TUSHAR GANDHI

About Author


TUSHAR ARUN GANDHI (BORN: JANUARY 17, 1960 IN MUMBAI) IS THE GREAT-GRANDSON OF MAHATMA GANDHI AND THE SON OF JOURNALIST ARUN GANDHI. HE WAS BORN IN A TRAIN BETWEEN MUMBAI AND KOLKATA AND SPENT HIS CHILDHOOD IN SANTA CRUZ.

तुषार अरुण गांधी (जन्म:१७ जानेवारी, १९६० मुंबई येथे) हे महात्मा गांधींचे पणतू आणि पत्रकार अरुण गांधी यांचे सुपुत्र आहेत़ मुंबई आणि कोलकाता याच्या दरम्यान गाडीतच त्यांचा जन्म झाला़ त्यांचे बालपण सांताक्रूझमध्ये गेले. मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली़ १९९६ मध्ये कटक येथील बँक ऑफ इंडियाच्या तिजोरी मध्ये चुकून राहिलेला महात्मा गांधींचा रक्षाकलश सापडला़ सुप्रीम कोर्टाच्या परवानगीने त्यांनी या कलशाचे त्रिवेणीसंगमात ३० जानेवारी १९९७ रोजी विसर्जन केले़ त्याच वर्षी त्यांनी महात्मा गांधी प्रतिष्ठानची स्थापना केली. ते या प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आहेत़ लेट्स किल गांधी या पुस्तकात त्यांनी महात्माजींच्या वधासाठी ब्राह्मणांना दोष दिला़ टीकाकारांच्या मते या पुस्तकामुळे सर्वच ब्राह्मणांची बदनामी झाली आहे़ तुषार गांधी मात्र ठामपणे म्हणतात, की त्यांनी केलेले दोषारोप सर्व ब्राह्मणांना नव्हे, तर केवळ सतत माझ्या पणजोबांच्या जिवावर उठलेल्या पुण्यातील ब्राह्मणांच्या एका विशिष्ट गटाला उद्देशून आहेत़ २००५ साली त्यांनी दांडीयात्रेच्या ७५ व्या स्मरणदिनी पुन्हा एकदा २४१ मैलांची दांडीयात्रा काढली़ त्यांच्याच प्रयत्नांमुळे दांडीयात्रेचा साबरमती ते दांडीचा हा मार्ग राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा ठरवण्यात आला़ तुषार यांचे सध्या वास्तव्य मुंबई येथे पत्नी सोनल, मुलगा विवेन व मुलगी कस्तुरी यांच्या समवेत आहे.
Sort by
Show per page
Books not found in this category.

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more