* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHY MEN DON’T LISTEN AND WOMEN CAN’T READ MAPS
  • Availability : Available
  • Translators : SHUBHADA VIDVANS
  • ISBN : 9788184980301
  • Edition : 4
  • Publishing Year : MAY 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"WHY MEN DON`T LISTEN AND WOMEN CAN`T READ MAPS` THE TITLE OF THIS BOOK WRITTEN BY ALLAN AND BARBARA PEACE IS ITSELF SELF-INTRODUCTORY SO THERE IS NO NEED TO TELL YOU ABOUT THE THEME OF THE BOOK. BUT SPECIAL FEATURE OF THIS BOOK IS THE HANDLING OF THEME. THE LANGUAGE OF THE BOOK AND EXAMPLES THEREIN ARE VERY WITTY AND COMIC. THE FUNDAMENTAL PROBLEM IS MEN AND WOMEN ARE DIFFERENT. NOT BETTER OR WORSE, JUST DIFFERENT. SCIENTISTS, ANTHROPOLOGISTS AND SOCIOBIOLOGIEST HAVE KNOWN THIS FOR YEARS BUT THEY HAVE ALSO BEEN PAINFULLY AWARE THAT TO EXPRESS THIS KNOWLEDGE PUBLICLY IN SUCH A POLITICALLY CORRECT WORLD COULD TURN THEM INTO SOCIAL PARIAHS. SOCIETY TODAY IS DETERMINED TO BELIEVE THAT MEN AND WOMEN POSSESS EXACTLY THE SAME SKILLS, APTITUDES AND POTENTIALS JUST AS SCIENCE IRONICALLY IS BEGINNING TO PROVE THEY ARE COMPLETELY DIFFERENT. THIS BOOK IS DEDICATED TO ALL MEN AND WOMEN WHO HAVE EVER SAT UP AT 2 A.M. PULLING THEIR HAIR OUT AS THEY PLEAD WITH THEIR PARTNERS. ""BUT WHY DON`T YOU UNDERSTAND` PARTNERS CAN`T ANSWER THIS BUT WE THE WRITERS HAVE ANSWERED THIS QUESTION IN THIS BOOK. RELATIONSHIPS FAIL BECAUSE MEN STILL DON`T UNDERSTAND WHY A WOMEN CAN`T BE MORE LIKE A MAN AND WOMEN EXPECT THEIR MEN TO BEHAVE JUST LIKE THEY DO. NOT ONLY WILL THIS BOOK HELP YOU TO GRIP THE OPPOSITE SEX, IT WILL HELP YOU UNDERSTAND YOURSELF. AND HOW YOU BOTH CAN LEAD HAPPIER, HEALTHIER AND MORE HARMONIOUS LIVES AS A RESULT. MUST READ THIS BOOK.
स्त्री व पुरुष यांच्यातील नातेसंबंध बिघडतात ह्याचे कारण म्हणजे पुरुषांना हे समजत नाही की बायका त्यांच्यासारख्या का नाहीत; आणि बायकांना वाटते की आपण जसे करतो तसे पुरुष का करत नाहीत. ह्याचे कारण म्हणजे, स्त्री व पुरुष वेगळे आहेत. ते समान पेशींपासून बनलेले आहेत, एवढी एकच गोष्ट त्यांच्यात समान आहे. पण हे दोघे वेगवेगळ्या जगात रमतात. त्यांची मूल्ये वेगवेगळी असतात, पण फारच थोडे पुरुष हे मान्य करतात. एक सामायिक गोष्ट अशी की स्त्री व पुरुष कुठल्याही धर्माचे, पंथाचे, वर्गाचे असले तरी त्यांचे दृष्टिकोन व विश्वास सारखेच असतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #WHYMENDONTLISTENANDWOMENCANTREADMAPS #WHYMENDONTLISTENANDWOMENCANTREADMAPS #व्हायमेनडोन्टलिसनअ‍ॅण्डविमेनकान्टरीडमॅप्स #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHUBHADAVIDVANS #ALLANPEASEBARBARAPEASE "
