* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEMOCRACYS XI
  • Availability : Available
  • Translators : MEGHNA DHOKE
  • ISBN : 9789353171308
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 512
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SPORTS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NOTHING UNITES INDIA LIKE CRICKET. THE INDIAN TEAM IS A GLORIOUS MIX OF PEOPLE FROM DIFFERENT RELIGIONS, CLASSES, CASTES, REGIONS AND LANGUAGES; WHERE THE SON OF A PUMP MANAGER FROM RANCHI IS TIGHTLY BOUND IN FATE AND DETERMINATION TO THE CHILD PRODIGY OF A MARATHI PROFESSOR FROM MUMBAI AND A MUSLIM FROM THE BACK ALLEYS OF HYDERABAD. AND WHILE DYNASTS CAN RULE THE ROOST IN POLITICS AND BOLLYWOOD, CRICKET IS A MERITOCRATIC SPACE. BUT IT WASN`T ALWAYS THIS WAY. GANDHI, FOR INSTANCE, INTENSELY DISAPPROVED OF CRICKET. DURING THE RAJ IT WAS ASSOCIATED WITH RACISM. IT HAD THE NASTY ODOUR OF COMMUNAL DIVISION, WITH HINDUS AND MUSLIMS PLAYING IN SEPARATE TEAMS. DALITS, MEANWHILE, WERE PERSONAS NON GRATA ON THE FIELD. BESTSELLING AUTHOR AND JOURNALIST RAJDEEP SARDESAI NARRATES THE STORY OF POST-INDEPENDENCE CRICKET THROUGH THE LIVES OF ELEVEN EXTRAORDINARY INDIAN CRICKETERS WHO REPRESENT DIFFERENT DIMENSIONS OF THIS CHANGE - FROM DILIP SARDESAI AND TIGER PATAUDI IN THE 1950S TO M.S. DHONI AND VIRAT KOHLI TODAY. THIS IS NOT A BOOK ABOUT AN ALL-TIME BEST INDIAN CRICKET ELEVEN BUT ONE THAT SEEKS TO SHOW US GLIMPSES OF A CHANGING INDIA THROUGH PERSONAL AND ANECDOTAL BIOGRAPHICAL PORTRAITS. FROM THE DAYS THAT INDIAN CRICKETERS TRAVELLED BY TRAIN AND EARNED A FEW HUNDRED RUPEES FOR TEST MATCHES TO THE BRIGHT LIGHTS OF THE MULTIMILLION-DOLLAR IPL, THIS BOOK PUTS THE SPOTLIGHT ON THE EVOLUTION OF INDIAN CRICKET AND SOCIETY, AND SHOWS HOW A POST-COLONIAL NATION FOUND SELF-RESPECT.
स्वातंत्र्योत्तर सुरुवातीच्या काळात भारतीय क्रिकेट हा खेळ तत्कालीन संस्थानिक, अभिजन, श्रीमंत अशा विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असायचा. ‘शाही रंजन’ असेच क्रिकेटचे स्वरूप होते. संस्थाने खालसा झाल्यानंतर कालौघात बदलत्या राजकीय परिस्थितीशी समांतर क्रिकेटची व्याप्ती इतरेजनात वाढत गेली. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक स्थित्यंतर होत असताना भारतीय क्रिकेटमध्ये विकासात्मक परिवर्तन होत गेले. त्या काळापासून ते आजच्या ‘नं-१ पोझिशन’पर्यंत यायला काही दशकांचा कालावधी उलटावा लागला. याच काही दशकांच्या कालावधीत अनेक गुणी खेळाडूंनी क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरले. ‘प्रिंट व इलेक्टॉनिक मीडिया’चे नामवंत पत्रकार आणि माजी कसोटीपटू दिलीप सरदेसाई यांचे चिरंजीव राजदीप सरदेसाई यांनी आजवरच्या क्रिकेटपटूंमधील आदर्श ११ जणांची निवड