Madhavi Desai

About Author

Birth Date : 21/07/1933
Death Date : 15/07/2013


MADHAVI DESAI WAS BORN IN KOLHAPUR, BUT SPENT MOST OF HER LIFE IN GOA. PRODUCER OF MARATHI FILMS AND DADASAHEB PHALKE AWARD WINNER KAI. BHALJI PENDHARKAR IS HIS FATHER. MADHAVITAR GOT THE HERITAGE OF ART AND LITERATURE FROM THE FAMILY ITSELF.

माधवी देसाई यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला, पण त्यांनी आपल्या आयुष्याचा बराच काळ गोव्यामध्येच व्यतीत केला. मराठी चित्रपटांचे निर्माते आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते कै. भालजी पेंढारकर हे त्यांचे वडील. माधवीताईंना कलेचा, साहित्याचा वारसा घराण्याकडूनच मिळाला. माधवीताईंनी जवळ-जवळ १६ वर्षे शिक्षणक्षेत्रात काम केले. नंतर त्या गोव्यामध्ये वास्तव्यास गेल्या. त्या २५ वर्षे तेथे राहिल्या. आपल्या साहित्यिक कारकिर्दीचा प्रारंभही त्यांनी तेथेच केला. अखिल गोवा साहित्य संमेलनाची स्थापनाही त्यांनी केली. त्यांनी जवळ-जवळ ३८ पुस्तके लिहिली. नाच ग घुमा या त्यांच्या आत्मचरित्राला यशो दामिनी हा साहित्य पुरस्कारही मिळाला. प्रतारणा व सीमारेषा या त्यांच्या पुस्तकांना कला अ‍ॅकॅडमी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. देवराई, जगावेगळी, नियती, कांचनगंगा, मंजिरी, प्रार्थना, हरवलेल्या वाटा, स्वयंसिद्धा आम्ही, शाल्मली, आवतन या त्यांच्या कादंबऱ्याही खूप गाजल्या. असं म्हणू नकोस, कथा सावलीची, सागर, किनारा, शुक्रचांदणी हे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी घे भरारी या चित्रपटासाठी पटकथा व संवाद लेखनही केले. या चित्रपटाला अल्फा गौरव अ‍ॅवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 12 total
ASA MHANU NAKOS Rating Star
Add To Cart INR 170
DHUMARE Rating Star
Add To Cart INR 130
HARAVALELYA WATA Rating Star
Add To Cart INR 120
KANCHANGANGA Rating Star
Add To Cart INR 220
KATHA SAWALICHI Rating Star
Add To Cart INR 190
KINARA Rating Star
Add To Cart INR 120
28 %
OFF
MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1670 INR 1199
MANJIRI Rating Star
Add To Cart INR 150
NIYATI Rating Star
Add To Cart INR 120
PRARTHANA Rating Star
Add To Cart INR 220
SAGAR Rating Star
Add To Cart INR 100
SHUKRACHANDANI Rating Star
Add To Cart INR 130

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more