* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AN INSURANCE CLAIM AFTER A TRAFFIC ACCIDENT ALERTS PERRY MASON TO THE POSSIBILITY OF DOUBLE-DEALING CONCERNING A PARCEL OF LAND. HE NEGOTIATES A VERY LARGE SETTLEMENT FOR HIS CLIENT, BUT THEN A WEALTHY BUSINESSMAN IS FOUND DEAD ON HIS YACHT AND PERRY IS ASKED TO DEFEND AGAINST A CHARGE OF MURDER THE MAN WHO PAID THE MONEY TO SETTLE THE INSURANCE CLAIM. BEAUTIFULLY PRESENTED WITH STRIKING ARTWORK AND STYLISH YET EASY-TO-READ TYPE, AVID READERS OF CRIME WILL LOVE READING THIS GRIPPING, WELL-WRITTEN THRILLER.
रस्त्यावर एक अपघात घडतो. हा अपघात दाबून टाकण्याच्या प्रयत्नांत एक खून उघडकीस येतो. स्किनर हिल्स काराकुल या मेंढ्यांपासून फर बनविणाऱ्या कंपनीचा मालक फ्रेड मिलफिल्ड याचा खून होतो. संशयाची सुई त्याची पत्नी डाफनेबरोबरच त्याचा पार्टनर रॉजर बरबॅन्क यांच्याभोवती फिरू लागते. कारण रॉजर बरबॅन्कच्या बोटीवरच फ्रेड मिलफिल्डचे प्रेत सापडते. रॉजर बरबॅन्कची मुलगी कॅरोड आपल्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते. चतुर पेरी मेसन आणि त्याची धाडसी सेक्रेटरी डेला स्ट्रीट केसच्या मुळाशी पोहोचतात. छोटे-छोटे धागेदोरे मिळवत असतानाच एक थोडीशी कललेली मेणबत्ती केसला कशी योग्य दिशा दाखवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. वेगवान कथानक, अचानक आलेली वळणे व शेवटपर्यंत ताणलेली उत्सुकता यामुळे कादंबरी मनोरंजक झाली आहे. खुनाचे रहस्य आणि प्रेमकथा अशा या कथेचा शेवट वाचकांना नक्कीच आश्चर्यचकित करेल यात शंका नाही.

No Records Found
No Records Found
Keywords
#PERRYMASON#DETECTIVESTORIESINMARATHI# #PERRYMASON#DETECTIVESTORIESINMARATHI #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 15-04-2018

