल्या मनाचे कंडिशनिंग झालेले असते. आनुवंशिकता, कौटुंबिक स्थिती, सामाजिक, राजकीय वातावरण इ. कारण त्यासाठी देता येतात. त्यामुळे आपण अपयशाचे खापर त्यावर फोडत राहतो. परंतु असे कोणाला तरी पुढे करून आपल्या अपयशाचे वा त्रुटीचे समर्थन करणे इष्ट नाही. हे कंडिशनिंग तोडायला हवे. त्यासाठी सजगता, कल्पनाशक्ती, सद्सद्विवेकबुद्धी, इच्छाशक्ती यांचा उपयोग होऊ शकतो. दुसऱ्यावर आरोप करायचा नाही, स्वत:च्या चुकांचं समर्थन करायचं नाही. संपूर्ण जबाबदारी घ्यायची, पुढाकार फक्त सकारात्मक असायला हवा, ही पथ्ये पाळली तर आपल्या विचारांमधील एकांगीपणा कमी होऊ शकेल. आपली प्रवृत्ती असेल तर आपण कणखर राहू शकता. वास्तव स्वीकारू शकता. • परिस्थिती वैतागवाणी असली तरी मी खंबीर राहीन. • मी प्रॉब्लेम सोडवण्यात हुशार आहे म्हणून मला प्रॉब्लेम सोडवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. • मी यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीन. • माझ्या आयुष्यात आलेले हे कसोटीत कठीण प्रसंग इतरांच्याही आयुष्यात येऊ शकतात, आलेले असतील. • आज मला कमीपणा घ्यावा लागतो आहे, पण असा कमीपणा घ्यायलाही मनाचा मोठेपणा लागतो. • माझं मन मोठं आहे. मी आनंदाने सगळ्यांना सामावून घेत असतो. आपली भाषा ही देखील आपल्या नेतृत्वाची निदर्शक असते. सतत मन मारून जगणं हे नेतृत्वाचं लक्षण नाही. सतत पडते घेतल्याने न्यूनगंड निर्माण होतो. आपण जी भाषा वापरतो ती मन मारणारी भाषा नसावी, नेतृत्वाची असावी. जबाबदारी घेणारी असावी. आपल्याला इष्ट वाटणाऱ्या गोष्टींसाठी पुढाकार घ्यायला हवा तसाच टाकाऊ गोष्टी झुगारून देण्यासाठी पुढाकारी घ्यायला हवा. मात्र स्वत:च्या फायद्यासाठी पुढाकार घेताना इतरांना ओरबाडून टाकणे म्हणजे नेतत्व नाही. इतरांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना बरोबर घेऊन उन्नती करणे त्यासाठी सजगता, विवेकबुद्धी, इच्छाशक्ती या निसर्गदत्त देणग्यांचा पुरेपूर वापर पुढाकार घेताना करावा लागतो. नोकरी नाही, मनासारख्या गोष्टी होत नाहीत, कुटुंबात कलह आहे, आपल्या मार्गात अडचणी येताहेत त्याबद्दल इतरांना दोष देत बसू नका. त्याबद्दल संपूर्ण जबाबदारी घ्या आणि त्यामधून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्या. प्रश्न सोडवण्यासाठी पुढे पाऊल टाका. एका क्षणात प्रश्न सुटणार नाहीत. पण... प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पहिले पाऊल तर पडेल. करिअर डेव्हलपमेंट, मुलांचे संगोपन, आई-वडिलांबाबतीची कर्तव्ये, पती-पत्नी म्हणून जबाबदारी, आरोग्य संवर्धन अशा नानाविध क्षेत्रासंबंधी आपल्याला नियोजन करण्याची गरज असते. आपल्याला मिळणारा वेळ त्यात ही सर्व कामे करण्यासाठी कसरत करावी लागते, दररोज करायची कामे, आठवड्याला करायची कामे, महिन्याला करायची कामे, त्रैमासिक कामे, षण्मासिक कामे, वार्षिक कामे अशी त्यासाठी नोंद करता येईल. तातडीची कामे, गौण कामे, महत्त्वाची कामे सवडीने करायची कामे अशीही विभागणी करता येईल. घराची साफसफाई नातलगांच्या भेटीगाठी, पत्नीबरोबर शॉपिंग वा फिरणे, डायरी, पत्रलेखन, मुलांचा अभ्यास, घरात मदत, व्यायाम, स्कुटरची वा वाहनाची देखभाल, घरातील नळाची गळती थांबवणे, गॅसनोंदणी, किराणा माल खरेदी, वैद्यकिय तपासणी, डिव्हिडंड भरणे, बँकेची कामे करणे, अशी कितीतरी कामे करण्याची निकड असते. त्यासाठी वेळ काढायला लागतो. त्याचबरोबर काही दीर्घ पल्ल्याची कामे व त्यांचे नियोजनही महत्त्वाचे असते. आर्थिक गुंतवणूक, इन्कम टॅक्सने रिटर्न भरणे, वैद्यकीय तपासणी, वैयक्तिक विकास (व्यायाम, कौशल्य संपादन, प्रशिक्षण) नातेसंबंधांची जपणूक यांनाही टाईम मॅनेजमेंटमध्ये स्थान द्यायला हवे. आपले आरोग्य उत्तम असेल तरच जगातील सुखांचा, सोयींचा उत्तम प्रकारे आपण उपयोग घेऊ शकतो. शरीराची सहनशक्ती वाढवणे, लवचिकता वाढवणे आणि स्नायूंची शक्ती वाढवणे यासाठी व्यायामाची गरज असते. शारीरिक लवचिकता असेल तर स्वभावात लवचिकता आढळते. आडमुठेपणामुळे दीर्घकालीन यश लाभत नाही. मन शांत आणि स्थिर ठेवणे हे यशाचे, पुढाकाराचे नेतृत्वाचे आठवे सूत्र आहे. मन स्थिर ठेवण्यासाठी ध्यानधारणा, शवासन, विपश्यना, एकांतामध्ये मौन, पूजाप्रार्थना, लेखन यांचा उपयोग होऊ शकतो. ‘पुढाकार घ्या’ या पुस्तकातील एकूणच सर्व विवेचन या दृष्टीने तुम्हाला बळ देणारे ठरेल. जीवनाकडे सकारात्मक, जबाबदारीच्या दृष्टीने बघण्यास त्यामुळे प्रेरणा मिळेल. आपल्या यशस्वी जीवनाचा भक्कम पाया घालण्याच्या दृष्टीने योग्य ती उद्दिष्ट्ये समोर ठेवून, विवेकाने वेळेचे व नात्यांचे, कामाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे नियोजन करून आपल्या क्षेत्रात आपणास निकोप मनाने आणि सुदृढ शरीराने प्रगतीचा वेग टिकवता येईल अशी ग्वाही देणारे हे पुस्तक आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more