केली (खरेतर बहुतांश वाचकांच्या मनातले हेच आदर्श क्रिकेटर आहेत) आणि प्रत्येक खेळाडूची कारकीर्द वाचकांपुढे मांडली आहे. या ११ कीर्तिमान खेळाडूंची चरित्रकहाणी राजदीप यांनी शब्दबद्ध केली आहे. प्रस्तुत पुस्तकात त्यांची कारकीर्द आकडेवारीसह येतेच, पण त्यांचे मैदानावरील आणि मैदानाबाहेरील आयुष्याचे उद्धृत केलेले संदर्भ संक्षिप्त तरीही परिपूर्ण वाटतात. त्या त्या खेळाडूच्या खेळातील व खेळाबाहेरील गुणदोषांचे सटीक आणि सटीप विश्लेषण राजदीप करतात. या खेळाडूंच्या आयुष्यातील क्रिकेटचा ‘उपोद्घात’ (अर्थात प्रारंभ) आणि ‘सिंहावलोकन’ (अर्थात निवृत्ती) असा सर्वसमावेशक तपशील वाचकांना अवगत होतो. राजदीप स्वत: क्रिकेट खेळले आहेत. आनुवंशिक वारसा म्हणून क्रिकेट त्यांच्या रक्तातच आहे. म्हणूनच त्यांचे क्रिकेटविषयीचे विश्लेषण अनुभवाच्या मुशीतून आलेले आहे. एखाद्या खेळाडूविषयी लिहिताना क्रिकेटमधले धुरीण, बुजुर्ग आणि समकालीन क्रिकेटपटूच्या मतमतांतराची पुस्तकात असलेली पखरण हा तर खास ‘राजदीप टच’ म्हणावा लागेल. एखाद्या खेळाडूचे फक्त गुणवर्णन, त्याचे विक्रम आणि आकडेवारी, त्याची विश्वस्तरीय कामगिरी, त्याची शैली, त्याचे कौशल्य, देशातील आणि जगभरातील लोकप्रियता याचेच वर्णन पुस्तकात येते असे नाही. तर त्या खेळाडूचे दोष, त्याच्या चुका, त्याच्या वर्तनातील विसंगती, त्याचे फसलेले निर्णय, त्याच्याविषयीचे प्रवाद आणि समज, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ‘दुसरी’ बाजू असे समग्र चित्र उभे करताना राजदीप शब्दांची कंजुषी करत नाहीत. उलट त्यांच्या लिखाणाला परखडतेची धार येते. राजदीप यांची भाषा प्रवाही आहे. त्यात लालित्य आहे आणि सौंदर्यही... विषयाच्या ओघात आलेली त्यांची काही पल्लेदार वाक्ये पाहू : त्या सभ्य काळाचं दिलीप सरदेसाई हे ‘पॉडक्ट’ होतं... भविष्याच्या पोटात उमेदीचा गर्भ श्वास घेऊ लागला... त्याच्या बॅटमधून धावांचे झरे फुटत होते... आक्रमण हाच बचावाचा उत्तम मार्ग असतो... रिचर्ड्सच्या उंच उडालेल्या चेंडूवर कपिलची नजर रुतलेली होती... ज्या वयात गणित शाळकरी मुलांना घाम फोडतं, त्या वयात हा मुलगा नवीन समीकरणं जुळवत होता... ‘तो’ षटकार म्हणजे आपल्या आगमनाचा तेंडुलकरी ऐलानच होता... याच काळात क्रिकेटचं कॉमर्सशी लग्न झालं... विकासाच्या वाटेत इंडिया पुढे निघून गेला; भारत मात्र मागेच राहिला... पुस्तकात ठायी ठायी असलेली अशी वाक्यं राजदीपच्या प्रतिभेची, लेखनकौशल्याची आणि कल्पनाविलासाची प्रचिती देतात. चिवडा खाताना घासात काजूचा तुकडा यावा, अशीच ही खुमासदार वाक्यं आहेत. मेघना ढोके यांचं अनुवाद कौशल्य लाजबाब आहे. अस्सल मराठीकरणाचा हा उत्तम नमुनाच आहे. राजदीपच्या लेखनाची खुमारी मेघनाने दुणावली आहे. आजच्या काळात क्रिकेट न आवडणारा विरळाच. पण असलाच, तर त्याने हे पुस्तक आवर्जून वाचावे. कदाचित त्याला क्रिकेट श्वासाइतकेच महत्त्वाचे वाटू लागेल...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAJDEEPSARDESAI#DILIPSARDESAI#DEMOCRACYSXI#INDIANCRICKET#MANSURALIKHANPATAUDI#BISHANSINGHBEDI#MEGHANA DHOKE#SUNILGAVASKAR#KAPILDEV#MOHAMMEDAZHARUDDIN#SACHINTENDULKAR#SOURAVGANGULI#RAHULDRAVID#MAHENDRASINGDHONI#VIRATKOHLI# #भारतीय क्रिकेट# राजदीप सरदेसाई# मेघना ढोके#डेमेक्रसीज इलेव्हन#सचिन तेंडूलकर# दिलीप सरदेसाई# मन्सूर अली खान पत्तोडी#बिशन सिंग बेदी# सुनील गावसकर#कपिल देव# मोहम्मद अझरुद्दीन#सौरभ गांगुली#राहूल द्रविड#महेंद्रसिंग धोनी#विराट कोहली#
