- Nilesh Shinde
लेखमाला - भाग पहिला
लेखकाविषयी :
माणूस नावीन्यपूर्ण कल्पनेने पछाडलेला आणि उत्साहाने भारलेला असेल तर तो मोठे यश मिळवू शकतो हयाचे उत्तम उदाहरण म्हणजे "डेल कार्नेगी"
त्यांचा जन्म वायव्य अमेरिकेतील मिसुरी येथे एका गरीब शेतकरी कुटुंबातला झाला.
एकेकाळी काऊबाँय असणारा मुलगा पुढे जाऊन मोठमोठ्या कंपन्यांच्या उच्चाधिकार्यांना व्यक्त कसे व्हावे हे शिकवणारा सर्वात जास्त फी आकारणारा प्रशिक्षक बनेल असे स्वप्नात सुद्धा कुणाला खरे नसते वाटले.
घरचे अठराविश्व दारिद्रय ,काबाडकष्ट आणि कर्जाचा वाढता डोंगर हया कशानेच नाउमेद न होता शिकत होता.
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्न करून त्याने वक्तृत्व कलेवर प्रभुत्व मिळवले.
शिक्षणांतर काही काळ विक्रेत्याचे काम करून काही काळ अभिनय केल्यानंतर त्याला लेखक होण्याचे वेध लागले.
दिवसभर पुस्तक वाचन लिखाण आणि रात्री प्रौढ शिक्षण वर्ग असा त्याचा दिनक्रम बनला.
त्यांचे पब्लिक स्पिकींग कोर्स अल्पावधीतच लोकप्रिय झाले
त्यांचे विद्यार्थी असलेले व्यवसायिक नोकरदार हयांना मित्रांवर छाप पाडायची, व्यवसाय नोकरीत तत्काळ वापरता येतील अशी व्यवहारी तंत्र जाणून घ्यायची होती
त्यानुसार त्यांनी व्यावहारिक शहाणपणाचा कोर्स बनवला ज्यात भाषण,विक्री, नातेसंबंध आणि हयासर्वामागचे मानसशास्त्र शिकवायचे त्यांनी ठरवले
हयातूनच पुढे ज्या पुस्तकाचा जन्म झाला ते म्हणजे
" मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा"
पुस्तकाविषयी :
हया पुस्तकातून लेखकाने लोकांना कसे हाताळावे जेणेकरुन ते तुमचे ऐकतील, तुमच्या विचारांशी सहमत होतील, तुमचे जिवलग बनतील.
लोकांवर छाप पडण्यासाठी लागणारी संवाद कौशल्य आणि पथ्ये सांगितली आहेत.
लोकांना प्रेमाने जिंकण्यासाठी वादविवाद कसे टाळावेत तसेच चांगले वागण्यासाठी आव्हान कसे द्यायचे तसेच प्रतिकूल परिस्थितीत संयम ढळू न देता बाजी कशी पलटवायची याची सूत्रे सांगितली आहोत तसेच लोकांना राग येऊ न देता टीका न करता त्यांच्यात बदल कसे घडवायचे
त्यांच्या चुका सह्रदयतेने कशा सुधारायच्या
हयाबाबत पुस्तकात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- Vaibhav Pathrudkar
संग्रही असावे असे सुंदर पुस्तक.
- Chandrashekhar Sakpal
वाचून पूर्ण......
thank you so much
- Dhanraj Bhandare April 8
डेल कार्नेगी यांनी लिहलेले - मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा हे पुस्तक नुकतेच वाचुन झाले त्या विषयी
हे एक कृतीशील असे पुस्तक असुन आपला भविष्यकाळ अधिक आणि अधिक आनंददायी व यशस्वी व्हायला हवा असे आपना सर्वानांच वाटते अश्या प्रत्येकांनी किमान एक वेळा तरी हे पुस्तक वाचायला हवे
किती तरी वेळा आपन सर्वत्र अनुभव घेत असतो रोजचे आयुष्य जगतेवेळी विनाकारण किती वाद होत असतात हे आपन पाहतो.
आपला मराठी माणूस तर मोडेल पन वाकणार नाही हीच वृत्ती ठेऊन वागत असतो (मोडल्यानंतर कोणतीही गोष्ट
पहिल्या सारखी होईल का ? ) शकतो एक घाव दोन तुकडे करण्यापेक्षा यात सुर्वणमध्ये नेहमीच वर्तमान व भविष्यासाठी फलदायी असतो.
