- Nilesh Malvankar
प्रसिद्ध लेखिका मोहना जोगळेकर यांचा रिक्त हा मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला कथासंग्रह वाचनात आला.
बऱ्याच काळाने दर्जेदार कथा वाचल्याचं समाधान मिळालं.
या कथांमधून मानवी स्वभावाचे विविध कंगोरे समर्थपणे उलगडून दाखवले आहेत. मानवी मनाच्या भावभावनांचं बारकाईने केलेलं चित्रण या कथांमधून जाणवतं.
विक्षिप्त स्वभावाच्या माणसांमुळे त्यांच्या जवळच्यांना सोसावे लागणारे त्रास.
पालकांच्या अमेरिका-भारत-अमेरिका अशा स्थलांतरामुळे मुलांना स्थिरावण्यात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव.
हुशार पण शिकायची इच्छा असूनही परिस्थितीमुळे हतबल झालेला अमर
दोन मुलींचा स्वतःबद्दलचा शोध आणि त्याचे त्यांच्या कुटुंबावर होणारे परिणाम
समाजसेवेच्या क्षेत्रात आलेले काही अनुभव आणि त्याचा एका तरुणीच्या आयुष्यावर होणार परिणाम.
परदेशातून बऱ्याच वर्षांनी भारतात आल्यावर गावी ओळखीच्या खुणा शोधणारी स्त्री.
एका चुकीमुळे आयुष्यभराची होणारी फरफट
संशयी नवऱ्यामुळे द्विधा मनस्थितीत असणारी स्त्री.
काही काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा होण्याला अर्थ असतो हे सांगणारी कमुताईची कथा.
आईवडिलांच्या संबंधांचं पुढे मुलीच्या आयुष्यावर पडणारी छाया.
प्रेमविवाहामुळे माहेरच्यांनी संबंध तोडले, तरी जिद्दीने स्वतःच्या हिंमतीवर संसार समर्थपणे निभावून नेणारी स्त्री.
परक्यांच्या मुलासाठी झटणारी तरुणी. अनोरेक्सीयाशी झगडणारी युवती
अशा विविध विषयांवरील कथा या संग्रहात आहेत. बरेचसे विषय मराठीत कदाचित पहिल्यांदाच हाताळले गेलेले आहेत. हे विषयांचं नावीन्य तसेच त्या विषयांचा खोल अभ्यास कथेतून जाणवतो. एवढं असूनही कथा प्रवाही आहेत. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यात कथा यशस्वी ठरतात.
हा कथासंग्रह किंडलवरदेखील उपलब्ध आहे.
या पूर्वी मोहना जोगळेकर यांचा `मेल्टिंग पॉट` हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता आणि त्याला कोमसापचं पारितोषिक मिळालेलं आहे.
माहेर, श्री व सौ, अनुराधा, प्रसाद, रोहिणी, साप्ताहिक सकाळ, मायबोली, BMM वृत्त तसेच अमेरिकेतील विविध दिवाळी अंकांमध्ये मोहना जोगळेकर यांच्या कथा प्रकाशित होत असतात. त्या व्यतिरिक्त लोकसत्ता, रत्नागिरी टाइम्स, प्रहार, सकाळ अशा वर्तमानपत्रांमधूनही त्यांनी लेख आणि सदरलेखन केलं आहे.
लेखिकेस पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!
- संवेदनशील, प्रवाही आणि वाचनीय कथा
प्रसिद्ध लेखिका मोहना जोगळेकर यांचा रिक्त हा मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला कथासंग्रह वाचनात आला.
बऱ्याच काळाने दर्जेदार कथा वाचल्याचं समाधान मिळालं.
या कथांमधून मानवी स्वभावाचे विविध कंगोरे समर्थपणे उलगडून दाखवले आहेत. मानवी मनाच्या भावभावनांचं बारकाईने केलेलं चित्रण या कथांमधून जाणवतं.
विक्षिप्त स्वभावाच्या माणसांमुळे त्यांच्या जवळच्यांना सोसावे लागणारे त्रास.
पालकांच्या अमेरिका-भारत-अमेरिका अशा स्थलांतरामुळे मुलांना स्थिरावण्यात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव.
हुशार पण शिकायची इच्छा असूनही परिस्थितीमुळे हतबल झालेला अमर
दोन मुलींचा स्वतःबद्दलचा शोध आणि त्याचे त्यांच्या कुटुंबावर होणारे परिणाम
समाजसेवेच्या क्षेत्रात आलेले काही अनुभव आणि त्याचा एका तरुणीच्या आयुष्यावर होणार परिणाम.
परदेशातून बऱ्याच वर्षांनी भारतात आल्यावर गावी ओळखीच्या खुणा शोधणारी स्त्री.
एका चुकीमुळे आयुष्यभराची होणारी फरफट
संशयी नवऱ्यामुळे द्विधा मनस्थितीत असणारी स्त्री.
