NALIN MEHTA

About Author


"PROFESSOR NALIN MEHTA IS DEAN, SCHOOL OF MODERN MEDIA, UPES; ADVISOR, GLOBAL UNIVERSITY SYSTEMS; AND NON- RESIDENT SENIOR FELLOW, INSTITUTE OF SOUTH ASIAN STUDIES, NATIONAL UNIVERSITY OF SINGAPORE. HE IS AN AWARD-WINNING SOCIAL SCIENTIST, JOURNALIST AND AUTHOR WHO HAS HELD SENIOR LEADERSHIP POSITIONS IN MAJOR INDIAN MEDIA COMPANIES AND IN INTERNATIONAL FINANCING INSTITUTIONS LIKE THE GLOBAL FUND IN GENEVA, SWITZERLAND. HE HAS TAUGHT AND HELD RESEARCH POSITIONS AT UNIVERSITIES AND INSTITUTIONS IN AUSTRALIA (ANU, LA TROBE UNIVERSITY), SINGAPORE (NUS), SWITZERLAND (INTERNATIONAL OLYMPIC MUSEUM) AND INDIA (IIM BANGALORE, SHIV NADAR UNIVERSITY). HE WAS PREVIOUSLY EXECUTIVE EDITOR, THE TIMES OF INDIA-ONLINE, WHERE HE LED A NUMBER OF AI-LED TECH INNOVATIONS TO REDEFINE DIGITAL MEDIA. HE HAS ALSO SERVED AS MANAGING EDITOR, INDIA TODAY (ENGLISH TV CHANNEL) AND CONSULTING EDITOR, THE TIMES OF INDIA. MEHTA IS THE AUTHOR OF FIVE BESTSELLING AND CRITICALLY ACCLAIMED BOOKS, INCLUDING INDIA ON TELEVISION (WINNER OF THE ASIAN PUBLISHING AWARD FOR BEST BOOK ON ASIAN MEDIA, 2009), BEHIND A BILLION SCREENS (LONGLISTED AS BUSINESS BOOK OF THE YEAR, TATA LITERATURE LIVE, 2015), AND MOST RECENTLY, DREAMS OF A BILLION (2020, CO-AUTHORED)."

"प्रोफेसर नलिन मेहता युपीईएस स्कूल ऑफ मॉडर्न मीडियाचे डीन आहेत. ग्लोबल युनिव्हर्सिटी सिस्टम्स, इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशियन स्टडीज, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर अशा अनेक संस्थांचे सल्लागार आहेत. ते एक पुरस्कारप्राप्त सामाजिक शास्त्रज्ञ, पत्रकार आणि लेखक आहेत, ज्यांनी प्रमुख भारतीय मीडिया कंपन्यांमध्ये आणि जिनिव्हा, स्वित्झर्लंडमधील ग्लोबल फंड सारख्या आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा संस्थांमध्ये वरिष्ठ नेतृत्व पदे भूषवली आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलिया (ANU, ला ट्रोब विद्यापीठ), सिंगापूर (NUS), स्वित्झर्लंड (आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संग्रहालय) आणि भारतातील (IIM बेंगलोर, शिव नादर विद्यापीठ) विद्यापीठांमध्ये संशोधन आणि अध्यापन केले आहे. ते पूर्वी टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑनलाइन आवृत्तीचे कार्यकारी संपादक होते, जिथे त्यांनी डिजिटल मीडिया पुनर्परिभाषित करण्यासाठी अनेक एआय-नेतृत्वातील तंत्रज्ञान नवकल्पनांचे नेतृत्व केले. त्यांनी इंडिया टुडे (इंग्रजी टीव्ही चॅनल) चे व्यवस्थापकीय संपादक आणि टाइम्स ऑफ इंडियाचे सल्लागार संपादक म्हणूनही काम केले आहे. मेहता हे पाच सर्वाधिक विकल्या खपाच्या आणि समीक्षकांकडून नावाजल्या गेलेल्या पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात इंडिया ऑन टेलिव्हिजन (आशियाई मीडियावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठी एशियन प्रकाशन पुरस्कार, 2009 चे विजेते), बिहाइंड अ बिलियन स्क्रीन्स (वर्षाचे बिझनेस बुक, टाटा लिटरेचर लाइव्ह, 2015), आणि अगदी अलीकडे, ड्रीम्स ऑफ अ बिलियन (2020, सह-लेखक) या पुस्तकांचा समावेश आहे. "
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE NEW BJP Rating Star
Add To Cart INR 999

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more