* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAHE KABIR MAIN PURA PAYA
  • Availability : Available
  • Translators : MEENA TAKALKAR
  • ISBN : 9788177666830
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 37 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`I FEEL CONTENTED WITH THE THOUGHT OF DEATH, OF WHICH ALL ARE SCARED.`_ KABIR. THOSE WHO ARE IGNORANT ARE SCARED OF DEATH. THOSE WHO UNDERSTAND DEATH, HAVE CONQUERED LIFE. DEATH IS THE SUPREME BEAUTY OF THIS WORLD. IF YOU WANT TO DESTROY YOUR SHADOW, YOU JUST HAVE TO STAND STILL AT A PLACE, THIS KILLS YOUR SHADOW. THE SAME THING APPLIES TO DEATH. THE MORE YOU TRY TO RUN AWAY FROM DEATH, THE MORE IT WILL FOLLOW YOU. BUT STAND STILL, GIVE IT A FEARLESS GLANCE AND YOU WILL FIND ELIXIR IN IT. STOP AND FACE THE DEATH. LEARN TO RECOGNIZE DEATH. YOU WILL COME ACROSS THE GOD. OSHO TRIES TO REVEAL NEW MEANING FROM KABIR`S `DOHA`. OSHO`S SIMPLE LANGUAGE MIGHT HELP YOU TO COME ACROSS THE TRUE MEANING OF LIFE.
``सारे जग ज्या मृत्यूला घाबरते त्याच मृत्यूने माझे मन आनंदित होते.`` — कबीर जे अज्ञानी आहेत तेच मृत्यूला घाबरतात. ज्यांनी मृत्यू ओळखला आहे, त्यांनी जीवन जिंकले आहे. मृत्यूसारखी परम सुंदर गोष्टच नाही या जगात. जर तुमची सावली नष्ट करायची असेल तर तुम्ही एका जागी स्थिर होता, सावली आपोआप नाहीशी होते. जसे प्रत्येक समस्येकडे डोळे उघडून पहाता, समस्या आपोआप संपून जाते. मृत्यूचेही तसेच आहे. मृत्यूपासून पळायचा प्रयत्न केलात तर तो पाठलाग करेल. पण त्याकडे निर्भयपणे पहाल तर तो अमृतासमान भासेल. थांबा आणि मृत्यूला सामोरे जा. मृत्यू ओळखायला शिका. तुम्हाला परमेश्वर भेटेल. कबिरांच्या सुंदर दोह्यांमधून ओशो जीवनाचा नवा अर्थ शोधू पाहतात. ओशोंच्या रसाळ भाषेतले हे अर्थ वाचून कदाचित आपल्यालाही जीवन समजेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 24-09-2006

    आपल्या जीवनाविषयी, भोवतालच्या जगाविषयी अनेक प्रश्न ‘मृत्यू’ विषयीचे असतात. जन्माकडून मृत्यूकडे होणाऱ्या प्रवासात आपण सुखदु:खाच्या छायाप्रकाशात चाचपडत असतो. अशा वेळेस जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणारी भगवान रजनीश उर्फ ओशो यांची पुस्तके निश्चितच मार्गदर्श ठरतात. त्यातलेच एक पुस्तक ‘मृत्यू अमृताचे द्वार’ ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या ‘कहे कबीर मैं पुरा पाया’ या हिंदी पुस्तकातील सात ते तेरा प्रकरणे मीना टाकळकर यांनी मराठीत अनुवाद केली आहेत. या सात प्रवचनांचे संकलन म्हणजेच ‘मृत्यू अमृताचे द्वार’ संत कबिराच्या सुंदर दोह्यांमधून ओशो यांनी जीवनाचा नवा अर्थ शोधला आहे. पहिले प्रवचन आहे, ‘जो जागा झाला त्यालाच ईश्वर भेटला! कबीर म्हणतात, ‘भैर चढै सो अधधर डूबै।’ या दोह्याचे विश्लेषण ओशोंनी केले आहे. कोणत्याही नावेमध्ये चढलात तरी प्रवाहाच्या मध्यभागी ती डुंबणारच. ‘निराधार भार पार’ ज्यांनी कोणत्याही आधार घेतला नाही, ते पैलतीरी सहज पोहोचतील. याबद्दल ओशो म्हणतात, जो नावेमध्ये चढला त्याच क्षणी त्याचे डुबणे सुरू झाले. कारण तो पोहू शकत नव्हता. म्हणून तर तो चढला. हा जीवनाचा प्रवास खरे तर एकट्याचा आहे. तो एकट्यानेच पोहून पार करावयाचा आहे. कुणावरही अवलंबून न राहाता स्वत:च्या सामर्थ्याने, श्रद्धा विश्वासाने पार पाडायचा असतो. कबिरांच्या वचनांचा अर्थ ओशोंनी वेगवेगळ्या दृष्टातांनी दाखले देऊन उलगडून सांगितला आहे. जो निराधार आहे तो त्याचा त्यालाच आधार आहे. जर परमेश्वराला आधार बनवले तर तुमच्या परमेश्वरांची काय किंमत राहिली? तुमचा परमेश्वर म्हणजे तुमची कल्पना आहे. जर तुम्ही परमेश्वराचा आधार न मानता स्वत:च स्वत:चा आधार झालात तर तिथेच परमेश्वर आपण होऊन आधार देतो, त्याआधी नाही. ‘एक परम समाधान’ या दुसऱ्या प्रवचनातही ‘अहंकारा’ विषयीचे कबिराचे वचन उलगडून सांगितले आहे. ते म्हणतात. अहंकार अडचण आहे, समर्पण उकल आहे. अहंकाराने रोग निर्माण केले तर समर्पणामुळे ते संपतील म्हणून तर सगळ्या शास्त्रांनी सगळ्या परंपरांनी समर्पणाचा महिमा गायला आहे. एक महत्त्वाचे सूत्र ओशोंनी सांगितले आहे की, आपला प्रश्न नीटपणे समजून घेतला आहे, त्यांचे समाधान होईल. दुसरे कुठेही नाही तर प्रश्नामध्येच उत्तर लपले आहे. ज्याला तुम्ही शोधताय ते कुठेही दुसरीकडे नसून ते तुमच्यातच दडले आहे. ‘अमृताचे दार मृत्यू आहे’ या तिसऱ्या प्रवचनात ‘मृत्यू’ संकल्पनेचा अर्थ उलगडून दाखवला आहे. एका बाजूने बघताना जीवन मृत्यू आहे. दुसऱ्या बाजूने बघताना जीवन संपूर्ण परमानंद वाटते. ते पूर्ण परमानंद आहे. ते उच्च परमजीवन आहे. बघण्याच्या दृष्टिकोनावर सारे अवलंबून आहे. चवथे प्रवचन ‘संन्यास परम सौभाग्य आहे.’ या शिर्षकाचे आहे. प्रत्येकच प्रवचनात सुरुवातीला कबिराच्या ओव्या दिल्या आहेत आणि पुढे प्रवचनात त्या ओवीचा अर्थ उदाहरणं, दाखले, देऊन ओशोंनी समजावून सांगितला आहे. पाचवे प्रवचन आहे ‘पंडितापासून सावधान’ या प्रवचनात कबिराविषयी आपल्याला काय वाटते ते ओशो सांगतात. ते म्हणतात. संतांमध्ये कबिराच्या तोडीचे कोणीच नाही. सगळे संत अद्भूत आहेत. त्याचे अद्वितीयपण हे आहे की त्यांचे उसने असे काहीच नाही. कबिराचा मार्ग मोठा सरळ-साधा आहे. खूप कमी लोकांचा रस्ता इतका सरळ साधा असतो. वाकड्या तिरक्या गोष्टीं कबिरांना पसंत नाहीत म्हणूनच त्यांच्या मार्गाचे नाव आहे ‘सहजयोगी’ण् सहावे प्रवचन आहे ‘शून्यामध्ये उडी’ या प्रवचनात चर्चा केली आहे ते मुद्दे म्हणजे - (१) मी शून्य होत आहे आता काय करू? (२) धर्मगुरुंसारखा कबिराचा व्यापक प्रभाव का पडला नाही? (३) दु:खापासून मुक्ती कशी मिळेल? (४) माझ्यावर गुरुकृपा कधी होईल? या चार मुद्यांवर कबिराच्या वचनांचा अर्थ सांगत उदाहरणे देऊन ओशोंनी चर्चा केली आहे. त्यात शेवटी म्हटले आहे की, माळी कोणतीही फुले स्वत:हून उमलवत नाही. पाणी देतो, खाद्या देतो परंतु कोणतेही फूल हाताने उमलवत नाही. रोपट्याला सुद्धा संधी देतो, की जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा पिकेल, जेव्हा वसंत येईल, जेव्हा फुलांच्या आत उमलण्याची क्षमता निर्माण होईल, तेव्हा फूल आपणहून उमलेल. आपणहून उमलणे हा सहजयोग आहे. सहजतेला समजलात तर कबिराला समजलात. शेवटच्या प्रवचनाने शीर्षक आहे ‘शब्दांची साधना करो’ जे शब्द शांतता आणि शीतलतेपासून येतात. असेच शब्द ऐका. क्रोध, शत्रुत्व, हिंसा आणि तिरस्काराचे शब्द ऐकायचे नाहीत. त्याचप्रमाणे युद्ध आणि विषाने भरलेला शब्द ऐकू नका. जेव्हा मनामध्ये तिरस्कार निर्माण होईल तेव्हा एकांतात बसा. परमेश्वराचे स्मरण करा. शीतल व्हा, शीतल बोला, शांतता ही