* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
    JUNE 23 2022
  • ISBN : 9789394258983
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2022
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : EDUCATION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NATIONAL EDUCATION POLICY, 2020 IS A POLICY THAT SEEKS TO RADICALLY CHANGE THE INDIAN EDUCATION SYSTEM. IT HAS ITS UPS AND DOWNS, BUT COMMENTING ON THIS POLICY IS IMPORTANT FOR FLAWLESS IMPLEMENTATION OF THE POLICY. THEREFORE, A DETAILED THOUGHTFUL LAYOUT OF MANY ISSUES CAN BE SEEN IN THIS BOOK. IN ADDITION TO THE IMPORTANT PROVISIONS OF THE NATIONAL EDUCATION POLICY, THE INSTITUTIONAL RESPONSIBILITY OF VARIOUS INSTITUTIONS IN THE IMPLEMENTATION OF THE POLICY, THE WELCOME ASPECTS OF THE POLICY AND THE NEED FOR POLICY REDESIGN HAVE BEEN CLARIFIED BY DR. BHALBA VIBHUTE.
राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करू इाQच्छणारे धोरण आहे. त्यात जशा जमेच्या बाजू आहेत, तशाच उणिवाही आहेत. या धोरणावर भाष्य करणे धोरणाच्या दोषरहित अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे ठरते. म्हणून अनेक मुद्द्यांची सविस्तर विचारपूर्वक मांडणी या पुस्तकात पाहायला मिळते. ज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणातील महत्त्वाच्या तरतुदींसोबतच, धोरणांच्या अंमलबजावणीतील विविध संस्थांची संस्थात्मक जबाबदारी, धोरणातील स्वागतार्ह बाबी आणि धोरणाच्या पुनर्मांडणीची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOK #MEHTAPUBLISHINGHOUSE #RASHTRIYASHIKSHANDHORAN2020CHIKITSA #PROF.(DR.)BHALBAVIBHUTE #EDUCATION
Customer Reviews
  • Rating Starप्रा. शीतला जाधव

    शिक्षणातील समता, संधी, दर्जा गेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने काही अंशी साध्य केला. १९९० नंतर जागतिकीकरण आले आणि त्यातून शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा आली. यामागे आपला देश इतर देशांच्या तुलनेत मागे पडू नये, अशी भूमिका होती. अशा भूमिकेसाठी धोरणे महत्त्वची आहेत, पण धोरणे राबवण्यात आपलं अपयश लपलं आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणाची चिकित्सा आवश्यक आहे. नव्या धोरणात पंचसूत्री आहे, ज्यात परवडण्यासारखे शिक्षण आणि जबाबदारी हे नवे मुद्दे आहेत. पण त्याची अंमलबजावणी कशी होणार याबाबत साशंकता आहे, त्यासाठी या धोरणाची सर्वागीण चर्चा आवश्यक आहे. हे उद्दिष्ट डॉ. भालबा विभुते लिखित ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० चिकित्सा’ या पुस्तकातून साध्य होते. डॉ. के. कस्तुरीरंगन आयोगाने मनुष्यबळ विकास मंत्रालयास सादर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०१९ या अहवालावर बेतलेले ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२०, २९ जुलै, २०२०मध्ये लागू करण्यात आले. हे धोरण शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, विचार करण्यासारखे इतर महत्त्वाचे केंद्रीय मुद्दे आणि अंमलबजावणी अशा चार भागांत विभागलेले आहे. हे धोरण देशाच्या शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करणारे असून, ते २०४०पर्यंत पूर्णपणे अमलात आणले जाणार आहे. प्रचलित