VIDNYAN NAVALAI (6 BOOKS) (ANTARAL, APLE PURVAJ, BHUGOL, KHAGOL,PASHU-PAKASHI ANI PRANIJAGAT) by DR.BAL PHONDKE

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669725
  • Edition : 4
  • Publishing Year : JULY 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :DR.BAL PHONDKE COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
N/A
एका उडत्या बोटीनं एका सागरी विमानाला आकाशात नेल होत. आवाजाच्या वेगापेक्षा आपण जास्त वेगाने उड्डाण करू शकतो. हौशी लोकांच्या रॉकेट बनवायच्या स्पर्धा असतात. सॅटर्न ५ या रॉकेटची उंची तीन मजली इमारतीइतकी होती. अंतराळात जवळजवळ दोन लाख टाकाऊ पदार्थांचा कचरा आहे. विश्वास नाही ना बसत? हीच तर विद्यानाची नवलाई आहे. अशा कितीतरी आश्चर्यजनक गोष्टींचा हा नजराणा म्हणजे वैज्ञानिक अलिबाबाची अदभूत गुहांच! आणि ती उघडण्यासाठी कोणाच्याही मंत्राची आवश्यकता नाही. फक्त हि पान उलटा आणि हवी तितकी रत्न लुटा.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarNEWS PAPER REVIEW

    प्रसिद्ध मानसशास्त्र डॉ. सिम्मंड फ्रॉइड याने माणसाच्या मनाचे प्रकट मन व अप्रकट मन असे कप्पे दर्शवून त्याच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि मग माणसाच्या मनाच्या तळघरातील अनेक गूढ, विसंगत, चमत्कारिक विचार विकार व वर्तन यांचा परस्पर संबंध जोडण्याचही प्रयत्न होऊ लागला. माणूस स्वत:शी संवाद साधू लागला तर मनाच्या अंतराळातील चक्राकार फिरत असलेल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा कार्यकारणभाव तो स्वत:च लावू शकतो. वर्षानुवर्षे मनात जपलेली रहस्ये उलगडून दाखवावी, अशी उर्मी येते. ‘अंतराळ’ कादंबरी म्हणजे मनाच्या अशाच एका अवस्थेत प्रथमपुरुषी निवेदनातून केलेले अंतर्मनाचे प्रगटीकरण. कादंबरीची सुरुवात वर्तमानातली. निवेदक आत्म्याशी संवाद साधत पन्नास वर्षांच्या आयुष्यातले अनुभव सांगतो. या आत्मनिवेदनात सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील घटना, समस्या, संघर्ष आहे. कादंबरीचा कालखंड हा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा व सरंजामशाहीचा सरता कालखंड. राजकीय सत्तांतरामुळे काळानुरूप होणारे समाजव्यवस्थेतील बदलांचे उल्लेख कादंबरीत येतात. यातील राणे कुटुंब म्हणजे सरंजामशाही व्यवस्थेचा नमुना. या सरंजामशाहीच्या खुणा, पिढ्यान्पिढ्या रक्तात भिनलेली वैशिष्टये, गुण-अवगुण हे प्रसंग, घटना, संवाद यातून व्यक्त होत राहते. नीतिअनीतीचे मापदंड सरंजामशाहीला लागू नसतात, असे अभिमानाने व धाष्र्टयाने सांगणारा तरुण आजच्या तरुण पिढीच्या बेताल वर्तनावर कोरडे ओढतो हा केवढा विरोधाभास! कादंबरीलेखनाचा उद्देश आत्मनिवेदनाचा आहे पण यात केवळ व्यक्तिगत, कौटुंबिक जीवनाचा पट नाही. त्यास राजकीय स्थित्यंतराची, तत्कालीन परिस्थितीची पाश्र्वभूमी आहे. गांधी-नेहरूंच्या विचारांचा जबरदस्त पगडा असलेली पिढी व नंतरची