‘VRUNDAVAN’ IS A NOVEL THAT RAISES QUESTIONS ABOUT THE PRACTICE OF SATI AND DELVES DEEP INTO THE INNER PSYCHE OF WOMEN. V. S. KHANDEKAR PORTRAYS THIS STORY AGAINST THE BACKDROP OF THE OLD, CRUEL PRACTICE OF A WIFE SACRIFICING HERSELF ON HER HUSBAND`S FUNERAL PYRE AND THE SUBSEQUENT COERCION INVOLVED. THE PROTAGONIST AND RENOWNED WRITER MANOHAR DAMLE WANTS TO WRITE A NOVEL ABOUT A WOMAN WHO COMMITTED SATI FOR A DIWALI MAGAZINE. WHILE SEARCHING FOR A SATI MEMORIAL ON THE BANKS OF THE PURNA RIVER IN SANGAMPUR, HE MEETS AN ACTRESS NAMED NIRMAL. NIRMAL’S LIFE IS NO DIFFERENT FROM THAT OF A WOMAN WHO COMMITTED SATI, AS SHE LIVES A SATI-LIKE EXISTENCE WHILE STILL ALIVE, ILLUSTRATING THAT THE LIVES OF EDUCATED WOMEN IN MODERN TIMES HAVE NOT FUNDAMENTALLY CHANGED. ALTHOUGH THE TEXT OF THE NOVEL REMAINS INCOMPLETE, ITS CONTENT AND MEANING ARE FULLY CLEAR.
‘वृंदावन’ ही सती प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आणि स्त्रीच्या अंतर्मनाचा ठाव घेणारी कादंबरी आहे. पतीच्या मृत्यूनंतर स्वतःस समर्पित करण्याची जुनी अनिष्ट प्रथा आणि नंतर आलेली सक्ती या पार्श्वभूमीवर वि. स. खांडेकरांनी ही कथा मांडली आहे. १८२९ मधील सती बंदी कायद्याला दीडशे वर्षे उलटूनही स्त्रीच्या स्थितीत फारसा बदल न झाल्याचे शल्य यात व्यक्त होते. कादंबरीचा नायक आणि विख्यात लेखक मनोहर दामले याला एका दिवाळी अंकासाठी सती गेलेल्या स्त्रीवर कादंबरी लिहायची असते. संगमपूर येथील पूर्णा नदीकाठी सतीच्या स्मारकाच्या शोधात असताना त्याला निर्मल नावाची नटी भेटते. निर्मलचे जीवनही सती गेलेल्या स्त्रीपेक्षा वेगळे नसून, ती जिवंतपणीच सतीसारखे जीवन जगत असते. आधुनिक काळातील शिक्षित स्त्रीच्या जीवनातही फरक पडला नसल्याचे लेखक याद्वारे सांगू इच्छितात. कादंबरीचा मजकूर अपूर्ण राहिला असला, तरी तिचा आशय पूर्णांशाने स्पष्ट आहे. खांडेकरांच्या नायिका संघर्षशील, मूल्यनिष्ठ आणि नैतिक द्वंद्वात सापडलेल्या असल्या तरी त्यातून स्त्री मुक्तीचा आणि विचारांचा सुंदर संगम दिसून येतो.