    झुकलेल्या मेणबत्तीची कथा... समुद्रात उभ्या असलेल्या एका शिडाच्या नौकेवर एक खून होतो. मेंढ्या चारण्यासाठी नि त्यांच्या लोकरीपासून महागडे कपडे बनवण्याचा व्यवसाय असणाऱ्या फ्रेड मिलफिल्ड नावाच्या माणसाचा खून होतो. मिलफिल्ड आणि त्याचा व्यावसायिक साथीदार ॅरी व्हॅन न्युई हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातल्या एका विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेत असतात. कशासाठी? तर मेंढ्या चारण्यासाठी. फौजदारी कायदा कोळून प्यालेला नामवंत वकील पेरी मेसन याच्याकडे हा खटला येतो. पहिल्या सलामीलाच मेसनच्या लक्षात येते की, मेंढ्या चारणे नि लोकरीचे उत्पादन करणे हे बहाणे आहेत. मग इतकी जमीन खरेदी कशासाठी? तर या भागात तेल मिळाले असावे. एकदा हे नक्की झाल्यावर खुनाचा उद्देश स्पष्ट होतो. पण खून केला कुणी? मेसनला खुनाच्या ठिकाणी जवळपास नव्वद अंश झुकलेली. एक विझलेली मेणबत्ती दिसते. त्या बारीकशा धाग्यावरून, समुद्राच्या भरती-ओहोटीचे, नौकेच्या हेलकाव्यांचे आणि प्रेत इकडून तिकडे गडगडल्यामुळे, खालच्या गालिच्यावर पडलेल्या रक्तांच्या डागांचे अफलातून गणित बांधून काढत मेसन खुन्यापर्यंत पोहोचतो. अर्ल स्टॅन्ले गार्डनर या जगप्रसिद्ध अमेरिकन डिटेक्टिव्ह कथा लेखकाच्या ‘द केस ऑफ द क्रुकेड कॅण्डल’ या पेरी मेसन कथेचा प्रस्तुत अनुवाद बाळ भागवत यांनी त्याच नावाने मराठीत आणला आहे. सर आर्थर कॉनन डॉयलचा कथानायक जसा शेरलॉक होम्स. अ‍ॅगाथा खिस्तीचा कथानायक जसा हरक्यूल पायरो, तसा अर्ल स्टॅन्ले गार्डनरचा हा कथानायक पेरी मेसन, शेरलॉक होम्स आणि हरक्यूल पायरो हे व्यवसायाने डिटेक्टिव्हच आहेत. पेरी मेसन हा कॅलिफोर्नियातला नामवंत वकील आहे. अमेरिकन फौजदारी कायदा त्याने कोळून प्यालेला आहे. पॉल ड्रेक या आपल्या व्यावसायिक डिटेक्टिव्ह मित्राकरवी तो एखाद्या प्रकरणाचा गुप्त तपास करतोच; पण डेला स्ट्रीट या आपल्या चिटणीस तरुणीसोबत तो स्वत:ही गुप्त तपासावर निघत असतो. अवघड प्रकरणात उडी घ्यायची त्याला फार आवड असते. दैव धारिष्टास धार्जिणे. या म्हणीनुसार त्याच्या धाडसाला हमखास यश मिळतेच. गार्डनर हा स्वत:च नामवंत वकील होता. वकिली पेशातल्या आपल्या अनुभवांवर आधारित कथालेखनाला त्याने १९२३ साली सुरुवात केली. लेस्टर लीथ, केन कॉर्निंग आणि अखेर पेरी मेसन या त्याच्या कथानायकांनी अमेरिकन वाचक वेडा झाला. अमेरिकेच्या ‘बेस्ट सेलिंग ऑथर्स लिस्ट’मध्ये गार्डनर वर्षांनुवर्षे जणू मुक्काम ठोकून होता. गार्डनर १९७० साली वारला. प्रस्तुत कथा मुळात १९४४ सालीची आहे, पण संगणकाच्या वेगवान काळातली ती वाचनीय, पकडून ठेवणारी आहे. हे गार्डनरच्या कथाबांधणीचे वैशिष्ट्य. -मल्हार गोखले ...Read more

