* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661095
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 68
  • Language : MARATHI
  • Category : PLAY
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE BOND OF WEDLOCK IS LIKE THE WELDING THAT BINDS TWO PLATES OF STEEL TOGETHER. AS A RESULT, TWO BEINGS BECOME STRONGER. LIFE GOES ON RELENTLESSLY. IT DOES NOT PAUSE FOR ANYBODY. CHILDREN GROW UP. WE LOSE THE COMPANY OF OUR FRIENDS; WE EXPERIENCE TIMES OF HAPPINESS AS WELL AS SORROW. BUT THROUGH ALL THESE UPHEAVALS THE COUPLE IS ALWAYS WITH EACH OTHER, ENJOYING THE PLEASURES OF THIS BOND. IT IS HERE THAT WE CAN EXPERIENCE HEAVEN ON EARTH. WHEREVER THERE IS SUCH ONENESS, WEDDED LIFE REMAINS UNSCATHED DESPITE THE CONFLICTS OR UPHEAVALS IN THE WORLD AT LARGE, JUST LIKE THE PHOENIX THAT RISES FROM THE ASHES. IF YOU CAN ACQUIRE THIS STRENGTH, YOU CAN LET THE WORLD BE. YOU CAN SMILE AT CRITICISMS. AS LONG AS YOU ARE SURE THAT THERE IS SOMEONE FIRMLY BACKING YOU, THERE IS NO REASON TO FEAR ANYTHING, UNDERSTAND?
‘...ही लग्नगाठ दोन पोलादी पट्ट्यांना केलेल्या वेल्डिंगसारखी असते. ते दोन जीव अधिक सामथ्र्यवान बनतात, ते त्या वेल्डिंगमुळं. जीवन कुणासाठी थांबत नाही. ते पुढं जातच असतं. मुलंबाळं वाढतात. जुन्यांची सोबत हरवते. अनेक सुखदु:खाचे क्षण येतात. हे सारे बदल घडत असताना तुम्ही मात्र एकत्र असता. त्या एकत्रपणाचा आनंद उपभोगत असता. ख-या अर्थानं पृथ्वीवरचा स्वर्ग तिथंच अवतरतो. ती एकरूपता आली, की जगात हवे तेवढे उत्पात होऊ देत, संघर्ष वाढू देत, संसार अबाधितच राहतो. राखेतून जन्म घेणाया फिनिक्स पक्ष्यासारखा. ती ताकद तुम्ही मिळवलीत, की तुम्ही कुणालाही दुर्लक्षू शकता. निंदेला हसू शकता. जोवर तुमच्या पाठीशी कुणीतरी खंबीरपणे उभं आहे, याची खात्री असेल, तोवर कशालाही भिण्याची गरज नाही, कळलं?’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 08-09-2002

    वाचनीय नाटक... (कै) रणजित देसाई यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी हे २ अंकी, त्यांनी लिहिलेलं नाटक पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालं आहे. ‘सावली उन्हाची’ या नाटकाचं कथानक जगावेगळं आहे. रवी चित्रे हे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांना पिंकी नावाची सात-आठवर्षांची मुलगी आहे. पण तिची आई या अर्भकाचं तोंड न पाहताच प्रसूतीच्या वेळी गेलेली आहे. डॉ. चित्रेंची आई हृदयरोगाने आजारी. तिला दोन अ‍ॅटॅक येऊन गेलेले. आपल्या ‘ताई’नं सूनमुख बघावं व मुलाचा संसार सुरळीत चालू व्हावा म्हणून डॉ. चित्रे यांचे मामा प्रयत्न करून शुभदाशी त्याचं लग्न ठरवतात. