* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TUZI VAT VEGALI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661873
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : PLAY
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
“WHENEVER A TIGRESS GIVES BIRTH TO HER LITTER, SHE DELIVERS THEM AS SHE GOES ALONG HER WAY. THOSE THAT HAVE MANAGED TO WALK AWAY ON THEIR FEET SURVIVE; THE REST BECOME PREY…” THE RULERS OF SAVANGARH FOR GENERATIONS TOGETHER. THEIR DYNASTY HAS GROWN UP IN THIS SOIL. THE HAVE ENJOYED THE RICHES IT GAVE THEM. BUT THE KINGDOMS WERE MERGED…THE TIES SNAPPED. THE DESCENDANTS OF SAVANGARH MIGRATED AND SET UP HOTELS. SHOULD THE REINS OF THE DYNASTY BE HANDED OVER TO THESE HOTELIERS?...THEN WHO IS THE TRUE HEIR? CAN HEIRDOM REMAIN IMMORTAL THROUGH THE SACRIFICES AND TRIBULATIONS OF TWO LIVES – A SINGER COURTESAN AND A PRINCE – THAT WERE BURNISHED AND CONSUMED BY LOVE?...
‘‘... वाघीण जेव्हा विते, तेव्हा पिलं टाकीत जाते. परत त्याच वाटेनं येताना जी पिलं आपल्या पावलांनी तिच्या वाटेतून दूर गेलेली असतात, तेवढीच टिकतात. बाकीची भक्ष्य असतात...’’ पिढ्यान् पिढ्यांचे सावनगढचे राजे. तिथल्या मातीवर त्यांचं घराणं पोसलं. तिथलं सारं ऐश्वर्य भोगलं... पण संस्थानं विलीन झाली.. रिश्ता तुटला. सावनगढचे वंशज परदेशात हॉटेल्स काढून बसले. त्या खानावळवाल्यांच्या हाती घराण्याचा वारसा सोपवायचा?.. मग कोण असू शकतो खरा वारसदार? राजदरबारातील गायिका आणि युवराज यांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं, दोन जीव जळूनही वारसा अमर होतो?...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 23-09-2001

    रणजित देसार्इंचे तीन अंकी नाटक... रणजित देसार्इंनी लिहिलेलं ‘तुझी वाट वेगळी’ हे तीन अंकी नाटक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलं आहे. सावनगढचे राजा जयपालसिंह यांचे राज्य नंतर पुढे संस्थान विलीन झाल्यानंतर त्यांच्या वंशजांनी परदेशात हॉटेल्स काढले. ्यांचा वंशज सुरजित मात्र भाऊक विचारी असतो. सावनगढचं संस्थान विलीन झाल्यानंतर तो परदेशात भटकतो. नंतर मुंबईला एक आलिशान फ्लॅट घेऊन आपल्या पूर्वजांच्या यशाच्या खुणा त्यात साठवतो. या काळात त्याला साथ देते ती त्याची मैत्रीण गायिका चंदा ऊर्फ चंदेर. प्रत्यक्षात ती एका तवायफच्या घरी वाढलेली असते. मात्र, त्याच्या मैत्रीतूनच तिचं जीवन फुलतं. त्याच्या आधाराने ती पुढे जाते. तिच्या गायकीमुळे नावलौकिक मिळवते आणि राष्ट्रपती पुरस्काराचा सन्मान तिला मिळतो. दोघांच्या वाटचालीत अनेक टक्के टोणपे येतात. तिला अवहेलना, बदनामी सहन करावी लागते. एका राजपुत्रानं तिच्या नांदी लागणंही अनेकांना सहन होत नाही. त्यांच्या दोघांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं ही कहानी फुलली आहे. शेवटी या राजघराण्याच्या बहुमोलाचा वारसा हा राजा शेवटी चंदाच्या हाती सुपूर्द करतो. रणजित देसाई यांनी संस्थानचे ढासळते वैभव, त्याच्या खुणा भाऊकपणे जपणारे सध्याचे राजे यांचं चित्रण या नाटकाच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होतं. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 28-07-2002

