* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661873
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : PLAY
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHENEVER A TIGRESS GIVES BIRTH TO HER LITTER, SHE DELIVERS THEM AS SHE GOES ALONG HER WAY. THOSE THAT HAVE MANAGED TO WALK AWAY ON THEIR FEET SURVIVE; THE REST BECOME PREY . THE RULERS OF SAVANGARH FOR GENERATIONS TOGETHER. THEIR DYNASTY HAS GROWN UP IN THIS SOIL. THE HAVE ENJOYED THE RICHES IT GAVE THEM. BUT THE KINGDOMS WERE MERGED .THE TIES SNAPPED. THE DESCENDANTS OF SAVANGARH MIGRATED AND SET UP HOTELS. SHOULD THE REINS OF THE DYNASTY BE HANDED OVER TO THESE HOTELIERS?...THEN WHO IS THE TRUE HEIR? CAN HEIRDOM REMAIN IMMORTAL THROUGH THE SACRIFICES AND TRIBULATIONS OF TWO LIVES – A SINGER COURTESAN AND A PRINCE THAT WERE BURNISHED AND CONSUMED BY LOVE?...
‘‘... वाघीण जेव्हा विते, तेव्हा पिलं टाकीत जाते. परत त्याच वाटेनं येताना जी पिलं आपल्या पावलांनी तिच्या वाटेतून दूर गेलेली असतात, तेवढीच टिकतात. बाकीची भक्ष्य असतात...’’ पिढ्यान् पिढ्यांचे सावनगढचे राजे. तिथल्या मातीवर त्यांचं घराणं पोसलं. तिथलं सारं ऐश्वर्य भोगलं... पण संस्थानं विलीन झाली.. रिश्ता तुटला. सावनगढचे वंशज परदेशात हॉटेल्स काढून बसले. त्या खानावळवाल्यांच्या हाती घराण्याचा वारसा सोपवायचा?.. मग कोण असू शकतो खरा वारसदार? राजदरबारातील गायिका आणि युवराज यांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं, दोन जीव जळूनही वारसा अमर होतो?...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 23-09-2001

    रणजित देसार्इंचे तीन अंकी नाटक... रणजित देसार्इंनी लिहिलेलं ‘तुझी वाट वेगळी’ हे तीन अंकी नाटक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलं आहे. सावनगढचे राजा जयपालसिंह यांचे राज्य नंतर पुढे संस्थान विलीन झाल्यानंतर त्यांच्या वंशजांनी परदेशात हॉटेल्स काढले. ्यांचा वंशज सुरजित मात्र भाऊक विचारी असतो. सावनगढचं संस्थान विलीन झाल्यानंतर तो परदेशात भटकतो. नंतर मुंबईला एक आलिशान फ्लॅट घेऊन आपल्या पूर्वजांच्या यशाच्या खुणा त्यात साठवतो. या काळात त्याला साथ देते ती त्याची मैत्रीण गायिका चंदा ऊर्फ चंदेर. प्रत्यक्षात ती एका तवायफच्या घरी वाढलेली असते. मात्र, त्याच्या मैत्रीतूनच तिचं जीवन फुलतं. त्याच्या आधाराने ती पुढे जाते. तिच्या गायकीमुळे नावलौकिक मिळवते आणि राष्ट्रपती पुरस्काराचा सन्मान तिला मिळतो. दोघांच्या वाटचालीत अनेक टक्के टोणपे येतात. तिला अवहेलना, बदनामी सहन करावी लागते. एका राजपुत्रानं तिच्या नांदी लागणंही अनेकांना सहन होत नाही. त्यांच्या दोघांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं ही कहानी फुलली आहे. शेवटी या राजघराण्याच्या बहुमोलाचा वारसा हा राजा शेवटी चंदाच्या हाती सुपूर्द करतो. रणजित देसाई यांनी संस्थानचे ढासळते वैभव, त्याच्या खुणा भाऊकपणे जपणारे सध्याचे राजे यांचं चित्रण या नाटकाच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होतं. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 28-07-2002