Customer Reviews
  • Rating StarPriyanka Landage

    Good evening All my वाचनवेडा मित्रमैत्रिणींनो ..... आतापर्यंत बरीच पुस्तके वाचली . पण कोणत्या पुस्तकाबददल आवर्जुन लिहाव अस वाटल नाही . पण हे पुस्तक वाचल्यावर अस वाटल कि लोकानी हे पुस्तक वाचाव . हे पुस्तक वाचल्यावर आपल्या आयुष्यातील बऱ्याच प्रशनाची उत्तर आपोआप मिळतील. कारण यामध्ये सर्वाचा आवडीच्या विषयाचे विश्लेषण केलेल आहे . *तो म्हणजे* * स्त्री पुरुष याच्यातील नातेसंबंध* तर काय वाटत तुम्हाला ? का बरं बिघडत असतील त्यांच्यामधील नातेसंबंध ? याचे कारण म्हणजे पुरुषांना समजत नाही कि स्त्रिया त्याच्यासारख्या का नाहीत ? अन् स्त्रियांना वाटतेळी आपण जस जसे करतो तसे पुरुष का करत नाहीत? याचे कारण म्हणजे ते दोघेही वेगवेगळे आहेत . अन् ते का व कसे वेगळे आहेत ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तका मध्ये मिळतील . हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडेल . त्याचा / तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.😊 ...Read more

  • Rating StarBHAUSAHEB PAWAR

    स्त्री व पुरुष यांच्यातील नातेसंबंध बिघडतात याचे कारण म्हणजे पुरुषांना हे समजत नाही की बायका त्यांच्यासारख्या का नाहीत,आणि बायकांना वाटते की आपण जसे करतो तसे पुरुष का करत नाहीत. याचे कारण म्हणजे,स्त्री व पुरुष वेगळे आहेत. ते समान पेशीपासून बनलेले हेत,एवढी एकच गोष्ट त्यांच्या समान आहे.पण हे दोघे वेगळ्या जगात राहतात.त्यांची मूल्ये वेगवेगळी असतात.पण फारच थोडे पुरुष हे मान्य करतात. एक सामायिक गोष्ट अशी की स्त्री व पुरुष कुठल्याही धर्माचे पंथाचे वर्णाच्या असले तरी त्यांचे दृष्टिकोन व विश्वास सारखेच असतात. या पुस्तकात-बायका का जास्त बोलतात, पुरुष का बोलत नाहीत अशा वेगवेगळ्या बाबींनवर या पुस्तकात माहिती दिली आहे. ...Read more

  • Rating StarVijaykumar Chougle

    Why Men don`t listen and Women can`t read Maps ~~~~Allan & Barbara Please व्हाय मेन डोन्ट लिसन अँड वूमन कानट रीड मॅप्स~~~~~अनुवाद Adv. शुभदा विद्वांस स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंध का बिघडतात? पुरुषांना हे समजत नाही की स्त्रिया त्यांच्ासारख्या का नाहीत;आणि स्त्रियांना वाटत पुरुषांनी आपल्यासारखा वागावं. ह्याचे कारण म्हणजे स्त्री आणि पुरुष वेगळे आहेत.ते समान पेशिंपासून बनलेले आहेत. एवढी एकच गोष्ट त्यांच्यात समान आहे. तुम्ही स्वतःला ओळखावं, तसच जोडीदाराच्या मनात काय चाललंय ते जानाव, ज्यामुळे तुमचे आपसातील नातेसंबंध आनंददायी व दृढ होतील. ह्या पुस्तकातून अनेक गुपीत तुम्हाला समजतील.