    आगळीवेगळी वाट चोखाळणारं नाटक… ‘तुझी वाट वेगळी’ हे तीन अंकी नाटक आहे. रणजित देसाई यांनी लिहिलेलं. एक वेगळंच नाटक. आजच्या ‘हॉट अ‍ॅण्ड हिट’ अशा भडक नाटकांच्या गलबल्यापेक्षा किती वेगळं. नाटकाचा पोतच वेगळा. ‘स्वामी’ या कादंबरीचे जनक म्हणून सारी मराठी जनत रणजित देसार्इंना ओळखते. कदाचित या जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी हे नाटक लिहून ठेवलेलं असावं. सप्टेंबर २००१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे. ही आहे एक अनोखी शोकान्त अशी प्रेमकहाणी. संस्थानिक राजपुत्र सुरजित आणि त्यांच्याबरोबर काशीहून आलेली एक गाणारी कलावंतीण चंदा यांची. सावनगढ हे विलीनकरणापूर्वीचं संस्थान. जयपाल हे त्या वेळी असलेले संस्थानिक. धनराज त्यांचा दिवाण. जयपालांचा हा युवराज गाण्याचा अतिशौकीन आहे. चंदाच्या रूपावर आणि सुरांवर त्याचं बेहद्द प्रेम आहे. पण एक युवराज कलावंतीणीशी कसा विवाहबद्द होणार? काशीला कुठे तरी उकिरड्यावर सापडलेल्या या अर्भकाला कालिचरण नावाचा दृष्ट, मुलींच्या कलांचा व्यापार करणारा वाढवतो. ती कोठीवर नाचगाणं करते; पण तिचा भयंकर छळ करणारा कालिचरण. त्याच्याकडून सुटण्यासाठीच युवराजांबरोबर आपखुशीनं आलेली चंदा. जयपाल चंदाला आपला राजगवई - हरिप्रसादच्या हाती सोपवितो. तिचा गळा लाजवाब आहे. हरिप्रसाद आपला गंडा या शिष्येला बांधतो. सुरजितचा पारंपरिक पद्धतीनं कुणा युवराज्ञीशी विवाह होतो. ही कथा सुरांच्या, गाण्यांच्या अंगानं जाणारी आहे. हरिप्रसाद मानी आहे; पण अस्सल गवय्या असल्यानं आपलं गाणं आपल्या नंतरही जिवंत राहावं, गाण्याचा वारसा चंदानं संभाळावा म्हणून संस्थान सोडून मुंबईला येतो. चंदाच्या सौंदर्यामुळे तिची मैफल करायला उत्सुक असलेले तिच्याकडून हलक्याफुलक्या बंदिशीचीच अपेक्षा करतात. हरिप्रसादला ते सहन होत नाही. मध्येच सुरजित त्यांच्या घरी येतो. युवराजाला ती त्याची आवडती ठुमरी ऐकवत असते. कालिचरणही पैशांच्या लोभानं नाही, तर चंदाला पुन्हा आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी येतो. प्रत्येकाचे हेतू निराळे. युवराजांचं सुरांवरचं प्रेम हरिप्रसादला कळत नाही. त्यांना तो जायला फर्मावतो. कालिचरणला आपली सर्व पुंजी देऊन चंदाची सुटका करतो. त्याग हा सुरांच्या पूजेचा पाया. हरिप्रसादचं चंदाशी नातं बापबेटीचं. पण नतद्रष्टं समाजक्षोभाचा या गाण्याला त्रास नको म्हणून ते नातं तसंच जपत तो चंदाशी लग्न करतो... पुढं त्याचा मृत्यू... चंदाला ‘पद्मभूषण’ हा सन्मान मिळणं... सुरजितचं तिच्या फ्लॅटवर येणं... सगळंच अत्यंत कोमल भावनांना जपत लेखकानं लिहिलेलं. मधूनमधून अर्थपूर्ण ऊर्दू शेरांची सुरजितच्या तोडी पेरणी या दृश्यांना सखोल परिमाण लाभून देते. पद्मभूषण पदक दिल्लीहून घेऊन आल्यावर सुरजितच्या हट्टामुळे सागरकिनारी असलेल्या व आता दोन हार्टअ‍ॅटॅक येऊन गेलेल्या वयोवृद्ध सुरजितच्या फ्लॅटवर चंदा येते. हा शेवटचा प्रसंग दोन्ही व्यक्तिरेखांमधलं गहिरं असं प्रेमाचं नातं घट्ट विणीत जातो. सुरजितनं संस्थान विलीनीकरणाची सही केलेली असते. तो युवराज राहिलेला नसतो. पण राजे जयपाल या त्याच्या वडिलांच्या प्रतिष्ठेच्या व राजघराण्याच्या पारंपरिक कल्पनांमुळेच तो गायिकेपासून दुरावतो. म्हणून शेवटी आपल्या घराण्याचा वारसा असलेला अत्यंत मौल्यवान असा मोत्याचा कंठा चंदाला देताना तो उद्गारतो, हा कंठा काय आमच्या सुपुत्रांनी इटलीमध्ये काढलेल्या हॉटेलवाल्यांना - खानावळवाल्यांना द्यायचा? सावनगढचं ‘सावनीवाले’ हे आडनाव मिरवून तू पद्मभूषण हा सर्वोच्च सन्मान तुझ्या गाण्यामुळे मिळवला...’ आणि अशा समाधानातच त्याचा होणार व्याकुळ, पण प्रसन्नचित्त मृत्यू... असं हे नाटक. खरोखरच आजच्या जमान्यात वेगळं त्याग, भक्ती, प्रेम, करारीपणा, आयुष्यभर प्रणयाला जपणं आदी कितीतरी भव्योदात्त मूल्यांवर हे नाटक उभं आहे. याचे प्रत्यक्ष प्रयोग झालेत किंवा कसे, याचा उल्लेख पुस्तकात नाही. मात्र राजदरबारातील गायिका आणि युवराज यांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं हे दोन जीव जळूनही गाण्याचा वारसा अमर झालेला आहे. असं हे अमर, अभिजात, अक्षर नाटक मेहता पब्लिशिंग हाऊसने लेखकाच्या मृत्यूनंतर प्रकाशित करून नाट्यवेड्या प्रेक्षकांना अमोल नजराणाच बहाल केला आहे... अशा नाटकाकडे आजचे रंगकर्मी वळतील? हा प्रत्यक्ष प्रयोग (संगीत अबाधित ठेवून) रंगमंचावर सादर करून मराठी चोखंदळ प्रेक्षकांचा दुवा घेतील? यावर सुंदर मालिका निर्माते काढतील...? दूरदर्शनवर ती दाखवली जाईल? काही तरी चांगलं मिळण्यासाठी एवढे प्रश्न...! -भावना भार्गवे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 18-11-2001

    प्रेमाची अनेक विलोभनीय रूपे… ‘स्वामी’सारख्या विख्यात कादंबरीचे लेखक रणजित देसाई याचं नाव नाटककार म्हणून ज्ञात नाही. परंतु ते उत्कृष्ट नाट्यलेखनही करू शकतात हे ‘तुझी वाट वेगळी’ या त्यांच्या नाटकाचे वाचन करताना दिसून येते. ‘प्रेम’ या विषयावर अनेक नाक-नाटके, चित्रपट येऊन गेले, त्यात सुखान्त किंवा दुखान्त असलेल्या प्रेमकथा मांडण्यात आल्या. येथून रणजित देसार्इंनी ‘तुझी वाट वेगळी’ या नाटकात प्रेमाची अनेक रूपं दाखविली त्यासाठी त्याग आणि संघर्ष चित्रित करून प्रेम किती श्रेष्ठ असते हे दाखवून दिले आहे. एका युवराजाची ही शोकान्त पण उदात्त प्रेमकहाणी आहे. कित्येक प्रेमाची तऱ्हा या त्यांनी वेगवेगळया चित्रित केल्या आहेत. चंदाचे त्यागी प्रेम, युवराज सुरजितचे अमर पण एकर क्षणाला अविश्वासाने डगमगणारे प्रेम, हरिप्रसाद या राजगवयाचे आपल्या कलेवर असणारे प्रेम आणि त्यासाठी त्यांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत केलेला संघर्ष आणि चंदाला आपली कला अर्पण करून मोठं करण्याचं स्वप्न, त्यासाठी अरिस्थितीशी केलेला संघर्ष. कालिचरण याचं पैशावर असणारे प्रेम, रामसिंग या नोकराचे आपल्या मालकावर असणारे प्रेम आणि शेवटपर्यंत त्याने मालकाला दिलेली साथ, जयपाल यांचे आपले राज्य आणि प्रतिष्ठा यांवर असणारे प्रेम अशा या प्रेमाच्या परी आहेत. सुरजित - चंदा यांचं प्रेम एका कसोटीच्या क्षणी अविश्वासाने डगमगतं आणि त्यांना वेगवेगळया वाटेवर नेऊन सोडतं. सुरजित आपल्या व्यक्तींमध्ये राहूनही एकटा पडतो. तर चंदा कलेसाठी स्वत:ला वाहून घेते. यासाठी तिला आपले गुरू हरिप्रसाद यांच्या बरोबर विवाहही करावा लागतो. ज्या राज्यासाठी जयपाल त्यांना वेगवेगळं करतो ते राज्य बरखास्त होतं. सुरजितची बायको, मुले विदेशात स्थायिक असतात. तो एकटा पडतो. सुखाबाबत एके ठिकाणी तो म्हणतो, ‘तुम्ही राज्य उपभोगलंत. एका माणसानं पराक्रम केला आणि त्याच्या नावावर तुम्ही पिढ्यान्पिढ्या राज्य करित आला. आयुष्यातली सर्व सुखं तुम्हाला मिळाली. दु:खाचा लवलेशही तुम्हाला शिवला नाही. तुम्ही खरे भाग्यवान.’ आपल्या राज्याचा अनमोल ठेवा तो शेवटी चंदाला अर्पण करतो. मरण तरी सुखाने येईल याची तो अपेक्षा करतो. त्याला वाईट एवढेच वाटते की त्याला सामान्य माणसाचे आयुष्य जगता आले नाही. तो चंदाच्या मांडीवर प्राण सोडतो. त्यांचं प्रेम वाचकाला सुन्न करून टाकते. असे हे नाटक वाचनीय आहे. लेखकाची भाषाशैली, प्रसंगाची गुंफण ही वाचकाला विचार करायला लावणारी आहे. -प्रतिभा वानखेडे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHIKASANTVANAM
RADHIKASANTVANAM by MUDDUPALANI Rating Star
केदार मारुलकर