Customer Reviews
  • Rating Starनीतिन आरेकर

    राजदीपजी, नमस्कार, मी प्राध्यापक नीतिन आरेकर. तुम्ही क्रिकेट खेळत होता तेव्हाही तुम्हाला पाहिलं होतं, अकाली क्रिकेट का सोडलंत तो प्रश्न मनात ठेवून मी तुमचे विविध शोज नेहमीच पाहात होतो. आज तुमचं डेमॉक्रसीज इलेव्हन हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. हा कवळ क्रिकेटचाच नव्हे तर भारतीय लोकशाहीचा घेतलेला धांडोळा आहे. प्रत्येक खेळाडूला अभ्यासताना तुम्ही समकालीन सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक घडामोडी यांचा अर्थ भारतीय मानसाशी लावण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. संस्कृतीच्या विविध क्षेत्रांशी जवळीक असल्याने व स्वतः क्रीडापटू असल्याने तुम्हाला हे सर्व अतिशय चांगल्या रीतीने तपासता आलं. भारतात अशी पुस्तकं लिहिली जात नाहीत. तुम्ही ती उणीव भरून काढलीत, मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद!! ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 13-07-2019

    क्रिकेटचा रंजक इतिहास... ‘डेमोक्रसीज इलेव्हन – भारतीय क्रिकेटची महान गाथा’ हे पुस्तक म्हणजे क्रिकेटचा रंजक इतिहास आहे. या पुस्तकामधून भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ११ महान खेळाडूंचा प्रवास मांडलेला आहे. १९६०च्या दशकामध्ये खेळणारे दिलीप सरदेसाई आणि नाब पतौडी यांच्यापासून सुरुवात होते आणि आत्ताच्या महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली या खेळाडूंपर्यंत लेखक आपल्याला आणून सोडतो. भारतीय क्रिकेटच्या उत्क्रांतीची गोष्ट सांगणारे हे पुस्तक भारतीय क्रिकेट आणि भारतीय समाज कसा बदलत गेला हे स्पष्ट करते. ...Read more

  • Rating StarDaily Lokmat 9th June 19

    एक देश म्हणून भारताची जी काही जागतिक स्तरावरील वैशिष्ट्ये आहेत, त्यामध्ये लोकसंख्येचा विचार करता ‘सर्वांत मोठी लोकशाही’ आणि ‘क्रिकेटवेड्यांचा देश’ यांचा समावेश होतो. देशावर ब्रिटिशांचा अंमल असताना त्यांनी आपल्या विरंगुळ्यासाठी क्रिकेट नावाचे जे रोपटंइथं लावलं, रुजवलं... त्याचा आता महावृक्ष झालाय. या महावृक्षाचा पसारा इतका विस्तारलाय, की या खेळाच्या जन्मदात्यासह संपूर्ण क्रिकेटविश्व त्याच्या कवेत आलं आहे. या खेळाची रुजवात भारतात होत असताना येथील मातीचा गुणही त्याला लागला. क्रिकेट जगतात ठसा उमटविणारी अनेक रत्नं आपल्या देशानं दिली. अशा ११ रत्नांच्या आयुष्याचा ‘लोकशाहीमय’ पट वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या शैलीनं मांडण्याचा यशस्वी प्रयत्न ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि एका क्रिकेटपटूच्या पोटी जन्मलेले राजदीप