KONDAPALLI KOTESWARAMMA

About Author

Birth Date : 05/08/1918
Death Date : 19/09/2018


SHE WORKED ACTIVELY FOR THE COMMUNIST PARTY OF INDIA ALONG WITH HER HUSBAND AND THE LIKES OF PUCHAPALLI SUNDARAIAH. SHE CONTRIBUTED ACTIVELY TO THE TELANGANA REBELLION. SHE WORKED FOR THE PARTY FOR FEW YEARS STAYING UNDERGROUND (IN BANDAR, ELURU, PURI, RAICHUR), AWAY FROM HER FAMILY AND CHILDREN. SHORTLY AFTER THE REBELLION, THE COMMUNIST PARTY DIVIDED INTO TWO. HER HUSBAND DESERTED HER AND SHE WAS LEFT TO FEND FOR HERSELF AND HER CHILDREN. AT THE AGE OF 35, SHE CAME TO HYDERABAD TO STUDY MATRICULATION. SHE SUSTAINED DURING THOSE YEARS THROUGH THE LITTLE MONEY EARNED FROM WRITING STORIES AND PERFORMING FOR THE RADIO. EVEN WHILE SUSTAINING WITH SUCH MEAGRE EARNINGS, SHE USED TO SEND TEN RUPEES EACH TO THE PARTY (CPI AND CPI(M)) FUNDS EVERY MONTH. AFTER COMPLETING HER MATRICULATION, SHE JOINED POLYTECHNIC COLLEGE IN KAKINADA AS A MATRON. SHE STARTED PARTICIPATING IN THE LITERARY EVENTS IN KAKINADA. LATER, SHE WORKED IN VARIOUS COLLEGES ACROSS THE STATE. SHE HAD A DAUGHTER KARUNA AND A SON CHANDRASEKHAR. KARUNA WAS A DOCTOR AND CHANDRASEKHAR STUDIED AT REGIONAL ENGINEERING COLLEGE, WARANGAL. BOTH OF THEM DIED UNDER UNFORESEEN CIRCUMSTANCES. DURING THESE YEARS, HER HUSBAND ESTABLISHED THE PEOPLES WAR PARTY IN INDIA AND WORKED ACTIVELY TOWARDS IT. BUT HE GOT OUSTED LATER ON FROM HIS OWN PARTY AND WAS JAILED. HE SUFFERED MENTAL ILLNESS AND DIED AT THE AGE OF 87 IN HIS GRANDDAUGHTERS (DAUGHTER OF KARUNA) PLACE. KOTESWARAMMA LIVED IN VIJAYAWADA FOR FEW YEARS AND LATER ON MOVED TO CHANDRA RAJEWSARA RAO OLD AGE HOME IN HYDERABAD.

कोंडापल्ली कोटेश्वराम्मा ह्या आंध्रप्रदेशातील माओवादी चळवळीचे दिवंगत प्रणेते श्री. सीतारामय्या कोंडापल्ली यांच्या पत्नी म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी स्वत: राजकीय कार्यकत्र्या म्हणून बरीच वर्षे काम केलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या तेलुगू कथा आणि कवितासंग्रह देखील प्रकाशित झाले आहेत. जवळपास शंभर वर्षांचे आयुष्य लाभलेल्या कोटेश्वराम्मांनी वयाच्या ९२व्या वर्षी निर्जन वारधी या नावाने आपले आत्मवृत्त लिहिले. २०१२ मध्ये हे आत्मवृत्त प्रकाशित झाले आणि २०१८ मध्ये कोटेश्वराम्मांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची जीवनकहाणी म्हणजे आंध्र प्रदेशातील महत्त्वाच्या सामाजिक, राजकीय चळवळीतील भेदक अनुभवांची गाथाच आहे. स्वातंत्र्य आंदोलन, कम्युनिस्ट आंदोलन, तेलंगणाचा सशस्त्र लढा, नक्षलबारी या सर्वांचा यात समावेश आहे. त्यांच्या या अनुभवांना एक बाल विधवा, देशातील सर्वांत जहाल कम्युनिस्ट आंदोलनातील कार्यकर्ती, सर्वांत प्रभावी नेत्याची पत्नी, एक स्वतंत्र विचारसरणीची प्रतिभावान स्त्री आणि याशिवाय एक आई, आज्जी असे अनेक पदर आहेत.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 1 of 1 total
38 %
OFF
NIRJAN POOL Rating Star
Add To Cart INR 250 INR 155

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more