* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CONVERSATIONS WITH GOD PART - II
  • Availability : Available
  • Translators : VRUSHALI PATWARDHAN
  • ISBN : 9788184989564
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : PHILOSOPHY
  • Available in Combos :NEALE DONALD WALSCH COMBO SET - 2 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN NEALE DONALD WALSCH WAS EXPERIENCING A LOW POINT IN HIS LIFE, HE DECIDED TO WRITE A LETTER TO GOD. WHAT HE DID NOT EXPECT WAS A RESPONSE AND THE RESULT WAS CONVERSATIONS WITH GOD BOOK 1. IN BOOK 2, THE DIALOGUE EXPANDS TO DEAL WITH THE MORE GLOBAL TOPICS OF GEOPOLITICAL AND METAPHYSICAL LIFE ON THE PLANET, AND THE CHALLENGES NOW FACING THE WORLD. THIS INCREDIBLE SERIES CONTAINS ANSWERS THAT WILL CHANGE YOU, YOUR LIFE, AND THE WAY YOU VIEW OTHER BEINGS.
माणसाच्या आध्यात्मिक वाटचालीबद्दल सर्व काही म्हणजे हा ‘संवाद परमेश्वराशी’ – ‘कॉन्व्हर्सेशन विथ गॉड’.ही वाटचाल तुमची, माझी, सगळ्या मानवजातीची आहे. ‘कॉन्व्हर्सेशन विथ गॉड’ या मालिकेतल्या या दुसऱ्या पुस्तकातल्या शेवटच्या भागात संपूर्ण मानवजातीच्या एकत्रित वाटचालीवर विशेष भर दिलेला आहे.इथंआपल्या पुढे एक आव्हान आहे.आपल्या पृथ्वीवर ज्या पद्धतीनं आपण जगत आहोत, ते फार संयोग्य नाही; ते संकुच कामीआहे, असंयापुस्तकात म्हटलं आहे.काही ठिकाणी आणि काहींच्या बाबतीत तर अतिशय निराशा जनकस्थिती आहे. अजूनही एक मार्ग आहे; पण तो शोधून सापडणार नाही.आपणच तो निर्माण करू शकतो.जुन्या कालबाह्यधारणांना कवटाळून बसलो, तर हा नवा मार्ग निर्माण करता येणार नाही.त्यासाठी नव्या धारणा, देवाबद्दलचा नव्या कल्पना आणि जगाला प्रकाशाकडे नेणाऱ्या नव्या वाटायां कडे खुल्यादिलानं बघायला हवं.या नव्या वाटागोष्टींचा मोकळ्या मनानं विचार करायलाहवा.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SANVADPARMESHWARASHIPART-2 #CONVERSATIONSWITHGODPART-II #संवादपरमेश्वराशीभाग२: #PHILOSOPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VRUSHALIPATWARDHAN #वृषालीपटवर्धन #NEALEDONALDWALSCH "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 17-04-2016

    मानव जातीच्या कल्याणासाठी केलेले विचारमंथन... लेखक दक्षिण ओरॅगॉन प्रांतात नॅन्सी इथं राहतात. माणसांना स्वत:ची ओळख व्हावी, या उद्देशाने ना नफा तत्त्वांवर एक प्रतिष्ठान सुरू केले आहे. माणसांची वैयक्तिक प्रगती होऊन आध्यात्मिक समज निर्माण करण्याच्या दृषटीने हे प्रतिष्ठान काम करते. स्वत: वॉल्श अमेरिकेत फिरून व्याख्यानं देतात आणि कार्यशाळा आयोजि करून ‘संवाद परमेश्वराशी’ या पुस्तकातील संदेशाचा प्रचार-प्रसारही करतात. माणसाच्या आध्यात्मिक वाटचालीबद्दल सर्व काही म्हणजे हा ‘संवाद परमेश्वराशी’ ही वाटचाल सगळ्या मानवजातीची आहे. सगळ्या मानवजातीच्या एकत्रित, संयुक्त वाटचालीवर या पुस्तक मालीकेतल्या ‘संवाद परमेश्वराशी’ या दुसऱ्या पुस्तकात विशेष भर दिला आहे. इथे आपल्या पुढे एक आव्हान दिलेलं आहे. या पृथ्वीवर आपण पद्धतीने जगत आहोत ते फारसं योग्य नाही, तसं ते कुचकामी आहे, असं या पुस्तकात म्हटलं आहे. काही ठिकाणी आणि काहींच्या बाबतीत तर अतिशय निराशाजनक स्थिती आहे. अजूनही एक मार्ग आहे, पण तो शोधून सापडणार नाही, तो आपण निर्माणच करू शकतो आणि जुन्या कालबाह्य कल्पनांना, विवादांना बसलो तर हा नवा मार्ग निर्माण करता येणार नाही. त्यासाठी नव्या कल्पना देवाबद्दलच्या नव्या कल्पना आणि जगाला प्रकाशाकडे नेणाऱ्या आयुष्याच्या नव्या धारणा याकडे खुल्या मनाने बघायला हवं. या नव्या गोष्टींचा मोकळ्या मनाने विचार करायला हवा. अशा नवीन कल्पनांचं हे पुस्तक आहे. ते तुम्हाला वेगळी दृष्टी देऊ करतं आणि हे कमी महत्त्वाचं नाही. एखाद्या नुसत्या बौद्धिक प्रयोगापेक्षा हे मोठं आहे. कारण तुमच्या दृष्टिकोनांतून तुमची आकलनशक्ती निर्माण होते. आकलनातून आशा धारणा निर्माण होतात. धारणांतून तुमचं वर्तन व्यक्त होतं. वर्तनातून अनुभव आणि अनुभवातून आपलं वास्तव निर्माण होतं. हे एक चक्र आहे. घड्याळाच्या दिशेनं त्याचे काटे फिरतात आणि तुमची धारणा हा यातला, बाराचा सर्वोच्च काटा आहे. माणसाची धारणा बदलण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे याखेरीज आणखी एखादा मार्ग आहे, असा आभास निर्माण करणं, असं दाखवणं ‘एखाद्या गोष्टीबद्दलची आपली धारणा, आपला दृष्टिकोन हाच एकमेव आहे. निदान एकमेव योग्य मार्ग आहे.’ असंच अनेकांना वाटत असतं. जग बदलायचं असेल, तर माणसांच्या विचारांना नवी दिशा द्यायला हवी. लाखो वर्षांत माणसांच्या वागण्यात फरक पडलेला नाही. आजही आपण अश्मयुगीन माणसासारखेच हिंसक वागतोय. जीवनापासून आपण फारकत घेतली आहे. असंच आजही आपण खरंच कोण आहोत आणि भोवतालच्या प्रत्येक गोष्टीशी, चराचराशी आपले नेमकं खरं नाव काय आहे, याची आपल्याला कल्पनाच नसते. वर्तनाच्या पातळीवर बदल घडवण्याचं आव्हान आपण घेत राहणार असू तर विशिष्ट वागणं रोखण्यासाठी काहीतरी करणारच. पण ते क्षणभरच. तेसुद्धा सक्ती करून! पण ही जुलूम, जबरदस्ती थांबली की जुना स्वभाव, धरणा आणि त्यामुळे तसं वागणं पुन्हा डोके वर काढू शकतं. परमेश्वराचा जगाला संदेश आहे- ‘माझ्याबद्दल तुमचा चुकीचा समज आहे.’ हा संदेश जग बदलू शकेल असे लेखकाला वाटते. त्यांच्या मते हे पुस्तक खूपच परिणामकारक आहे. यातलं ज्ञान स्वयंभू आहे. मन लगेच शांत होते. मनावर हळुवार फुंकर घालणारं असं हे पुस्तक आहे. ‘प्रिय परमेश्वरा, तू सतत आमच्याबरोबर असतोस. हे ठाऊक आहे. तुझ्याशी आम्ही एकरुप आहोत. कसलंच द्वैत नाही. हाच अद्वैतानुभव घेण्यासाठी आम्हाला मदत कर. हरघडीला या सत्याचा प्रत्यय येतो. आमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला स्वत:च्या अस्तित्वाबद्दल पूर्णत्व आणि श्रीमंती समृद्धीचा अनुभव घ्यायला हवा. ही श्रीमंती, परिपूर्णता, चमत्कार आणि चातुर्य, शांती आणि काटेकोरपणा हीच आपली खरी ओळख आहे. त्यातूनच आपलं आयुष्य सुखकर आणि आपलं जग सुखद होणार आहे.’ आमेन, आमेन (लेखकाचा उदात्त विचार) माणसाच्या आध्यात्मिक वाटचालीबद्दल सर्वकाळी म्हणजे हा, ‘संवाद परमेश्वराशी.’ ही वाटचाल तुमची सगळ्या मानवजातीची आहे. या मालिकेतील या दुसऱ्या पुस्तकातल्या शेवटच्या भागात संपूर्ण मानव जातीच्या एकत्रित वाटचालींवर भर दिलेला आहे. इथे आपल्यापुढे एक आव्हान आहे. आपल्या पृथ्वीवर ज्या पद्धतीने आपण जगत आहोत, ते योग्य नाही. ते कुचकामी आहे. काही बाबतीत अतिशय निराशाजनक स्थिती आहे. अजूनही एक मार्ग आहे; पण तो शोधून सापडणार नाही. तो आपणच निर्माण करू शकतो. जुन्या धारणांना कवटाळून हा नवा मार्ग निर्माण करता येणार नाही. देवाबद्दलच्या नव्या कल्पना आणि जगाला प्रकाशाकडे नेणाऱ्या नव्या वाटा खुल्या दिलानं बघायला हव्या. या नव्या गोष्टींचा मोकळ्या मनान विचार करायला हवा. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 08-05-2016

    माणसाच्या आध्यात्मिक वाटचालीबद्दल सर्वकाही म्हणजे हा संवाद परमेश्वराशी ‘कॉव्हर्सेशन विथ गॉड’. ही वाटचाल तुमची, माझी, सगळ्या मानवजातीची आहे. ‘कॉव्हर्सेशन विथ गॉड’ या मालिकेतल्या या दुसऱ्या पुस्तकातल्या शेवटच्या भागात संपूर्ण मानवजातीच्या एकत्रित वाटचलीवर विशेष भर दिलेला आहे. इथं आपल्यापुढे एक आव्हान आहे. आपल्या पृथ्वीवर ज्या पद्धतीनं आपण जगत आहोत, ते फारसं योग्य नाही; ते तसं कुचकामी आहे, असं या पुस्तकात म्हटलं आहे. काही ठिकाणी आणि काहींच्या बाबतीत तर अतिशय निराशाजनक स्थिती आहे. अजूनही एक मार्ग आहे : पण तो शोधून सापडणार नाही. आपणच तो निर्माण करू शकतो. जुन्या कालबाह्य धारणांना कवटाळून बसलो, तर हा नवा मार्ग निर्माण करता येणार नाही. त्यासाठी नव्या धारणा, देवाबद्दलच्या नव्या कल्पना आणि जगाला प्रकाशाकडे नेणाऱ्या नव्या वाटा यांकडे खुल्या दिलानं बघायला हवं. या नव्या गोष्टींचा मोकळ्या मनानं विचार करायला हवा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more