जीवनशैली बनवा. तीच तुमची जीवनप्रणाली आहे. शांत होता होता, साधक होता होता एक दिवस तुम्ही साधू होऊन जाल. साधू होता एक दिवस तुम्ही कृतार्थ होऊन जाल. ‘मृत्यू अमृताचे द्वार’ हे पुस्तक म्हणजे कबिराच्या सुंदर दोह्यांमधून ‘ओशो’नी दिलेला जीवनाचा नवा अर्थ वाचकांना मार्ग दर्शविणारा आहे. ओशोंच्या रसाळ भाषेतल हे चिंतन जीवन-मृत्यूसंबंधी तत्वज्ञान सांगणारे आहे. -रजनी अपसिंगेकर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 12-11-2006

    ओशोंच्या मुखातून कबीरवाणी!... ‘ओशो’ नाव घेतलं की भारतीय मनासमोर धर्माच्या विरोधात बंड करून उठलेली आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देणारी व्यक्ती डोळ्यासमोर येते. अशी सर्रास धारणा असलेल्या व्यक्तींनी एकतर ओशोंचं साहित्य वाचलेलं नसतं किंवा त्याबद्दल ते वालेल्यांकडून काही ऐकलेलंही नसतं. एक गॉसिप म्हणून ओशो बऱ्याचवेळा चघळले जातात. पण वस्तुस्थिती तर अशी आहे की, फ्रेडरिक नित्शे फ्रॉइड, रामकृष्ण, राजकारण, समाजकारण अशा सर्व विषयांवर अधिकारवाणीने मार्गदर्शन ओशोंनी केलंय. त्यांच्यावर धर्माच्या विपरित शिकवण केल्याचा आरोप केला जातो. तर त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही’ त्यामुळे अनेक संतांचे दाखले, त्यांचे विचार ओशो आपली धार्मिकता विषद करण्यासाठी मांडतात. दोह्यांमुळे आपल्याला माहिती असलेल्या कबीरांवर त्यांनी दिलेली व्याख्याने ‘मृत्यू अमृताचे द्वार’, ‘माझे माझ्यापाशी काही नाही’ आणि ‘भक्तीत भिजला कबीर’ या पुस्तकात संग्रहित करण्यात आली आहेत. ओशोंचा मुख्य विषय नेहमीप्रमाणेच परमेश्वर आणि मानव असा आहे. त्या ईश्वराला शोधण्यासाठी बाहेर नाही तर आत बघायला पाहिजे, हा उपदेश सर्वमान्य असला तरी सर्वसामान्यांच्या काही तो गळी उतरत नाही. पण कबिराच्या दोह्यांमध्ये नीट डोकावून बघितलं तर लक्षात येतं, परमेश्वर कसा आहे; तर तो जिथे हवा तिथे तसा आहे. आणि हे असं का आहे, हे ओशो मग अत्यंत रंजक अशा भाषेत पानापानात समजावत राहतात. या आशेने की, कधीतरी आपल्या मनातला अंधकार दूर होईल आणि या प्रचंड विश्वातल्या आपल्या आणि ईश्वराच्या बाबतीतल्या सत्य स्वरुपाचं आपल्याला ज्ञान होईल. साधारणपणे कुठलाही धार्मिक विषय हा रुक्ष असतो. एकदम कपाळावर भरपूर आठ्या घालून विश्वाचं ओझं आपल्याच डोक्यावर असल्यासारखी भावमुद्रा बुवांना आणि भक्तांना म्हणजे आपल्याला वागवावीच लागते. पण ओशोंच्या धार्मिकतेत मात्र निखळ विनोदाला स्थान आहे, समाजाच्या सबलीकरणाला स्थान आहे, शांततेला स्थान आहे, नृत्याला स्थान आहे. संगीताला स्थान आहे, थोडक्यात म्हणजे जीवनाला स्थान आहे. आणि जीवन आहे तर मृत्यूही आहे. या वास्तवाची जाणीव ज्यादिवशी खऱ्या अर्थी आपल्याला होते, त्यावेळी जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही बदलतो. मृत्यू आहे म्हणून जीवनाला काही अर्थ आहे. हे पटतं. मग कबीराचं ‘सारे जग ज्या मृत्यूला घाबरते त्याच मृत्यूने माझे मन आनंदित होते’ हे वचन आपल्याला आतल्या प्रवासाला जायला उद्युक्त करतं. लोकांनी आतल्या प्रवासाला सुरुवात करावी या उद्देशाने, धार्मिक बनावं या हेतूने असे हे कबीर आपल्याला ओशो या तीन पुस्तकांतून समजावून देतात. त्यामुळे अक्षरश: प्रत्येक व्यक्तीने ही पुस्तकं वाचणं ‘मस्ट’च आहे. -योगेश मेहेंदळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more