* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171616770
  • Edition : 5
  • Publishing Year : 1953
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : PLAY
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COMPILATION OF IMPORTANT AND FAMOUS DIALOGUES FROM THE TOPMOST DRAMAS WRITTEN BY EMINENT PERSONALITIES, RIGHT FROM ANNASAHEB KIRLOSKAR TO V. V. SHIRWADKAR. IT HELPS US TO UNDERSTAND THE PROGRESS OF MARATHI THEATER IN A BETTER WAY. TODAY, WE ALL MISS THE IMPORTANT THEATER TRIO; THE ACTOR, THE PLAY-WRITER AND THE THEATERS. TILL THE SCENARIO CHANGES TO BETTER, WE NEED TO SURVIVE ON THE PAST MEMORIES OF THEATER AND DRAMAS. THIS BOOK ALLOWS THE READERS TO TRAVEL THROUGH THE BYGONE RICH ERA OF MARATHI THEATER. IT WILL SURELY INITIATE AN INTEREST TO FURTHER STUDY THE DRAMAS IN DETAIL
कै. अण्णासाहेब किर्लोस्कर ते वि. वा. शिरवाडकर अशा दहा महत्त्वाच्या नाटककारांच्या गाजलेल्या नाटकांतील निवडक वेच्यांचा श्री. वि. स. खांडेकरांनी संपादित केलेला हा संग्रह आहे. मराठी नाट्यलेखनाचा कसकसा विकास होत गेला, त्याचा अस्पष्ट आलेख या वेच्यांतून सूचित होतो. आज नट, नाटककार आणि नाट्यगृहे या नाट्यकलेच्या वैभवाला आवश्यक असलेल्या तिन्ही घटकांचे एक प्रकारचे दुर्भिक्ष जाणवत आहे. ही प्रतिकूल परिस्थिती पालटेपर्यंत मराठी रंगभूमीला जुन्या वैभवावरच जगले पाहिजे. `रंगदेवता` या ग्रंथात वाचकांना या वैभवाचे, अंशत: का होईना, दर्शन घडेल आणि या वैभवाला कारणीभूत झालेल्या निवडक नाट्यकृतींच्या समग्र अभ्यासाला ते प्रवृत्त होतील. रंगदेवता
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #रंगदेवता
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT MUMBAI 16-08-1998

    ज्येष्ठ नाटककाराची नाटयशैली… कादंबरीकार म्हणून अधिक प्रसिद्ध असलेले वि. स. खांडेकर समीक्षक म्हणूनही तितकेच गण्य आहेत. अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा त्यांचा अभ्यास सुपरिचित आहे. त्यातून जशी त्यांची अभ्यासक वृत्ती दिसते, त्याचप्रमाणे त्यांनी संादित केलेला ‘रंगदेवता’ हा नाट्यवेच यांचा संग्रह त्यांच्यातील समिक्षकाची साक्ष पटवतो. ‘रंगदेवता’मध्ये किर्लोस्कर ते शिरवाडकर अशा दहा महत्त्वाच्या नाटककारांच्या गाजलेल्या नाटकांतील निवडक वेचे आहेत. किर्लोस्करांचे ‘सौंभद्र’, वा. बा. केळकरांचे ‘त्राटिका’, देवलांचे ‘शारदा’, कोल्हटकरांचे ‘मूकनायक’, खाडिलकरांचे ‘सत्वपरीक्षा’, गडकऱ्यांचे ‘राजसंन्यास’, वरेरकरांचे ‘भूमिकन्या’, ‘सीता’, अत्र्यांचे ‘कवडीचुंबक’, कणेकरांचे ‘आर्शिवाद’, आणि शिरवाडकरांचे ‘दूरचे