* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661873
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : PLAY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHENEVER A TIGRESS GIVES BIRTH TO HER LITTER, SHE DELIVERS THEM AS SHE GOES ALONG HER WAY. THOSE THAT HAVE MANAGED TO WALK AWAY ON THEIR FEET SURVIVE; THE REST BECOME PREY . THE RULERS OF SAVANGARH FOR GENERATIONS TOGETHER. THEIR DYNASTY HAS GROWN UP IN THIS SOIL. THE HAVE ENJOYED THE RICHES IT GAVE THEM. BUT THE KINGDOMS WERE MERGED .THE TIES SNAPPED. THE DESCENDANTS OF SAVANGARH MIGRATED AND SET UP HOTELS. SHOULD THE REINS OF THE DYNASTY BE HANDED OVER TO THESE HOTELIERS?...THEN WHO IS THE TRUE HEIR? CAN HEIRDOM REMAIN IMMORTAL THROUGH THE SACRIFICES AND TRIBULATIONS OF TWO LIVES – A SINGER COURTESAN AND A PRINCE THAT WERE BURNISHED AND CONSUMED BY LOVE?...
‘‘... वाघीण जेव्हा विते, तेव्हा पिलं टाकीत जाते. परत त्याच वाटेनं येताना जी पिलं आपल्या पावलांनी तिच्या वाटेतून दूर गेलेली असतात, तेवढीच टिकतात. बाकीची भक्ष्य असतात...’’ पिढ्यान् पिढ्यांचे सावनगढचे राजे. तिथल्या मातीवर त्यांचं घराणं पोसलं. तिथलं सारं ऐश्वर्य भोगलं... पण संस्थानं विलीन झाली.. रिश्ता तुटला. सावनगढचे वंशज परदेशात हॉटेल्स काढून बसले. त्या खानावळवाल्यांच्या हाती घराण्याचा वारसा सोपवायचा?.. मग कोण असू शकतो खरा वारसदार? राजदरबारातील गायिका आणि युवराज यांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं, दोन जीव जळूनही वारसा अमर होतो?...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 23-09-2001

    रणजित देसार्इंचे तीन अंकी नाटक... रणजित देसार्इंनी लिहिलेलं ‘तुझी वाट वेगळी’ हे तीन अंकी नाटक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलं आहे. सावनगढचे राजा जयपालसिंह यांचे राज्य नंतर पुढे संस्थान विलीन झाल्यानंतर त्यांच्या वंशजांनी परदेशात हॉटेल्स काढले. ्यांचा वंशज सुरजित मात्र भाऊक विचारी असतो. सावनगढचं संस्थान विलीन झाल्यानंतर तो परदेशात भटकतो. नंतर मुंबईला एक आलिशान फ्लॅट घेऊन आपल्या पूर्वजांच्या यशाच्या खुणा त्यात साठवतो. या काळात त्याला साथ देते ती त्याची मैत्रीण गायिका चंदा ऊर्फ चंदेर. प्रत्यक्षात ती एका तवायफच्या घरी वाढलेली असते. मात्र, त्याच्या मैत्रीतूनच तिचं जीवन फुलतं. त्याच्या आधाराने ती पुढे जाते. तिच्या गायकीमुळे नावलौकिक मिळवते आणि राष्ट्रपती पुरस्काराचा सन्मान तिला मिळतो. दोघांच्या वाटचालीत अनेक टक्के टोणपे येतात. तिला अवहेलना, बदनामी सहन करावी लागते. एका राजपुत्रानं तिच्या नांदी लागणंही अनेकांना सहन होत नाही. त्यांच्या दोघांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं ही कहानी फुलली आहे. शेवटी या राजघराण्याच्या बहुमोलाचा वारसा हा राजा शेवटी चंदाच्या हाती सुपूर्द करतो. रणजित देसाई यांनी संस्थानचे ढासळते वैभव, त्याच्या खुणा भाऊकपणे जपणारे सध्याचे राजे यांचं चित्रण या नाटकाच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होतं. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 28-07-2002

