Swati Shailesh Lodha

About Author


SWATI AND SHAILESH LODHA VERY THOUGHTFULLY ESTABLISHED AN ORGANIZATION CALLED SWASH TO BRING ABOUT THE PROGRESS OF PEOPLE.

लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी स्वाती व शैलेश लोढा यांनी अत्यंत विचारपूर्वक स्वाश नावाची एक संस्था स्थापन केली. COMMUNICATION CONNOISSEUR हा त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम स्वत:ला समजून घेण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यांच्या कार्यशाळांमध्ये हास्य व शिक्षण यांचा अनोखा संगम असतो. पन्नास तासांच्या दीर्घ कार्यशाळांमध्ये भाग घेणाNया लोकांची मनोवृत्ती आणि वागणूकही बदलते. त्यांच्या चिकाटीच्या प्रयत्नांबद्दल त्यांना अमेरिकेतील हार्डिंग विद्यापीठाकडून प्रशाQस्तपत्रही मिळाले आहे. स्वाती लोढा यांनी वयाच्या सतराव्या वर्षी लेखनाला सुरुवात केली. एकविसाव्या वर्षी स्वाश ही संस्था स्थापन केली. आता त्या स्वाशच्या संचालिका आणि जोधपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेच्या कार्यक्रम संचालिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांची प्रामाणिक आणि सरळमार्गी वृत्ती लोकांना आदर्श वाटते. त्यांची शिस्त आणि चिकाटी लोकांसाठी प्रेरणादायी ठरते. शैलेश लोढा यांनी दहाव्या वर्षीच स्टेज-शो करण्यास सुरुवात केली. त्यांचे विनोदी कार्यक्रम जगभर लोकप्रिय आहेत. हजारो लोकांनी त्यांचे कार्यक्रम बघितले आहेत आणि प्रमुख वक्ता म्हणून त्यांची भाषणे ऐकली आहेत. आम्ही जेव्हा एका माणसाला बदलू शकतो, तेव्हा एक जग आम्ही बदललेलं असतं. असा या जोडप्याचा विश्वास आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHALA UTHA KAMALA LAGA Rating Star
Add To Cart INR 195

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more