SUMEDH VADAWALA RISBUD

About Author




१९६२ मधे कोकणात जन्मलेल्या सुमेध वडावालांचं बालपणानंतरचं आयुष्य विलेपार्ल्यात गेलं. माझगांव डॉकमधून ते सेवानिवृत्त झाले. पंचविशीत लेखनाला आरंभ करून नंतरच्या पस्तीस वर्षांत जवळपास तेवढीच पुस्तकं प्रकाशित झाली. कथासंग्रह, कादंबर्‍या; वाचकांच्या, समीक्षकांच्या पसंतीस उतरल्या असल्या तरी उत्तरकाळात ते आत्मकथा लेखनात रमले. सर्वच पुस्तकांना विपुल आवृत्त्यांचं भाग्य लाभलं. महाराष्ट्र शासन, युवक बिरादरी, महाराष्ट्र सेवा संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद आदी राज्य व देश पातळीवरच्या एकूण पुरस्कारांपैकी; सर्वोत्कृष्ट कथांसाठीचे शांताराम, डॉ. अ. वा. वर्टी, श्री. दा. पानवलकर आदी महत्त्वपूर्ण पुरस्कार त्यांच्या कथालेखनाची गुणवत्ता अधोरेखित करणारे रले. कधी कौटुंबिक कधी अलक्षित चाकोरीबाह्य विषयांना कवेत घेणार्‍या त्यांच्या सर्वच कथांनी आशयसंपृक्ततेमुळे आणि भिन्नवेधक, अनघड शैलीमुळे वाचकांना कायम गारूड घातलं.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
CHANDANFULA Rating Star
Add To Cart INR 270
SAMAKSHA Rating Star
Add To Cart INR 360
SANJAVA Rating Star
Add To Cart INR 230
VIRAHAVAAS Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती

`छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते. आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय. यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. अगदी हसून पुरेवाट झाली. आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं. आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा. खूप फ्रेश वाटलं. निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more