* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAHE KABIR MAIN PURA PAYA
  • Availability : Available
  • Translators : MEENA TAKALKAR
  • ISBN : 9788177666830
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 37 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`I FEEL CONTENTED WITH THE THOUGHT OF DEATH, OF WHICH ALL ARE SCARED.`_ KABIR. THOSE WHO ARE IGNORANT ARE SCARED OF DEATH. THOSE WHO UNDERSTAND DEATH, HAVE CONQUERED LIFE. DEATH IS THE SUPREME BEAUTY OF THIS WORLD. IF YOU WANT TO DESTROY YOUR SHADOW, YOU JUST HAVE TO STAND STILL AT A PLACE, THIS KILLS YOUR SHADOW. THE SAME THING APPLIES TO DEATH. THE MORE YOU TRY TO RUN AWAY FROM DEATH, THE MORE IT WILL FOLLOW YOU. BUT STAND STILL, GIVE IT A FEARLESS GLANCE AND YOU WILL FIND ELIXIR IN IT. STOP AND FACE THE DEATH. LEARN TO RECOGNIZE DEATH. YOU WILL COME ACROSS THE GOD. OSHO TRIES TO REVEAL NEW MEANING FROM KABIR`S `DOHA`. OSHO`S SIMPLE LANGUAGE MIGHT HELP YOU TO COME ACROSS THE TRUE MEANING OF LIFE.
``सारे जग ज्या मृत्यूला घाबरते त्याच मृत्यूने माझे मन आनंदित होते.`` — कबीर जे अज्ञानी आहेत तेच मृत्यूला घाबरतात. ज्यांनी मृत्यू ओळखला आहे, त्यांनी जीवन जिंकले आहे. मृत्यूसारखी परम सुंदर गोष्टच नाही या जगात. जर तुमची सावली नष्ट करायची असेल तर तुम्ही एका जागी स्थिर होता, सावली आपोआप नाहीशी होते. जसे प्रत्येक समस्येकडे डोळे उघडून पहाता, समस्या आपोआप संपून जाते. मृत्यूचेही तसेच आहे. मृत्यूपासून पळायचा प्रयत्न केलात तर तो पाठलाग करेल. पण त्याकडे निर्भयपणे पहाल तर तो अमृतासमान भासेल. थांबा आणि मृत्यूला सामोरे जा. मृत्यू ओळखायला शिका. तुम्हाला परमेश्वर भेटेल. कबिरांच्या सुंदर दोह्यांमधून ओशो जीवनाचा नवा अर्थ शोधू पाहतात. ओशोंच्या रसाळ भाषेतले हे अर्थ वाचून कदाचित आपल्यालाही जीवन समजेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 24-09-2006

    आपल्या जीवनाविषयी, भोवतालच्या जगाविषयी अनेक प्रश्न ‘मृत्यू’ विषयीचे असतात. जन्माकडून मृत्यूकडे होणाऱ्या प्रवासात आपण सुखदु:खाच्या छायाप्रकाशात चाचपडत असतो. अशा वेळेस जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणारी भगवान रजनीश उर्फ ओशो यांची पुस्तके निश्चितच मार्गदर्श ठरतात. त्यातलेच एक पुस्तक ‘मृत्यू अमृताचे द्वार’ ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या ‘कहे कबीर मैं पुरा पाया’ या हिंदी पुस्तकातील सात ते तेरा प्रकरणे मीना टाकळकर यांनी मराठीत अनुवाद केली आहेत. या सात प्रवचनांचे संकलन म्हणजेच ‘मृत्यू अमृताचे द्वार’ संत कबिराच्या सुंदर दोह्यांमधून ओशो यांनी जीवनाचा नवा अर्थ शोधला आहे. पहिले प्रवचन आहे, ‘जो जागा झाला त्यालाच ईश्वर भेटला! कबीर म्हणतात, ‘भैर चढै सो अधधर डूबै।’ या दोह्याचे विश्लेषण ओशोंनी केले आहे. कोणत्याही नावेमध्ये चढलात तरी प्रवाहाच्या मध्यभागी ती डुंबणारच. ‘निराधार भार पार’ ज्यांनी कोणत्याही आधार घेतला नाही, ते पैलतीरी सहज पोहोचतील. याबद्दल ओशो म्हणतात, जो नावेमध्ये चढला त्याच क्षणी त्याचे डुबणे सुरू झाले. कारण तो पोहू शकत नव्हता. म्हणून तर तो चढला. हा जीवनाचा प्रवास खरे तर एकट्याचा आहे. तो एकट्यानेच पोहून पार करावयाचा आहे. कुणावरही अवलंबून न राहाता स्वत:च्या सामर्थ्याने, श्रद्धा विश्वासाने पार पाडायचा असतो. कबिरांच्या वचनांचा अर्थ ओशोंनी वेगवेगळ्या दृष्टातांनी दाखले देऊन उलगडून सांगितला आहे. जो निराधार आहे तो त्याचा त्यालाच आधार आहे. जर परमेश्वराला आधार बनवले तर तुमच्या परमेश्वरांची काय किंमत राहिली? तुमचा परमेश्वर म्हणजे तुमची कल्पना आहे. जर तुम्ही परमेश्वराचा आधार न मानता स्वत:च स्वत:चा आधार झालात तर तिथेच परमेश्वर आपण होऊन आधार देतो, त्याआधी नाही. ‘एक परम समाधान’ या दुसऱ्या प्रवचनातही ‘अहंकारा’ विषयीचे कबिराचे वचन उलगडून सांगितले आहे. ते म्हणतात. अहंकार अडचण आहे, समर्पण उकल आहे. अहंकाराने रोग निर्माण केले तर समर्पणामुळे ते संपतील म्हणून तर सगळ्या शास्त्रांनी सगळ्या परंपरांनी समर्पणाचा महिमा गायला आहे. एक महत्त्वाचे सूत्र ओशोंनी सांगितले आहे की, आपला प्रश्न नीटपणे समजून घेतला आहे, त्यांचे समाधान होईल. दुसरे कुठेही नाही तर प्रश्नामध्येच उत्तर लपले आहे. ज्याला तुम्ही शोधताय ते कुठेही दुसरीकडे नसून ते तुमच्यातच दडले आहे. ‘अमृताचे दार मृत्यू आहे’ या तिसऱ्या प्रवचनात ‘मृत्यू’ संकल्पनेचा अर्थ उलगडून दाखवला आहे. एका बाजूने बघताना जीवन मृत्यू आहे. दुसऱ्या बाजूने बघताना जीवन संपूर्ण परमानंद वाटते. ते पूर्ण परमानंद आहे. ते उच्च परमजीवन आहे. बघण्याच्या दृष्टिकोनावर सारे अवलंबून आहे. चवथे प्रवचन ‘संन्यास परम सौभाग्य आहे.’ या शिर्षकाचे आहे. प्रत्येकच प्रवचनात सुरुवातीला कबिराच्या ओव्या दिल्या आहेत आणि पुढे प्रवचनात त्या ओवीचा अर्थ उदाहरणं, दाखले, देऊन ओशोंनी समजावून सांगितला आहे. पाचवे प्रवचन आहे ‘पंडितापासून सावधान’ या प्रवचनात कबिराविषयी आपल्याला काय वाटते ते ओशो सांगतात. ते म्हणतात. संतांमध्ये कबिराच्या तोडीचे कोणीच नाही. सगळे संत अद्भूत आहेत. त्याचे अद्वितीयपण हे आहे की त्यांचे उसने असे काहीच नाही. कबिराचा मार्ग मोठा सरळ-साधा आहे. खूप कमी लोकांचा रस्ता इतका सरळ साधा असतो. वाकड्या तिरक्या गोष्टीं कबिरांना पसंत नाहीत म्हणूनच त्यांच्या मार्गाचे नाव आहे ‘सहजयोगी’ण् सहावे प्रवचन आहे ‘शून्यामध्ये उडी’ या प्रवचनात चर्चा केली आहे ते मुद्दे म्हणजे - (१) मी शून्य होत आहे आता काय करू? (२) धर्मगुरुंसारखा कबिराचा व्यापक प्रभाव का पडला नाही? (३) दु:खापासून मुक्ती कशी मिळेल? (४) माझ्यावर गुरुकृपा कधी होईल? या चार मुद्यांवर कबिराच्या वचनांचा अर्थ सांगत उदाहरणे देऊन ओशोंनी चर्चा केली आहे. त्यात शेवटी म्हटले आहे की, माळी कोणतीही फुले स्वत:हून उमलवत नाही. पाणी देतो, खाद्या देतो परंतु कोणतेही फूल हाताने उमलवत नाही. रोपट्याला सुद्धा संधी देतो, की जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा पिकेल, जेव्हा वसंत येईल, जेव्हा फुलांच्या आत उमलण्याची क्षमता निर्माण होईल, तेव्हा फूल आपणहून उमलेल. आपणहून उमलणे हा सहजयोग आहे. सहजतेला समजलात तर कबिराला समजलात. शेवटच्या प्रवचनाने शीर्षक आहे ‘शब्दांची साधना करो’ जे शब्द शांतता आणि शीतलतेपासून येतात. असेच शब्द ऐका. क्रोध, शत्रुत्व, हिंसा आणि तिरस्काराचे शब्द ऐकायचे नाहीत. त्याचप्रमाणे युद्ध आणि विषाने भरलेला शब्द ऐकू नका. जेव्हा मनामध्ये तिरस्कार निर्माण होईल तेव्हा एकांतात बसा. परमेश्वराचे स्मरण करा. शीतल व्हा, शीतल बोला, शांतता ही