* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661873
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : PLAY
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
“WHENEVER A TIGRESS GIVES BIRTH TO HER LITTER, SHE DELIVERS THEM AS SHE GOES ALONG HER WAY. THOSE THAT HAVE MANAGED TO WALK AWAY ON THEIR FEET SURVIVE; THE REST BECOME PREY…” THE RULERS OF SAVANGARH FOR GENERATIONS TOGETHER. THEIR DYNASTY HAS GROWN UP IN THIS SOIL. THE HAVE ENJOYED THE RICHES IT GAVE THEM. BUT THE KINGDOMS WERE MERGED…THE TIES SNAPPED. THE DESCENDANTS OF SAVANGARH MIGRATED AND SET UP HOTELS. SHOULD THE REINS OF THE DYNASTY BE HANDED OVER TO THESE HOTELIERS?...THEN WHO IS THE TRUE HEIR? CAN HEIRDOM REMAIN IMMORTAL THROUGH THE SACRIFICES AND TRIBULATIONS OF TWO LIVES – A SINGER COURTESAN AND A PRINCE – THAT WERE BURNISHED AND CONSUMED BY LOVE?...
‘‘... वाघीण जेव्हा विते, तेव्हा पिलं टाकीत जाते. परत त्याच वाटेनं येताना जी पिलं आपल्या पावलांनी तिच्या वाटेतून दूर गेलेली असतात, तेवढीच टिकतात. बाकीची भक्ष्य असतात...’’ पिढ्यान् पिढ्यांचे सावनगढचे राजे. तिथल्या मातीवर त्यांचं घराणं पोसलं. तिथलं सारं ऐश्वर्य भोगलं... पण संस्थानं विलीन झाली.. रिश्ता तुटला. सावनगढचे वंशज परदेशात हॉटेल्स काढून बसले. त्या खानावळवाल्यांच्या हाती घराण्याचा वारसा सोपवायचा?.. मग कोण असू शकतो खरा वारसदार? राजदरबारातील गायिका आणि युवराज यांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं, दोन जीव जळूनही वारसा अमर होतो?...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 23-09-2001

    रणजित देसार्इंचे तीन अंकी नाटक... रणजित देसार्इंनी लिहिलेलं ‘तुझी वाट वेगळी’ हे तीन अंकी नाटक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलं आहे. सावनगढचे राजा जयपालसिंह यांचे राज्य नंतर पुढे संस्थान विलीन झाल्यानंतर त्यांच्या वंशजांनी परदेशात हॉटेल्स काढले. ्यांचा वंशज सुरजित मात्र भाऊक विचारी असतो. सावनगढचं संस्थान विलीन झाल्यानंतर तो परदेशात भटकतो. नंतर मुंबईला एक आलिशान फ्लॅट घेऊन आपल्या पूर्वजांच्या यशाच्या खुणा त्यात साठवतो. या काळात त्याला साथ देते ती त्याची मैत्रीण गायिका चंदा ऊर्फ चंदेर. प्रत्यक्षात ती एका तवायफच्या घरी वाढलेली असते. मात्र, त्याच्या मैत्रीतूनच तिचं जीवन फुलतं. त्याच्या आधाराने ती पुढे जाते. तिच्या गायकीमुळे नावलौकिक मिळवते आणि राष्ट्रपती पुरस्काराचा सन्मान तिला मिळतो. दोघांच्या वाटचालीत अनेक टक्के टोणपे येतात. तिला अवहेलना, बदनामी सहन करावी लागते. एका राजपुत्रानं तिच्या नांदी लागणंही अनेकांना सहन होत नाही. त्यांच्या दोघांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं ही कहानी फुलली आहे. शेवटी या राजघराण्याच्या बहुमोलाचा वारसा हा राजा शेवटी चंदाच्या हाती सुपूर्द करतो. रणजित देसाई यांनी संस्थानचे ढासळते वैभव, त्याच्या खुणा भाऊकपणे जपणारे सध्याचे राजे यांचं चित्रण या नाटकाच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होतं. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 28-07-2002