दिवे’ या नाटकांतील वेचे ‘रंगदेवता’ मध्ये आहेत. यातील प्रत्येक नाटकाने रंगभूमी गाजवलेली आहे. अर्वाचीन वाङ्मयाच्या इतिहासात या नाटककारांना आणि त्यांच्या या नाटकांना उच्च स्थान आहे. ‘मराठी नाट्यलेखनाचा कसकसा विकास होत गेला त्याचा अस्पष्ट आलेख’ म्हणून या संग्रहाचा उल्लेख प्रकाशक करतात. साहजिकच इथेही खांडेकरांमधला इतिहासाचा अभ्यासक लपलेला नाही. मूळ वेच्यांचा भाग सोडला, तर प्रस्तावना आणि प्रत्येक वेच्याचा परिचय एवढा भाग खांडेकरांचा आहे. त्यामुळे जितके महत्त्वपूर्ण वेचे आहेत तितकेच महत्त्वपूर्ण खांडेकरांची समिक्षाही आहे. प्रस्तावनेत खांडेकरांमधील इतिहासांच्या अभ्यासकाला अधिक वाव मिळाला आहे. १८८० ते १९५० या काळातील नाट्यक्षेत्रातील विकासाचा आढावा प्रस्तावनेत घेतला आहे. १८८०-९० या दशकात साहित्याच्या सर्वच क्षेत्रात विकास घडत होता. साहजिकच तो नाट्यक्षेत्रातही घडत होता; काव्य, नाट्य, कादंबरी वगैरे लोकप्रिय वाङ्मयप्रकारांचा एक प्रकारचा पुनर्जन्म झाला, असे खांडेकर म्हणतात. साहित्य क्षेत्रातील ‘या काळात या सर्व वाङ्मय प्रकारांची कात गळून पडली’ असे वर्णन केले तर चुकीचे होणार नाही.’ नाट्यक्षेत्रात क्रांती घडवण्याचे श्रेय किर्लोस्करांना जाते. किर्लोस्करांच्या ‘शाकुंतल’च्या रूपाने रंगभूमीवर नवे युग सुरू झाले. पौराणिक, ऐतिहासिक कथा भागांवर आधारित नाटकांच्या जमान्यात किर्लोस्करांनीही तोच मार्ग पत्करला. त्यांच्या संगीत नाटकांनी मराठी रसिकांची मने काबीज केली. ‘सौभद्र’ने किर्लोस्करांच्या प्रतिभेचे खरेखुरे दर्शन घडते, असे खांडेकर म्हणतात. विलक्षण लोकप्रियता मिळण्यासारखे अनेक गुण या नाटकात आहेत. संस्कृत सुखान्त नाटकांच्या प्रभावामुळे किर्लोस्करांनी सुभद्राहरणाची सुखान्त प्रेमकथा ‘सौभद्र’साठी निवडली. आपल्या रसाळ प्रतिभेच्या जोरावर त्यांनी त्या कथेचा कुशलतेने विकास केला. ‘महाभारतातल्या मूळ कथेत नसलेला, पण हरिदासी कथांतून पिढ्या-न्-पिढ्या आलेला अर्जुनाच्या संन्यासंग्रहणाचा भाग नाट्यदृष्ट्या अत्यंत रसाळ व रंजक होईल, हे नाटककाराने ओळखले आणि कथेच्या विकासाला आणि विलासाला त्याचा उपयोग करून घेतला.’ याच भागाचे चित्रण ‘त्रिदंडी संन्यास’ या वेच्यात होते. प्रसंगनिष्ठ व स्वभावनिष्ठ विनोदनिर्मिती हे या प्रवेशाचे प्रमुख अंग आहे, या वेच्यात येणारे नणंदा-भावजयांचे संवाद सामान्याच्या घरातले वाटतात, त्यामुळे प्रेक्षक नाटकाशी समरस होतात, असे खांडेकर म्हणतात. मराठी नाटकांवर संस्कृतप्रमाणेच इंग्रजीमधील नाटकांचाही प्रभाव होता, त्यामुळे इंग्रजी नाटकांचे भाषांतर व रूपांतरेही मराठीत मोठ्या प्रमाणावर झाली. वासुदेव बळवंत केळकर यांनी शेक्सपिअरच्या ‘टेमिंग ऑफ द श्रू’ ‘त्राटिका’ हे रूपांतर केले. या