RAJESH PANDEY`S BOOK `GUINNESSGATHA` IS A BOOK THAT WILL GUIDE EVERYONE. THE WORK OF SERVING THE COUNTRY, WHICH STARTED FROM THE AKHIL BHARATIYA VIDYARTHI PARISHAD, HAS REACHED TWELVE WORLD RECORDS STEP BY STEP. IT IS A STORY, PRESENTED WITH THE HELP OF FIELD ART, OF HOW THEY HAD TO FACE VARIOUS DIFFICULTIES AT EVERY STEP WHILE MAKING THESE TWELVE WORLD RECORDS AND HOW THEY UNITEDLY ACHIEVED EACH WORLD RECORD WITHOUT GIVING UP. THESE TWELVE WORLD RECORDS, WHICH RAJESH PANDEY, WHO IS GUIDED BY THE IDEA OF ??`EMPOWERING THE YOUTH, THAT IS, EMPOWERING THE NATION`, HAVE CREATED WITH THE HELP OF THE YOUTH, MAKE EVERY READER REALIZE THAT WE TOO CAN ACHIEVE THIS.
राजेश पांडे यांचं ‘गिनीजगाथा’ हे पुस्तक म्हणजे प्रत्येकाला दिशादर्शक ठरणारं पुस्तक आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून मजल दरमजल करत केलेली देशसेवेच्या कार्याची सुरुवात, बारा विश्र्वविक्रमांपर्यंत येऊन पोहोचली आहे. हे बारा विश्र्वविक्रम करताना त्यांना प्रत्येक पावलागणिक विविध अडचणींचा सामना कसा करावा लागला आणि हार न मानता एकजूट होऊन प्रत्येक विश्र्वविक्रम कसा सध्या केला याची स्थल-कलासहित मांडलेली कहाणीच आहे. ‘तरुणांना सशक्त करणं, म्हणजेच राष्ट्राला सशक्त करणं’ या विचारानं चालणारे राजेश पांडे यांनी तरुणांच्या साथीनं सांधलेले हे बारा विश्र्वविक्रम प्रत्येक वाचकाला आपणही हे साध्य करू शकतो ही जाणीव करून देणारे आहेत.