    आगळीवेगळी वाट चोखाळणारं नाटक… ‘तुझी वाट वेगळी’ हे तीन अंकी नाटक आहे. रणजित देसाई यांनी लिहिलेलं. एक वेगळंच नाटक. आजच्या ‘हॉट अ‍ॅण्ड हिट’ अशा भडक नाटकांच्या गलबल्यापेक्षा किती वेगळं. नाटकाचा पोतच वेगळा. ‘स्वामी’ या कादंबरीचे जनक म्हणून सारी मराठी जनत रणजित देसार्इंना ओळखते. कदाचित या जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी हे नाटक लिहून ठेवलेलं असावं. सप्टेंबर २००१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे. ही आहे एक अनोखी शोकान्त अशी प्रेमकहाणी. संस्थानिक राजपुत्र सुरजित आणि त्यांच्याबरोबर काशीहून आलेली एक गाणारी कलावंतीण चंदा यांची. सावनगढ हे विलीनकरणापूर्वीचं संस्थान. जयपाल हे त्या वेळी असलेले संस्थानिक. धनराज त्यांचा दिवाण. जयपालांचा हा युवराज गाण्याचा अतिशौकीन आहे. चंदाच्या रूपावर आणि सुरांवर त्याचं बेहद्द प्रेम आहे. पण एक युवराज कलावंतीणीशी कसा विवाहबद्द होणार? काशीला कुठे तरी उकिरड्यावर सापडलेल्या या अर्भकाला कालिचरण नावाचा दृष्ट, मुलींच्या कलांचा व्यापार करणारा वाढवतो. ती कोठीवर नाचगाणं करते; पण तिचा भयंकर छळ करणारा कालिचरण. त्याच्याकडून सुटण्यासाठीच युवराजांबरोबर आपखुशीनं आलेली चंदा. जयपाल चंदाला आपला राजगवई - हरिप्रसादच्या हाती सोपवितो. तिचा गळा लाजवाब आहे. हरिप्रसाद आपला गंडा या शिष्येला बांधतो. सुरजितचा पारंपरिक पद्धतीनं कुणा युवराज्ञीशी विवाह होतो. ही कथा सुरांच्या, गाण्यांच्या अंगानं जाणारी आहे. हरिप्रसाद मानी आहे; पण अस्सल गवय्या असल्यानं आपलं गाणं आपल्या नंतरही जिवंत राहावं, गाण्याचा वारसा चंदानं संभाळावा म्हणून संस्थान सोडून मुंबईला येतो. चंदाच्या सौंदर्यामुळे तिची मैफल करायला उत्सुक असलेले तिच्याकडून हलक्याफुलक्या बंदिशीचीच अपेक्षा करतात. हरिप्रसादला ते सहन होत नाही. मध्येच सुरजित त्यांच्या घरी येतो. युवराजाला ती त्याची आवडती ठुमरी ऐकवत असते. कालिचरणही पैशांच्या लोभानं नाही, तर चंदाला पुन्हा आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी येतो. प्रत्येकाचे हेतू निराळे. युवराजांचं सुरांवरचं प्रेम हरिप्रसादला कळत नाही. त्यांना तो जायला फर्मावतो. कालिचरणला आपली सर्व पुंजी देऊन चंदाची सुटका करतो. त्याग हा सुरांच्या पूजेचा पाया. हरिप्रसादचं चंदाशी नातं बापबेटीचं. पण नतद्रष्टं समाजक्षोभाचा या गाण्याला त्रास नको म्हणून ते नातं तसंच जपत तो चंदाशी लग्न करतो... पुढं त्याचा मृत्यू... चंदाला ‘पद्मभूषण’ हा सन्मान मिळणं... सुरजितचं तिच्या फ्लॅटवर येणं... सगळंच अत्यंत कोमल भावनांना जपत लेखकानं लिहिलेलं. मधूनमधून अर्थपूर्ण ऊर्दू शेरांची सुरजितच्या तोडी पेरणी या दृश्यांना सखोल परिमाण लाभून देते. पद्मभूषण पदक दिल्लीहून घेऊन आल्यावर सुरजितच्या हट्टामुळे सागरकिनारी असलेल्या व आता दोन हार्टअ‍ॅटॅक येऊन गेलेल्या वयोवृद्ध सुरजितच्या फ्लॅटवर चंदा येते. हा शेवटचा प्रसंग दोन्ही व्यक्तिरेखांमधलं गहिरं असं प्रेमाचं नातं घट्ट विणीत जातो. सुरजितनं संस्थान विलीनीकरणाची सही केलेली असते. तो युवराज राहिलेला नसतो. पण राजे जयपाल या त्याच्या वडिलांच्या प्रतिष्ठेच्या व राजघराण्याच्या पारंपरिक कल्पनांमुळेच तो गायिकेपासून दुरावतो. म्हणून शेवटी आपल्या घराण्याचा वारसा असलेला अत्यंत मौल्यवान असा मोत्याचा कंठा चंदाला देताना तो उद्गारतो, हा कंठा काय आमच्या सुपुत्रांनी इटलीमध्ये काढलेल्या हॉटेलवाल्यांना - खानावळवाल्यांना द्यायचा? सावनगढचं ‘सावनीवाले’ हे आडनाव मिरवून तू पद्मभूषण हा सर्वोच्च सन्मान तुझ्या गाण्यामुळे मिळवला...’ आणि अशा समाधानातच त्याचा होणार व्याकुळ, पण प्रसन्नचित्त मृत्यू... असं हे नाटक. खरोखरच आजच्या जमान्यात वेगळं त्याग, भक्ती, प्रेम, करारीपणा, आयुष्यभर प्रणयाला जपणं आदी कितीतरी भव्योदात्त मूल्यांवर हे नाटक उभं आहे. याचे प्रत्यक्ष प्रयोग झालेत किंवा कसे, याचा उल्लेख पुस्तकात नाही. मात्र राजदरबारातील गायिका आणि युवराज यांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं हे दोन जीव जळूनही गाण्याचा वारसा अमर झालेला आहे. असं हे अमर, अभिजात, अक्षर नाटक मेहता पब्लिशिंग हाऊसने लेखकाच्या मृत्यूनंतर प्रकाशित करून नाट्यवेड्या प्रेक्षकांना अमोल नजराणाच बहाल केला आहे... अशा नाटकाकडे आजचे रंगकर्मी वळतील? हा प्रत्यक्ष प्रयोग (संगीत अबाधित ठेवून) रंगमंचावर सादर करून मराठी चोखंदळ प्रेक्षकांचा दुवा घेतील? यावर सुंदर मालिका निर्माते काढतील...? दूरदर्शनवर ती दाखवली जाईल? काही तरी चांगलं मिळण्यासाठी एवढे प्रश्न...! -भावना भार्गवे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 18-11-2001

    प्रेमाची अनेक विलोभनीय रूपे… ‘स्वामी’सारख्या विख्यात कादंबरीचे लेखक रणजित देसाई याचं नाव नाटककार म्हणून ज्ञात नाही. परंतु ते उत्कृष्ट नाट्यलेखनही करू शकतात हे ‘तुझी वाट वेगळी’ या त्यांच्या नाटकाचे वाचन करताना दिसून येते. ‘प्रेम’ या विषयावर अनेक नाक-नाटके, चित्रपट येऊन गेले, त्यात सुखान्त किंवा दुखान्त असलेल्या प्रेमकथा मांडण्यात आल्या. येथून रणजित देसार्इंनी ‘तुझी वाट वेगळी’ या नाटकात प्रेमाची अनेक रूपं दाखविली त्यासाठी त्याग आणि संघर्ष चित्रित करून प्रेम किती श्रेष्ठ असते हे दाखवून दिले आहे. एका युवराजाची ही शोकान्त पण उदात्त प्रेमकहाणी आहे. कित्येक प्रेमाची तऱ्हा या त्यांनी वेगवेगळया चित्रित केल्या आहेत. चंदाचे त्यागी प्रेम, युवराज सुरजितचे अमर पण एकर क्षणाला अविश्वासाने डगमगणारे प्रेम, हरिप्रसाद या राजगवयाचे आपल्या कलेवर असणारे प्रेम आणि त्यासाठी त्यांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत केलेला संघर्ष आणि चंदाला आपली कला अर्पण करून मोठं करण्याचं स्वप्न, त्यासाठी अरिस्थितीशी केलेला संघर्ष. कालिचरण याचं पैशावर असणारे प्रेम, रामसिंग या नोकराचे आपल्या मालकावर असणारे प्रेम आणि शेवटपर्यंत त्याने मालकाला दिलेली साथ, जयपाल यांचे आपले राज्य आणि प्रतिष्ठा यांवर असणारे प्रेम अशा या प्रेमाच्या परी आहेत. सुरजित - चंदा यांचं प्रेम एका कसोटीच्या क्षणी अविश्वासाने डगमगतं आणि त्यांना वेगवेगळया वाटेवर नेऊन सोडतं. सुरजित आपल्या व्यक्तींमध्ये राहूनही एकटा पडतो. तर चंदा कलेसाठी स्वत:ला वाहून घेते. यासाठी तिला आपले गुरू हरिप्रसाद यांच्या बरोबर विवाहही करावा लागतो. ज्या राज्यासाठी जयपाल त्यांना वेगवेगळं करतो ते राज्य बरखास्त होतं. सुरजितची बायको, मुले विदेशात स्थायिक असतात. तो एकटा पडतो. सुखाबाबत एके ठिकाणी तो म्हणतो, ‘तुम्ही राज्य उपभोगलंत. एका माणसानं पराक्रम केला आणि त्याच्या नावावर तुम्ही पिढ्यान्पिढ्या राज्य करित आला. आयुष्यातली सर्व सुखं तुम्हाला मिळाली. दु:खाचा लवलेशही तुम्हाला शिवला नाही. तुम्ही खरे भाग्यवान.’ आपल्या राज्याचा अनमोल ठेवा तो शेवटी चंदाला अर्पण करतो. मरण तरी सुखाने येईल याची तो अपेक्षा करतो. त्याला वाईट एवढेच वाटते की त्याला सामान्य माणसाचे आयुष्य जगता आले नाही. तो चंदाच्या मांडीवर प्राण सोडतो. त्यांचं प्रेम वाचकाला सुन्न करून टाकते. असे हे नाटक वाचनीय आहे. लेखकाची भाषाशैली, प्रसंगाची गुंफण ही वाचकाला विचार करायला लावणारी आहे. -प्रतिभा वानखेडे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.