आयुष्यातील किती तरी वादविवाद निव्वळ शब्दाने शब्द वाढल्याने होत असतात या कार्नेगी सरांनी या मध्ये अंत्यत सोप्या शब्दात हजारो उदाहरणे देऊन वाद विवाद कसे टाळता येतात हे यात सांगितले आहे
ते असे सांगतात कि व्यक्ती कितीही छोटा असु द्या आत्मसन्मान त्यांच्यात असतोच लोकांना स्वतः विषयी बोलणे आवडते या बाबत कार्नेगी सर म्हणतात की लोक तुमच्यात रूची घेत नाहीत ना ते माझ्यात घेतात ते अगदी तिन्ही त्रिकाळ फक्त स्वतः मध्ये रूची घेतात अगदी सकाळी दुपारी रात्री जेवणानंतर सुध्दा
एखाद्या माणसाला दुखःवल्याने त्यांच्या मनात रागाची भावना ईतकी तीव्र असते की मृत्यू नंतरही शोकाच्या ऐवजी त्याने केलेला अपमानच आठवतो यातुन प्रत्येकाने बोध घेतला पाहिजे की आपन कधी कधी आपल्या जीभेवरचा ताबा सुटल्याने व क्षणिक रागामुळे एखाद्याचे मन कायमचे दुरावेल अशी कृती कटाक्षाने टाळायला हवी
वादविवाद जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वादविवाद टाळा
नेहमीच इतरांच्या मनाचा आदर करा तुम्ही चुकला असे म्हणने शक्यतो टाळा
पुढच्या व्यक्तीचे नेहमी शांतपणे ऐकून घ्यायला हवे चांगल्या वक्ता होण्याचा आपन प्रयत्न करतो पन कधी आपणास चांगला श्रोता व्हायला पाहिजे हे कोणीही आपणास सांगत नाही ते यातुन समजते
कितीही नाजुक प्रसंगात मनावर ताबा असायला हवा आरडाओरडा केल्याने समस्या कधीच सुटणार नाही मात्र परिस्थिती आणखीण बिकट होईल असे कार्नेगी म्हणतात
आपली चुक आपन मान्य केली तर तुम्ही कधीच अडचणीत येऊ शकत नाही त्यामुळे सगळे वादविवाद मिटतात आणि तुमच्या विरोधकालासुध्दा न्याय बुध्दीने वागण्याची स्फुर्ती मिळते हे लक्षात असू द्यावे या बाबत त्यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत.
समोरच्याशी बोलताना आधी त्याचे कौतुक करा ज्याला नेतृत्व करायचे आहे त्याने ही हातोटी वापरायला हवी
एखाद्या कठीण प्रसंगात व्यक्ती ने कसे तोंड द्यायला हवे या बद्दल ते सांगतात की थिओडोर रूझवेल्ट यांच्या कारकिर्दीत एखाद्या बाबतीत कठीण प्रसंगात निर्णय घ्यायचा प्रसंग आला तर ते White House मधील लिंक न यांच्या तैलचित्रा कडे पाहुन स्वतःला असे विचारत असे जर माझ्या जागी लिंकन असते तर त्यांनी ही समस्या कशी सोडवली असती.
या पुस्तकातील एक उतारा जो मला खुप आवडला तो असा आहे
`आपन कसे असायला हवे व आपण काय आहोत अशी स्वतःशीच तुलना केली तर आपण अर्धजागृत आहोत अशी आपली खात्री पटते. आपण आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा फारच थोडा वापर करतो. अधिक सुस्पष्टपणे सांगायचे झाले,तर प्रत्येक माणुस स्वतःभोवती कुंपण घालून जगतो. त्याच्याकडे इतक्या अनेक प्रकारच्या अर्मयाद क्षमता असतात,पण त्याच्या सवयीमुळे त्यांचा वापर करण्यात तो अपयशी ठरतो.`
शेवटी एवढच सांगेन की हे पुस्तक वाचून आपन कसे वागायला हवे हे जरी नाही शिकलो तरी कसे वागू नये हे मात्र नक्की शिकतो!
- Atul Pahurkar
एक वाक्यात सांगायचं तर तोंडातून कोणाला ही negative बोलू नये हेच त्या पुस्तकात आहे..त्यानेच आपण लोकांची मन जिंकू शकतात..
अधिक डिटेल साठी बुक buy करावे..
