TUSHAR GANDHI

About Author


TUSHAR ARUN GANDHI (BORN: JANUARY 17, 1960 IN MUMBAI) IS THE GREAT-GRANDSON OF MAHATMA GANDHI AND THE SON OF JOURNALIST ARUN GANDHI. HE WAS BORN IN A TRAIN BETWEEN MUMBAI AND KOLKATA AND SPENT HIS CHILDHOOD IN SANTA CRUZ.

तुषार अरुण गांधी (जन्म:१७ जानेवारी, १९६० मुंबई येथे) हे महात्मा गांधींचे पणतू आणि पत्रकार अरुण गांधी यांचे सुपुत्र आहेत़ मुंबई आणि कोलकाता याच्या दरम्यान गाडीतच त्यांचा जन्म झाला़ त्यांचे बालपण सांताक्रूझमध्ये गेले. मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली़ १९९६ मध्ये कटक येथील बँक ऑफ इंडियाच्या तिजोरी मध्ये चुकून राहिलेला महात्मा गांधींचा रक्षाकलश सापडला़ सुप्रीम कोर्टाच्या परवानगीने त्यांनी या कलशाचे त्रिवेणीसंगमात ३० जानेवारी १९९७ रोजी विसर्जन केले़ त्याच वर्षी त्यांनी महात्मा गांधी प्रतिष्ठानची स्थापना केली. ते या प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आहेत़ लेट्स किल गांधी या पुस्तकात त्यांनी महात्माजींच्या वधासाठी ब्राह्मणांना दोष दिला़ टीकाकारांच्या मते या पुस्तकामुळे सर्वच ब्राह्मणांची बदनामी झाली आहे़ तुषार गांधी मात्र ठामपणे म्हणतात, की त्यांनी केलेले दोषारोप सर्व ब्राह्मणांना नव्हे, तर केवळ सतत माझ्या पणजोबांच्या जिवावर उठलेल्या पुण्यातील ब्राह्मणांच्या एका विशिष्ट गटाला उद्देशून आहेत़ २००५ साली त्यांनी दांडीयात्रेच्या ७५ व्या स्मरणदिनी पुन्हा एकदा २४१ मैलांची दांडीयात्रा काढली़ त्यांच्याच प्रयत्नांमुळे दांडीयात्रेचा साबरमती ते दांडीचा हा मार्ग राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा ठरवण्यात आला़ तुषार यांचे सध्या वास्तव्य मुंबई येथे पत्नी सोनल, मुलगा विवेन व मुलगी कस्तुरी यांच्या समवेत आहे.
Sort by
Show per page
Books not found in this category.

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more