DR. KAMALKUMAR MAHAVAR

About Author


DR. KAMAL KUMAR MAHAWAR WAS BORN IN KOLKATA, INDIA. AFTER GRADUATING IN MEDICINE FROM KOLKATA MEDICAL COLLEGE IN 1996, HE OBTAINED HIS MS IN GENERAL SURGERY FROM THE PRESTIGIOUS PGIMER, CHANDIGARH. AFTER COMPLETING HIS POSTGRADUATE STUDIES FROM THE UNIVERSITY OF LIVERPOOL, DR. MAHAWAR WORKED AS A CONSULTANT GENERAL AND BARIATRIC SURGEON AT THE NATIONAL HEALTH SERVICE (CITY HOSPITALS SUNDERLAND NHS TRUST) IN LUCKNOW - ACTIVELY INVOLVED IN RESEARCH - FOR SEVERAL PRESTIGIOUS SCIENTIFIC JOURNALS - AND HIS COLUMN `ANTAGONIZER ON THE POPULAR WEB PLATFORM INDIA MEDICAL TIMES DEALS WITH ISSUES AFFECTING INDIAN HEALTHCARE IN VARIOUS WAYS. HE ALSO WRITES A BLOG FOR ETHEALTHWORLD.COM. BEING A PRACTICING MEDICAL DOCTOR HIMSELF, HE FOUND THE OPPORTUNITY TO REFLECT ON VARIOUS ETHICAL AND METHODOLOGICAL ISSUES PLAGUING HEALTHCARE IN INDIA AND CREATED `THE ETHICAL DOCTOR TO RAISE AWARENESS.

डॉ. कमल कुमार महावार यांचा जन्म भारतातील कोलकाता शहरात झाला. १९९६साली कोलकाता मेडिकल कॉलेजमधून वैद्यकिय क्षेत्रात पदवी प्राप्त करत, त्यांनी प्रतिष्ठित पीजीआयएमईआर, चंदीगड इथून जनरल सर्जरीमध्ये एमएस पदवी प्राप्त केली. लिव्हरपूल विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर, डॉ. महावार हे ळख्मधील नॅशनल हेल्थ सर्व्हिस (सिटी हॉस्पिटल्स सुंदरलॅन्ड एनएचएस ट्रस्ट) इथे कन्सल्टन्ट जनरल आणि बॅरिएट्रिक सर्जन म्हणून काम - संशोधनात सक्रियपणे सहभाग - अनेक प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नल्सचे – तसेच लोकप्रिय वेब प्लॅटफॉर्म इंडिया मेडिकल टाइम्सवरील त्यांचा `अ‍ॅन्टॅगोनायझर हा स्तंभ भारतीय आरोग्यसेवेवर विविधांगी परिणाम करणार्‍या विषयांवर आहे. ETHEALTHWORLD.COM.साठी ब्लॉग लिखाणदेखील ते करतात. स्वत: एक प्रॅक्टिसिंग मेडिकल डॉक्टर असल्यामुळे भारतातील आरोग्य सेवेला त्रास देणार्‍या विविध नैतिक आणि पद्धतशीर मुद्द्यांवर चिंतन करण्याची संधी त्यांना मिळताच ‘द एथिकल डॉक्टर’ची निर्मिती करून जनजागृती केली.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE ETHICAL DOCTOR Rating Star
Add To Cart INR 360

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more