DR. SAJJAN SINGH YADAV

About Author


SAJJAN YADAV IS A RESEARCHER AND BUREAUCRAT. HE IS AN OFFICER OF THE INDIAN ADMINISTRATIVE SERVICE AND IS CURRENTLY ADDITIONAL SECRETARY IN THE DEPARTMENT OF EXPENDITURE, MINISTRY OF FINANCE, GOVERNMENT OF INDIA. HE HAS A RICH AND DIVERSE EXPERIENCE OF TWENTY-SEVEN YEARS IN POLICY FORMULATION AND IMPLEMENTATION, AS WELL AS IN SENIOR LEADERSHIP POSITIONS IN THE GOVERNMENT OF INDIA AND STATE GOVERNMENTS. IN THE FEDERAL GOVERNMENT, BESIDES THE MINISTRY OF FINANCE, HE HAS WORKED IN THE MINISTRY OF HEALTH AND FAMILY WELFARE, MINISTRY OF WOMEN AND CHILD DEVELOPMENT, MINISTRY OF HEAVY INDUSTRY AND PUBLIC ENTERPRISES AND MINISTRY OF CORPORATE AFFAIRS. HE HAS SERVED THE GOVERNMENT IN SECTORS INCLUDING FINANCE, HEALTH, NUTRITION, WATER, SANITATION, FOOD, PUBLIC DISTRIBUTION, URBAN DEVELOPMENT, MUNICIPAL ADMINISTRATION, INFORMATION AND PUBLICITY, ART, CULTURE, TOURISM AND COMMERCIAL TAXES. IMPORTANT ASSIGNMENTS HANDLED BY HIM IN THE PAST INCLUDE TENURES AS MISSION DIRECTOR OF THE NATIONAL NUTRITION MISSION (POSHAN ABHIYAN), DIRECTOR OF THE NATIONAL RURAL HEALTH MISSION, COMMISSIONER OF FOOD AND SUPPLIES IN DELHI, CEO, DELHI JAL BOARD, COMMISSIONER, VAT, AND COMMISSIONER OF THE EAST DELHI MUNICIPAL CORPORATION. HE EARNED HIS DOCTORATE IN PUBLIC HEALTH FROM THE PRESTIGIOUS LONDON SCHOOL OF HYGIENE AND TROPICAL MEDICINE (LSHTM). HIS RESEARCH WAS PUBLISHED IN LEADING MEDICAL PEER-REVIEWED JOURNALS, MAGAZINES AND NEWSPAPERS. THESE INCLUDE BMC PUBLIC HEALTH, INDIAN JOURNAL OF MEDICAL RESEARCH, INDIAN JOURNAL OF OCCUPATIONAL AND ENVIRONMENTAL MEDICINE, INTERNATIONAL JOURNAL OF MEDICINE AND PUBLIC HEALTH, JOURNAL OF CRITICAL REVIEWS, LSHTM RESEARCH ONLINE, GLOBAL HEALTH ACTION, YOJANA, ECONOMIC TIMES, DNA, MILLENNIUM POST AND PIONEER. HE HAS BEEN CONFERRED MANY AWARDS FOR EXCEPTIONAL WORK IN PUBLIC SERVICE, INCLUDING THE NATIONAL E-GOVERNANCE AWARD 2017-2018 AND THE PRESIDENT OF INDIAS MEDAL FOR OUTSTANDING WORK IN CENSUS OPERATIONS.

श्री. सज्जन सिंग यादव हे एक संशोधक आणि सरकारी अधिकारी आहेत. ते भारतीय प्रशासन सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत असून, सध्या ते भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागातले अतिरिक्त सचिव आहेत. त्यांना धोरण निश्चिती आणि अंमलबजावणी क्षेत्रातील २७ वर्षांचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण अनुभव आहे. तसेच भारत सरकार आणि राज्य सरकारांमध्ये नेतृत्त्वाची वरिष्ठ पदे त्यांनी सांभाळलेली आहेत. सरकारच्या वित्त मंत्रालयाव्यतिरिक्त आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय, महिला व शिशुविकास मंत्रालय, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्रालय, आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, यामध्येही त्यांनी काम केलेले आहे. वित्त, आरोग्य, पोषण, जल, स्वच्छता, अन्न, सार्वजनिक वितरण, नागरी / शहर विकास, महापालिका प्रशासन, माहिती व प्रसारण, कला, सांस्कृतिक विभाग, पर्यटन, आणि व्यावसायिक कर, अशा अनेक विभागात त्यांनी सरकारची सेवा बजावली आहे. त्यांनी पूर्वी पार पाडलेल्या महत्त्वाच्या कामगिरीत पुढील कामांचा समावेश आहे – संचालक – राष्ट्रीय पोषण अभियान, संचालक- ग्रामीण आरोग्य अभियान, आयुक्त-अन्नधान्य आणि पुरवठा विभाग, दिल्ली, दिल्ली जल बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त - मूल्यवर्धित कर (VAT) विभाग, आणि आयुक्त, पूर्व दिल्ली महानगरपालिका. लंडन स्कूल ऑफ हायजिन अॅन्ड ट्रॉपिकल मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेकडून त्यांनी सार्वजनिक आरोग्य या विषयांत डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेली आहे. ज्या विज्ञान पत्रिकांमध्ये, त्याच क्षेत्रातल्या जाणकारांकडून गुणवत्तेची पडताळणी केल्यानंतरच संशोधन-लेख प्रसिद्ध केले जातात, अशा प्रमुख विज्ञान-पत्रिकांमध्ये, तसेच मासिके आणि वर्तमानपत्रांमध्ये, त्यांचा शोधनिबंध प्रकाशित केला गेला होता. यात पुढील जर्नल्सचा समावेश आहे, बी.एम.सी.- पब्लिक हेल्थ, इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च, इंडियन जर्नल ऑफ ऑक्युपेशनल अँड एन्व्हायरनमेंटल मेडिसिन, इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ, जर्नल ऑफ क्रिटिकल रिव्ह्यूज, LSHTML म्हणजे लंडन स्कूल ऑफ हायजिन अॅन्ड ट्रॉपिकल मेडिसिन यांचे रिसर्च ऑनलाईन, ग्लोबल हेल्थ अॅक्शन, योजना, दि इकॉनॉमिक टाइम्स, डीएनए, मिलेनियम पोस्ट, आणि दि पायोनियर. सार्वजनिक सेवा क्षेत्रात त्यांनी केलेल्या असामान्य कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. या पुरस्कारांमध्ये नॅशनल इ-गव्हर्नन्स अॅवॉर्ड २०१७ - २०१८ आणि प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया यांच्यातर्पेÂ ‘आऊटस्टँडिंग वर्क इन सेन्सस ऑपरेशन्स साठी दिल्या जाणार्या मेडल चा समावेश आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more