* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE CASE OF THE CROOKED CANDLE
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9789386888372
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : CRIME & MYSTERY
  • Available in Combos :ERLE STANLEY GARDNER COMBO SET-10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AN INSURANCE CLAIM AFTER A TRAFFIC ACCIDENT ALERTS PERRY MASON TO THE POSSIBILITY OF DOUBLE-DEALING CONCERNING A PARCEL OF LAND. HE NEGOTIATES A VERY LARGE SETTLEMENT FOR HIS CLIENT, BUT THEN A WEALTHY BUSINESSMAN IS FOUND DEAD ON HIS YACHT AND PERRY IS ASKED TO DEFEND AGAINST A CHARGE OF MURDER THE MAN WHO PAID THE MONEY TO SETTLE THE INSURANCE CLAIM. BEAUTIFULLY PRESENTED WITH STRIKING ARTWORK AND STYLISH YET EASY-TO-READ TYPE, AVID READERS OF CRIME WILL LOVE READING THIS GRIPPING, WELL-WRITTEN THRILLER.
रस्त्यावर एक अपघात घडतो. हा अपघात दाबून टाकण्याच्या प्रयत्नांत एक खून उघडकीस येतो. स्किनर हिल्स काराकुल या मेंढ्यांपासून फर बनविणाऱ्या कंपनीचा मालक फ्रेड मिलफिल्ड याचा खून होतो. संशयाची सुई त्याची पत्नी डाफनेबरोबरच त्याचा पार्टनर रॉजर बरबॅन्क यांच्याभोवती फिरू लागते. कारण रॉजर बरबॅन्कच्या बोटीवरच फ्रेड मिलफिल्डचे प्रेत सापडते. रॉजर बरबॅन्कची मुलगी कॅरोड आपल्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते. चतुर पेरी मेसन आणि त्याची धाडसी सेक्रेटरी डेला स्ट्रीट केसच्या मुळाशी पोहोचतात. छोटे-छोटे धागेदोरे मिळवत असतानाच एक थोडीशी कललेली मेणबत्ती केसला कशी योग्य दिशा दाखवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. वेगवान कथानक, अचानक आलेली वळणे व शेवटपर्यंत ताणलेली उत्सुकता यामुळे कादंबरी मनोरंजक झाली आहे. खुनाचे रहस्य आणि प्रेमकथा अशा या कथेचा शेवट वाचकांना नक्कीच आश्चर्यचकित करेल यात शंका नाही.

No Records Found
No Records Found
Keywords
#PERRYMASON#DETECTIVESTORIESINMARATHI# #PERRYMASON#DETECTIVESTORIESINMARATHI #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 15-04-2018