    आगळीवेगळी वाट चोखाळणारं नाटक… ‘तुझी वाट वेगळी’ हे तीन अंकी नाटक आहे. रणजित देसाई यांनी लिहिलेलं. एक वेगळंच नाटक. आजच्या ‘हॉट अ‍ॅण्ड हिट’ अशा भडक नाटकांच्या गलबल्यापेक्षा किती वेगळं. नाटकाचा पोतच वेगळा. ‘स्वामी’ या कादंबरीचे जनक म्हणून सारी मराठी जनत रणजित देसार्इंना ओळखते. कदाचित या जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी हे नाटक लिहून ठेवलेलं असावं. सप्टेंबर २००१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे. ही आहे एक अनोखी शोकान्त अशी प्रेमकहाणी. संस्थानिक राजपुत्र सुरजित आणि त्यांच्याबरोबर काशीहून आलेली एक गाणारी कलावंतीण चंदा यांची. सावनगढ हे विलीनकरणापूर्वीचं संस्थान. जयपाल हे त्या वेळी असलेले संस्थानिक. धनराज त्यांचा दिवाण. जयपालांचा हा युवराज गाण्याचा अतिशौकीन आहे. चंदाच्या रूपावर आणि सुरांवर त्याचं बेहद्द प्रेम आहे. पण एक युवराज कलावंतीणीशी कसा विवाहबद्द होणार? काशीला कुठे तरी उकिरड्यावर सापडलेल्या या अर्भकाला कालिचरण नावाचा दृष्ट, मुलींच्या कलांचा व्यापार करणारा वाढवतो. ती कोठीवर नाचगाणं करते; पण तिचा भयंकर छळ करणारा कालिचरण. त्याच्याकडून सुटण्यासाठीच युवराजांबरोबर आपखुशीनं आलेली चंदा. जयपाल चंदाला आपला राजगवई - हरिप्रसादच्या हाती सोपवितो. तिचा गळा लाजवाब आहे. हरिप्रसाद आपला गंडा या शिष्येला बांधतो. सुरजितचा पारंपरिक पद्धतीनं कुणा युवराज्ञीशी विवाह होतो. ही कथा सुरांच्या, गाण्यांच्या अंगानं जाणारी आहे. हरिप्रसाद मानी आहे; पण अस्सल गवय्या असल्यानं आपलं गाणं आपल्या नंतरही जिवंत राहावं, गाण्याचा वारसा चंदानं संभाळावा म्हणून संस्थान सोडून मुंबईला येतो. चंदाच्या सौंदर्यामुळे तिची मैफल करायला उत्सुक असलेले तिच्याकडून हलक्याफुलक्या बंदिशीचीच अपेक्षा करतात. हरिप्रसादला ते सहन होत नाही. मध्येच सुरजित त्यांच्या घरी येतो. युवराजाला ती त्याची आवडती ठुमरी ऐकवत असते. कालिचरणही पैशांच्या लोभानं नाही, तर चंदाला पुन्हा आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी येतो. प्रत्येकाचे हेतू निराळे. युवराजांचं सुरांवरचं प्रेम हरिप्रसादला कळत नाही. त्यांना तो जायला फर्मावतो. कालिचरणला आपली सर्व पुंजी देऊन चंदाची सुटका करतो. त्याग हा सुरांच्या पूजेचा पाया. हरिप्रसादचं चंदाशी नातं बापबेटीचं. पण नतद्रष्टं समाजक्षोभाचा या गाण्याला त्रास नको म्हणून ते नातं तसंच जपत तो चंदाशी लग्न करतो... पुढं त्याचा मृत्यू... चंदाला ‘पद्मभूषण’ हा सन्मान मिळणं... सुरजितचं तिच्या फ्लॅटवर येणं... सगळंच अत्यंत कोमल भावनांना जपत लेखकानं लिहिलेलं. मधूनमधून अर्थपूर्ण ऊर्दू शेरांची सुरजितच्या तोडी पेरणी या दृश्यांना सखोल परिमाण लाभून देते. पद्मभूषण पदक दिल्लीहून घेऊन आल्यावर सुरजितच्या हट्टामुळे सागरकिनारी असलेल्या व आता दोन हार्टअ‍ॅटॅक येऊन गेलेल्या वयोवृद्ध सुरजितच्या फ्लॅटवर चंदा येते. हा शेवटचा प्रसंग दोन्ही व्यक्तिरेखांमधलं गहिरं असं प्रेमाचं नातं घट्ट विणीत जातो. सुरजितनं संस्थान विलीनीकरणाची सही केलेली असते. तो युवराज राहिलेला नसतो. पण राजे जयपाल या त्याच्या वडिलांच्या प्रतिष्ठेच्या व राजघराण्याच्या पारंपरिक कल्पनांमुळेच तो गायिकेपासून दुरावतो. म्हणून शेवटी आपल्या घराण्याचा वारसा असलेला अत्यंत मौल्यवान असा मोत्याचा कंठा चंदाला देताना तो उद्गारतो, हा कंठा काय आमच्या सुपुत्रांनी इटलीमध्ये काढलेल्या हॉटेलवाल्यांना - खानावळवाल्यांना द्यायचा? सावनगढचं ‘सावनीवाले’ हे आडनाव मिरवून तू पद्मभूषण हा सर्वोच्च सन्मान तुझ्या गाण्यामुळे मिळवला...’ आणि अशा समाधानातच त्याचा होणार व्याकुळ, पण प्रसन्नचित्त मृत्यू... असं हे नाटक. खरोखरच आजच्या जमान्यात वेगळं त्याग, भक्ती, प्रेम, करारीपणा, आयुष्यभर प्रणयाला जपणं आदी कितीतरी भव्योदात्त मूल्यांवर हे नाटक उभं आहे. याचे प्रत्यक्ष प्रयोग झालेत किंवा कसे, याचा उल्लेख पुस्तकात नाही. मात्र राजदरबारातील गायिका आणि युवराज यांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं हे दोन जीव जळूनही गाण्याचा वारसा अमर झालेला आहे. असं हे अमर, अभिजात, अक्षर नाटक मेहता पब्लिशिंग हाऊसने लेखकाच्या मृत्यूनंतर प्रकाशित करून नाट्यवेड्या प्रेक्षकांना अमोल नजराणाच बहाल केला आहे... अशा नाटकाकडे आजचे रंगकर्मी वळतील? हा प्रत्यक्ष प्रयोग (संगीत अबाधित ठेवून) रंगमंचावर सादर करून मराठी चोखंदळ प्रेक्षकांचा दुवा घेतील? यावर सुंदर मालिका निर्माते काढतील...? दूरदर्शनवर ती दाखवली जाईल? काही तरी चांगलं मिळण्यासाठी एवढे प्रश्न...! -भावना भार्गवे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 18-11-2001

    प्रेमाची अनेक विलोभनीय रूपे… ‘स्वामी’सारख्या विख्यात कादंबरीचे लेखक रणजित देसाई याचं नाव नाटककार म्हणून ज्ञात नाही. परंतु ते उत्कृष्ट नाट्यलेखनही करू शकतात हे ‘तुझी वाट वेगळी’ या त्यांच्या नाटकाचे वाचन करताना दिसून येते. ‘प्रेम’ या विषयावर अनेक नाक-नाटके, चित्रपट येऊन गेले, त्यात सुखान्त किंवा दुखान्त असलेल्या प्रेमकथा मांडण्यात आल्या. येथून रणजित देसार्इंनी ‘तुझी वाट वेगळी’ या नाटकात प्रेमाची अनेक रूपं दाखविली त्यासाठी त्याग आणि संघर्ष चित्रित करून प्रेम किती श्रेष्ठ असते हे दाखवून दिले आहे. एका युवराजाची ही शोकान्त पण उदात्त प्रेमकहाणी आहे. कित्येक प्रेमाची तऱ्हा या त्यांनी वेगवेगळया चित्रित केल्या आहेत. चंदाचे त्यागी प्रेम, युवराज सुरजितचे अमर पण एकर क्षणाला अविश्वासाने डगमगणारे प्रेम, हरिप्रसाद या राजगवयाचे आपल्या कलेवर असणारे प्रेम आणि त्यासाठी त्यांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत केलेला संघर्ष आणि चंदाला आपली कला अर्पण करून मोठं करण्याचं स्वप्न, त्यासाठी अरिस्थितीशी केलेला संघर्ष. कालिचरण याचं पैशावर असणारे प्रेम, रामसिंग या नोकराचे आपल्या मालकावर असणारे प्रेम आणि शेवटपर्यंत त्याने मालकाला दिलेली साथ, जयपाल यांचे आपले राज्य आणि प्रतिष्ठा यांवर असणारे प्रेम अशा या प्रेमाच्या परी आहेत. सुरजित - चंदा यांचं प्रेम एका कसोटीच्या क्षणी अविश्वासाने डगमगतं आणि त्यांना वेगवेगळया वाटेवर नेऊन सोडतं. सुरजित आपल्या व्यक्तींमध्ये राहूनही एकटा पडतो. तर चंदा कलेसाठी स्वत:ला वाहून घेते. यासाठी तिला आपले गुरू हरिप्रसाद यांच्या बरोबर विवाहही करावा लागतो. ज्या राज्यासाठी जयपाल त्यांना वेगवेगळं करतो ते राज्य बरखास्त होतं. सुरजितची बायको, मुले विदेशात स्थायिक असतात. तो एकटा पडतो. सुखाबाबत एके ठिकाणी तो म्हणतो, ‘तुम्ही राज्य उपभोगलंत. एका माणसानं पराक्रम केला आणि त्याच्या नावावर तुम्ही पिढ्यान्पिढ्या राज्य करित आला. आयुष्यातली सर्व सुखं तुम्हाला मिळाली. दु:खाचा लवलेशही तुम्हाला शिवला नाही. तुम्ही खरे भाग्यवान.’ आपल्या राज्याचा अनमोल ठेवा तो शेवटी चंदाला अर्पण करतो. मरण तरी सुखाने येईल याची तो अपेक्षा करतो. त्याला वाईट एवढेच वाटते की त्याला सामान्य माणसाचे आयुष्य जगता आले नाही. तो चंदाच्या मांडीवर प्राण सोडतो. त्यांचं प्रेम वाचकाला सुन्न करून टाकते. असे हे नाटक वाचनीय आहे. लेखकाची भाषाशैली, प्रसंगाची गुंफण ही वाचकाला विचार करायला लावणारी आहे. -प्रतिभा वानखेडे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more