- Satish Kagne
हे पुस्तक
खूप सुंदर आहे
2 वेळा वाचन झालं सुद्धा
- सुमित sonsare
I liket
- VYAPARI MITRA, FEB-2017
जगप्रसिद्ध लेखक डेल कार्नेगी यांनी लिहिलेले इंग्रजी भाषेतील पुस्तक "How to Win Friends and Influence People" याचा मराठी अनुवाद म्हणजेच वरील पुस्तक होय. या इंग्रजी पुस्तकाच्या ५० लाखांपेक्षा जास्त प्रती विक्री झाल्या आहेत. तसेच या पुस्तकाचा ५० हून अधिक भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झाला आहे व त्याच्या सर्व मिळून १० कोटी प्रती संपल्या आहेत. यावरूनच या पुस्तकाची महती लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
सगळ्यांशी गोड बोलणे, समोरच्याचे कौतुक करणे, अपराध पोटात घालणे ही या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे. आजच्या काळात आपला दृष्टिकोन बदलणे अत्यंत गरजेचे आहे. हा बदल स्वत:त घडवून आणणे हाच स्वत:ला चिरकाल आनंदी ठेवण्याचा हमखास यशस्वी मार्ग आहे.
पुस्तक एकूण चार भागात विभागले गेले आहे. भाग - १ मध्ये लोकांशी कसे वागावे याबद्दलची मूलभूत तंत्रे त्यामध्ये ३ प्रकरणे, भाग - २ - लोकांना तुमच्याशी सहमत करून घेण्याचे सहा मार्ग त्यामध्ये ६ प्रकरणे, भाग - ३ लोकांना जिंकून घेण्याचा मूलमंत्र यामध्ये १२ प्रकरणे आणि भाग - ४ मध्ये नेतृत्व स्वीकारा लोकांना राग येऊ न देता व आक्रमक होऊ न देता कसे बदलावे यामध्ये ९ प्रकरणे आहेत. शेवटी यश मिळविण्याचा झटपट मार्ग,
या सर्व प्रकरणांमध्ये दिलेली उदाहरणे, माहिती व तत्वे अत्यंत उपयुक्त व सहज पटणारी अशी आहेत.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच या पुस्तकाचा जास्तीत जास्त लाभ व्हावा म्हणून नऊ सूचना केल्या आहेत. त्या प्रथम वाचा व त्याप्रमाणे पुस्तक वाचा.
अ) लोकांवर तुमची छाप पडावी यासाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. ती पथ्ये तसेच काही गोष्टी करावयास नकार दिला, तर कोणती संकटे ओढवली जातील याबद्दल भाग-२ मध्ये विवेचन केले आहे. वादविवाद करण्याने काहीच साध्य होत नाही. तुम्ही वादविवादाने लोकांना कधीच जिंकू शकत नाहीत याबद्दल अनेक उदाहरणांनी ते भाग-३ मध्ये पटवून दिले आहे. चौथ्या भागात नेतृत्व ही कला आहे व त्याची महती किती आहे हे समजावून दिले आहे.
आपण आपल्या शारीरिक व मानसिक ताकदीचा केवळ निम्मा भागच वापरतो. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले, तर मानव फार मर्यादेत राहतो. खरेतर त्याच्यामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे, पण ती वापरण्यात तो अपयशी ठरतो. या पुस्तकाचा मूळ उद्देश हाच आहे. ती ताकद शोधण्यास, वाढवण्यास व तिचा फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला मदत करणे.
ब) पुस्तकाचा लेखक डेल कार्नेगी यांचे बालपण व पुढील काही वर्षांचे आयुष्य अतिशय कष्टप्रद होते. त्यासंबंधीचा तपशील पान २४८ ते २५४ मध्ये लॉवेल थॉमस यांनी दिला आहे. तो प्रत्येकाने लक्षपूर्वक वाचावा असा आहे.
क) अनुवादकर्त्याने ज्या पुस्तकाचे अनुवाद करायचे आहे त्याच्याशी किती एकरूप व्हायला पाहिजे त्याचे उदाहरण स्वयं अनुवादक अॅड. शुभदा विद्वांस आहे. पुस्तक वाचत असताना आणि पुस्तकातील विचारांवर चिंतन करताना त्यांना झोप लागली आणि स्वप्न पडले.
– पान बारा व तेरावर आपण स्वत: वाचा.
हे पुस्तक स्वत: विकत घेऊन प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे आहे. नुसते वाचून उपयोगी नाही. त्यातील तत्वे आचरणात आणणे तितकेच गरजेचे आहे. व ती तत्वे आचरणांत आणल्यानंतर तुमचे अनुभव काय हे लिहिण्यासाठी पुस्तकाच्या शेवटी २ पाने जोडली आहेत, त्यावर हे अनुभव लिहून ठेवा.
- Raviraj
Nice