* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PERVEZ
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA MAHAJAN
  • ISBN : 9789357203852
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2024
  • Weight : 300.00 gms
  • Pages : 300
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NOVEL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SET IN MUMBAI, THIS NOVEL TRACES THE POLITICAL MATURATION OF PERVEZ, A YOUNG PARSI WOMAN WHOSE MARRIAGE TO A CHRISTIAN HAS FALLEN APART. COMING FROM AN AFFLUENT BACKGROUND, PERVEZ IS DRAWN INTO THE ACTIVIST MOVEMENT IN THE MONTHS PRECEDING THE DEMOLITION OF THE BABRI MASJID, TO FIND HERSELF CONFRONTING FUNDAMENTAL BELIEFS REGARDING SOCIAL PRIVILEGE, JUSTICE, RELIGION AND SECULARISM. HER OUTRAGE IS TEMPERED BY A SURVIVAL INSTINCT THAT PROPELS HER INTO ACTION AND EVENTUAL CATHARSIS. A NOVEL THAT LOOKS AT CONTEMPORARY ISSUES WHILE GIVING AN INSIGHT INTO THE PARSI WAY OF LIFE.
आपल्या सूक्ष्म निरीक्षणाक्ती आणि संवेदनशीलता या गुणांच्या साहाय्याने पेस्तनजी यांनी आपल्या समाजातील लोकांच्या जगण्याच्या पद्धतींवर तत्कालीन ज्वलंत समस्यांच्या पार्श्वभूमीवर सडेतोड टीका केली आहे. पेस्तनजी या आत्मपरीक्षणातून बंडखोर झालेल्या आहेत. मुंबईमध्ये या कादंबरीतील गोष्ट घडत जाते. एक तरूण पारशी स्त्रीच्या राजकीय परिपक्वतेचा प्रवास दाखवणारी ही कहाणी आहे. आपले एका ख्रिश्चन माणसाशी झालेले लग्न मोडून ती मुंबईला परत आली आहे. परवेझचे मूळचे कुटुंब हे एक उच्चभ्रू, श्रीमंत असे घर आहे. मुंबईला परत आल्यावर ती चळवळीतील काही कार्यकर्त्यांच्या कामात ओढली जाते. बाबरी मशिद जमीनदोस्त करण्यात आली त्या घटनेच्या आधीचा हा अस्वस्थ असा काळ आहे. अशा काळात वावरताना आपण सनातनी विचारांच्या विरोधात उभ्या राहिलो आहोत, हे तिच्या लक्षात येते. सामाजिक न्याय, धर्म, सहिष्णुता या विषयांवर ती विचार करायला लागते. सामाजिक असमतोलामुळे पेटून उठलेल्या तिच्या रागाचा कडेलोट होतो एका घटनेत, तिच्यातून ती आपला बचाव करत बाहेर येते, आपल्या विचारांचं कृतीत रूपांतर करते आणि आपल्या अस्वस्थपणाला संतापाला त्यातूनच वाट करून देते. ही कादंबरी पारशी लोकांच्या जगण्यावर प्रकाश टाकतेच, त्याबरोबरच समकालीन महत्त्वाच्या प्रश्नांची मांडणी करताना दिसते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#अनुवादितमराठीपुस्तके#काल्पनिककथा#परवेझ#मेहेरपेस्तनजी#सुनंदामहाजन#MEHTAPUBLISHINGHOUSE#TRANSLATEDMARATHIBOOKS#PERVEZ#MEHERPESTONJI#SUNANDAMAHAJAN#FICTION
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more