DR. MANASI KELKAR

About Author


DR. MANASI KELKAR WORKED AS THE SENIOR PROJECT COORDINATOR FROM JANUARY 2018 TO 2024 ON THE PROJECT SURVEY OF DIALECTS OF MARATHI IN COLLABORATION WITH RAJYA MARATHI VIKAS SANSTHA, MUMBAI AND DECCAN COLLEGE, PUNE. SHE HOLDS A DOCTORATE IN LINGUISTICS FROM JAWAHARLAL NEHRU UNIVERSITY THESIS WAS ON THE SOCIOLINGUISTIC STUDY OF TRANSPLANTED LANGUAGES: THANJAVUR MARATHI. WHILE PURSUING HER GRADUATION IN SANSKRIT FROM RUIA COLLEGE, MUMBAI (UNIVERSITY GOLD MEDALIST) AND POST-GRADUATION IN LINGUISTICS FROM DECCAN COLLEGE, PUNE (FIRST RANK), SHE PASSED SIX EXAMINATIONS IN GERMAN LANGUAGE FROM MAX MUELLER BHAVAN, MUMBAI. AT THE SAME TIME, SHE HAS A GOOD KNOWLEDGE OF THE TAMIL LANGUAGE AND HAS BEEN WORKING ON TRANSLATIONS FROM ENGLISH AND TAMIL TO MARATHI FOR THE PAST FEW YEARS. HER AREAS OF INTEREST INCLUDE THE STUDY OF CONTACT LANGUAGES, THE FIELDWORK COLLECTION AND ANALYSIS OF LINGUISTIC MATERIAL, AND THE COMPARATIVE STUDY OF LANGUAGES. SHE HAS BEEN CONTINUOUSLY DELIVERING LECTURES FOR THE LAST TWO YEARS AS AN EXPERT GUIDE ON THE TOPICS OF DIALECT SURVEY METHOD AND SELECTION OF RESEARCH METHOD FOR MAHARASHTRA STATE FACULTY DEVELOPMENT AGENCY (MSFDA).

डॉ. मानसी केळकर या राज्य मराठी विकास संस्था,मुंबई आणि डेक्कन कॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणार्‍या मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण: प्रतिमांकन आणि आलेखन या प्रकल्पावर जानेवारी २०१८ पासून २०२४ पर्यंत वरिष्ठ प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून भाषाशास्त्र विषयात डॉक्टरेट पदवी संपादन केली असून त्यांचा संशोधनाचा विषय प्रत्यारोपित भाषांचा समाजभाषावैज्ञानिक अभ्यास: तंजावर मराठी हा होता. रुईया महाविद्यालय, मुंबई येथून संस्कृत या विषयात पदवी (विद्यापीठ सुवर्णपदकाच्या मानकरी) तसेच डेक्कन कॉलेज, पुणे येथून भाषाशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी (सुवर्णपदक) अशा तर्‍हेने शैक्षणिक वाटचाल करत असतानाच त्यांनी मॅक्स म्युलर भवन, मुंबई येथून जर्मन भाषेतील सहा परिक्षा उत्तीर्ण झाल्या. त्याचबरोबर विवाहामुळे संपर्कात आलेल्या तमिळ भाषेचेही उत्तम ज्ञान असून गेली काही वर्षे इंग्रजी तसेच तमिळ भाषेतून मराठी भाषेत भाषांतराचे काम करत आहेत. संपर्क भाषांचा अभ्यास, भाषिक सामग्रीचे क्षेत्रपाहणीद्वारे संकलन आणि त्याचे विश्लेषण, भाषांचा तौलनिक अभ्यास हे त्यांचे अभ्यासविषय आहेत. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था ( MSFDA) तर्फे गेली दोन वर्षे सातत्याने बोलीभाषा सर्वेक्षण पद्धती तसेच संशोधन पद्धतीची निवड या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून व्याख्यान देत आहेत. भाषा संशोधनासोबतच विविध भाषेतील साहित्याचा आस्वाद घेण्याची आवड तसेच निवेदन यांमध्ये विशेष रूची आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
NADIMUKH Rating Star
Add To Cart INR 360
SARAN Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more