MEHTA MARATHI GRANTHJAGAT DIWALI ISSUE 2020

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MEHTA MARATHI GRANTHJAGAT DIWALI ISSUE 2020
  • Availability : Available
  • ISBN : 0
  • Edition : NOVEMBER 2020
  • Publishing Year : NOVEMBER 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 0
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
NA
कोरोना काळात आपण सर्वांनीच मोठं स्थित्यंतर अनुभवलं. अजूनही ते वादळ शमलेलं नाही, पण तरीही आपल्याला आपल्या दिनक्रमाकडे वळायलाच हवं. यंदाच्या आमच्या मेहता मराठी ग्रंथजगतच्या दिवाळी अंकात कोरोनाने आपल्या जगण्यावर केलेला प्रभाव अर्थातच अनुभवास येणार आहे. मुख्यतः कोरोना काळातलं सृजन या भागात काही कलाकार, साहित्यिक आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर आपले अनुभव आणि नव्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करतील. यात प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या कोरोना काळातील दोन सिनेमांच्या निर्मितीचा अनुभव, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, समीक्षक रणजित शिंदे, अनुवादक उमा कुलकर्णी यांचे अनुभव, अशा दिग्गजांच्या लेखांचा समावेश असेल. शिवाय या अंकात देशातल्या आणि जगातल्याही विविध भागात स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांचे कोरोना काळातले अनुभव, त्यांचं महाराष्ट्राशी असलेलं जोडलेपण आणि कोरोनामुळे आलेली अस्वस्थता याविषयीच चिंतन असेल. या अंकात विज्ञान कथा आणि वैज्ञानिक साहित्यावरही भर देण्यात येत आहे. संजय ढोले, बाळ फोंडके यांच्या कथांचा आस्वाद या भागात घेता येईल. तर जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहचवा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating Starमहाराष्ट्र टाइम्स २६/११/२०२०

    सगळीकडे करोनाने थैमान घातले असताना, साहित्यविश्व त्या पासून दूर कसे राहू शकेल? याच धाग्याभोवती `मेहता मराठी ग्रंथजगत` चा यंदाचा अंक गुंफला आहे. मास्कपासून बनवलेला आकाशकंदील हे चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ कोणत्याही लेखापेक्षा कमी नाही. दिगदशक गेंद्र अहिरे यांनी `लॉकडाऊन फिल्म` या सिनेमाविषयी अनुभव लिहिले आहेत. जेष्ठ लेखक, अनुवादक उमा कुलकर्णी यांनी `कोरोना.... कोरोना .....प्लेग` या लेखात करोनाच्या प्रारंभिक काळातील कंबोडिया आणि व्हिएतनाममधील प्रवासाविषयी लिहिले आहे. अमेरिकेतील करोनाविषयक अनुभव लीना सोहोनी, मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, शोभा चित्रे यांनी लिहिले आहेत. ओडिशा, पश्चिम बंगालमधील वातावरणाचा वेध राधा जोगळेकर, सई कुलकर्णी-मुखर्जी यांनी घेतला आहे. करोनाकाळातील डिजिटल साहित्यावर रणधीर शिंदे यांनी भाष्य केले आहे. लॉकडाऊनच्या काळात सुरु झालेल्या `पुस्तकवाले` बद्दल आशय वाळंबे यांनी सांगितले आहे. ...Read more

  • Rating Starलोकमत २५-११-२०२०

    `कोरोना` या विषयाशी निगडित दिवाळी अंकात चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी व दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी `आतला ` कलाकार लॉकडाऊन काळात काय करत होता, यांचं कथन केलंय. डॉ. बाळ फोंडके, डॉ. संजय ढोले, जोसेफ तुस्कानो , शशिकांत काळे यांच्या रंजक विज्ञान कथा त पूजा भडांगे, सुप्रिया वकील यांच्या अनुवादित कवितांचा अंकात सहभाग आहे. पुस्तकवाले संस्थेच्या स्थापनेचा इतिहास आशय वाळंबे यांनी उलगडला असून विविध प्रांत, देशातील कोरोना परिस्थीचा मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, शोभा चित्रे, राधा जोगळेकर, सई कुलकर्णी-मुखर्जी यांनी वेध घेतला आहे. रणधीर शिंदे व उमा कुलकर्णी यांनीही अनुक्रमे कोरोना काळातील डिजिटल साहित्य व कंबोडिया- व्हिएतनाम प्रवास, लॉकडाऊनच्या आठवणी नेमकेपणानं मांडल्या आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more

MAHASAMRAT RANKHAINDAL
MAHASAMRAT RANKHAINDAL by VISHWAS PATIL Rating Star
गंधार

नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more