नाटकाचे मूळ पाश्चात्य आहे. याचा विसर पडायला लावणारी खुसखुशीत भाषा आणि अस्सल देशी रूप यामुळे केळकरांची कौशल्य स्पष्ट होते. ‘त्रिदंडी संन्यास’ प्रमाणेच ‘त्राटिका’ आणि ‘प्रतापराव’ हा वेचाही विनोदप्रधान आहे. त्राटिकेला वठणीवर आणण्यासाठी प्रतापरावाने केलेल्या क्ऌप्त्यांमधून ही विनोदनिर्मिती होते. या वेच्यातून विनोदाचे ‘तरल नर्तन’ दिसते, असे खांडेकर म्हणतात. किर्लोस्करांचे शिष्य गोविंद बल्लाळ देवल यांना खांडेकर त्या काळातले ‘मूर्धाभिषिक्त नाटककार’ म्हणतात. ‘शारदा’सारख्या नाटकाने त्यांनी सर्वस्वी स्वतंत्र विषयावरचे नाटक रंगभूमीवर आणले. गद्याइतकीच पद्याची रचनाही अर्थपूर्ण व रसाळ असणे हे देवलांच्या नाटकांचे वैशिष्ट्य ‘शारदा’मध्येही जाणवते. बालाजरठं विवाहाच्या समस्येवर आधारलेल्या या नाटकाने सामाजिक नाटकांचे युग सुरू झाले. ‘मराठी नाट्यकला समाजाभिमुख करण्याचे आणि ललितकृती लोकरंजनाबरोबर लोकशिक्षणाचेही कार्य साधू शकते. हे सिद्ध करण्याचे श्रेय ‘शारदा’ इतकेच दुसऱ्या कुठल्याही मराठी नाटकाला देता येणार नाही’, असे मत खांडेकर ठामपणे मांडतात. ‘गुडघ्याला बाशिंग बांधणारा म्हातारा’ या वेच्यात हास्यरस व करुणरस यांचे मिश्रण दिसते. मात्र दोन्ही रस एकमेकांना बांध न आणता साथ देतात, हे विशेष. इतर नऊ नाटकांविषयी विस्तृत निवेदन करणारे खांडेकर कोल्हटकरांबाबत मात्र मौन पाळतात. ‘कोल्हटकरांच्या संवादातले, विनोदातले आणि कल्पना चमत्कृतीतले बुद्धिचापल्य प्रेक्षकांना गुदगुल्या करते. पण ते त्यांची हृदये मात्र हलवू शकत नाही’ असे थोडक्यातच कोल्हटकरांबद्दल ते लिहितात. कोल्हटकरांच्या ‘मूकनायक’ मधील बहिरा प्रतिनायक हा वेचाही विनोदावर आधारित आहे. सुंदर, सूचक आणि विनोदी संवादांनीही हे नाटक भरलेले आहे. विक्रांतचे मुकेपण, केयूराचे बहिरेपण या दोन सोंगांमधून घडणारा विनोद आणि प्रतोदाने केयूराचे सोंग उघडकीस आणणे असा या वेच्यातील प्रसंग आहे. ‘शारदा’ इतकेच मराठी रंगभूमीला नवे वळण लावणारे नाटक म्हणून ‘मूकनायक’चा उल्लेख खांडेकर करतात. खाडिलकरांनी मराठी सुखान्तिकांची परंपरा झुगारून दिली. त्यांच्या व्यक्तित्त्वातील उग्रता, उत्कटता, उदात्तता, देशभक्ती, लोकजागृती हे विशेष त्यांच्या नाटकांतूनही जाणवतात. ‘सत्वपरीक्षा’ या पौराणिक नाटकातून घेतलेला ‘हे पोट फेकून दिले !’ हा वेचा खाडिलकरांचे तेजस्वी तत्त्वज्ञान आणि त्याची नाट्यपूर्ण व हृदयस्पर्शी मांडणी करण्याची त्यांची पद्धत एक चांगला नमुना आहे’, असे खांडेकर म्हणतात. हरिश्चंद्र, तारामती, रोहिदास यांच्या कथेची पाश्र्वभूमी लक्षात घेता या वेच्याची परिणमकारकता प्रत्ययाला येते. गडकऱ्यांची आपल्या नाटकात कोल्हटकरांचे वाङ्मयगुण आणि खाडिलकरांचे नाट्यगुण यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ‘राजसन्यास’ हे त्यांचे ऐकमेव ऐतिहासिक नाटक अपूर्ण राहिले. खांडेकर म्हणतात, ‘कलावंताच्या मृत्यूमुळे अपूर्ण स्थितीत राहिलेले डोंगरातले एखादे भव्य, सुंदर लेणे पाहावे, तसा भास ‘राजसंन्यास’ नाटक वाचताना होतो. ‘संभाजीच्या स्वैर पण तेजस्वी स्वभावरेखेवर ‘राजसंन्यास’ आधारलेले आहे. हिरोजी, साबाजी, येसूबाई आणि तुळशी यांच्या स्वभावाचे प्रभावी दर्शन या लहानशा वेच्यांतूनही घडवण्याचे गडकऱ्यांचे लेखणीचे सामर्थ्य जाणवल्या वाचून राहत नाही. वरेरकरांना खांडेकर ‘मराठी नाट्यसृष्टीचे शेलारमामा’ म्हणून संबोधतात. ते जितके कलावंत, तितकेच प्रचारक व समाजसुधारक. ज्या सामाजिक प्रश्नाविषयी जिव्हाळा होता. तोच त्यांच्या ‘भूमिकन्या सीता’ या पौराणिक नाटकाचा केंद्रबिंदू आहे. स्त्रीजातीवर होणारा अन्याय त्यांनी सीतेंच्या माध्यमातून मांडला आहे. सीतात्यागाच्या प्रसंगाला शंबूक आणि उर्मिला या दोन भूमिकांची जोड देऊन नाविन्य निर्माण केलेले आहे. ते ‘प्रभू रामचंद्रांचे अग्निदिव्य’ या वेच्यातून दिसते. उर्मिलाच्या स्वाभिमानी स्त्रीमनाचे प्रभावी चित्रण यात येते. काही गंभीर स्वरूपाच्या नाटकानंतर खांडेकर पुन्हा विनोदाकडे वळले आहेत. शेक्सपिअरइतकाच मोलिएर या फ्रेंच नाटककाराच्या नाटकांनीही मराठी नाटकावर प्रभाव पडला आहे. त्याच्याच ‘ला व्हार’ या नाटकाचे अत्र्यांनी ‘कवडीचुंबक’ हे रूपांतर केले. ‘पंपूशेठ पैठणकर’ या वेच्यातून अत्र्यांच्या प्रसन्न विनोदशैलीचे प्रतिबिंब दिसते. ‘कुलवधू’कार रांगणेकरांच्या ‘आर्शिवाद’मध्ये स्त्री प्रश्नांचेच कौटुंबिक पद्धतीने केलेले चित्रण आहे. ‘पितृऋण’च्या वेच्यात मध्यमवर्गीय स्त्रीपुढे पडलेला सामाजिक पेच सहानुभूतीने चितारला आहे. ‘रंगभूमीच्या पडत्या काळात रांगणेकरांनी तिची मोलाची सेवा केली,’ असे खांडेकर म्हणतात. शिरवाडकरांची कल्पक व तेजस्वी कवीवृत्ती त्यांच्या नाटकांमधूनही तितक्याच समर्थपणे जाणवते. ‘दूरचे दिवे’ या त्यांच्या नाटकाला ऑस्कर वाइल्डच्या ‘आयडियल हजबंड’चा आधार आहे. या नाटकात धर्म आणि व्यवहार यांच्या संघर्षाचे चित्रण आधुनिक काळाला अनुरूप अशा कथानकाद्वारे केलेले आहे. विश्रामचे आधुनिक तत्त्वज्ञान. ‘पूजा ! पण कुणाची ? या वेच्यातून व्यक्त होते. प्रत्येक वेच्याच्या परिचयामध्ये खांडेकरांनी कधी सविस्तर तर कधी संक्षिप्त नाट्यपरिचय दिला आहे. त्यातून त्यांच्यातला समिक्षक प्रभावीपणे जाणवतो. विनोद, कारुण्य, नाट्य, रसात्मक अशा विविध गुणांनी नटलेले नाट्यवेचे व अभ्यासपूर्ण समीक्षा यांचा हा संग्रह अर्वाचीन वाङ्मयाच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरतो, यात शंका नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more