Dadasaheb More

About Author

Birth Date : 01/06/1961


IN 1984 FOR HIS AUTOBIOGRAPHY GABAL, SHRI. DADASAHEB MALHARI MORE WAS BORN ON 1 JUNE 1961 AT BAWCHI IN SOLAPUR DISTRICT. PRESENTLY RESIDING IN NASHIK, DADASAHEB COMPLETED M. IN FIRST CLASS. A. (MARATHI) DEGREE AND ALSO PASSED THE SET EXAMINATION. HE IS WORKING AS AN ASSOCIATE PROFESSOR IN THE FACULTY OF HUMANITIES AND SOCIAL SCIENCES.

गबाळ या आत्मकथनासाठी १९८४ मध्ये राज्य पुरस्कार मिळणाऱ्या श्री. दादासाहेब मल्हारी मोरे यांचा जन्म १ जून १९६१ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील बावची येथे झाला. सध्या नशिक येथे वास्तव्य असलेल्या दादासाहेबांनी प्रथम श्रेणीत एम. ए. (मराठी) पदवी प्राप्त केली असून, सेट परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत. मानव्य विद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे सहयोगी प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. गबाळ या आत्मकथनाबरोबरच त्यांचे दुस्काळ कादंबरी, विमुक्त कथासंग्रह, अंधाराचे वारसदार कादंबरी हे (मेहता प्रकाशन) व इतर विपुल साहित्यलेखन प्रसिद्ध आहे. गबाळ या आत्मकथनाला राज्य पुरस्काराबरोबरच मुकादम साहित्य पुरस्कार, विमुक्त कथासंग्रहाला मसाप चा आनंदीबाई शिर्के पुरस्कार, अंधाराचे वारसदार (कादंबरी) कार्तिकेय साहित्य पुरस्कार, विळसा कथासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी श्री. मोरे यांचे लेखन नावाजले गेले आहे. कथा, कादंबरी, आत्मकथन या विविध साहित्यप्रकारांबरोबरच दलित साहित्याचे योगदान , शिक्षणातून सामाजिक परिवर्तन , जागतिकीकरण आणि भटक्या-विमुक्त साहित्याचा वाङ्मयप्रवाह असे शोधनिबंध त्यांनी चर्चासत्रांतून सादर केले आहेत. गबाळ चे अनुवाद कन्नड, इंग्रजी, हिंदी भाषांतून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या सकस लेखनावर पीएच.डी संशोधनाबरोबरच अभ्यासक्रमामध्येही ( गबाळ या कादंबरीचा बी.ए अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ, एम. ए. शिवाजी विद्यापीठ, एम. ए. गोंडवना विद्यापीठ, तसेच विमुक्त या कथासंग्रहातील कसरत ही कथा बालभारती पुस्तकात, विमुक्त या कथासंग्रहाचा गुलबर्गा विद्यापीठ ) समावेशाचा सन्मान त्यांना लाभला आहे. कोल्हापूर, बेळगाव, निगवे दुमाला, अहमदापूर येथील निरनिराळ्या संमेलनांचे अध्यक्षपद भूषवण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
ANDHARACHE WARASDAR Rating Star
Add To Cart INR 150
DUSKAL Rating Star
Add To Cart INR 160
GABAL Rating Star
Add To Cart INR 250
VIMUKTA Rating Star
Add To Cart INR 280

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more