* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SUNO BHAI SADHO
  • Availability : Available
  • Translators : PRADNYA OAK
  • ISBN : 9789386342096
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 148
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : PHILOSOPHY
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 37 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GAUTAM BUDHHA, MAHAVIR, GURUNANAK, SHRI RAMKRISHNA AND KABIR...... WHY KABIR IS DIFFERENT FROM THEM? OSHO ANSWERS THROUGH HIS STUDIOUS INTERPRETATION. OSHO NARRATERS BEAUTIFULLY HOW ‘LOVE’ DOES MIRACLES & OPENS THE DOOR OF SPIRITUAL WORLD. ONE THING IS SURE OSHO’S DISCOURSE MAKE US ‘AWAKE’ FROM ‘DEEP SLEEP’.
माणसाच्या मनात उलटसुलट विचारांचा आणि विकारांचा गुंता असतो; त्यामुळे परमात्मा, सत्य यापर्यंत तो पोहोचू शकत नाही. विचारांच्या आणि विकारांच्या गुंत्यामुळे माणूस जीवनभर अशांत, अतृप्त, अपूर्ण, असंतुष्ट आणि अहंकारी राहतो; त्याची या गुंत्यातून सुटका होऊन तो परमात्म्यापर्यंत, सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी संतांचे विचार मार्गदर्शक ठरतात. संत कबीरांच्या दोह्यांतून असंच अमूल्य मार्गदर्शन मिळतं. कबीरांच्या दोह्यांमुळे ओशोही प्रभावित झाले आणि त्यांच्या प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी कबीरांच्या काही दोह्यांवर विस्तृत भाष्य केलं. तर ओशोंच्या अशा काही प्रवचनांचं संकलन ‘प्रेमरस...कबीराचा’ या पुस्तकात करण्यात आलं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
PREMRAS…KABIRACHA# PRADNYA OAK# BHAKTI KA MARAG ZINA RE# GHUNGHAT KE PAT KHOL RE #SUNO BHAI SADHO# RAS GAGAN GUFA ME AJAR JHARAI# MAN MAST HUWA TAB KYO BOLE# DHYAN# KARM# BHAKTI# PARMATMA# NAJUK
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more