ANURAG TRIPATHI

About Author


ANURAG TRIPATHI IS AN ALUMNUS OF THE INDIAN SCHOOL OF BUSINESS WITH A COURSE IN ADVANCED CREATIVE WRITING FROM THE UNIVERSITY OF OXFORD, DEPARTMENT FOR CONTINUING EDUCATION. A KEEN OBSERVER OF PEOPLE AND A MASTER RACONTEUR, HE DRAWS ON HIS VAST RESERVOIR OF LIFE EXPERIENCES. AS AN ERSTWHILE INVESTMENT BANKER, HE PREVIOUSLY LED THE RETAIL EQUITY BUSINESS FOR A FINANCIAL COMPANY IN INDIA. THIS NOVEL, HIS SECOND, IS A FICTIONALISED NO-HOLDS-BARRED ACCOUNT OF WHAT GOES ON BEHIND THE SCENES IN THE FINANCIAL ADVISORY BUSINESS IN INDIA. HOWEVER, THAT STILL HASN’T DETERRED HIM FROM CONTINUING TO INVEST IN THE INDIAN STOCK MARKETS FOR THE LAST TWENTY YEARS. HIS DEBUT NOVEL ON THE ART MARKET IN INDIA WAS NOMINATED FOR THE RAYMOND CROSSWORD BOOK AWARDS IN 2017. DALAL’S STREET IS HIS SECOND NOVEL. A MEMBER OF THE SINGAPORE WRITER’S GROUP, ANURAG NOW LIVES IN THE ‘LION CITY’, ALONG WITH HIS WIFE. BOTH ARE KEEN SCUBA DIVERS, WHO LIKE TRAVELLING AND EXPLORING THE WORLDS LESSER KNOWN.

अनुराग त्रिपाठी हे इंडियन स्कूल ऑफ बिझनेस चे माजी विद्यार्थी असून त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी ललित लेखनसंबंधी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. विलक्षण निरीक्षण क्षमता आणि कथनकलेचे उत्तम जाणकार म्हणून ते आपल्या समृद्ध आयुष्याच्या अनुभवसाठ्यावर आधारित कथा मांडतात. पूर्वी गुंतवणूक बँकिंग क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी भारतातील एका वित्तीय संस्थेच्या रिटेल इक्विटी व्यवसायाचे नेतृत्व केले होते. त्यांची ही दुसरी कादंबरी आर्थिक सल्लागार व्यवसायाच्या पडद्यामागील वास्तवाचे काल्पनिक पण बेधडक चित्रण करते. तरीदेखील, मागील वीस वर्षांपासून ते भारतीय शेअर बाजारात सातत्याने गुंतवणूक करत आहेत. भारताच्या कला बाजारावर आधारित त्यांची पहिली कादंबरी २०१७ मध्ये रेमंड क्रॉसवर्ड बुक अवॉर्डसाठी नामांकित झाली होती.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DALAL"S STREET Rating Star
Add To Cart INR 420

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more