* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619689
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 876
  • Language : MARATHI
  • Category : CLASSIC
  • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHIVSENA CHIEF BALASAHEB THACKERAY WAS KNOWN FOR HIS FEARLESS, OUTSPOKEN , FREE STYLE OF SPEECH . HIS POLTICS BASED ON HINDUTVA & INTER STATE MIGRATION SETS NEW PATTERNS IN THE POLITICS OF MAHARASHTRA . SO BALASAHEB THACKERAY’S EVERY STATEMENT WAS ALARM FOR THE POLITICAL CHANGES DURING HIS ERA. BALASAHEB THACKERAY SPOKE HIS MIND IN MANY FREEWHEELING INTERVIEWS GIVEN TO SAMANA EDITOR SANJAY RAUT . THESE INTERVIEWS ARE MOST IMPORTANT DOCUMENTATION OF MAHARASHTRA POLITICS. THE BOOK NAMED ‘EKVACHANI PART 1&2 WILL REMIND BALASAHEB THACKERAY’S ERA TO ITS READERS .
हिंदुत्वाच्या जोरावर ज्यांनी महाराष्ट्राची सत्ता मिळवली आणि केंद्रातही शिवसेनेला सत्तेत आणलं, त्या शिवसेनेचा अनेक वर्षं चेहरा असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या परखड मुलाखती ‘एकवचनी’ या पुस्तकात संजय राऊत यांनी एकत्र केल्या आहेत. बाळासाहेबांचा सडेतोड स्पष्टवक्तेपणा जो जगद्विख्यात होता, तो विशेषत्वाने या मुलाखतींमध्ये जाणवला आहे. कडवा हिंदुत्ववाद, दंगली, गँगवार याविषयी त्यांनी आपली मते परखडपणे मांडली आहेत. शरद पवार, सोनिया गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांसारख्या नेत्यांवर प्रखर टीका केली आहे. पक्षांतर करणाऱ्या छगन भुजबळांसारख्या नेत्याचेही त्यांनी वाभाडे काढले आहेत. भ्रष्टाचार, बेरोजगारी या समस्यांवरही त्यांनी आपली मते मांडली आहेत. शिवसेना मतभेद, भाजपबरोबर असणारे सबंध या राजकारणाशी संबंधित प्रश्नांना उत्तरे देतानाच देवधर्म, नास्तिकता, श्रद्धा, कुटुंब यांविषयीही ते भरभरून बोलले आहेत. मराठी अस्मितेचा अभिमान बाळगणाNया बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या मुलाखतींमधून समोर येतात. शिवसेनेची धोरणं, शिवसेनेचे आचारविचार, अपेक्षा यांसोबतच शिवसेनेचा इतिहास, भविष्यकाळ या सर्वांविषयी बाळासाहेबांची मतं आणि विचार या मुलाखतींमधून प्रकट होतात.

No Records Found
No Records Found
Keywords
BALASAHEB THAKARAY, SANJAY RAUT, HINDISAM, SHIV-SENA, MAHARASHTRA, CONGRESS, SHARAD PAWAR, SONIAGANDHI, INDIRA GANDHI, RAJEEV GANDHI, PAKISTAN, POLITICS, BRIBERY, SAMANA, SHIVRAI, BABARI, RAM MANDIR, INTERVIEW, MELAVA, MUMBAI MUNICIPAL, CORPORATION, BJP, RAJ THAKARAY, UDDHAV THAKARAY, MEDIA, ELECTION , SAVARKAR, HINDUISAM, KASAB, TERORISAM, AJIT PAWAR,YUVASHAKTI, FARMERS, MNS, CARTOONS, MEDIA, WORKERS, MANISHANKAR
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    बाळासाहेब ठाकरे यांच्या घणाघाती मुलाखती... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ‘सामना’ चे संपादक, आणि १९९४ पासून संजय राऊत हे कार्यकारी संपादक आहेत. बाळासाहेबांना दैनिकाच्या दैनंदिन कामकाजाकडे पाहण्याएवढी उसंत मिळणे अशक्यच; त्यामुळं कार्यकारी संपादक ज कोणी असेल त्यालाच बाळासाहेबांची मानसिकता लक्षात घेऊन, त्यांच्या मनातले जाणून रोज अग्रलेखाची ‘लाईन’ ठरवणे क्रमप्राप्त असते. संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या वृत्ती-प्रवृत्तीला साजेलसे स्वत:चे व्यक्तिमत्व ‘सामना’ ची सूत्रे हाती आल्यावर घडवले आहे. सामना वाचला जातो तो शिवसेनेचे मुखपत्र म्हणून, बाळासाहेबांच्या मतांचे व्यासपीठ म्हणून! कार्यकारी संपादकाच्या वैयक्तिक मतांसाठी सामना कोणी वाचावा, अशी अपेक्षाही नसते; त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्याच भूमिकेत शिरून, त्यांच्याच भावभावनांना व धोरणात्मक व्यूहाला संपादकीय शब्दरूप देण्यातील कौशल्य उत्तमप्रकारे संजय राऊत यांनी प्रकट केले आहे, आणि बाळासाहेबांना