* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619689
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 876
  • Language : MARATHI
  • Category : CLASSIC
  • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHIVSENA CHIEF BALASAHEB THACKERAY WAS KNOWN FOR HIS FEARLESS, OUTSPOKEN , FREE STYLE OF SPEECH . HIS POLTICS BASED ON HINDUTVA & INTER STATE MIGRATION SETS NEW PATTERNS IN THE POLITICS OF MAHARASHTRA . SO BALASAHEB THACKERAY’S EVERY STATEMENT WAS ALARM FOR THE POLITICAL CHANGES DURING HIS ERA. BALASAHEB THACKERAY SPOKE HIS MIND IN MANY FREEWHEELING INTERVIEWS GIVEN TO SAMANA EDITOR SANJAY RAUT . THESE INTERVIEWS ARE MOST IMPORTANT DOCUMENTATION OF MAHARASHTRA POLITICS. THE BOOK NAMED ‘EKVACHANI PART 1&2 WILL REMIND BALASAHEB THACKERAY’S ERA TO ITS READERS .
हिंदुत्वाच्या जोरावर ज्यांनी महाराष्ट्राची सत्ता मिळवली आणि केंद्रातही शिवसेनेला सत्तेत आणलं, त्या शिवसेनेचा अनेक वर्षं चेहरा असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या परखड मुलाखती ‘एकवचनी’ या पुस्तकात संजय राऊत यांनी एकत्र केल्या आहेत. बाळासाहेबांचा सडेतोड स्पष्टवक्तेपणा जो जगद्विख्यात होता, तो विशेषत्वाने या मुलाखतींमध्ये जाणवला आहे. कडवा हिंदुत्ववाद, दंगली, गँगवार याविषयी त्यांनी आपली मते परखडपणे मांडली आहेत. शरद पवार, सोनिया गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांसारख्या नेत्यांवर प्रखर टीका केली आहे. पक्षांतर करणाऱ्या छगन भुजबळांसारख्या नेत्याचेही त्यांनी वाभाडे काढले आहेत. भ्रष्टाचार, बेरोजगारी या समस्यांवरही त्यांनी आपली मते मांडली आहेत. शिवसेना मतभेद, भाजपबरोबर असणारे सबंध या राजकारणाशी संबंधित प्रश्नांना उत्तरे देतानाच देवधर्म, नास्तिकता, श्रद्धा, कुटुंब यांविषयीही ते भरभरून बोलले आहेत. मराठी अस्मितेचा अभिमान बाळगणाNया बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या मुलाखतींमधून समोर येतात. शिवसेनेची धोरणं, शिवसेनेचे आचारविचार, अपेक्षा यांसोबतच शिवसेनेचा इतिहास, भविष्यकाळ या सर्वांविषयी बाळासाहेबांची मतं आणि विचार या मुलाखतींमधून प्रकट होतात.

No Records Found
No Records Found
Keywords
BALASAHEB THAKARAY, SANJAY RAUT, HINDISAM, SHIV-SENA, MAHARASHTRA, CONGRESS, SHARAD PAWAR, SONIAGANDHI, INDIRA GANDHI, RAJEEV GANDHI, PAKISTAN, POLITICS, BRIBERY, SAMANA, SHIVRAI, BABARI, RAM MANDIR, INTERVIEW, MELAVA, MUMBAI MUNICIPAL, CORPORATION, BJP, RAJ THAKARAY, UDDHAV THAKARAY, MEDIA, ELECTION , SAVARKAR, HINDUISAM, KASAB, TERORISAM, AJIT PAWAR,YUVASHAKTI, FARMERS, MNS, CARTOONS, MEDIA, WORKERS, MANISHANKAR
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    बाळासाहेब ठाकरे यांच्या घणाघाती मुलाखती... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ‘सामना’ चे संपादक, आणि १९९४ पासून संजय राऊत हे कार्यकारी संपादक आहेत. बाळासाहेबांना दैनिकाच्या दैनंदिन कामकाजाकडे पाहण्याएवढी उसंत मिळणे अशक्यच; त्यामुळं कार्यकारी संपादक ज कोणी असेल त्यालाच बाळासाहेबांची मानसिकता लक्षात घेऊन, त्यांच्या मनातले जाणून रोज अग्रलेखाची ‘लाईन’ ठरवणे क्रमप्राप्त असते. संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या वृत्ती-प्रवृत्तीला साजेलसे स्वत:चे व्यक्तिमत्व ‘सामना’ ची सूत्रे हाती आल्यावर घडवले आहे. सामना वाचला जातो तो शिवसेनेचे मुखपत्र म्हणून, बाळासाहेबांच्या मतांचे व्यासपीठ म्हणून! कार्यकारी संपादकाच्या वैयक्तिक मतांसाठी सामना कोणी वाचावा, अशी अपेक्षाही नसते; त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्याच भूमिकेत शिरून, त्यांच्याच भावभावनांना व धोरणात्मक व्यूहाला संपादकीय शब्दरूप देण्यातील कौशल्य उत्तमप्रकारे संजय राऊत यांनी प्रकट केले आहे, आणि बाळासाहेबांना