Sushmita Banerjee

About Author

Death Date : 04/09/2013


SUSHMITA BANERJEE, ALSO KNOWN AS SUSHMITA BANDHOPADHYAY AND SAYEDA KAMALA, WAS A WRITER AND ACTIVIST FROM INDIA. HER WORKS INCLUDE THE MEMOIR KABULIWALAR BANGALI BOU BASED ON HER EXPERIENCE OF MARRYING AN AFGHAN AND HER TIME IN AFGHANISTAN DURING TALIBAN RULE.

सुस्मिता बंदोपाध्याय आणि सईदा कमला या नावानेही त्या प्रसिद्ध होत्या. कोलकता येथे मध्यमवर्गीय कुटुंबात सुस्मिता यांचा जन्म झाला. अफगाणिस्तानमधील जानबाज खान या व्यावसायिकाशी २ जुलै, १९८८मध्ये विवाहबद्ध होऊन त्या अफगाणिस्तानात पोहोचल्या. घरच्यांचा विरोध पत्करून केलेल्या या विवाहामध्ये आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या अनुभवाने खचून न जाता त्यांनी तेथे जुळवून घेतले. पण त्याच वेळी त्यांनी बुरखा घालण्यास आणि तालिबानी फतव्यास कडाडून विरोध केला. ना\सगचे शिक्षण घेतलेल्या सुस्मिता यांनी तेथील खेड्यात स्त्रियांसाठी एक क्लिनिक सुरू केले. त्यांच्या या समाजोपयोगी कामामुळे तालिबानींनी त्यांच्यावर दबाव वाढवण्यास सुरुवात केली. यातूनच ५ सप्टेंबर, २०१३ रोजी तालिबानी दहशतवाद्यांनी त्यांची त्यांच्या घराच्याबाहेर गोळ्या घालून हत्या केली. सुस्मिता यांनी १९९५ साली आपल्या वैवाहिक जीवनावर आधारित लिहिलेली ‘काबुलीवाल्याची बंगाली बहू’ ही पहिली कादंबरी खूप गाजली. २००३ साली त्यावर ‘एस्केप प्रÂॉम तालिबान’ हा हिंदी चित्रपटही प्रर्दिशत झाला होता. त्यानंतर ‘तालिबानी अत्याचार : देश व विदेश’, ‘मुल्ला ओमर, तालिबान व मी’ (२०००), ‘एक बोलही खोटा नाही’ (२००१) या पुस्तकांनाही लोकप्रियता लाभली.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KABULIWALYACHI BANGALI BAYKO Rating Star
Add To Cart INR 140

Shop by

Category Price
      
Latest Edition Year
Author

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more