जीवनशैली बनवा. तीच तुमची जीवनप्रणाली आहे. शांत होता होता, साधक होता होता एक दिवस तुम्ही साधू होऊन जाल. साधू होता एक दिवस तुम्ही कृतार्थ होऊन जाल. ‘मृत्यू अमृताचे द्वार’ हे पुस्तक म्हणजे कबिराच्या सुंदर दोह्यांमधून ‘ओशो’नी दिलेला जीवनाचा नवा अर्थ वाचकांना मार्ग दर्शविणारा आहे. ओशोंच्या रसाळ भाषेतल हे चिंतन जीवन-मृत्यूसंबंधी तत्वज्ञान सांगणारे आहे. -रजनी अपसिंगेकर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 12-11-2006

    ओशोंच्या मुखातून कबीरवाणी!... ‘ओशो’ नाव घेतलं की भारतीय मनासमोर धर्माच्या विरोधात बंड करून उठलेली आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देणारी व्यक्ती डोळ्यासमोर येते. अशी सर्रास धारणा असलेल्या व्यक्तींनी एकतर ओशोंचं साहित्य वाचलेलं नसतं किंवा त्याबद्दल ते वालेल्यांकडून काही ऐकलेलंही नसतं. एक गॉसिप म्हणून ओशो बऱ्याचवेळा चघळले जातात. पण वस्तुस्थिती तर अशी आहे की, फ्रेडरिक नित्शे फ्रॉइड, रामकृष्ण, राजकारण, समाजकारण अशा सर्व विषयांवर अधिकारवाणीने मार्गदर्शन ओशोंनी केलंय. त्यांच्यावर धर्माच्या विपरित शिकवण केल्याचा आरोप केला जातो. तर त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही’ त्यामुळे अनेक संतांचे दाखले, त्यांचे विचार ओशो आपली धार्मिकता विषद करण्यासाठी मांडतात. दोह्यांमुळे आपल्याला माहिती असलेल्या कबीरांवर त्यांनी दिलेली व्याख्याने ‘मृत्यू अमृताचे द्वार’, ‘माझे माझ्यापाशी काही नाही’ आणि ‘भक्तीत भिजला कबीर’ या पुस्तकात संग्रहित करण्यात आली आहेत. ओशोंचा मुख्य विषय नेहमीप्रमाणेच परमेश्वर आणि मानव असा आहे. त्या ईश्वराला शोधण्यासाठी बाहेर नाही तर आत बघायला पाहिजे, हा उपदेश सर्वमान्य असला तरी सर्वसामान्यांच्या काही तो गळी उतरत नाही. पण कबिराच्या दोह्यांमध्ये नीट डोकावून बघितलं तर लक्षात येतं, परमेश्वर कसा आहे; तर तो जिथे हवा तिथे तसा आहे. आणि हे असं का आहे, हे ओशो मग अत्यंत रंजक अशा भाषेत पानापानात समजावत राहतात. या आशेने की, कधीतरी आपल्या मनातला अंधकार दूर होईल आणि या प्रचंड विश्वातल्या आपल्या आणि ईश्वराच्या बाबतीतल्या सत्य स्वरुपाचं आपल्याला ज्ञान होईल. साधारणपणे कुठलाही धार्मिक विषय हा रुक्ष असतो. एकदम कपाळावर भरपूर आठ्या घालून विश्वाचं ओझं आपल्याच डोक्यावर असल्यासारखी भावमुद्रा बुवांना आणि भक्तांना म्हणजे आपल्याला वागवावीच लागते. पण ओशोंच्या धार्मिकतेत मात्र निखळ विनोदाला स्थान आहे, समाजाच्या सबलीकरणाला स्थान आहे, शांततेला स्थान आहे, नृत्याला स्थान आहे. संगीताला स्थान आहे, थोडक्यात म्हणजे जीवनाला स्थान आहे. आणि जीवन आहे तर मृत्यूही आहे. या वास्तवाची जाणीव ज्यादिवशी खऱ्या अर्थी आपल्याला होते, त्यावेळी जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही बदलतो. मृत्यू आहे म्हणून जीवनाला काही अर्थ आहे. हे पटतं. मग कबीराचं ‘सारे जग ज्या मृत्यूला घाबरते त्याच मृत्यूने माझे मन आनंदित होते’ हे वचन आपल्याला आतल्या प्रवासाला जायला उद्युक्त करतं. लोकांनी आतल्या प्रवासाला सुरुवात करावी या उद्देशाने, धार्मिक बनावं या हेतूने असे हे कबीर आपल्याला ओशो या तीन पुस्तकांतून समजावून देतात. त्यामुळे अक्षरश: प्रत्येक व्यक्तीने ही पुस्तकं वाचणं ‘मस्ट’च आहे. -योगेश मेहेंदळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more