रुचेल, शोभेल अशीच शैली घडवली आहे. क्वचितच कधी बाळासाहेबांची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली असेल, इतक्या दोघांच्या वेव्हलेंग्थज् जुळलेल्या आहेत. बाळासाहेबांना शोभतील असे विचार बाळासाहेबांना शोभेल अशा आक्रमक शैलीत मांडण्याची ही कसरत संजय राऊत गेली सात-आठ वर्षे करीत आहेत. तरीही बाळासाहेबांची त्या त्या वेळची मते ही शिवसैनिकांना व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच ठाकरी भाषेत हवी असतात. ही वाचकांची गरज लक्षात घेऊन संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या विस्तृत मुलाखती महिन्या-दोन महिन्याने सामनात देण्याचा परिपाठ ठेवला. इतर कोणीही घेऊ शकणार नाही, असं स्वातंत्र्य संजय राऊत यांनी या मुलाखतींच्या बाबतीत घेतले आणि बाळासाहेबांना अडचणीचे वाटणारे प्रश्नही विचारले आहेत. बाळासाहेबांनी हे प्रश्न संजय राऊत यांच्या मनातले नाहीत, सर्वसामान्य मराठी माणसाचे आहेत, असे समजून उत्तरे देऊन, सरसहा हाताळले, क्वचितच उत्तर देण्याचे त्यांनी टाळले, किंवा क्वचितच प्रश्नांना बगल दिली असे दिसते. एखाद्या दैनिकांत संपादकांच्या मॅरेथॉन मुलाखती वरचेवर येणे हा एकूण चमत्कारिकच प्रकार. पण ‘सामना’चे वैशिष्ट्य म्हणून त्याचा उल्लेख होऊ लागला. बाळासाहेबांचा बाणा रोखठोक बोलण्याचा! तशात मराठीचा घणाघाती वापर करण्याचा त्यांच्या स्वभाव. मुलाखतीत बोलताना एखादी शिवी वा बदनामीकारक विधान तोंडातून गेले तरी ते जसेच्या तसे छापा असा बाळासाहेबांचा आग्रह; त्यामुळे संजय राऊत यांच्या प्रश्नातही आडपडदा वा हातचे राखून न ठेवणे हा प्रकार नाही; त्यामुळे या मुलाखती वादळी व वादग्रस्तही ठरल्या. संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या एकूण ५२ मुलाखती त्यांच्यासाठी ते पंच्याहस्तीच्या पंधरा वर्षांत घेतल्या. पहिल्या दोन मुलाखती अनुक्रमे १९८७ व १९९२ मधील आहेत. परंतु पुढच्या पन्नास मुलाखती १ मे १९९४ पासून ३ जुलै २००१ या सात वर्षांतल्या आहेत. त्यात त्या त्या वेळच्या ज्वलंत समस्यांबाबतची बाळासाहेबांची मते त्यांच्या आक्रमक शैलीत व्यक्त झाली आहेत. या मुलाखतीच्या रूपाने बाळासाहेबांनी दीड हजारावर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. शिवसेना, हिंदुत्व, सरकार, भाजपा, समाजवादी, काँग्रेस, विरोधी पक्ष, निवडणुका, मतदार, दौरे, शिवसेनेतील फाटाफूट, बंडखोरी भाजपा-शिवसेनेतील तणाव, पत्रकारिता, मीडिया, कामगारक्षेत्र, राज्यघटना, लोकशाही, खंडणी, दहशत, गँगवार, भ्रष्टाचार, ठाकरे यांच्या कुटुंबातील वाद, अवैध मार्गाने संपत्तीची जमवाजमव, शिवसैनिकांचे वर्तन, मुंबईचे मराठीपण, झोपडपट्ट्या, भूमिपुत्रांवरील अन्याय, त्या त्या वेळेचे राजकीय वातावरण व गणित, गोवारीचे हत्याकांड, दंगली, बॉम्बस्फोट, देशाचे नेतृत्व, रिमोट कंट्रोल, शेतमालाचे भाव, श्रीमंतांचे मित्र झाल्याचा आरोप, नोकरशाहीचा नाकर्तेपणा, राजकीय संन्यास, कुपोषणाने मृत्यू, कॉन्व्हेंट शाळा, महागाई, आर्थिक दिवाळखोरी, पक्षहिंसा, पाकिस्तान, काश्मीर, कारगिल, श्रीलंका व लिट्टे, दुकानांवरील मराठी पाट्या, खिस्ती मिशनरी, मुसलमानांचा मताधिकार काढून घेण्याचा आग्रह, तहलका, इस्लामचे आक्रमण, मणिपूरमधील बंड, एन्रॉन, श्रीकृष्ण आयोग, राज-उद्धव यांचे संबंध, नेपाळमधील राजवंश हत्या इ. कितीतरी विषय या मुलाखतीमध्ये आले आहेत. विषय पुन:पुन्हा आले आहेत स्वत:बद्दलसुद्धा ठाकरे यांनी वेळोवेळी काही बोलकी विधाने केली आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू त्यातून स्पष्ट होतात. या मुलाखतींमधून आपल्या सर्वच प्रश्नांची समाधानकारक किंवा मनासारखी उत्तरे मिळावीत, ही अपेक्षा करणे योग्य नाही. पारदर्शकतेलाही व्यावहारिक मर्यादा असतात; त्यामुळे काही ठिकाणी ‘बीटवीन द लाईन्स( वाचावे लागते. तशा जागाही खूप आहेत आणि अर्थपूर्ण, मार्मिक आहेत. असं खूप काही या मुलाखतींतून समोर येतं. ते विचारांना चालना देतं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more