सरदेसाई यांनी या पुस्तकातून केला आहे. सर्वकालीन महान भारतीय संघाविषयी हे पुस्तक नाही. भारतीय क्रिकेटला आकार देणाºया, यशाचा बॅटन पुढील पिढीच्या हाती देणाऱ्या, जगण्याच्या लढाया लढण्याचं बळ देणाऱ्या, भारतीयांना स्वप्न पाहण्याची; ती पूर्ण करण्याची हिंमत देणाऱ्या ११ खेळाडूंविषयी हे पुस्तक असल्याचं लेखक नमूद करतात. अर्थात ‘डेमोक्रसीज इलेव्हन -`Democracy`s XI - The great Indian Cricket Story`... भारतीय क्रिकेटची महान गाथा’ या पुस्तकामध्ये राजदीप यांनी वडील दिलीप सरदेसाई यांच्यासह मन्सूर अली खान पतौडी, बिशनसिंग बेदी, सुनील गावसकर, कपिलदेव, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या आजी-माजी दिग्गजांची जडणघडण, खेळाडू आणि व्यक्ती म्हणून वाटचाल, यश-अपयश, आव्हाने, विक्रम, निवृत्तीनंतरचं जीवन, त्यांचं भावविश्व, मजेशीर किस्से यांसह भोवतालची सामाजिक परिस्थिती अशा खुबीनं शब्दबद्ध केली आहे, की वाचणाºयाला जणू हे आपल्या नजरेसमोर घडत असल्याचा भास होतो. ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीत कार्यरत पत्रकार मेघना ढोके यांनी तितक्याच ताकदीचा अनुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. हे पुस्तक उपरोक्त ११ खेळाडूंबद्दलच माहिती देत नाही, तर १९६०च्या दशकाच्या प्रारंभी कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारे दिलीप सरदेसाई ते वर्तमान भारतीय संघाचा कर्णधार कोहलीच्या काळापर्यंत भारतीय क्रिकेटचा इतिहासदेखील सांगते. गोव्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा ते भारतीय संघातील भरवशाचा फलंदाज म्हणून नाव कमावलेले सरदेसाई... राजघराण्यात जन्माला आलेले, अपघातात उजवा डोळा निकामी झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी भारतीय संघात स्थान मिळविणारे, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे ‘टायगर’ हे नाव सार्थ ठरविणारे मन्सूर अली खान पतौडी... भारतीय संघाची नकारात्मक मानसिकता बदलून ताठ मानेने खेळण्याची प्रेरणा देणारे, विंडीजसकट जगभरातील वेगवान गोलंदाजांचा समर्थपणे सामना करून सर्वांत प्रथम १० हजार कसोटी धावांचा टप्पा गाठणारे विक्रमादित्य सुनील गावसकर... फिरकीपटूंचा देश ही ओळख मिटवून सर्वाधिक कसोटी बळींचा विक्रम आपल्या नावे करणारे वेगवान गोलंदाज तसेच जागतिक दर्जाचे अष्टपैलू कपिलदेव... हैदराबादच्या गल्लीत वाढलेला मुस्लिम तरुण ते नजाकती मनगटी फटक्यांचे नैसर्गिक कोंदण लाभलेला आणि ऐतिहासिक पदार्पणाद्वारे जगभरातील समीक्षकांची वाहवा मिळविणारा अझर, मुंबईत प्राध्यापकाच्या घरी जन्माला येऊन आपल्या अफाट कर्तृत्वाद्वारे फलंदाजीला नवे जागतिक आयाम देणारा सचिन... संपन्न घरात जन्मलेला बंगाली मुलगा ते इतर संघांना ‘अरे’ला ‘कारे’ म्हणून उत्तर देण्याची सवय भारतीय संघाला लावणारा आक्रमक कर्णधार सौरव गांगुली... रांचीतला पेट्रोल पंप आॅपरेटरचा मुलगा ते भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून देणारा कर्णधार, अशा आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविणारी वाटचाल करणारा धोनी... बालपणापासून