Swati Shailesh Lodha

About Author


SWATI AND SHAILESH LODHA VERY THOUGHTFULLY ESTABLISHED AN ORGANIZATION CALLED SWASH TO BRING ABOUT THE PROGRESS OF PEOPLE.

लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी स्वाती व शैलेश लोढा यांनी अत्यंत विचारपूर्वक स्वाश नावाची एक संस्था स्थापन केली. COMMUNICATION CONNOISSEUR हा त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम स्वत:ला समजून घेण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यांच्या कार्यशाळांमध्ये हास्य व शिक्षण यांचा अनोखा संगम असतो. पन्नास तासांच्या दीर्घ कार्यशाळांमध्ये भाग घेणाNया लोकांची मनोवृत्ती आणि वागणूकही बदलते. त्यांच्या चिकाटीच्या प्रयत्नांबद्दल त्यांना अमेरिकेतील हार्डिंग विद्यापीठाकडून प्रशाQस्तपत्रही मिळाले आहे. स्वाती लोढा यांनी वयाच्या सतराव्या वर्षी लेखनाला सुरुवात केली. एकविसाव्या वर्षी स्वाश ही संस्था स्थापन केली. आता त्या स्वाशच्या संचालिका आणि जोधपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेच्या कार्यक्रम संचालिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांची प्रामाणिक आणि सरळमार्गी वृत्ती लोकांना आदर्श वाटते. त्यांची शिस्त आणि चिकाटी लोकांसाठी प्रेरणादायी ठरते. शैलेश लोढा यांनी दहाव्या वर्षीच स्टेज-शो करण्यास सुरुवात केली. त्यांचे विनोदी कार्यक्रम जगभर लोकप्रिय आहेत. हजारो लोकांनी त्यांचे कार्यक्रम बघितले आहेत आणि प्रमुख वक्ता म्हणून त्यांची भाषणे ऐकली आहेत. आम्ही जेव्हा एका माणसाला बदलू शकतो, तेव्हा एक जग आम्ही बदललेलं असतं. असा या जोडप्याचा विश्वास आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHALA UTHA KAMALA LAGA Rating Star
Add To Cart INR 195

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
वैशाली देशमुख (पांडे), अमरावती.

काल लायब्ररीतून `छाटीतो गप्पा` हे लेखक जी.बी.देशमुखांचं पुस्तक घेतलं. एका बैठकीत वाचून संपवलं. साध्या, सोप्या, हलक्याफुलक्या भाषेत सांगितलेल्या रंगतदार गोष्टी वाचताना खूप मजा आली. जीवनाची लज्जत वाढवणाऱ्या आणि त्याचबरोबर अंतर्मुख करणाऱ्या या गप्पा लावाब आहेत! मनाला उभारी देणार असं हलकफुलकं पुस्तक क्वचितच हाती येतं. लेखकाला धन्यवाद. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
अविनाश कुळकर्णी, नागपूर.

जी.बी.देशमुख लिखीत `दुर्दम्य ` पुस्तक आज वाचलं. एका व्यक्ती विशेषचं इतक सरस आणि मार्मिक वर्णन लेखकाने ज्या शैलीत साकारलय ते फारच छान. पुस्तकातील शेवटची ४-५ पानं तर हृदय हेलावून टाकतात. लेखकाकडून असेच सुंदर,बहारदार आणी मार्मिक लेखन होत रहावं हीच दिच्छा. अप्रतिम. ...Read more