ज्याचा तुम्हाला तुमचा पुढील आयुष्य सुफल, अधिक प्रेममय व जिव्हाळ्याचं करण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. स्त्रियांची तक्रार--त्यांचे पुरुष सवेदनाशून्य आहेत.त्यांच्यामध्ये सहिष्णुता नाही.ते जास्त बोलत नाहीत, प्रेम करत नाहीत.... पुरुषांची तक्रार--मूळ मुद्दा सोडून भलतेच आणि खूप जास्त बोलतात, असे आणि अनेक.... स्त्रिया या मनकवड्या असतात.त्यांना समोरच्याच्या मनात काय चाललंय ते समजत. त्यासाठी त्यांना शब्दातून सांगण्याची गरज नसते.त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की नवऱ्याला त्यांच्या मनातलं समजावं, तिच्या गरजा ओळखाव्यात पण तिची देहबोली तिचे इशारे काही त्याला समजत नाहीत.त्यामुळेच जगभरातील सर्व स्त्रिया पुरुषांना भावनाशून्य म्हणून संबोधतात. स्त्रिया एवढं का बोलतात? कारण त्यांच्या मेंदूच्या दोन्ही गोलार्धात स्पीच सेंटर्स असतात. स्त्रियांना जास्त बोलण्याची गरज का असते? पुरुषांच्या मेंदूमध्ये अनेक कप्पे असतात आणि त्यात माहिती वेगवेगळी साठवून ठेवण्याची क्षमता असते. दिवसाच्या शेवटी सर्व समस्यांचे वर्गीकरण करून त्याचे फायलिंग झालेल असत. स्त्रियांचा मेंदू माहिती त्याप्रमाणे संकलित करत नाही. समस्या डोक्यामध्ये सतत ताक घुसळलयाप्रमाणे घुसळत राहतात. मग या संकटातून बाहेर पडण्याचा एकच उपाय त्यांच्याकडे उरतो, तो म्हणजे त्या समस्या विषयी इतरांशी बोलणं. त्यांना त्याची माहिती करून देणे आणि त्याच वेळी त्यांना कोणाकडून त्या समस्यांचा शेवट किंवा त्याच्यावर तोडगा नको असतो. स्त्रियांसाठी बोलणं म्हणजे एकमेकांशी नात जुळवण तर पुरुषांसाठी बोलण म्हणजे घटना सांगण. एकमेकांच्या दोषांवर पांघरुण घालण्यातच शहाणपणा आहे आपण सगळेच सगळ्या गोष्टीत हुशार नसतो. त्यांन फारस बिघडत नाही. सरावान गोष्टी येतात पण तेवढ्यासाठी आपल किंवा जोडीदाराच आयुष्य बरबाद करु नये. स्त्रीया नातेसंबंधात असंतुष्ट राहिल्या तर त्या त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत आणि पुरुष जर कामाच्या ठिकाणी असंतुष्ट राहिला तर तो त्याच्या नातेसंबंधाला न्याय देऊ शकत नाही. स्त्री आणि पुरुष हे दोन वेगळ्या संघटनांचे सदस्य आहेत. हा फरक लक्षात घेणं, समजून घेण गरजेचे आहे तरच तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना आणि त्यामागचा कार्यकारण भाव समजून घेऊ शकाल. तिला प्रेम, प्रणय आणि संवाद हवा असतो. त्याला मात्र बायकोकडून असा विश्वास हवा असतो की तो यशस्वी आहे आणि ती तो जे काही देतो त्यावर खुश आहे. पण त्यांन रोमँटिक असणे गरजेच असत. आणि मुख्य म्हणजे ती जे बोलते ते काळजीपूर्वक कुठलेही उपाय न सुचवता ऐकणे गरजेच असत. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    नातेसंबंधावर प्रकाश टाकणारे पुस्तक… पुरूष आणि स्त्री हे भिन्न आहेत. श्रेष्ठ-कनिष्ठ नाही, फक्त भिन्न! शास्त्रज्ञ, वंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ या सगळ्यांना हे अनेक वर्षांपासून माहिती आहे. पण सध्याच्या स्त्री पुरूष समानता, स्त्री शक्ति, स्त्री-मुक्ति्या जगात याबद्दल कसे बोलावे हा प्रश्न त्यांना सतावत आहे. स्त्री आणि पुरूष वेगळे आहेत. हे फरक समाजावून घेण्यामागे एकमेकांमधील दोषांवर टीका न करता त्यांच्यातील बलस्थाने शोधून काढून एक सुदृढ, सशक्त समाज निर्माण करणे हा हेतू आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी तीन वर्षांचा अवधी व चाळीस हजार किलोमीटरचा प्रवास लेखकद्वयीला करावा लागला. संपूर्ण जग पालथे घातले. हे पुस्तक आव्हानात्मक तर कधी धक्कादायकसुद्धा वाटेल. पण मनाला लुभावणारे. नातेसंबंध का बिघडतात तर पुरूषांना समजत नाही, की स्त्रिया त्यांच्यासारख्या का नाहीत आणि स्त्रियांना वाटते पुरूषांनी आपल्यासारखे वागावे हा घोळ मिटविण्यासाठी ह्या पुस्तकाचा प्रपंच. अ‍ॅलन आणि बार्बरा पीस यांनी लिहिलेल्या चौदा पुस्तकांपैकी आठ बेस्ट सेलर ठरली. त्यांचे साहित्य पन्नास भाषांमध्ये अनुवादित होऊन शंभर देशातील वाचकांपर्यंत पोहोचले. आपल्या पुस्तकातील माहिती अचूक व परिपूर्ण असावी यासाठी दोघेही भरपूर मेहनत घेतात. म्हणूनच त्यांची पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरतात. अ‍ॅड. शुभदा विद्वांस यांनी मूळ पुस्तकाचा सुरेख अनुवाद केला आहे. त्यांचे हे पहिलेच पुस्तक. पहिले प्रकरण आहे ‘समानतेतून भिन्नता’ समान पेशीपासून निर्माण झालेले स्त्री-पुरूष कसे भिन्न आहेत हे अतिशय साध्या, सोप्या, खुमासदार शैलीतून नजरेस आणून दिले आहे. पूर्वी जीवन-संघर्ष अवघड होता, पण नातेसंधंब सुरळीत आणि सोपे होते. पण आता आधुनिक जगात सर्व नियम धाब्यावर बसवल्यापासून खूप गोंधळ, संभ्रम आणि दु:ख वाट्याला आले. स्त्री आणि पुरुष यांना समान संधी दिल्या आणि ते घेण्याचे पूर्ण स्वातंत्र दिले, तरी त्यांच्या क्षमता वेगळ्या आहेत. दुसरे प्रकरण आहे ‘दृष्टी व दृष्टिकोन.’ स्त्री व पुरुष यांचे जगाकडे बघण्याचे दृष्टिकोन कसे वेगळे आहेत ते इथे सांगितले आहे. पुरुषांची रंगांधता तसेच त्यांची ‘टनेल व्हिजन’ तर बायकांची ‘पेरिफेरल व्हिजन’ यामुळे कशा गमती-जमती घडतात ते वाचायला मिळते. बायका ऐकलेल्या गोष्टीचे वर्णनसुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्षात हजर असल्यासारखे करतात व पुरुष प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास ठेवत नाहीत. स्त्री-पुरुषांची निरीक्षणशक्ती कशी भिन्न आहे हे समजून घेण्यासाठी केलेल्या प्रयोगांचे वर्णन यामध्ये येते. बायका मनकवड्या असतात, पण पुरुषांना सांगितल्याशिवाय कुठलीच गोष्ट समजत नाही. ‘सार काही मनाच्या गाभाऱ्यात’ या तिसऱ्या प्रकरणात स्त्री व पुरुष यांचा मेंदू आकाराने कसा लहान-मोठा आहे, तरीही स्त्रियांची बुद्धिमत्ता तीन टक्क्यांनी कशी जास्त आहे याचे शास्त्रशुद्ध पुरावे दिलेले आहेत. या प्रकरण्याच्या शेवटी वाचकांसाठी जी प्रश्नावली दिली आहे, ती सोडवताना नक्कीच मजा येईल. चौथे