शिक्षण व्यवस्थेत खूप मोठय़ा प्रमाणात बदल करण्याचे या धोरणात निश्चित केले आहे. शालेय शिक्षणाचे १०+२+३ हे प्रारूप बदलून त्याऐवजी ५+३+३+४ हे प्रारूप स्वीकारले आहे. अभ्यासक्रम, व्यवस्थापन, अध्ययन-अध्यापन, मूल्यांकन, शिक्षणाचे नियमन आणि संस्थात्मक मूल्यमापन आणि मूल्यांकन यात बदल सुचवले आहेत. उच्च शिक्षणाची प्रचलित संस्थात्मक रचनाच हे शिक्षण धोरण पूर्णार्थाने नाकारते. बहुशाखीय शिक्षण पद्धतीचा स्वीकार, संशोधनास प्राधान्य, उच्च शिक्षण नियामक संस्थांची पुनर्रचना ही या धोरणाची महत्त्वाची वैशिष्टय़े. प्रेरित, उत्साही आणि सक्षम शिक्षक शिक्षणातील महत्त्वाचा घटक असतो याची दखलही या धोरणात घेतली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करू इच्छिणारे धोरण आहे. त्यात जशा जमेच्या बाजू आहेत, तशाच उणिवाही आहेत. डॉ. के. कस्तुरीरंगन आयोगाचा अहवाल प्रचलित शिक्षण व्यवस्थेवर फारसे संशोधन न करता, आपणास हवी तशी भारतीय शिक्षणाची उद्दिष्टे ठरवतो आणि ती प्रत्यक्षात येण्यासाठी मार्ग सुचवतो. तर २०२०चे धोरणही आम्ही ठरवले ते योग्य आणि ते अमलात आणणार या दिशेने वाटचाल करते. म्हणून या धोरणावर भाष्य करणे धोरणाच्या दोषरहित अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे ठरते. वाचकांनाही धोरणाची माहिती होणे गरजेचे ठरते. या दुहेरी भूमिकेतील २०२०च्या धोरणाची मांडणी या पुस्तकात केली आहे. खरे तर या धोरणावर खूप मोठय़ा प्रमाणावर चर्चा व्हावयास हवी होती. हे धोरण करोना महासाथीच्या काळात जाहीर झाल्याने त्यावर व्हावी तशी चर्चा झालीच नाही. धोरणाच्या जमेच्या बाजू शासनाच्या वतीने समाजासमोर आल्या; परंतु त्याची चिकित्सा मात्र फारच कमी झाली. म्हणून काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मधील महत्त्वाच्या तरतुदींवर प्रकाश टाकते, तसेच धोरणाची वैशिष्टय़े स्पष्ट करते. धोरण अंमलबजावणीत विविध संस्थांची संस्थात्मक जबाबदारी स्पष्ट करते. धोरणातील स्वागतार्ह बाबींची नोंद घेत असतानाच धोरणाची चिकित्सा करण्यावर लक्ष केंद्रित करते. या धोरणाच्या पुनर्माडणीची आवश्यकता स्पष्ट करते. नव्या धोरणाच्या काही तरतुदींचा अंमलबजावणी मसुदा स्पष्ट झाल्याशिवाय धोरणाबाबतचा गोंधळ कमी होणार नाही. नव्या धोरणात मेंदू आधारित अध्ययनाचा आधार घेऊन शिक्षणाचा आकृतिबंध बदलला गेला असल्याचे आढळते. सातत्यपूर्ण मूल्यमापन हे शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे, पण ते कशा रीतीने अवलंबले जाईल, हे नवीन धोरणात स्पष्ट केलेले नाही, त्यामुळे येणाऱ्या काळातील धोरणाच्या अंमलबजावणीतूनच धोरण स्पष्ट होत जाईल, याची जाणीव हे पुस्तक करून देते. आजवर एकशाखीय अभ्यासक्रमामुळे अनेक तोटे अनुभवाला आले आहेत. बहुशाखीय अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांपुढे पर्याय उपलब्ध असतील, त्यामुळे त्यांच्या कलाने त्यांना क्षेत्र निवड करता येईल. पण त्याच वेळी शालेय नोंदणीचा दर पन्नास टक्क्यांपर्यंत न्यायचा असेल तर धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य आणि केंद्र सरकारात समन्वयाची गरज आहे. एकुणातच नव्या शैक्षणिक धोरणाबाबत अजूनही गोंधळाचं वातावरण आहे. त्यासाठी सर्व शैक्षणिक घटकांनी या धोरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने डॉ. भालबा विभुते यांचं पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.