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नाटकाच्या कथाबीजाची निर्मिती होते. शुभदा डॉ. रवीला आपल्या अंगाला स्पर्श करू देत नाही. तिचं लग्नापूर्वी सारंग भोसले तशा बेरोजगार असलेल्या तरुणावर प्रेम असतं. तिनं मनानं त्याला वरलेलं असतं. डॉ. रवी चित्रे मानसोपचार तज्ज्ञ असल्यानं तिच्या भावविश्वाचा आब ठेवून शुभदाला स्पर्श न करण्याचं वचन देतात. आईच्या आजारपणात आपण दोघे मात्र सुखी पती-पत्नी आहोत, हे नाटक वठवायचं असं रवी ठरवतो. शुभदा आईची-सासूची मनापासून सेवा करते. पिंकीचं व तिचं छान जमतं. एकटा पडलेला असतो तो रवी. आईचा महिन्यानंतर समाधानानं जीव जातो. रवीला वाटतं शुभदा सोडून जाणार. लहानपणापासून ज्यानं सांभाळलं, शिकवलं तो मामाही ताईच्या मृत्यूनंतर कोकणात जातो. एकाकी अवस्थेत कसं राहायचं... डॉ. चित्रे एक वेगळाच प्लॅन करतो. तोपर्यंत बी. सारंग नावाने चित्रपटसृष्टीत स्टोरीरायटर म्हणून खूप खूप प्रसिद्धी पावलेला पण त्यामुळेच दारू व मदिराक्षी यांच्या विळख्यात अहोरात्र गुरफटलेल्या या व्यक्तीला डॉ. भेटतात... स्वत:ला पिक्चर काढायचं म्हणून सांगतात. त्यामुळे पुढे सारंग त्याच्या घरी येतो. शुभदाची त्याची भेट होते. डॉक्टर शुभदा त्याला ‘द्यायला’ निघतात. सारंग भारतीय संस्कृतीचं तत्त्वज्ञान सांगतो... शेवटी हिमालयाएवढा उंच व गंगेसारखा पवित्र असा हा आपला जगावेगळा पती... त्याच्याशी शुभदाचं पत्नीचं नातं त्या रात्री निर्माण होतं. असं हे आनंदपर्यवसानी दोन अंकी नाटक. एक सुखात्मिका. आता वास्तवाशी अशा आदर्श डॉ. पतीचं व्यक्तिरेखाटन कितपत योग्य? शुभदाचं मनोमीलन जुळण्यासाठी सारंगला नियोजन करून घरी आणणं इत्यादी. अनेक प्रश्न तसे अनुत्तरित आहेत पण असंही घडू शकतं. नियमाला अपवाद म्हणून. सारंग शुभदा भेटीत सारंग आपल्या जीवनाला (स्वैराचारी व स्वच्छंदी) रांगोळीची उपमा देतो. पहिली रांगोळी पुसल्यावरच दुसऱ्या दिवशीची रांगोळी काढावी लागते. आता मी कुठेही न गुंतता फक्त रांगोळीच काढत राहिलो आहे... ही प्रतिमा अर्थपूर्ण आहे. मात्र सारंगच्या तोंडी भारतीय संस्कृतीवरचं भाष्य... ‘कोणताही पुरुष (कोणत्याही पंथाचा व धर्माचा) जेव्हा विवाह करतो तो आयुष्याशी अखंड सोबत म्हणून... माझा शुभदाशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही...’ प्रेक्षकांना त्याच्या आधीच्या स्वैर वर्तनाच्या पार्श्वभूमीवर पटणारं वाटत नाही. शेवटी डॉ. रवी चित्रे लग्नगाठ ही दोन पोलादी पट्ट्यांना केलेल्या वेल्डिंगसारखी असते असं म्हणतो आणि ‘उन्हाच्या सावलीत’ कुणाचा तरी भक्कम आधार असल्याशिवाय जगात कुणाला भिण्याची गरज नाही असं शुभदाला सांगतो... हे भाष्य नाटकाचं शीर्षक मार्मिकपण सिद्ध करतं. मात्र नाटकातील संघर्ष वेगळा असला तरी तो यथार्थ वाटत नाही. शुभदाचं वागणं हे तर्कापलीकडचं वाटतं. कदाचित म्हणूनही या नाटकाचे प्रयोग झाले नसतील. एका मानसोपचार तज्ज्ञाचीदेखील एक विचित्र मानसिक अवस्था कशी होते व त्यातून कोणत्या रीतीनं तो बाहेर पडतो हे वाचणं मनोज्ञ आहे हे निश्चित. संवाद, भाष्य, तत्त्वज्ञान इत्यादीमधील भाषा सहजसुंदर आहे. वाचनीय नाटक म्हणून ते मनाचा ठाव घेतं. -भावना भार्गवे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more