प्रकरण आहे,‘बोलणं आणि ऐकणं’ बायकांना बोलणे आवडतेच. पुरुष मात्र मनाशीच बोलतात. बायका किती जास्त बोलतात, तर पुरुष कसा मुखदुर्बल असतो हे विनोदी प्रसंगातून व्यक्त केले आहे. कोणत्याही प्रसंगात पुरुषचा चेहरा कसा स्थितप्रज्ञ असतो आणि बायका भावनांच्या प्रत्येक छटा कशा दर्शवतात याचे सचित्र वर्णन हे. पुरुष मनातल्या मनात कसे बोलतात, तर बायका विचारसुद्धा मोठ्याने करतात यातील विरोधाभास पहावयास मिळतो. पाचवे प्रकरण ‘पुरुषांच्या विशेष क्षमते’ बद्दलचे. ती त्याला मिळालेली देणगी आहे. जी सामान्य स्त्रियांना आत्मसात करणे शक्य नसते. ‘विचार, भावना, दृष्टिकोन आणि इतर संभाव्य संकट’ या सहाव्या प्रकरणात पुरुष व स्त्रिया वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळे का रिअ‍ॅक्ट होतात याचे शास्त्रीय विवेचन विनोदी ढंगानी केले आहे. पुरुष भावना गिळून टाकतो तर स्त्री त्या भावना चघळत बसते़ ‘आपला केमिकल लोचा’ या सातव्या प्रकरणात शास्त्रीय पुराव्यांवर आधारित माहिती वाचायला मिळते. आपल्या शरीरात जी संप्रेरके स्त्रवतात ती माणसांवर कशी गारुड घालतात याचे वर्णन मंत्रमुग्ध करणारे आहे. ‘मुलं ही मुलं’ च असतात या आठव्या प्रकरणात काही कटु सत्यांना सामोरे जावे लागते, तर नवव्या प्रकरणात ‘पुरुष, स्त्री व प्रणय’ यामध्ये स्त्री-पुरुष एकमेकांच्या कोणत्या गोष्टीना किती महत्त्व देतात व प्रत्यक्षात त्यांचे समज काय असतात हे उगते. ‘लग्न, प्रेम आणि प्रणय’ हे या पुस्तकातील दहावे प्रकरण आणि ‘सद्य: परिस्थितीकडे’ हे अकरावे व शेवटचे प्रकरण. आजच्या पुरुषासाठी आजही काहीच बदललेले नाही. पण बायकांच्या बाबतीत बोलायचे तर त्यांचा प्रधान्यक्रम हा त्यांच्या आईपेक्षा व आजीपेक्षा बदललेला दिसतो. अनेक बायकांनी त्यांची व्यावसायिक करिअर निवडलेली आहे. शास्त्र सांगते की, करिअरमुळे बायकांनाही पुरुषांचे आजार, ह्य्दयविकार, ताणतणाव, अल्सर्स व अकाली निधन या समस्या भेडसावू लागल्या आहेत. थीन स्त्रीयांमधील एक वर्षातून किमान नऊ दिवस केवळ ताणतणावामुळे रजा घेताना दिसते. सर्व्हे केला तेव्हा लक्षात आले की, स्त्रीमुक्तीचे वारे वाहूनसुद्धा बायकांचे प्राधान्य आपल्या मुलांना चांगल्या, परंपरावादी कौटुंबिाक वातावरणात वाढवण्याला आहे. फरक एवढाच की आजच्या स्त्रीला आर्थिक परावलंबित्व नको आहे. त्यांना पुरुषांवर अवलंबून राहणे पसंत नाही. तरीही आपले शरीर जराही बदललेले नाही. इस्त्राएलमध्ये एक प्रयोग केला. मुलांना कपडे, बूट, त्यांची हेअरस्टाईल, लाईफ स्टाईल मुले-मुली भेद न करता समान दिली. पण झाले काय? नव्वद वर्षांनीसुद्धा मुलांची आक्रमकता, उद्धट वर्तन, सत्तेसाठी झगडा मारामारी कमी झाली नाही. उलट सहकार्य करणे, प्रेमळ वृत्ती, शेअरिंग आजही मुलींमध्ये दिसते. थोडक्यात हे पुस्तक वाचल्याने अनेक कोड्यांची उत्तरे मिळतील. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more