बेधडक आणि काहीसा मुजोर स्वभाव असलेला, १८ व्या वर्षी रणजी सामना खेळत असताना वडिलांचे निधन झाल्याचे दु:ख बाजूला ठेवून त्याच दिवशी संघाला संकटातून बाहेर काढणारी खेळी करणारा विराट ते कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा सर्वच प्रकारांत स्वत: चांगली कामगिरी करून सहकाºयांना प्रेरणादायी नेतृत्व देणारा कर्णधार... असा खिळवून ठेवणारा या खेळाडूंचा प्रवास राजदीप यांनी चितारला आहे. इतर खेळांप्रमाणे क्रिकेटमध्येही घराणेशाहीला थारा नाही. इथं मैदानावर कामगिरी करा; नाही तर बाहेर व्हा, हाच नियम असतो. हे समजावून सांगताना राजदीप यांनी प्रस्तावनेत सुंदर उदाहरण दिलं आहे... ‘‘राजकीय नेत्याच्या मुलाला राजकारणात सहज जागा मिळू शकते. वाडवडिलांच्या पुण्याईवर विधानसभा-लोकसभेची निवडणूकही जिंकू शकतो. आमदार, खासदार, मंत्री होऊ शकतो. घराणेशाहीचा लाभ घेत बड्या उद्योगपतींची मुलं मोठ्या पदांवर जाऊन बसतात. अभिनेता-अभिनेत्रींच्या मुलांना सिनेमात सहज संधी मिळते. क्रिकेटमध्ये हे शक्य नाही. अफाट गुणवत्ता आणि सर्वोत्तम कामगिरी याशिवाय भारतीय संघात स्थान मिळविणे शक्य नाही.’’ ‘कुणाचा तरी मुलगा’ या पात्रतेच्या आधारे भारतीय संघात स्थान मिळत नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी रोहन गावसकर आणि स्वत:चा दाखला दिला आहे. राजदीप यांनी पुस्तक लिहिताना लेखक म्हणून प्रामाणिकपणा आणि तटस्थपणा जपल्याचे सिद्ध करण्यास हे उदाहरण पुरेसं ठरावं. प्रजासत्ताक भारताचा पाया रचताना घटनेने सर्व नागरिकांना समान संधींचं आकाश उपलब्ध करून दिलं. क्षमतेच्या बळावर गगनभरारी घेता येते, हे भारतीय क्रिकेटने सिद्ध करून दाखविलं आहे. संधीची समानता या लोकशाही मूल्यावर विश्वास ठेवून स्वप्ने पूर्ण करता येतात, या वाचकांच्या विश्वासाला बळकटी देण्याचं काम पुस्तकात उल्लेख असलेल्या ११ खेळाडूंची वाटचाल खचितच करते. हेच या पुस्तकाचं यश आहे. -अमोल मचाले ...Read more

  • Rating StarEknath Marathe

    डेमोक्रसीज इलेव्हन, भारतीय क्रिकेटची महान गाथा, राजदीप सरदेसाई, मराठी भाषांतर मेघना ढोके. भारतीयांचे क्रिकेट वेड अफाट आहे. क्रिकेटर तर देवासारखे पूजनीय आहेत. राजदीप सरदेसाई या स्वतः क्लब लेवल क्रिकेट खेळलेल्या पत्रकाराने हे इंग्रजीत लिहिले आहे व ह त्याचा ओघवता मराठी अनुवाद आहे. क्रिकेटचे विश्व गाजवून सोडणारे 11 भारतीय क्रिकेटपटूंचा अनोखा परिचय, ते जसा उदयाला आले, त्या क्रमाने करून देण्यात आला आहे. सगळ्यात आधी आहेत, लेखकाचे वडील, दिलीप सरदेसाई, गोव्याचे एकमेव कसोटीपटू ! सर्वात शेवटी आहे विराट कोहली ! या पुस्तकात नुसते क्रिकेट नाही तर क्रिकेटला देशाच्या अर्थकारण, राजकारण, समाजकारण या अंगाशी जुळवून बघितले आहे. क्रिकेटवर आधी असलेला शहरी, पदवीधर खेळाडूंचा असलेला प्रभाव ते ग्रामीण व शिक्षण अर्धवट सोडलेले खेळाडू असा छान उलगडला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये झालेली स्थित्यंतरे व तेव्हाचे राजकारण यांची सुद्धा छान संगती लावलेली आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more