एक डॉक्टर काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पुस्तक परिचयासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक (खरे तर अनुवादक) *डॉ. शंतनू अभ्यंकर.* पुण्याच्या बीजे मेडिकल मधून एमबीबीएस. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण. आयएमए तसेच इतर संघटनेत विविध पदांवर काम. अनक परिषदांमध्ये शास्त्रीय विषयावर शुद्ध मराठीत व्याख्याने. २५ वर्षाहून अधिक काळ ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संघटनांमध्ये काम. विज्ञान लेखक, भाषांतरकार, ब्लॉगर आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे समाजात सर्वसाधारणपणे *न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर लेखन* आणि प्रसंगी *प्रचलित समजाला तडा देणारे परखड भाष्य* करण्याची धमक. *पुस्तक परिचय* मुद्दूपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. अनुपम सौंदर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, शृंगारनिपुणता बहुभाषाकोविद अशी देवदासी स्त्री. राधिकासांत्वनमु हे तेलगू भाषेतील काव्य तिने रचले. परंतु नंतरच्या काळात अश्लील ठरवून त्यावर बंदी घालण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा या काव्याला प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले. गेल्याच वर्षी हे काव्य मराठीत अनुवादित करून डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी मराठी रसिकांना हा सांस्कृतिक ठेवा उपलब्ध करून दिला आहे. तंजावरच्या तत्कालीन मराठी राजवटीचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठी राजे आणि तमिळ प्रजा. या राज्याची प्रसिद्धी इतर कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका अशी, काही आज आपल्याला खळबळजनक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध परंपरा होती. तिथे गणिकांनाही प्रतिष्ठा होती. अशीच एक गणिका-मुद्दूपलनी. तिची एक रचना म्हणजेच राधिकासांत्वनमु. तेलुगूमध्ये सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या राज्याचीच नाही, तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते. मराठीमध्ये इतकं शृंगारीक काव्य लिहिलं गेलं नाही.त्यात शृंगारीक लेखन म्हणजे लिहिलंच तर पुरुषांनी लिहावं, असा अलिखित नियम. शृंगार आणि अश्लीलता याच्या सीमारेषेवर असलेलं हे काव्य एका स्त्रीने लिहावं हे म्हणूनच आगळंवेगळं ठरतं. राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे. पण राधाकृष्णाची बहुतेक प्रेमकाव्ये कितीही सुंदर आणि शृंगारिक वर्णनांनी भरलेली असली तरी अखेरीस राधाकृष्णाचे मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन, असा शोध लावून त्याला एकदम अध्यात्मिक रूप दिलं जातं. राधिका सांत्वनम् मध्ये कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन- इला, यांचे नाते अगदी सर्वसाधारण स्त्रीपुरुषांसारखे रेखाटले आहे. आपली पार्श्वभूमी सांगून ही गणिका राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू करते. राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहेत. या काव्यातील प्रौढ राधा, तरुण कृष्णाचे आणि नुकत्याच यौवनात आलेल्या इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते. तो येतो. पण दुखावली गेलेली राधा त्याला फार महत्व देत नाही. त्याला राधेची आर्जवं करायला लागतात. तरीही राधा त्याला बधत नाही. मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिला घायाळ करतो, राधा पुन्हा आकृष्ट होते, दोघांचे मिलन होतं. इथे राधिकासांत्वन सुफळ संपूर्ण होतं, अशी ही काव्यरुप कथा. यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, हुशार तितक्याच हट्टी. इला नवथर तरुणी; तर राधा प्रौढ, प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि दोघींचा नायक कृष्णसखा. पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या आहेत. प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत. अनुभूती मोकळेपणानी व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, विरह,असूया, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही हे काव्य उलगडून दाखवते आणि तेही एक स्त्रीच्या नजरेतून. हा नजारा थक्क करणारा आहे. हे शृंगारीक असलं तरी उत्कट आणि रसाळ काव्य आहे. या काव्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे. डॉ. शंतनू यांनी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर त्या काळातील वाटणारच नाही. मूळ छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही. मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार करत भाषांतर केल्याचे मनोगतात लिहिले आहे. मराठीत हे सगळे काव्य लिहिताना पुणेरी भाषा वापरली असली,तरी त्यात दुर्बोधता नाही. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली यात वापरल्या आहेत. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले आहेत. पुस्तक परिचय लिहिताना यातील काही ओळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते. _थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी, शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही. आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे; का हरी कटाक्ष पुरे, चमकाया नयनदले?_ यानंतर षोडशा इलेचं वर्णन या शब्दांत _कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना; मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही_ कृष्णावर भाळलेल्या इलाचे मनतरंग रेखाटताना म्हटले आहे- _लपंडावी डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला. शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता. नदीकिनारी साधून मौका, इला झोंबते हरीच्या अंगा. सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर. सख्यांस कौतुक सखिचे नवथर उधळून यौवन, धीट, खोडकर इला भाळली श्री कृष्णावर!_ कृष्ण आणि राधेचा प्रणय तिच्या नजरेतून सुटत नाही... _ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा; दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला, शेजघरी ने कृष्णा, राधा; म्हणे ‘आले मी’, इला बाला!! मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!_ राधेलाही इला मोठी होण्याची आतुरता, उत्सुकता आहेच... _कधी म्हणे विनोदे राधा, ‘ही मला सवत होई का?’ पण पाहताच इलेला, उरी उधाण ये मायेला, कुस्करी मग वारंवार, चुंबीते गोबरे गाल._ पण लग्नानंतर राधाने इलेला दिलेला संदेश आणि कृष्णाला दिलेला `दम` बहारदार आहे. इलेला संदेश _दे विश्वास अन् दे प्रोत्साहन. जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम काम निपुण तो प्रेमिक उत्तम ...दे, कोमल तन, कोमल दे मन, प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’_ कृष्णाला `दम` _‘कठोर कांचन माझी काया, लता जणू ती, तनू कोमला, धिटाई हळू, बुजेल इला, सांभाळा तुम्ही गोपाळा!’_ काही ओळी मात्र आजही सर्वसामान्य पुरुषांनाही लागू पडतील की काय, इतक्या चपखल झाल्या आहेत. _नाही कशी मुळी लाज ;हवी मजा, वरती माज ; पुरूषांचे नीत्य काज ; बाईच्या मनीची आस कोणी ना पुसे त्यास_ चार भाग आणि ५८४ पदं असलेलं हे काव्य शृंगारीक असेलही, नव्हे आहेच. पण स्त्रीसन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि संवेदनशील मनाचा ठाव घेणारा तो एक ठेवा आहे. _इतिश्री शंतनूविरचितम् राधिका सांत्वनम् भावानुवादस्य केदारकृतपरिचयम् संपूर्णम् ...Read more

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/7120?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR06UVpU4k8DLSaBDkgmglzUuRMuX2XQ3OKxRAdL-tQo1-DZwHV7_Q3uLE4_aem_ATgHVeQrpR7vbtSsdHKWSXs5EHm0mPjS_5lEI-n3B5uorlbUPMjKGOX9doFKfROrOtk