MANJUSHRII GOKHALE

About Author

Birth Date : 21/11/1957


इचलकरंजीतील द मॉडर्न हायस्कुलमध्ये सहायक शिक्षिका म्हणून, तर कोल्हापूरमधील महाराष्ट्र हायस्कुल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यभार सांभाळला आहे. कादंबऱ्या, कथासंग्रह, कवितासंग्रह, पाकशास्त्र, प्रवसावर्णन वगैरे वेगवेगळ्या साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले आहे. त्यांची २५ पुस्तके प्रकाशित आहेत. शिशिरसांज, रानगंध या नावाने त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. फुलपाखरांचा गाव आणि आकृतीगंध ही दोन चारोळ्यांची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. स्वस्तिकाची फुले, हास्यमेव जयते, बुफे आणि फेफ आणि ओंजळीतले मोती या कथासंग्रहांचे त्यांनी लेखन केले आहे. अंधाराच्या सावल्या, अग्निलाघव या रहस्यकथासंग्रहाबरोबरच रंगपश्चिमा हे प्रवासवर्णनही प्रसिद्ध झाले आहे. फास्ट-ब्रेकफास्ट नावाचे पाककृतींवर आधारित पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. अमृतसंदेश माहात्म्य या आध्यात्मिक पुस्तकाच्या लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी सासूची माया या मराठी चित्रपटासाठी कथा-पटकथा व संवादलेखनही केले आहे. अरुण दाते यांचा शुक्रतारा आणि शब्दसुरांच्या झुल्यावर या कार्यक्रमांमध्ये त्यांनी निवेदन केले आहे. तुकयाची आवली या कादंबरीला २००८मध्ये तुका म्हणे पुरस्कार आणि भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील वाचनवेध पुरस्कार जोहार मायबाप जोहार या पुस्तकाला खामगाव येथील कै. वरणगावकर स्मृतिपुरस्कार २०१२, संत गाडगेमहाराज अध्यासन पुरस्कार २०१४, तसेच ज्ञानसुर्याची सावली या कादंबरीला अश्वमेध ग्रंथालय आयोजित अक्षरगौरव पुरस्कार २०१४, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे किर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पारितोषिक २०१६ मिळाले आहे.

Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SAMARPAN Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
राजेंद्र देशमुख, अमरावती.

जी. बी. देशमुख यांनी लिहीलेले "छाटितो गप्पा " हे पुस्तक वाचायला घेतले. थोडा वेळ वाचन करु हा उद्देश होता. पुस्तक वाचण्यास सुरूवात केली. या पुस्तकामध्ये ४५ वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये लेखकाने केलेली मांडणी वाखाणण्या जोगी आहे. प्रत्येक ोष्ट वाचण्यास सुरूवात केल्या पासुन ती संपेपर्यंत तिच्या मधील उत्कंठा क्षणोक्षणी वाढत जाते. विषयाचा शेवट होईपर्यंत वाचन बंद करण्याची इच्छा होत नाही. प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी काहीही संबंध नाही. लेखकाने शब्दांची अशी मांडणी केली आहे की प्रत्येक घटना आपला समोर घडत आहे व आपण त्याचे साक्षीदार आहोत अश्या प्रकारचा जिवंतपणा जाणवतो. `तोंडाचा कुंचला` ह्या गोष्टितील खर्रा व पान खाऊन, पीचकारी मारून रस्ते रंगवण्याच्या गुणाचे असेही वर्णन होऊ शकते हे कल्पनेच्या पलिकडचे आहे. ४५ गोष्टी पूर्ण होईपर्यंत वाचन सोडण्याची माझी इच्छा झाली नाही. मधे काही कामानिमीत्य ब्रेक घ्यावा लागला, तरी पण `ब्रेक के बाद` परत वाचन सुरू करून पुस्तक पूर्ण होई पर्यंत सोडले नाही. शब्दांमधे जिवंतपणा आणल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. ...Read more