* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KSHAMA
  • Availability : Upcoming (COMMING SOON...!)
  • Translators : APARNA NAIGAONKAR
  • ISBN : 9789357204101
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2026
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
Quantity
KSHAMA IS A KANNADA NOVEL BY SAHANA VIJAYAKUMAR THAT TELLS THE EMOTIONAL STORY OF PALLAVI, AN INTELLIGENT, WELL-EDUCATED IT PROFESSIONAL WHO IS MARRIED. DURING AN OFFICIAL WORK TRIP TO THE UNITED STATES, SHE UNEXPECTEDLY MEETS CHETAN (CHETU), HER CHILDHOOD SCHOOLMATE AND FORMER LOVER. CHETAN HAS ALWAYS LOVED PALLAVI, AND EVEN AFTER MANY YEARS, HIS FEELINGS REMAIN UNCHANGED. ALTHOUGH PALLAVI IS NOW MARRIED, THEIR REUNION REAWAKENS SUPPRESSED EMOTIONS BETWEEN THEM. DURING HER STAY IN THE US, THEY RECONNECT EMOTIONALLY AND SHARE A DEEPLY EMOTIONAL BOND, WHILE STILL TRYING TO MAINTAIN CERTAIN BOUNDARIES. CHETAN IS EVEN WILLING TO MARRY HER, BUT PALLAVI FINDS HERSELF TORN BETWEEN HER MARITAL LIFE AND UNRESOLVED LOVE. EVENTUALLY, SHE MAKES A CONTROVERSIAL AND EMOTIONALLY COMPLEX DECISION, TO HAVE A CHILD WITH CHETAN, SEEING THE CHILD AS A SYMBOL OF THEIR LOVE. THIS DECISION IS SHAPED BY HER TROUBLED PAST, ESPECIALLY THE TRAUMA OF HER MOTHER’S SUICIDE CAUSED BY HER FATHER’S EXTRAMARITAL AFFAIR, WHICH HAS LEFT PALLAVI UNABLE TO FORGIVE HIM. THE NOVEL EXPLORES WHETHER SHE GOES THROUGH WITH HER DECISION AND HOW HER EMOTIONAL CONFLICTS UNFOLD, MAKING IT A LAYERED AND INTENSE STORY ABOUT LOVE, GUILT, FORGIVENESS, AND MORAL CHOICES.
पल्लवी, एक उच्चशिक्षित, हुशार, विवाहित आयटियन तरुणी... ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने ती अमेरिकेला जाते आणि अनपेक्षितपणे तिच्यासमोर उभा ठाकतो चेतन (चेतू), तिचा शाळूसोबती. चेतूचं आणि तिचं परस्परांवर प्रेम असतं; पण काही कारणाने ते लग्न करू शकलेले नसतात. आता तिचं लग्न झाल्यानंतर बऱ्याच कालावधीने ते एकमेकांसमोर आलेत. अविवाहित असलेला चेतू अजूनही तिच्यावर तेवढंच प्रेम करतोय. तिच्या अमेरिकेतल्या मुक्कामात ते परस्परांवर प्रेमाची मुक्त उधळण करतात, अर्थात मर्यादा सांभाळून; चेतू तर तिच्याशी लग्न करायलाही तयार असतो; पण ती संसार आणि प्रेम या द्वंद्वात सापडते. शेवटी ती असा निर्णय घेते की चेतूपासून मूल होऊ द्यायचं आणि ते मूल त्यांच्या प्रेमाची निशाणी असेल. तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तिच्या आईने आत्महत्या केलीय. ती वडिलांना क्षमा करू शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर ती तिच्या निर्णयाची अंमलबजावणी करते का? भावांदोलनांनी सजलेली व्यामिश्र कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #कादंबरी #क्षमा #सहनाविजयकुमार #अपर्णानायगावकर # MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHITRANSLATEDBOOK #NOVEL #KSHAMA #SAHANAVIJAYAKUMAR #APARNANAIGAONKAR
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more