    आगळीवेगळी वाट चोखाळणारं नाटक… ‘तुझी वाट वेगळी’ हे तीन अंकी नाटक आहे. रणजित देसाई यांनी लिहिलेलं. एक वेगळंच नाटक. आजच्या ‘हॉट अ‍ॅण्ड हिट’ अशा भडक नाटकांच्या गलबल्यापेक्षा किती वेगळं. नाटकाचा पोतच वेगळा. ‘स्वामी’ या कादंबरीचे जनक म्हणून सारी मराठी जनत रणजित देसार्इंना ओळखते. कदाचित या जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी हे नाटक लिहून ठेवलेलं असावं. सप्टेंबर २००१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे. ही आहे एक अनोखी शोकान्त अशी प्रेमकहाणी. संस्थानिक राजपुत्र सुरजित आणि त्यांच्याबरोबर काशीहून आलेली एक गाणारी कलावंतीण चंदा यांची. सावनगढ हे विलीनकरणापूर्वीचं संस्थान. जयपाल हे त्या वेळी असलेले संस्थानिक. धनराज त्यांचा दिवाण. जयपालांचा हा युवराज गाण्याचा अतिशौकीन आहे. चंदाच्या रूपावर आणि सुरांवर त्याचं बेहद्द प्रेम आहे. पण एक युवराज कलावंतीणीशी कसा विवाहबद्द होणार? काशीला कुठे तरी उकिरड्यावर सापडलेल्या या अर्भकाला कालिचरण नावाचा दृष्ट, मुलींच्या कलांचा व्यापार करणारा वाढवतो. ती कोठीवर नाचगाणं करते; पण तिचा भयंकर छळ करणारा कालिचरण. त्याच्याकडून सुटण्यासाठीच युवराजांबरोबर आपखुशीनं आलेली चंदा. जयपाल चंदाला आपला राजगवई - हरिप्रसादच्या हाती सोपवितो. तिचा गळा लाजवाब आहे. हरिप्रसाद आपला गंडा या शिष्येला बांधतो. सुरजितचा पारंपरिक पद्धतीनं कुणा युवराज्ञीशी विवाह होतो. ही कथा सुरांच्या, गाण्यांच्या अंगानं जाणारी आहे. हरिप्रसाद मानी आहे; पण अस्सल गवय्या असल्यानं आपलं गाणं आपल्या नंतरही जिवंत राहावं, गाण्याचा वारसा चंदानं संभाळावा म्हणून संस्थान सोडून मुंबईला येतो. चंदाच्या सौंदर्यामुळे तिची मैफल करायला उत्सुक असलेले तिच्याकडून हलक्याफुलक्या बंदिशीचीच अपेक्षा करतात. हरिप्रसादला ते सहन होत नाही. मध्येच सुरजित त्यांच्या घरी येतो. युवराजाला ती त्याची आवडती ठुमरी ऐकवत असते. कालिचरणही पैशांच्या लोभानं नाही, तर चंदाला पुन्हा आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी येतो. प्रत्येकाचे हेतू निराळे. युवराजांचं सुरांवरचं प्रेम हरिप्रसादला कळत नाही. त्यांना तो जायला फर्मावतो. कालिचरणला आपली सर्व पुंजी देऊन चंदाची सुटका करतो. त्याग हा सुरांच्या पूजेचा पाया. हरिप्रसादचं चंदाशी नातं बापबेटीचं. पण नतद्रष्टं समाजक्षोभाचा या गाण्याला त्रास नको म्हणून ते नातं तसंच जपत तो चंदाशी लग्न करतो... पुढं त्याचा मृत्यू... चंदाला ‘पद्मभूषण’ हा सन्मान मिळणं... सुरजितचं तिच्या फ्लॅटवर येणं... सगळंच अत्यंत कोमल भावनांना जपत लेखकानं लिहिलेलं. मधूनमधून अर्थपूर्ण ऊर्दू शेरांची सुरजितच्या तोडी पेरणी या दृश्यांना सखोल परिमाण लाभून देते. पद्मभूषण पदक दिल्लीहून घेऊन आल्यावर सुरजितच्या हट्टामुळे सागरकिनारी असलेल्या व आता दोन हार्टअ‍ॅटॅक येऊन गेलेल्या वयोवृद्ध सुरजितच्या फ्लॅटवर चंदा येते. हा शेवटचा प्रसंग दोन्ही व्यक्तिरेखांमधलं गहिरं असं प्रेमाचं नातं घट्ट विणीत जातो. सुरजितनं संस्थान विलीनीकरणाची सही केलेली असते. तो युवराज राहिलेला नसतो. पण राजे जयपाल या त्याच्या वडिलांच्या प्रतिष्ठेच्या व राजघराण्याच्या पारंपरिक कल्पनांमुळेच तो गायिकेपासून दुरावतो. म्हणून शेवटी आपल्या घराण्याचा वारसा असलेला अत्यंत मौल्यवान असा मोत्याचा कंठा चंदाला देताना तो उद्गारतो, हा कंठा काय आमच्या सुपुत्रांनी इटलीमध्ये काढलेल्या हॉटेलवाल्यांना - खानावळवाल्यांना द्यायचा? सावनगढचं ‘सावनीवाले’ हे आडनाव मिरवून तू पद्मभूषण हा सर्वोच्च सन्मान तुझ्या गाण्यामुळे मिळवला...’ आणि अशा समाधानातच त्याचा होणार व्याकुळ, पण प्रसन्नचित्त मृत्यू... असं हे नाटक. खरोखरच आजच्या जमान्यात वेगळं त्याग, भक्ती, प्रेम, करारीपणा, आयुष्यभर प्रणयाला जपणं आदी कितीतरी भव्योदात्त मूल्यांवर हे नाटक उभं आहे. याचे प्रत्यक्ष प्रयोग झालेत किंवा कसे, याचा उल्लेख पुस्तकात नाही. मात्र राजदरबारातील गायिका आणि युवराज यांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं हे दोन जीव जळूनही गाण्याचा वारसा अमर झालेला आहे. असं हे अमर, अभिजात, अक्षर नाटक मेहता पब्लिशिंग हाऊसने लेखकाच्या मृत्यूनंतर प्रकाशित करून नाट्यवेड्या प्रेक्षकांना अमोल नजराणाच बहाल केला आहे... अशा नाटकाकडे आजचे रंगकर्मी वळतील? हा प्रत्यक्ष प्रयोग (संगीत अबाधित ठेवून) रंगमंचावर सादर करून मराठी चोखंदळ प्रेक्षकांचा दुवा घेतील? यावर सुंदर मालिका निर्माते काढतील...? दूरदर्शनवर ती दाखवली जाईल? काही तरी चांगलं मिळण्यासाठी एवढे प्रश्न...! -भावना भार्गवे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 18-11-2001

    प्रेमाची अनेक विलोभनीय रूपे… ‘स्वामी’सारख्या विख्यात कादंबरीचे लेखक रणजित देसाई याचं नाव नाटककार म्हणून ज्ञात नाही. परंतु ते उत्कृष्ट नाट्यलेखनही करू शकतात हे ‘तुझी वाट वेगळी’ या त्यांच्या नाटकाचे वाचन करताना दिसून येते. ‘प्रेम’ या विषयावर अनेक नाक-नाटके, चित्रपट येऊन गेले, त्यात सुखान्त किंवा दुखान्त असलेल्या प्रेमकथा मांडण्यात आल्या. येथून रणजित देसार्इंनी ‘तुझी वाट वेगळी’ या नाटकात प्रेमाची अनेक रूपं दाखविली त्यासाठी त्याग आणि संघर्ष चित्रित करून प्रेम किती श्रेष्ठ असते हे दाखवून दिले आहे. एका युवराजाची ही शोकान्त पण उदात्त प्रेमकहाणी आहे. कित्येक प्रेमाची तऱ्हा या त्यांनी वेगवेगळया चित्रित केल्या आहेत. चंदाचे त्यागी प्रेम, युवराज सुरजितचे अमर पण एकर क्षणाला अविश्वासाने डगमगणारे प्रेम, हरिप्रसाद या राजगवयाचे आपल्या कलेवर असणारे प्रेम आणि त्यासाठी त्यांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत केलेला संघर्ष आणि चंदाला आपली कला अर्पण करून मोठं करण्याचं स्वप्न, त्यासाठी अरिस्थितीशी केलेला संघर्ष. कालिचरण याचं पैशावर असणारे प्रेम, रामसिंग या नोकराचे आपल्या मालकावर असणारे प्रेम आणि शेवटपर्यंत त्याने मालकाला दिलेली साथ, जयपाल यांचे आपले राज्य आणि प्रतिष्ठा यांवर असणारे प्रेम अशा या प्रेमाच्या परी आहेत. सुरजित - चंदा यांचं प्रेम एका कसोटीच्या क्षणी अविश्वासाने डगमगतं आणि त्यांना वेगवेगळया वाटेवर नेऊन सोडतं. सुरजित आपल्या व्यक्तींमध्ये राहूनही एकटा पडतो. तर चंदा कलेसाठी स्वत:ला वाहून घेते. यासाठी तिला आपले गुरू हरिप्रसाद यांच्या बरोबर विवाहही करावा लागतो. ज्या राज्यासाठी जयपाल त्यांना वेगवेगळं करतो ते राज्य बरखास्त होतं. सुरजितची बायको, मुले विदेशात स्थायिक असतात. तो एकटा पडतो. सुखाबाबत एके ठिकाणी तो म्हणतो, ‘तुम्ही राज्य उपभोगलंत. एका माणसानं पराक्रम केला आणि त्याच्या नावावर तुम्ही पिढ्यान्पिढ्या राज्य करित आला. आयुष्यातली सर्व सुखं तुम्हाला मिळाली. दु:खाचा लवलेशही तुम्हाला शिवला नाही. तुम्ही खरे भाग्यवान.’ आपल्या राज्याचा अनमोल ठेवा तो शेवटी चंदाला अर्पण करतो. मरण तरी सुखाने येईल याची तो अपेक्षा करतो. त्याला वाईट एवढेच वाटते की त्याला सामान्य माणसाचे आयुष्य जगता आले नाही. तो चंदाच्या मांडीवर प्राण सोडतो. त्यांचं प्रेम वाचकाला सुन्न करून टाकते. असे हे नाटक वाचनीय आहे. लेखकाची भाषाशैली, प्रसंगाची गुंफण ही वाचकाला विचार करायला लावणारी आहे. -प्रतिभा वानखेडे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more