RAVINDRA DHAMAPURKAR

About Author


TALGAON IN MALVAN TALUKA IS THE BIRTH VILLAGE OF RABINDRA DHAMAPURKAR. HE HAS RECEIVED DEGREES SUCH AS M. A. (MARATHI), M. A. (HINDI). HE TAUGHT IN THE FAMOUS TOPIWALA HIGH SCHOOL AND JUNIOR COLLEGE IN MALVAN. HE EARNED A REPUTATION AS A PEDAGOGIC AND A STUDENT-FRIENDLY TEACHER AND IS ALSO FAMOUS AS A SANTACHARITRAKAR (THE ONE WHO WRITES ABOUT SAINTS). HIS LITERARY CONTRIBUTION SO FAR HAS BEEN FIFTEEN FAMOUS AND INFAMOUS SAINTS PALATIAL BIOGRAPHIES, TRANSCENDENTAL WORSHIP, PRINCIPLE-CONTEMPLATIVE BOOKS RELATED TO SADHANA, SHABDBRAHMA, YA ITHE TARUTALI ETC. THE PORTRAITS IN HIS COLLECTION MALVANI MEN (UNPUBLISHED) ARE REMINISCENT OF P. L. DESHPANDES VAKTI AND VALLI. HIS WRITINGS HAVE BEEN PRAISED BY RENOWNED SENIOR WRITERS SUCH AS DURGA BHAGWAT, MADHU MANGESH KARNIK ETC.

मालवण तालुक्यातील तळगाव हे रवींद्र धामापूरकर यांचं जन्मग्राम. एम. ए. (मराठी), एम. ए. (हिंदी) बी.एड. अशा पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. त्यांनी मालवणच्या सुप्रसिद्ध टोपीवाला हायस्कूलमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अध्यापन केले. एक अध्यापनकुशल आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला. ‘संतचरित्रकार’ म्हणून प्रख्यात. आतापर्यंत पंधरा प्रसिद्ध-अप्रसिद्ध संतांचे रसाळ, प्रासादिक चरित्रग्रंथ, पारमार्थिक उपासना, साधनेसंबंधी तत्त्व-चिंतनात्मक ग्रंथ, ‘शब्दब्रह्म’, ‘या इथे तरुतळी’ हे लेखसंग्रह इ. त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांच्या ‘मालवणी माणसे’ (अप्रकाशित) या संग्रहातील व्यक्तिचित्रे पु.ल.देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्लीं’ची आठवण करून देतात. दुर्गा भागवत, मधु मंगेश कर्णिक इ. नामवंत ज्येष्ठ साहित्यिकांकडून त्यांच्या लेखनाची प्रशंसा झाली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
BHAVGIRI Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more