रुचेल, शोभेल अशीच शैली घडवली आहे. क्वचितच कधी बाळासाहेबांची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली असेल, इतक्या दोघांच्या वेव्हलेंग्थज् जुळलेल्या आहेत. बाळासाहेबांना शोभतील असे विचार बाळासाहेबांना शोभेल अशा आक्रमक शैलीत मांडण्याची ही कसरत संजय राऊत गेली सात-आठ वर्षे करीत आहेत. तरीही बाळासाहेबांची त्या त्या वेळची मते ही शिवसैनिकांना व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच ठाकरी भाषेत हवी असतात. ही वाचकांची गरज लक्षात घेऊन संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या विस्तृत मुलाखती महिन्या-दोन महिन्याने सामनात देण्याचा परिपाठ ठेवला. इतर कोणीही घेऊ शकणार नाही, असं स्वातंत्र्य संजय राऊत यांनी या मुलाखतींच्या बाबतीत घेतले आणि बाळासाहेबांना अडचणीचे वाटणारे प्रश्नही विचारले आहेत. बाळासाहेबांनी हे प्रश्न संजय राऊत यांच्या मनातले नाहीत, सर्वसामान्य मराठी माणसाचे आहेत, असे समजून उत्तरे देऊन, सरसहा हाताळले, क्वचितच उत्तर देण्याचे त्यांनी टाळले, किंवा क्वचितच प्रश्नांना बगल दिली असे दिसते. एखाद्या दैनिकांत संपादकांच्या मॅरेथॉन मुलाखती वरचेवर येणे हा एकूण चमत्कारिकच प्रकार. पण ‘सामना’चे वैशिष्ट्य म्हणून त्याचा उल्लेख होऊ लागला. बाळासाहेबांचा बाणा रोखठोक बोलण्याचा! तशात मराठीचा घणाघाती वापर करण्याचा त्यांच्या स्वभाव. मुलाखतीत बोलताना एखादी शिवी वा बदनामीकारक विधान तोंडातून गेले तरी ते जसेच्या तसे छापा असा बाळासाहेबांचा आग्रह; त्यामुळे संजय राऊत यांच्या प्रश्नातही आडपडदा वा हातचे राखून न ठेवणे हा प्रकार नाही; त्यामुळे या मुलाखती वादळी व वादग्रस्तही ठरल्या. संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या एकूण ५२ मुलाखती त्यांच्यासाठी ते पंच्याहस्तीच्या पंधरा वर्षांत घेतल्या. पहिल्या दोन मुलाखती अनुक्रमे १९८७ व १९९२ मधील आहेत. परंतु पुढच्या पन्नास मुलाखती १ मे १९९४ पासून ३ जुलै २००१ या सात वर्षांतल्या आहेत. त्यात त्या त्या वेळच्या ज्वलंत समस्यांबाबतची बाळासाहेबांची मते त्यांच्या आक्रमक शैलीत व्यक्त झाली आहेत. या मुलाखतीच्या रूपाने बाळासाहेबांनी दीड हजारावर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. शिवसेना, हिंदुत्व, सरकार, भाजपा, समाजवादी, काँग्रेस, विरोधी पक्ष, निवडणुका, मतदार, दौरे, शिवसेनेतील फाटाफूट, बंडखोरी भाजपा-शिवसेनेतील तणाव, पत्रकारिता, मीडिया, कामगारक्षेत्र, राज्यघटना, लोकशाही, खंडणी, दहशत, गँगवार, भ्रष्टाचार, ठाकरे यांच्या कुटुंबातील वाद, अवैध मार्गाने संपत्तीची जमवाजमव, शिवसैनिकांचे वर्तन, मुंबईचे मराठीपण, झोपडपट्ट्या, भूमिपुत्रांवरील अन्याय, त्या त्या वेळेचे राजकीय वातावरण व गणित, गोवारीचे हत्याकांड, दंगली, बॉम्बस्फोट, देशाचे नेतृत्व, रिमोट कंट्रोल, शेतमालाचे भाव, श्रीमंतांचे मित्र झाल्याचा आरोप, नोकरशाहीचा नाकर्तेपणा, राजकीय संन्यास, कुपोषणाने मृत्यू, कॉन्व्हेंट शाळा, महागाई, आर्थिक दिवाळखोरी, पक्षहिंसा, पाकिस्तान, काश्मीर, कारगिल, श्रीलंका व लिट्टे, दुकानांवरील मराठी पाट्या, खिस्ती मिशनरी, मुसलमानांचा मताधिकार काढून घेण्याचा आग्रह, तहलका, इस्लामचे आक्रमण, मणिपूरमधील बंड, एन्रॉन, श्रीकृष्ण आयोग, राज-उद्धव यांचे संबंध, नेपाळमधील राजवंश हत्या इ. कितीतरी विषय या मुलाखतीमध्ये आले आहेत. विषय पुन:पुन्हा आले आहेत स्वत:बद्दलसुद्धा ठाकरे यांनी वेळोवेळी काही बोलकी विधाने केली आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू त्यातून स्पष्ट होतात. या मुलाखतींमधून आपल्या सर्वच प्रश्नांची समाधानकारक किंवा मनासारखी उत्तरे मिळावीत, ही अपेक्षा करणे योग्य नाही. पारदर्शकतेलाही व्यावहारिक मर्यादा असतात; त्यामुळे काही ठिकाणी ‘बीटवीन द लाईन्स( वाचावे लागते. तशा जागाही खूप आहेत आणि अर्थपूर्ण, मार्मिक आहेत. असं खूप काही या मुलाखतींतून समोर येतं. ते विचारांना चालना देतं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more