ध्येयशून्य, तत्त्वशून्य, चंगळवादास बळी पडत चाललेली तरुण पिढी यांच्यातील वैचारिक मतभेद, संघर्ष हे सारे केवळ निवेदनाच्या पातळीवर न राहता परिणामकारक ठरते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे देशातले अनिश्चिततेचे वातावरण, औद्योगिकीकरण, दुष्ट प्रवृत्तींचा प्रादुर्भाव, भ्रष्टाचार यांचा कोवळ्या पिढीवर होणारा परिणाम, आदर्शवाद, उच्च नीतिमूल्ये व निराशा, किळसवाणी स्पर्धा, वशिलेबाजी, हिंसाचार, जातीयता, तत्त्वांची पायमल्ली आधोरेखित होतो. गांधीयुगातील पात्रे, त्यांच्या वेदना परिस्थितीशी तडजोड करण्यातली अगतिकता या वास्तवातली दाहकता वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचते. कारण ही निव्वळ टीका नाही. कृतिशीलता पिढीच्या अंत:करणाची ही तळमळ आहे. प्रस्तुत कादंबरीतील पुजारी मास्तरांचे पात्र स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारताचे चित्र डोळ्यासमोर उभे करते. या पिढीचा मानसिक संघर्ष, तुटलेपण, निराशावाद मास्तरांच्या भावनांच्या उद्रेकातून व्यक्त होते. राजकीय व सामाजिक परिस्थितीवर मास्तर कोरडे ओढतात. ‘‘आजची तरुण पिढी मरण्याआधीच वृद्धांना मारून टाकते,’’ या शब्दात वृद्धांची कालची, आजची व उद्याची समस्या तीव्रतेने मांडली जाते, अशा पिचल्या गेलेल्या पिढीचा संताप ‘गोरी साम्राज्यशाही जाऊन गहूवर्णी साम्राज्यशाही आली,’ अशा शब्दात व्यक्त होतो. गांधीजीसारख्या युगपुरुषाच्या अस्तानंतर त्यांची तत्त्वेही काळाच्या ओघात वाहून जातात हे कठोर वास्तव स्वीकारणे भाग पडते. कादंबरीत येणारे सामाजिक संदर्भ त्यांचे अवलोकन वर्ण धर्माधिष्ठित समाजातील दोन भिन्न संस्कृतीतले अंतर यांचे चित्रण आहे. सरंजामशाही म्हणजे मुक्त वर्तनास मिळालेला परवाना अशी पारंपरिक, बेछूट मनोवृत्ती, तरुण पिढीचे अनिर्बंध स्वातंत्र्य, शिस्तीचा अभाव तर दुसरीकडे पारंपरिक रुढीरीतीरिवाजांशी घट्ट पाळेमुळे असलेली महत्त्वाकांक्षी ब्राह्मणी संस्कृती यांचे चित्रण निवेदक करतो. स्वत:च्या कुळाबद्दलचा अभिमान व्यक्त करताना ब्राह्मणी संस्कृतीवर उपहास गर्भ टीकाही करतो. भौतिक सुखसोयीविषयी वाटते आकर्षण, नैतिक अध:पतन, बदलती नीतीमूल्ये यांचा तरुण पिढीच्या आचारविचारांवर होणारा परिणाम व त्यामुळे निर्माण होणारा कौटुंबिक व सामाजिक स्तरावरील संघर्ष घटनांच्या माध्यमातून चित्रित केला जातो. निवेदक व सरंजामशाहीतील शेवटचा शिलेदार सरंजामशाहीच्या अस्ताची झळा त्यासही लागलेली आढळते. एकीकडे या संस्कृतीच्या प्रभावाखालील असलेले त्याचे व्यक्तिमत्त्व तर दुसरीकडे पुआरे मास्तरांचा, माक्र्सवाद वगैरे सुधारणावाद्यांचा प्रभाव असलेले व्यक्तिमत्त्व यामुळे दुहेरीपण जाणवते. स्वभावत: असलेली पराकोटीची संवेदनशीलता झोवूâन देण्याची वृत्ती यामुळे त्याच्या विचारात नैतिक गोंधळलेपण आहे. ‘मी प्रामुख्याने बुद्धजीवी नाही. बुद्धीच्या पातळीवर जगत नाही. संवेदनाच्या पातळीवर जगतो. या निवेदनातून तो ‘स्व’चा शोध घेत