* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983883
  • Edition : 4
  • Publishing Year : MAY 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : ILLUSTRATIVE
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AS I STAYED IN A SMALL HUT AT THE BANKS OF A LAKE IN THE NAGZIRA SANCTUARY, THIS HUGE PEEPUL WAS MY CONSTANT COMPANION.WE ALL KNOW RAJASTHAN AS A DESERT. BUT WE FOUND MANY STORAGES OF WATER ALL ALONG WHICH ARE FAR AWAY FROM THE HUMAN HABITATS. IT WAS HERE THAT WE CAME ACROSS MANY BIRDS.I ROAMED AROUND THE HIMACHAL PRADESH. I SAW THE SNOW COVERED HIMALAYAS WITH MY NAKED EYES. AND WHILE AT THE SOLAN RAILWAY STATION, I ALSO CAME ACROSS BABIES TIED ON THEIR MOTHER’S BACKS, WATCHING THE WORLD AROUND THEM WITH ASTONISHED AND BEWILDERED EYES.
मी रेषांकडे केव्हा, कसा वळलो? आज आठवतं ते इतकंच की, लहान वयातच वळलो. शब्दांकडे वळण्याआधी रेषांकडे वळलो. घरात कोणी चित्रकार नव्हते. कोणामुळे हा नाद लागला? काही सांगता येत नाही. आठवणी उकरू लागल्यावर ध्यानात येतं की, ही आवड निर्माण व्हायला माझी आई थोडीफार कारणीभूत झालेली आहे. रांगोळ्या, गव्हा-तांदळांनी भरलेले चौक, रंगविलेले संक्रांतीचे घट. हिरवी पाने, नारळ, सुपाऱ्या , खणांच्या घड्या, काचेच्या बांगड्या, बुक्का, गुलाल, हळद-कुंकू, चैत्रगौरी, त्यांच्यापुढची आरास, सारवलेल्या अंगणात रेखलेली गौरीची पावले.... आकृती, रंग, रेषा यांची किती विविध आणि सुंदर रूपं मला बघायला मिळायची! मला आज वाटतं, चित्रकलेचं माझं शिक्षण इथून सुरू झालं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarMithila Joshi

    व्यंकटेश माडगुळकर यांचे "जनावनातली रेखाटणे" हे पुस्तक दुकानात बघून, विशेष वाटलं होतं. व्यंकटेश माडगूळकरांचा परिचय साहित्यिक म्हणून होता, `बनगरवाडी` शाळेपासूनच माहिती होतं, त्यांचं रेखाटण्याचं कौशल्य अगदीच अपरिचीत. हे छोटेखानी पुस्तक चाळता क्षणीच वित घेण्याचा मोह आवरला‌ नाही. याची 6/7 पानी‌ प्रस्तावना प्रचंड भावली.‌ इतकी कि द़ोन तीनदा वाचन झाल्यावर, इतर कोणाकोणाला पकडून `हे जरा वाचते, एक ना` , म्हणून वाचनाची पारायणं झाली. `रेषांकडे कसे वळालो` हे सांगताना, चित्रकलेची पहिली गुरु असलेल्या आईबद्दलचं त्यांनी केलेलं वर्णन प्रेमात पाडतं. मग चित्रकलेचे पहिले शिक्षक कलाल गुरुजीबद्दल. गुरुजींबद्दल तर एक गोष्ट फार मजेदार आहे, "कलाल गुरुजी चित्राखाली सही करतांना फक्त `क` अक्षर लाल रंगात काढत असत. असं का म्हणून विचारलं तर म्हणले, `क` लाल आहे. " :) या साहित्यिकाने, चौथीत असताना रस्त्यावरचे मैलाचे दगड रंगवण्याचं आणि त्यावर आकडे घालण्याचं सरकारी काम केलं होतं, अश्या कितीतरी नवल वाटाव्या अश्या गोष्टी समजतात. शिकारीची आवड त्यांना वनातील रेखांकनांकडे घेऊन गेलीय हे जाणवतं. त्यांच्या आवडत्या चित्रकार व्हान गाॅग ह्याच्या गावाला, त्याच्या समाधीला दिलेल्या भेटीचं वर्णन एक कलाकारच करू जाणे. चित्रकलेपासून साहित्यापर्येंतच्या वाटचालीचा मागोवा घेताना , ते हे ही अधोरेखित करतात की, " मध्ये अनेक वर्ष काही केलं नसताना, माळावर पडलेल्या कोरफडीच्या पात्याप्रमाणे माझ्या जवळच्या रेषेने अंगच्या रसावर पोषण करून आपली मुळे जमिनीत पसरली होती, त्याचमुळे त्यांचं रेखाटन वयाच्या आठव्या वर्षापासून म्हातारपणापर्यंत टिकून राहीलं" "ग दि माडगूळकर हे वडील बंधू यवतमाळ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते, अध्यक्षांचा भाऊ असल्यामुळे, आपल्याला व्यासपीठावर कधीही,केव्हाही जाता येई‌, रेखाटणे करता येत असत" किती प्रांजळपणा! या पुस्तकात तेव्हाची साहित्यिकांची रेखाटनं, नागझिरा, राजस्थान, धायरीच्या रानातली, काझीरंगा आणि‌‌ इतर आणि बरीच ठिकाणी केलेली रेखाटनं आहेत. या पुस्तकामुळे व्यंकटेश‌ माडगूळकर माणूस म्हणून जास्त कळतात. रेखाटने अप्रतिम‌ आहेत.‌ नक्की अनुभवावी अशी जनावनातली रेखाटणे..! रेखाटनांखालीच्या तळटीपा मस्त. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more