C. NORTHCOTE PARKINSON, M. K. RUSTOMJI, S. PAVRI

About Author


NA

हे सुप्रसिद्ध लेखक असून त्यांचं शिक्षण सेंट पीटर स्वूÂल, न्यू यॉर्वÂ व इम्यनुएल कॉलेज, वेंÂब्रिज इथे झालं. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी वेंÂब्रिज महाविद्यालयाचं सदस्यत्व मिळवण्याचा मान त्यांनी पटकावला. इलिऑनिस, लिव्हरपूल, हार्वर्ड आणि मलाया यांसारख्या देशोदेशींच्या विद्यापीठांमध्ये त्यांनी व्याख्याते म्हणून काम केलं. त्यांची ‘पार्विÂन्सन लॉ’ व अशी इतर अनेक पुस्तवंÂ जगभरात लोकप्रिय आहेत. यांची बरीच पुस्तवंÂ अमेरिका, इंग्लंड, प्रÂान्स, जपान इत्यादी देशांमध्ये प्रकाशित झाली असून ती अत्यंत लोकप्रिय ठरली आहेत. रुस्तुमजी यांची सहा पुस्तवंÂ ‘हिब्रू’ या इस्रायलच्या राष्ट्रभाषेतही प्रसिद्ध झाली आहेत. ‘चिल्ड्रन – हाउ टु मॅनेज देम, नाउ दॅट यू हॅव गॉट देम’ हे रुस्तुमजी- पार्विÂन्सन या जगप्रसिद्ध लेखक-जोडीचं पाचवं पुस्तक. अवघड व किचकट माहिती-विचार, अत्यंत सोप्या भाषेत, स्पष्टपणे सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याची कला रुस्तुमजी यांना लाभली आहे. हे पुस्तक जगभरात इतर अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे. रुस्तुमजी हे ‘टेल्को’ उद्योगसमूहाचे अनेक वर्षं वरिष्ठ व्यवस्थापक होते. व्यवस्थापन-शास्त्रातील त्यांच्या दोन पुस्तकांना, व्यवस्थापन-क्षेत्रातील ‘एस्कॉर्ट बुक अ‍ॅवॉर्ड’ हा सर्वोच्च बहुमान दोन वेळा मिळाला आहे. रुस्तुमजींच्या व्यवस्थापन-कलेवरील एका पुस्तकावर भारत सरकारने काढलेल्या एका चित्रपटालाही बक्षीस मिळालं आहे. हे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व बालमानसतज्ज्ञ असून, अनेक विख्यात शाळांच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
TUMHI AANI TUMACHI MULA Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more