* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CONVERSATIONS WITH GOD PART - II
  • Availability : Available
  • Translators : VRUSHALI PATWARDHAN
  • ISBN : 9788184989564
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : PHILOSOPHY
  • Available in Combos :NEALE DONALD WALSCH COMBO SET - 2 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN NEALE DONALD WALSCH WAS EXPERIENCING A LOW POINT IN HIS LIFE, HE DECIDED TO WRITE A LETTER TO GOD. WHAT HE DID NOT EXPECT WAS A RESPONSE AND THE RESULT WAS CONVERSATIONS WITH GOD BOOK 1. IN BOOK 2, THE DIALOGUE EXPANDS TO DEAL WITH THE MORE GLOBAL TOPICS OF GEOPOLITICAL AND METAPHYSICAL LIFE ON THE PLANET, AND THE CHALLENGES NOW FACING THE WORLD. THIS INCREDIBLE SERIES CONTAINS ANSWERS THAT WILL CHANGE YOU, YOUR LIFE, AND THE WAY YOU VIEW OTHER BEINGS.
माणसाच्या आध्यात्मिक वाटचालीबद्दल सर्व काही म्हणजे हा ‘संवाद परमेश्वराशी’ – ‘कॉन्व्हर्सेशन विथ गॉड’.ही वाटचाल तुमची, माझी, सगळ्या मानवजातीची आहे. ‘कॉन्व्हर्सेशन विथ गॉड’ या मालिकेतल्या या दुसऱ्या पुस्तकातल्या शेवटच्या भागात संपूर्ण मानवजातीच्या एकत्रित वाटचालीवर विशेष भर दिलेला आहे.इथंआपल्या पुढे एक आव्हान आहे.आपल्या पृथ्वीवर ज्या पद्धतीनं आपण जगत आहोत, ते फार संयोग्य नाही; ते संकुच कामीआहे, असंयापुस्तकात म्हटलं आहे.काही ठिकाणी आणि काहींच्या बाबतीत तर अतिशय निराशा जनकस्थिती आहे. अजूनही एक मार्ग आहे; पण तो शोधून सापडणार नाही.आपणच तो निर्माण करू शकतो.जुन्या कालबाह्यधारणांना कवटाळून बसलो, तर हा नवा मार्ग निर्माण करता येणार नाही.त्यासाठी नव्या धारणा, देवाबद्दलचा नव्या कल्पना आणि जगाला प्रकाशाकडे नेणाऱ्या नव्या वाटायां कडे खुल्यादिलानं बघायला हवं.या नव्या वाटागोष्टींचा मोकळ्या मनानं विचार करायलाहवा.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SANVADPARMESHWARASHIPART-2 #CONVERSATIONSWITHGODPART-II #संवादपरमेश्वराशीभाग२: #PHILOSOPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VRUSHALIPATWARDHAN #वृषालीपटवर्धन #NEALEDONALDWALSCH "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 17-04-2016

    मानव जातीच्या कल्याणासाठी केलेले विचारमंथन... लेखक दक्षिण ओरॅगॉन प्रांतात नॅन्सी इथं राहतात. माणसांना स्वत:ची ओळख व्हावी, या उद्देशाने ना नफा तत्त्वांवर एक प्रतिष्ठान सुरू केले आहे. माणसांची वैयक्तिक प्रगती होऊन आध्यात्मिक समज निर्माण करण्याच्या दृषटीने हे प्रतिष्ठान काम करते. स्वत: वॉल्श अमेरिकेत फिरून व्याख्यानं देतात आणि कार्यशाळा आयोजि करून ‘संवाद परमेश्वराशी’ या पुस्तकातील संदेशाचा प्रचार-प्रसारही करतात. माणसाच्या आध्यात्मिक वाटचालीबद्दल सर्व काही म्हणजे हा ‘संवाद परमेश्वराशी’ ही वाटचाल सगळ्या मानवजातीची आहे. सगळ्या मानवजातीच्या एकत्रित, संयुक्त वाटचालीवर या पुस्तक मालीकेतल्या ‘संवाद परमेश्वराशी’ या दुसऱ्या पुस्तकात विशेष भर दिला आहे. इथे आपल्या पुढे एक आव्हान दिलेलं आहे. या पृथ्वीवर आपण पद्धतीने जगत आहोत ते फारसं योग्य नाही, तसं ते कुचकामी आहे, असं या पुस्तकात म्हटलं आहे. काही ठिकाणी आणि काहींच्या बाबतीत तर अतिशय निराशाजनक स्थिती आहे. अजूनही एक मार्ग आहे, पण तो शोधून सापडणार नाही, तो आपण निर्माणच करू शकतो आणि जुन्या कालबाह्य कल्पनांना, विवादांना बसलो तर हा नवा मार्ग निर्माण करता येणार नाही. त्यासाठी नव्या कल्पना देवाबद्दलच्या नव्या कल्पना आणि जगाला प्रकाशाकडे नेणाऱ्या आयुष्याच्या नव्या धारणा याकडे खुल्या मनाने बघायला हवं. या नव्या गोष्टींचा मोकळ्या मनाने विचार करायला हवा. अशा नवीन कल्पनांचं हे पुस्तक आहे. ते तुम्हाला वेगळी दृष्टी देऊ करतं आणि हे कमी महत्त्वाचं नाही. एखाद्या नुसत्या बौद्धिक प्रयोगापेक्षा हे मोठं आहे. कारण तुमच्या दृष्टिकोनांतून तुमची आकलनशक्ती निर्माण होते. आकलनातून आशा धारणा निर्माण होतात. धारणांतून तुमचं वर्तन व्यक्त होतं. वर्तनातून अनुभव आणि अनुभवातून आपलं वास्तव निर्माण होतं. हे एक चक्र आहे. घड्याळाच्या दिशेनं त्याचे काटे फिरतात आणि तुमची धारणा हा यातला, बाराचा सर्वोच्च काटा आहे. माणसाची धारणा बदलण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे याखेरीज आणखी एखादा मार्ग आहे, असा आभास निर्माण करणं, असं दाखवणं ‘एखाद्या गोष्टीबद्दलची आपली धारणा, आपला दृष्टिकोन हाच एकमेव आहे. निदान एकमेव योग्य मार्ग आहे.’ असंच अनेकांना वाटत असतं. जग बदलायचं असेल, तर माणसांच्या विचारांना नवी दिशा द्यायला हवी. लाखो वर्षांत माणसांच्या वागण्यात फरक पडलेला नाही. आजही आपण अश्मयुगीन माणसासारखेच हिंसक वागतोय. जीवनापासून आपण फारकत घेतली आहे. असंच आजही आपण खरंच कोण आहोत आणि भोवतालच्या प्रत्येक गोष्टीशी, चराचराशी आपले नेमकं खरं नाव काय आहे, याची आपल्याला कल्पनाच नसते. वर्तनाच्या पातळीवर बदल घडवण्याचं आव्हान आपण घेत राहणार असू तर विशिष्ट वागणं रोखण्यासाठी काहीतरी करणारच. पण ते क्षणभरच. तेसुद्धा सक्ती करून! पण ही जुलूम, जबरदस्ती थांबली की जुना स्वभाव, धरणा आणि त्यामुळे तसं वागणं पुन्हा डोके वर काढू शकतं. परमेश्वराचा जगाला संदेश आहे- ‘माझ्याबद्दल तुमचा चुकीचा समज आहे.’ हा संदेश जग बदलू शकेल असे लेखकाला वाटते. त्यांच्या मते हे पुस्तक खूपच परिणामकारक आहे. यातलं ज्ञान स्वयंभू आहे. मन लगेच शांत होते. मनावर हळुवार फुंकर घालणारं असं हे पुस्तक आहे. ‘प्रिय परमेश्वरा, तू सतत आमच्याबरोबर असतोस. हे ठाऊक आहे. तुझ्याशी आम्ही एकरुप आहोत. कसलंच द्वैत नाही. हाच अद्वैतानुभव घेण्यासाठी आम्हाला मदत कर. हरघडीला या सत्याचा प्रत्यय येतो. आमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला स्वत:च्या अस्तित्वाबद्दल पूर्णत्व आणि श्रीमंती समृद्धीचा अनुभव घ्यायला हवा. ही श्रीमंती, परिपूर्णता, चमत्कार आणि चातुर्य, शांती आणि काटेकोरपणा हीच आपली खरी ओळख आहे. त्यातूनच आपलं आयुष्य सुखकर आणि आपलं जग सुखद होणार आहे.’ आमेन, आमेन (लेखकाचा उदात्त विचार) माणसाच्या आध्यात्मिक वाटचालीबद्दल सर्वकाळी म्हणजे हा, ‘संवाद परमेश्वराशी.’ ही वाटचाल तुमची सगळ्या मानवजातीची आहे. या मालिकेतील या दुसऱ्या पुस्तकातल्या शेवटच्या भागात संपूर्ण मानव जातीच्या एकत्रित वाटचालींवर भर दिलेला आहे. इथे आपल्यापुढे एक आव्हान आहे. आपल्या पृथ्वीवर ज्या पद्धतीने आपण जगत आहोत, ते योग्य नाही. ते कुचकामी आहे. काही बाबतीत अतिशय निराशाजनक स्थिती आहे. अजूनही एक मार्ग आहे; पण तो शोधून सापडणार नाही. तो आपणच निर्माण करू शकतो. जुन्या धारणांना कवटाळून हा नवा मार्ग निर्माण करता येणार नाही. देवाबद्दलच्या नव्या कल्पना आणि जगाला प्रकाशाकडे नेणाऱ्या नव्या वाटा खुल्या दिलानं बघायला हव्या. या नव्या गोष्टींचा मोकळ्या मनान विचार करायला हवा. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 08-05-2016

    माणसाच्या आध्यात्मिक वाटचालीबद्दल सर्वकाही म्हणजे हा संवाद परमेश्वराशी ‘कॉव्हर्सेशन विथ गॉड’. ही वाटचाल तुमची, माझी, सगळ्या मानवजातीची आहे. ‘कॉव्हर्सेशन विथ गॉड’ या मालिकेतल्या या दुसऱ्या पुस्तकातल्या शेवटच्या भागात संपूर्ण मानवजातीच्या एकत्रित वाटचलीवर विशेष भर दिलेला आहे. इथं आपल्यापुढे एक आव्हान आहे. आपल्या पृथ्वीवर ज्या पद्धतीनं आपण जगत आहोत, ते फारसं योग्य नाही; ते तसं कुचकामी आहे, असं या पुस्तकात म्हटलं आहे. काही ठिकाणी आणि काहींच्या बाबतीत तर अतिशय निराशाजनक स्थिती आहे. अजूनही एक मार्ग आहे : पण तो शोधून सापडणार नाही. आपणच तो निर्माण करू शकतो. जुन्या कालबाह्य धारणांना कवटाळून बसलो, तर हा नवा मार्ग निर्माण करता येणार नाही. त्यासाठी नव्या धारणा, देवाबद्दलच्या नव्या कल्पना आणि जगाला प्रकाशाकडे नेणाऱ्या नव्या वाटा यांकडे खुल्या दिलानं बघायला हवं. या नव्या गोष्टींचा मोकळ्या मनानं विचार करायला हवा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more