काही काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा होण्याला अर्थ असतो हे सांगणारी कमुताईची कथा.
आईवडिलांच्या संबंधांचं पुढे मुलीच्या आयुष्यावर पडणारी छाया.
प्रेमविवाहामुळे माहेरच्यांनी संबंध तोडले, तरी जिद्दीने स्वतःच्या हिंमतीवर संसार समर्थपणे निभावून नेणारी स्त्री.
परक्यांच्या मुलासाठी झटणारी तरुणी. अनोरेक्सीयाशी झगडणारी युवती
अशा विविध विषयांवरील कथा या संग्रहात आहेत. बरेचसे विषय मराठीत कदाचित पहिल्यांदाच हाताळले गेलेले आहेत. हे विषयांचं नावीन्य तसेच त्या विषयांचा खोल अभ्यास कथेतून जाणवतो. एवढं असूनही कथा प्रवाही आहेत. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यात कथा यशस्वी ठरतात.
हा कथासंग्रह किंडलवरदेखील उपलब्ध आहे.
या पूर्वी मोहना जोगळेकर यांचा `मेल्टिंग पॉट` हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता आणि त्याला कोमसापचं पारितोषिक मिळालेलं आहे.
माहेर, श्री व सौ, अनुराधा, प्रसाद, रोहिणी, साप्ताहिक सकाळ, मायबोली, BMW वृत्त तसेच अमेरिकेतील या विविध दिवाळी अंकांमध्ये मोहना जोगळेकर यांच्या कथा प्रकाशित होत असतात. त्या व्यतिरिक्त लोकसत्ता, रत्नागिरी टाइम्स, प्रहार, सकाळ अशा वर्तमानपत्रांमधूनही त्यांनी लेख आणि सदरलेखन केलं आहे.
लेखिकेस पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!
- - संजय वैशंपायन, 21/1/2020
आशयाने परिपूर्ण रिक्त कथासंग्रह
भारतातून अमेरिकेत स्थायिक होऊन पुढची पिढी हाताशी आणि तरी भारतीयत्वाची नाळ तुटत नाही हेच खरं आणि अशाच प्रकारच्या भावना व विचार मूळच्या रत्नागिरीकर मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, यांनी त्यांच्या स्वतंत्रपणे प्रकाशित झालेल्या ‘रिक्त` या कथासंग्रहामधील कथांमधून मांडल्या आहेत.
लेखिकेचा ‘मेल्टिंग पॉ` हा पहिला कथासंग्रह. त्याची फार मोठी चर्चा झाली होती. कोमसापचा लेखिकेचा पुरस्कारही या पुस्तकाच्या मध्यमातील सृजनासाठी लेखिकेला प्राप्त झाला आहे. यामुळे ‘रिक्त` या संग्रहातून मोठ्या अपेक्षा होत्याच आणि त्या पूर्ण होतात, असंच म्हणावं लागेल. मुखपृष्ठ पाहताच यामधील कथा नव्या युगाच्या, नव्या धाटणीच्या असणार असंच वाटतं.
‘रिक्त` कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि त्यामुळेच दीर्घ काळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतील घटनांबद्दल स्वत:चा दृष्टीकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनानंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातिभेद करायचा नाही, या निश्चयाने वेगळं पाऊल उचलणारी तरुणी, आई-वडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्विधा मन:स्थिती, अनाथ मुलासाठी एका तरुणीने उचललेलं अनोखं पाऊल, घरातील ‘फूकट` गेलेला मुलगा, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखांचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रापात्रांतून डोकावत राहतं. सारीच पात्रं वाचकाला अलगद त्या त्या काळात नेऊन सोडतात, कथेतील काळाशी, वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो.
‘रिक्त` कथासंग्रहातील प्रत्येक कथा ‘पुढे काय’ ही उत्कंठा वाढवणारी आणि पुढील कथेबद्दल उत्सुकता ताणणारी आहे; पण पहिल्याच ‘पाश’ या कथेमध्ये निखळ कोकणातील धोपेश्वरमधील कुटुंबाची घरातील सदस्यांमुळे झालेली परवड आणि नंतर ते रक्ताच्या नात्यांचे पाश तुटताना व तोडताना झालेली तडफड फार उत्कटपणे मांडली आहे.
हा कथासंग्रह १३ भरगच्च कथांचा आहे. यामुळे सर्वच कथांबद्दल स्वतंत्रपणे लिहिणे शक्य होणार नाही; परंतु त्यातील उल्लेखनीय ‘अमरचा दिवस’ टिपिकल झोपडपट्टीतील वातावरणात वाढणार्या मुलांची घुसमट, प्रगतीची आस अन् परीस्थितीचा तणाव ही संपूर्ण मध्यमवर्गीय वाचकाला अनभिज्ञ परिस्थिती मांडण्यात व त्यातील काळीज पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती अत्यंत प्रखर तीव्रतेने शब्दबद्ध करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. मोगरेबार्इंच्या रूपाने सुशेगात मध्यमवर्गीय स्थिती आणि सुटू न शकणार्या परिस्थितीच्या प्रश्नांची उकल शोधणार्या मंगलातार्इंच्या भांबावलेपणाची मांडणी सुरेखच साधली आहे.