आहे, असे दिसते. म्हणून भावनाप्रधानतेमुळे ब्राह्मण मुलीशी प्रेमलग्न करतो पण त्याच्या विचारात परिपक्वता नसल्याने झोवूâन देण्याच्या वृत्तीतून प्रौढपणीही स्त्रीविषयक अनावर आकर्षणातून आवेगाने ओढला जातो. शरीर पातळीवर प्रेम, आकर्षण, तारुण्यातील कोमल भावनांना आवाहन करून निर्माण झालेले प्रेम व प्रौढ वयातील आवेगाने केलेले प्रेम अशा प्रेमाच्या विविध अवस्था, छटा, रंग यांचे अनुभव धिटाईने व्यक्त केले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याची चाहूल व भविष्यातील उद्रेक तरुण पिढीच्या विशेषत: निवेदक व नंद्या (भिन्न) यांच्या संवादातून जाणवते. निवेदनाच्या भात्यास कधी कधी सार्वकालिक परिमाण लाभतं. मूल्य बदलत असताना चर्चेला वाव नसतो. वेगवेगळ्या मूल्यांचं घर्षण सुरु झालं की, तिथं तडजोड अशक्य असते. त्यावेळी मौन हाच उत्तम मार्ग असतो. एकाच व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू येथे पाहावयास मिळतात. पाश्चात्य विचारसरणीच्या प्रभावातून व्यक्तिवादाचा उदय व वर्णधर्माधिष्ठित समाजास छेद देऊन निर्मितीचे स्वप्न बघणे, शोषण करणाऱ्या व्यक्ति व व्यवस्था नष्ट झाल्या पाहिजेत या माक्र्सवादी विचारांचा प्रभाव असे हे अनेक रंगी व्यक्तिमत्त्व, आदर्शवाद, तंगळवाद, भोगवाद यांच्या गोंधळात सापडलेले त्याचे विचार आहेत. त्यात अपरिपक्वता आहे असेच दिसून येते. ‘आपण हिंदू ना! आपल्याला जगाविषयी आस्थाच नाही’ आपल्याला आस्था पुढच्या जन्माची विंâवा मोक्षाची! अशा शब्दात हिंदू धर्म तत्त्वज्ञानावर उपहासगर्भ टीका तो करतो. आपल्या लेखनाचा हेतू मांडताना ‘‘हा मीपणाचा शोध नाही, त्याहीपेक्षा मी ते सेलिब्रेट करीत आहे. पन्नास वर्षांच्या जीवनाचा एका दृष्टीने ऊहापोह करायचा आहे.’’ माणसातील पराकोटीच्या संवेदनशीलतेमुळे एखाद्या धक्कादायक घटनेचा खास परिणाम होऊन त्या माणसाचा मानसिक तोल ढळू शकतो. कणखर व्यक्तिमत्त्व नसल्यास ही शक्यता अधिक असते यास मानसशास्त्राचा आधार आहे. अशाच एका अत्यंत भावनाप्रधान, अतिसंवेदनशील, आदर्शवादी, चंगळवादी अशा रसायनांनी घडलेल्या व्यक्तिचे हे आत्मनिवेदन या आत्मनिवेदनाला अभिनिवेश नाही पण उत्कट भावनांचे प्रगटीकरण आहे. एक प्रकारचा कबुलीजबाब आहे. प्रौढ वयातही एका स्त्रीमुळे मानसिक तोल ढळू शकणाऱ्या दुबळ्या व्यक्तिचा आत्मशोधही आहे. याच स्वभावविशेषांचा वारसा घेऊन चौकटीबाहेर पाऊल टाकण्याचा वेडेपणा करणाऱ्या आपल्या लेकीला सावध करणाऱ्या वत्सल पित्याचा हा इशाराही असेल. म्हणून लेखकाच्या समर्थ लेखणीतून उतरलेले हे निवेदन वाचकांच्या मनाच्या अंतराळात एक आवर्त निर्माण करते. अनेक विषयांना स्पर्श करून जाणारी ही कादंबरी एका सामान्याचे आत्मप्रगटीकरण असूनही व्यक्तिकेंद्री नाही. त्यास सामाजिक, राजकीय संदर्भ आहेत. या सर्व परिस्थितीत, प्रभावात घडलेल्या एका व्यक्तीची ही जीवन कहाणी तर आहेच पण त्याच्या मनाचा प्रवासही आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more