    झुकलेल्या मेणबत्तीची कथा... समुद्रात उभ्या असलेल्या एका शिडाच्या नौकेवर एक खून होतो. मेंढ्या चारण्यासाठी नि त्यांच्या लोकरीपासून महागडे कपडे बनवण्याचा व्यवसाय असणाऱ्या फ्रेड मिलफिल्ड नावाच्या माणसाचा खून होतो. मिलफिल्ड आणि त्याचा व्यावसायिक साथीदार ॅरी व्हॅन न्युई हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातल्या एका विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेत असतात. कशासाठी? तर मेंढ्या चारण्यासाठी. फौजदारी कायदा कोळून प्यालेला नामवंत वकील पेरी मेसन याच्याकडे हा खटला येतो. पहिल्या सलामीलाच मेसनच्या लक्षात येते की, मेंढ्या चारणे नि लोकरीचे उत्पादन करणे हे बहाणे आहेत. मग इतकी जमीन खरेदी कशासाठी? तर या भागात तेल मिळाले असावे. एकदा हे नक्की झाल्यावर खुनाचा उद्देश स्पष्ट होतो. पण खून केला कुणी? मेसनला खुनाच्या ठिकाणी जवळपास नव्वद अंश झुकलेली. एक विझलेली मेणबत्ती दिसते. त्या बारीकशा धाग्यावरून, समुद्राच्या भरती-ओहोटीचे, नौकेच्या हेलकाव्यांचे आणि प्रेत इकडून तिकडे गडगडल्यामुळे, खालच्या गालिच्यावर पडलेल्या रक्तांच्या डागांचे अफलातून गणित बांधून काढत मेसन खुन्यापर्यंत पोहोचतो. अर्ल स्टॅन्ले गार्डनर या जगप्रसिद्ध अमेरिकन डिटेक्टिव्ह कथा लेखकाच्या ‘द केस ऑफ द क्रुकेड कॅण्डल’ या पेरी मेसन कथेचा प्रस्तुत अनुवाद बाळ भागवत यांनी त्याच नावाने मराठीत आणला आहे. सर आर्थर कॉनन डॉयलचा कथानायक जसा शेरलॉक होम्स. अ‍ॅगाथा खिस्तीचा कथानायक जसा हरक्यूल पायरो, तसा अर्ल स्टॅन्ले गार्डनरचा हा कथानायक पेरी मेसन, शेरलॉक होम्स आणि हरक्यूल पायरो हे व्यवसायाने डिटेक्टिव्हच आहेत. पेरी मेसन हा कॅलिफोर्नियातला नामवंत वकील आहे. अमेरिकन फौजदारी कायदा त्याने कोळून प्यालेला आहे. पॉल ड्रेक या आपल्या व्यावसायिक डिटेक्टिव्ह मित्राकरवी तो एखाद्या प्रकरणाचा गुप्त तपास करतोच; पण डेला स्ट्रीट या आपल्या चिटणीस तरुणीसोबत तो स्वत:ही गुप्त तपासावर निघत असतो. अवघड प्रकरणात उडी घ्यायची त्याला फार आवड असते. दैव धारिष्टास धार्जिणे. या म्हणीनुसार त्याच्या धाडसाला हमखास यश मिळतेच. गार्डनर हा स्वत:च नामवंत वकील होता. वकिली पेशातल्या आपल्या अनुभवांवर आधारित कथालेखनाला त्याने १९२३ साली सुरुवात केली. लेस्टर लीथ, केन कॉर्निंग आणि अखेर पेरी मेसन या त्याच्या कथानायकांनी अमेरिकन वाचक वेडा झाला. अमेरिकेच्या ‘बेस्ट सेलिंग ऑथर्स लिस्ट’मध्ये गार्डनर वर्षांनुवर्षे जणू मुक्काम ठोकून होता. गार्डनर १९७० साली वारला. प्रस्तुत कथा मुळात १९४४ सालीची आहे, पण संगणकाच्या वेगवान काळातली ती वाचनीय, पकडून ठेवणारी आहे. हे गार्डनरच्या कथाबांधणीचे वैशिष्ट्य. -मल्हार गोखले ...Read more

