* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745224
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 744
  • Language : MARATHI
  • Category : CLASSIC
  • Available in Combos :BHARTIYA SAMAJVIDNYAN KOSH COMBO SET-2 BOOKS
  • Discount : WORLD BOOK DAY OFFER 23 APRIL(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS 6TH SOCIAL SCIENCE ENCYCLOPEDIA WHICH PUTS FOCUS ON THE INDIAN SOCIETAL CONDITION DURING THE WIDE SPAN OF THOUSAND YEARS. ARTICLES IN THIS BOOK DESCRIBES THE CHANGES HAPPENED IN THE VARIOUS FIELDS OF THE SOCIETY. IT COVERS EVERY ASPECT OF SOCIETY INCLUDING AGRICULTURAL PROBLEMS, SOCIAL PROBLEMS, ENVIRONMENT PROTECTION, POLITICAL SITUATIONS ETC. IT IS A GREAT WORK OF INFORMATIVE DOCUMENTATION WHICH COULD BE USEFUL FOR STUDENTS, TEACHERS & ACADEMICIAN.
भारतीय समाजविज्ञानाच्या सहाव्या खंडात बदललेल्या सहस्रकातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या लेखांचे संकलन केले आहे. बदललेल्या सहस्रकातील राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणाने जागतिक पातळीवर किती वेगवान आणि धक्कादायक बदल घडवून आणले आहेत, याची प्रामुख्याने दखल या कोशात घेण्यात आली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात श्रीमंतांच्या संख्येत झालेली वाढ, तेवढ्याच गतीने श्रीमंत व गरीब या दोन वर्गातील रुंदावत चाललेली दरी, तसेच शेतीक्षेत्रामध्ये झालेली क्रांती आणि त्याचवेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात झालेली वाढ हा विरोधाभास सदर कोशातून टिपला आहे. आर्थिक क्षेत्रातील बदल व नवीन क्रांतिकारक घडामोडींची अद्ययावत नोंद घेतली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, बिनसरकारी संस्थांच्या खाजगी कामांची नोंद, या कोशातून घेण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व स्वावलंबी होणाऱ्या स्त्रियांमुळे कुटुंबव्यवस्थेवर अटळपणे होणारे परिणाम, जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वार्मिंग), वसुंधरा बचाव, यांसारख्या चळवळीला प्राप्त झालेले विशेष महत्त्व, दहशतवाद या मुद्द्यांकडेही या कोशात लक्ष वेधण्यात आले आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
BHARTIYA SAMAJVIDNYAN KOSH : KHAND 6# ADHIKAR : MAHITICHA TE HUKUMSHAHI# KAI. S. M. GARGE ARTHSHASTRA# RAJYSHASTRA# SAMAJSHASTRA# DR. ARVIND NAGARKAR# DR.SURESH KAKADE# DR. SHRUTI TAMBE# EKNATH BAGUL# ASTITVVAD# AKHATI YUDDH# ILICH# E-KARBHAR# UTTAR SANRACHANA VAD# OORJA ANI SAMAJ# AIDS : JAGTIK SAMASYA# OBAMA# AUDYOGIK MANASSHASTRA# COMMUNIST PAKSH : BHARAT# KHAJGIKARAN# GIFEN VASTU# JAMATWAD
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTRANG) 05-11-2017

    समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. स. मा. गर्गे यांनी पाया घातलेल्या भारतीय समाजविज्ञान कोशाचा सहावा खंड पुरवणी खंडाच्या रूपानं (अधिकार : माहितीचा ते हुकूमशाही) त्यांच्या पश्चात प्रसिद्ध झाला आहे. गेल्या २५-३० वर्षांत आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थितत आमूलाग्र बदल झाले. त्यापैकी अनेक गोष्टींचा समावेश या खंडात करण्यात आला आहे. अगदी ई-कारभारापासून रोख राखीव गुणोत्तरापर्यंत अनेक गोष्टींवर दिलेली मुद्देसूद, नेमकी आणि नेटकी माहिती हे या कोशाचं वैशिष्ट्य. प्रस्थापित लेखकांबरोबरच तरुण अभ्यासकांनीही लेखन केलं आहे. एकीकडं माहितीचा स्फोट होत असतानाही ‘अधिकृत’ माहिती मिळत नाही. त्या पार्श्वभूमीवर हा कोश अनेकांना उपयोगी पडेल. विशेषत: वेगवेगळ्या विषयांवर माहितीपर लेखन करणारे लेखक, स्पर्धापरिक्षा देणारे विद्यार्थी यांना या कोशाचा उपयोग होऊ शकेल. एकनाथ बागूल प्रमुख संपादक आहेत. गर्गे यांच्या काळात मूळ पाच कोशांबरोबर पारिभाषिक शब्दसंग्रहांचा समावेश असलेला सहावा खंडही प्रकाशित करण्यात आला होता. आता सहावा पुरवणी खंड प्रकाशित झाल्यानं त्यातल्या महत्त्वाच्या शब्दांची जोड असलेला पारिभाषिक शब्दसंग्रही नव्याने प्रकाशित करण्यात आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more