  • Rating Starदैनिक लोकसत्ता लोकरंग - ११ फेब्रुवारी २०१८

    अमेरिकी इंग्रजी रहस्यकथा वाचणाऱ्यांमध्ये ‘पेरी मेसन’ हे पात्र परिचयाचे असेलच. अर्ल स्टॅन्ले गार्डनर या कादंबरीकाराने एक निष्णात फौजदारी वकील म्हणून रंगवलेले हे पात्र. गार्डनरने इतर विविध प्रकारचे लेखन केलेले असले, विशेषत: त्याने उत्तम प्रवासवर्णने लिली असली, तरी तो मुख्यत: ओळखला जातो ते पेरी मेसन मालिकेतील कादंबऱ्यांसाठीच. १९३० च्या दशकात गार्डनरने उदयास आणलेले पेरी मेसन हे पात्र मेसन मालिकेतील रहस्यमय कादंबऱ्या आणि त्यांवरील सिनेमांमुळे एके काळी अमेरिकी वाचक-प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. याच मेसन मालिकेतील ‘द केस ऑफ द क्रुकेड कँडल’ ही बाळ भागवत यांनी अनुवादित केलेली कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकतीच प्रकाशित केली आहे. निष्णात वकील असलेल्या पेरी मेसनची गुन्ह्य़ाचा शोध घेण्याची त्याची अशी खास शैली आहे. एका गुन्ह्य़ाबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्याशी निगडित दुसऱ्या मोठय़ा गुन्ह्य़ाचे धागे उसवत गुन्हेगारी प्रवृत्तींना कायद्याद्वारे शिक्षेपर्यंत पोहोचवणे ही मेसनची शोधशैली. ‘द केस ऑफ द क्रुकेड कँडल’ ही रहस्यमय चातुर्यकथाही मेसनच्या या शोधशैलीचा प्रत्यय देणारी आहे. या कादंबरीची सुरुवात होते ती एका गृहस्थाच्या गाऱ्हाण्याने. मेसनच्या कार्यालयात सकाळीच एक गृहस्थ आलेला असतो. ट्रकने दिलेल्या धडकेत या गृहस्थाच्या गाडीचे नुकसान झालेले असते. गाडीला धडकलेला ट्रकचालक पळून गेला असला तरी त्याच्या ट्रकवरील काही नोंदी या गृहस्थाने ध्यानात ठेवलेल्या असतात. तो त्या मेसनला सांगतो. मेसन तो ट्रक कोणत्या कंपनीचा आहे हे शोधणार तोच त्याला त्या कंपनीच्या वकिलाकडून फोन येतो. तो वकील हे प्रकरण मिटविण्यासाठी मेसनकडे आलेल्या गृहस्थाला चांगला मोबदला देण्याची तयारी दाखवतो. त्याने सांगितलेली रक्कम मेसन नाकारतो आणि वाढीव रकमेची मागणी करतो. मेसनची मागणी नाकारली जाईल असे वाटत असतानाच कंपनी ती मागणी स्वीकारते आणि तितक्या रकमेचा धनादेश त्या गृहस्थाला देते. कंपनीच्या या तत्परतेमुळे मेसनला यात काही काळेबेरे असल्याचा संशय येतो आणि तो त्या कंपनीचे काम नेमके काय सुरू आहे, कुठे सुरू आहे हे तपासण्यास सुरुवात करतो. नेमके त्याच वेळी मेसनला कळते, की एका असहाय अपघातग्रस्त महिलेला त्याच्या मदतीची गरज आहे. तिला झालेला अपघातही याच कंपनीतील एका व्यक्तीकडून झालेला असतो. त्याचीही भरपाई मिळवायची असे मेसन ठरवतो. त्याच वेळी मेसनचा साहाय्यक आणि खासगी गुप्तहेर पॉल ड्रेक त्याला येऊन भेटतो. ड्रेक मेसनला त्या कंपनीच्या विविध काळ्या कारवायांबद्दल सूचक माहिती देतो. इथून मेसनच्या डोक्यातील विचारचक्र चालू लागते. मेसन त्या कंपनीच्या सर्व भागीदारांची माहिती काढू लागतो. त्यातील एक भागीदार गायब झाला असल्याचे त्याला कळते. हा भागीदार नेमका कुठे गायब झाला आहे, याचा तपास करताना मेसन दुसऱ्याच एका भानगडीत सापडतो. सुरुवातीला झालेला अपघात हा मामुली वाटावा असा वेगळाच प्रकार या कंपनीतील रहस्यमयरीत्या गायब झालेल्या भागीदाराच्या बाबतीत घडलेला असतो. विदेशामध्ये खासगी बोटी घेऊन खासगी तलावांमध्ये सुट्टीच्या दिवशी मासेमारी करण्याचा छंद अनेक जण जोपासतात. मोठय़ा कंपन्यांतील बडी मंडळी हमखास आपले काही खासगी व्यवहार अशा वेळी या बोटींवर करीत असतात. मेसन शोधत असलेल्या कंपनीचा गायब झालेला भागीदारही असाच व्यवहार करायला गेलेला असताना त्याची हत्या झालेली असते. या खुनाचा आळ ज्या व्यक्तीवर आलेला असतो, त्याची मुलगी आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी वेगळे पुरावे उभी करू लागते. मात्र असे करताना त्या शहरातील काही मान्यवरही त्यात अडकण्याची शक्यता निर्माण होतेच, पण तिच्या वडिलांबाबतही संशय निर्माण होतो. आपले वडील निरपराध आहेत, हे दाखविण्यासाठीचा तिचा आटापिटा आणखी गुंता वाढवत जातो. मात्र अखेर त्या कंपनीची कृष्णकृत्ये मेसन उघड करतो. एका क्षुल्लक गोष्टीच्या आधारे मेसन खुनाचा छडा लावतो, एका निरपराध व्यक्तीला त्या खुनाच्या आरोपातून सोडवतो आणि त्या जखमी असहाय महिलेला घसघशीत नुकसानभरपाई मिळवून देतो. मेसनचा हा सारा यशस्वी शोधप्रवास वाचकाला गुंग करून सोडणारा आहे. डॅन ब्राऊन, ली चाइल्ड, फ्रेडरिक फॉर्सिथ, विल्बर स्मिथ यांसारख्या लेखकांच्या कादंबऱ्या अनुवादित करणाऱ्या बाळ भागवत यांनी गार्डनरची ही कादंबरी अनुवादित करून पेरी मेसनच्या सृष्टीचा परिचय करून घेण्याची संधी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. ...Read more

  • Rating Starकिरण माने

    वाचनीय अस काही

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more