  • Rating Starदैनिक लोकसत्ता लोकरंग - ११ फेब्रुवारी २०१८

    अमेरिकी इंग्रजी रहस्यकथा वाचणाऱ्यांमध्ये ‘पेरी मेसन’ हे पात्र परिचयाचे असेलच. अर्ल स्टॅन्ले गार्डनर या कादंबरीकाराने एक निष्णात फौजदारी वकील म्हणून रंगवलेले हे पात्र. गार्डनरने इतर विविध प्रकारचे लेखन केलेले असले, विशेषत: त्याने उत्तम प्रवासवर्णने लिली असली, तरी तो मुख्यत: ओळखला जातो ते पेरी मेसन मालिकेतील कादंबऱ्यांसाठीच. १९३० च्या दशकात गार्डनरने उदयास आणलेले पेरी मेसन हे पात्र मेसन मालिकेतील रहस्यमय कादंबऱ्या आणि त्यांवरील सिनेमांमुळे एके काळी अमेरिकी वाचक-प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. याच मेसन मालिकेतील ‘द केस ऑफ द क्रुकेड कँडल’ ही बाळ भागवत यांनी अनुवादित केलेली कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकतीच प्रकाशित केली आहे. निष्णात वकील असलेल्या पेरी मेसनची गुन्ह्य़ाचा शोध घेण्याची त्याची अशी खास शैली आहे. एका गुन्ह्य़ाबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्याशी निगडित दुसऱ्या मोठय़ा गुन्ह्य़ाचे धागे उसवत गुन्हेगारी प्रवृत्तींना कायद्याद्वारे शिक्षेपर्यंत पोहोचवणे ही मेसनची शोधशैली. ‘द केस ऑफ द क्रुकेड कँडल’ ही रहस्यमय चातुर्यकथाही मेसनच्या या शोधशैलीचा प्रत्यय देणारी आहे. या कादंबरीची सुरुवात होते ती एका गृहस्थाच्या गाऱ्हाण्याने. मेसनच्या कार्यालयात सकाळीच एक गृहस्थ आलेला असतो. ट्रकने दिलेल्या धडकेत या गृहस्थाच्या गाडीचे नुकसान झालेले असते. गाडीला धडकलेला ट्रकचालक पळून गेला असला तरी त्याच्या ट्रकवरील काही नोंदी या गृहस्थाने ध्यानात ठेवलेल्या असतात. तो त्या मेसनला सांगतो. मेसन तो ट्रक कोणत्या कंपनीचा आहे हे शोधणार तोच त्याला त्या कंपनीच्या वकिलाकडून फोन येतो. तो वकील हे प्रकरण मिटविण्यासाठी मेसनकडे आलेल्या गृहस्थाला चांगला मोबदला देण्याची तयारी दाखवतो. त्याने सांगितलेली रक्कम मेसन नाकारतो आणि वाढीव रकमेची मागणी करतो. मेसनची मागणी नाकारली जाईल असे वाटत असतानाच कंपनी ती मागणी स्वीकारते आणि तितक्या रकमेचा धनादेश त्या गृहस्थाला देते. कंपनीच्या या तत्परतेमुळे मेसनला यात काही काळेबेरे असल्याचा संशय येतो आणि तो त्या कंपनीचे काम नेमके काय सुरू आहे, कुठे सुरू आहे हे तपासण्यास सुरुवात करतो. नेमके त्याच वेळी मेसनला कळते, की एका असहाय अपघातग्रस्त महिलेला त्याच्या मदतीची गरज आहे. तिला झालेला अपघातही याच कंपनीतील एका व्यक्तीकडून झालेला असतो. त्याचीही भरपाई मिळवायची असे मेसन ठरवतो. त्याच वेळी मेसनचा साहाय्यक आणि खासगी गुप्तहेर पॉल ड्रेक त्याला येऊन भेटतो. ड्रेक मेसनला त्या कंपनीच्या विविध काळ्या कारवायांबद्दल सूचक माहिती देतो. इथून मेसनच्या डोक्यातील विचारचक्र चालू लागते. मेसन त्या कंपनीच्या सर्व भागीदारांची माहिती काढू लागतो. त्यातील एक भागीदार गायब झाला असल्याचे त्याला कळते. हा भागीदार नेमका कुठे गायब झाला आहे, याचा तपास करताना मेसन दुसऱ्याच एका भानगडीत सापडतो. सुरुवातीला झालेला अपघात हा मामुली वाटावा असा वेगळाच प्रकार या कंपनीतील रहस्यमयरीत्या गायब झालेल्या भागीदाराच्या बाबतीत घडलेला असतो. विदेशामध्ये खासगी बोटी घेऊन खासगी तलावांमध्ये सुट्टीच्या दिवशी मासेमारी करण्याचा छंद अनेक जण जोपासतात. मोठय़ा कंपन्यांतील बडी मंडळी हमखास आपले काही खासगी व्यवहार अशा वेळी या बोटींवर करीत असतात. मेसन शोधत असलेल्या कंपनीचा गायब झालेला भागीदारही असाच व्यवहार करायला गेलेला असताना त्याची हत्या झालेली असते. या खुनाचा आळ ज्या व्यक्तीवर आलेला असतो, त्याची मुलगी आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी वेगळे पुरावे उभी करू लागते. मात्र असे करताना त्या शहरातील काही मान्यवरही त्यात अडकण्याची शक्यता निर्माण होतेच, पण तिच्या वडिलांबाबतही संशय निर्माण होतो. आपले वडील निरपराध आहेत, हे दाखविण्यासाठीचा तिचा आटापिटा आणखी गुंता वाढवत जातो. मात्र अखेर त्या कंपनीची कृष्णकृत्ये मेसन उघड करतो. एका क्षुल्लक गोष्टीच्या आधारे मेसन खुनाचा छडा लावतो, एका निरपराध व्यक्तीला त्या खुनाच्या आरोपातून सोडवतो आणि त्या जखमी असहाय महिलेला घसघशीत नुकसानभरपाई मिळवून देतो. मेसनचा हा सारा यशस्वी शोधप्रवास वाचकाला गुंग करून सोडणारा आहे. डॅन ब्राऊन, ली चाइल्ड, फ्रेडरिक फॉर्सिथ, विल्बर स्मिथ यांसारख्या लेखकांच्या कादंबऱ्या अनुवादित करणाऱ्या बाळ भागवत यांनी गार्डनरची ही कादंबरी अनुवादित करून पेरी मेसनच्या सृष्टीचा परिचय करून घेण्याची संधी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. ...Read more

  • Rating Starकिरण माने

    वाचनीय अस काही

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more