‘संभ्रम’चा कथाविषय, खरंतर लेखिकेचं प्रोफाईल पाहिलं तर अनवट वाटणारा. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मानवी गिनीपिग्ज उपलब्ध करून देण्याचा वेगळा व्यापार, त्यातील प्रश्न आणि सज्जन मनाला पडणारे प्रश्न फार धाडसाने मांडण्यात आले आहेत. कथा जरी मीना- चेतनची असली तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणात माणसांचा प्रयोग म्हणून वापर करण्याच्या प्रवृत्तीचा फायदा घेणाNयांचा उद्योग कथापटावर मांडण्यात आला आहे.
‘समाधान’ ही कथा ५५ ते ७० या कालखंडातील असल्याचे निश्चितपणे वाटते. अशा पाश्र्वभूमीवर कमू, गीताई, आबा या व्यक्तिरेखा थोडक्या लेखनात अतिशय समर्थपणे लेखिका उभ्या करते. वर्षाला बावन्न चित्रपट सावत्र मुलीला दाखवणारी गीताई आणि सावत्र मुलीची आत्या सुधा यांचे नातेसंबंध, त्यांची अपरिहार्यता उभी करण्याचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे.
भरगच्च आशयमूल्य असणार्या १३ कथा समाविष्ट असणार्या या कथासंग्रहाचं नाव ‘रिक्त’ का, याचं उत्तर या संग्रहातील शेवटची कथा ‘रिक्त’ हे आहे. वयात येणार्या अमिताकडे सगळ कुटुंब लक्ष देत असूनही शाळेतील मुलांचं चिडवणं मनाला लागतं आणि मनोरुग्ण व्हावं अशा परिसीमेने अमिता अन्न उलटून टाकणं, अवाजवी एरोबिक्स करते. युरोपात राहण्याचे भारतीयांवर होणारे मानसिक परिणाम बारीक बारीक कंगोर्यासह समर्थपणे मांडणारी कथा म्हणजे ‘रिक्त.’
खरंतर संग्रहातील सर्वच कथा परिपूर्ण आहेत; परंतु लेखिकेच्या मते यातील परमोच्च कथा ‘रिक्त’ असावी आणि त्यामुळेच संग्रहाला ‘रिक्त’ नाव दिलं असावं.
मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक अतिशय व्यावसायिक पद्धतीने प्रकाशित केलं आहे. सुरेख मुखपृष्ठ, छान टाईप व कागद देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचा वापरल्याने वाचताना बरं वाटतं. लेखिकेच्या निरीक्षणाचा, स्मरणाचा आणि सगळा एकत्रित परिणाम देणारं लिखाण फार आश्वासक आणि साहित्य जगात उज्ज्वल भवितव्य निश्चित करणारं आहे. खरंतर संग्रहातीलच एखाद्या कथेचं नाव संपूर्ण कथासंग्रहाला देण्याऐवजी स्वतंत्र ओळख ठरावी, असं नाव देणं गरजेचं वाटतं आणि बर्याच कथा या छोटी कादंबरी होण्याच्या जवळपास असल्याने भविष्यात लेखिकेने आपल्या शैलीमधील कादंबरी लेखनाचा टप्पा गाठावा, असं वाटणं साहजिकच! एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत!
- DAINIK LOKMAT 26-08-2018
उत्कंठावर्धक कथासंग्रह...
मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांचा ‘रिक्त’ हा कथासंग्रह नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतील घटनांबद्दल स्वत:चा दृष्टिकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनांनंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातीभेद करायचा नाही या निश्चयाने वेगळे पाऊल उचलणारी तरुणी, आईवडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्बिधा मन:स्थिती, अन्याय मुलांसाठी एका तरुणीने उचललेलं एक अनोखं पाऊल, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखाचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रांमधून डोकावत राहतं. या सगळ्या कथांतील वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी.
- सकाळ १९.०८.१८
मोहना प्रभुदेसाई - जोगळेकर यांनी लिहिलेल्या या कथा. आई वडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनांवर असताना लग्न केलेली युवती, स्वतःची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळं त्यांच्या घरात उठलेलं वादळ, अनाथ मुलासाठी एका तरुणीनं उचलेले पाऊल अशा अनेक गोष्टी घेऊन येणाऱ्या या कथा. लेखिकेचं अचूक निरीक्षण योग्य पात्रयोजना यांमुळं त्या वाचकाला त्या त्या काळात नेऊन सोडतात आणि वाचक व्यक्तिरेखांशी, वातावरणाशी नकळत एकरूप होऊन जातो.